ग्राहक तक्रार क्रमांक: 183/2011
( निकालीपत्र पारीत द्वारा- श्रीमती जयश्री येंडे, मा.सदस्या)
::निकालपत्र::
(पारीत दिनांक –21 मार्च,2012 )
1. उभय अर्जदार/तक्रारदार यांनी ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 अन्वये प्रस्तूत तक्रार मंचासमक्ष दाखल केली आहे.
2. उभय अर्जदार/तक्रारदार यांचे तक्रारीतील संक्षीत लेखी कथना नुसार, यातील गैरअर्जदार/विरुध्दपक्षाचा शेतीचे अकृषक वापरामध्ये रुपांतरण करुन भूखंड विक्रीचा व्यवसाय आहे. उभय अर्जदारांनी गैरअर्जदाराशी नागपूर ये्थे संपर्क साधून गैरअर्जदाराचे हिंगणा येथील मौजा मुरझरी येथील ले आऊट मधील भूखंड क्रमांक 88, आराजी 2560.002 चौरसफूट, प.ह.नं.77, शेत क्रमांक- 20-ए व 20-बी एकूण भूखंडाची किंमत रुपये-6,91,201/- मध्ये विकत घेण्याचा करार दिनांक 02.03.2009 रोजी केला. करारा प्रमाणे, कराराचे वेळी भूखंडाची आवंटीत रक्कम म्हणून रुपये-1,72,800/-गैरअर्जदार यांचेकडे जमा केले. तसेच उर्वरीत रक्कम रुपये-5,18,401/-प्रतीमाह रुपये-21,600/- प्रमाणे 24 महिन्यात दिनांक-02.03.2009 ते 02.02.2011 या कालावधीत गैरअर्जदारास अदा करावयाची होती. उभय तक्रारदार यांनी दिनांक-25.01.2010 पर्यंत भूखंडापोटी एकूण रक्कम रुपये-3,52,100/- गैरअर्जदारास अदा केली होती. दिनांक-25.01.2010 नंतर तक्रारदारांना आर्थिक अडचणीमुळे गैरअर्जदारास रक्कम अदा करणे शक्य नसल्याने, तक्रारदार यांनी दिनांक 25.10.2010 रोजी गैरअर्जदारास पत्र देऊन उर्वरीत भूखंडाची रक्कम भरण्यास असमर्थता दर्शविली व तक्रारदार यांनी, गैरअर्जदारास भूखंडापोटी अदा केलेली संपूर्ण रक्कम परत करावी अशी विनंती केली. त्यानुसार गैरअर्जदाराने तक्रारदार यांना दिनांक 15.12.2010 रोजी रुपये-2,64,075/- एवढया रकमेचा धनादेश परत केला.
ग्राहक तक्रार क्रमांक: 183/2011
परंतू भूखंडापोटी भरलेल्या रकमे पैकी रुपये-88,025/- एवढी रक्कम तक्रारदार यांना परत केली नाही. वास्तविक पाहता करारामध्ये भूखंडाची नोंदणी रद्य केल्या नंतर रुपये-88,025/- एवढी रक्कम कपात करण्यात येईल असे कुठेही नमुद नसताना, गैरअर्जदाराने सदरची रक्कम कपात केलेली आहे आणि ही गैरअर्जदाराचे सेवेतील त्रृटी आहे
3. म्हणून उभय तक्रारदार यांनी गैरअर्जदार कडून तक्रारदार यांना रुपये-88,025/- एवढी रक्कम 24% व्याजासह परत मिळावी. तक्रारदार यांना झालेल्या मानसिक, शारिरीक व आर्थिक त्रासा बद्यल रुपये-1,00,000/- आणि तक्रारीचा खर्च म्हणून रुपये-25,000/- मिळावेत अशी मागणी तक्रारीद्वारे केली.
4. गैरअर्जदाराने मंचा समक्ष आपला लेखी जबाब प्रतिज्ञालेखावर सादर केला. गैरअर्जदाराने उभय तक्रारदार यांनी त्यांचेकडून तक्रारीत नमुद केल्या प्रमाणे भूखंड खरेदी करण्याचा करार केल्याची बाब मान्य केली. तसेच उभय तक्रारदार यांनी, गैरअर्जदार यांना दिनांक-25.01.2010 पर्यंत भूखंडाचे रकमेपैकी रुपये-3,52,100/- एवढी रक्कम अदा केल्याची बाब सुध्दा मान्य केलेली आहे. तसेच उर्वरीत रक्कम करारा प्रमाणे अदा करावयाची होती ही बाब उभय पक्षांमध्ये ठरली होती. गैरअर्जदाराचे कथना नुसार, तक्रारदार यांनी दिनांक-25.01.2010 रोजीचे पत्रान्वये आर्थिक अडचणीमुळे ते भूखंडाची उर्वरीत रक्कम भरण्यास असमर्थ असल्याचे कळवून, सदर भूखंडाची नोंदणी रद्य करुन, भूखंडापोटी भरलेली रक्कम परत करावी अशी विनंती केली होती. त्यानुसार गैरअर्जदाराने दिनांक-15.12.2010 रोजी धनादेशाद्वारे रुपये-2,64,075/- एवढी रक्कम तक्रारदार यांना अदा केली होती. वास्तविक पाहता तक्रारदार यांनी सदर धनादेश स्विकारते वेळी कुठलीही हरकत नोंदविली नाही.
ग्राहक तक्रार क्रमांक: 183/2011
5. गैरअर्जदाराने पुढे असे नमुद केले की, करार करते वेळी, कुठल्याही कारणास्तव तक्रारदार यांनी भूखंडाची नोंदणी रद्य केल्यास , मूळ रकमेतून 25% एवढया रकमेची कपात करण्यात येईल, ही बाब तक्रारदार यांना समजावून सांगितली होती आणि सदर अटीची संपूर्ण माहिती दिली होती. त्यामुळे करारा प्रमाणे गैरअर्जदाराने रुपये-88,025/- एवढया रकमेची कपात केली. गैरअर्जदाराने करारा प्रमाणे सदरची कारवाई केलेली असल्यामुळे त्यांचे सेवेत कोणतीही कमतरता नाही. याउलट तक्रारदार यांनी गैरअर्जदारास त्रास देण्याचे हेतुने प्रस्तुत तक्रार दाखल केलेली आहे आणि म्हणून ती खर्चासह खारीज करण्यात यावी, अशी विनंती गैरअर्जदार यांनी केली.
6. उभय तक्रारदार यांनी एकत्रितरित्या प्रस्तुत तक्रार प्रतिज्ञालेखावर दाखल केली. सोबत पान क्रमांक 9 निशाणी क्रमांक-3 वरील यादी नुसार एकूण 06 दस्तऐवज दाखल केले असून त्यामध्ये करारनामा प्रत, भूखंडापोटी भरलेल्या रकमेच्या पावत्या, तक्रारदार यांनी गैरअर्जदारास दिलेले पत्र, गैरअर्जदाराने तक्रारदार यांना परत केलेल्या धनादेशाची प्रत, वकीला मार्फत पाठविलेली रजिस्टर्ड नोटीस व पोच पावती अशा दस्तऐवजाचा समावेश आहे.
7. गैरअर्जदाराने लेखी जबाब पान क्रमांक 29, निशाणी क्रमांक 9 प्रमाणे प्रतिज्ञालेखावर दाखल केला. अन्य दस्तऐवज दाखल केले नाहीत.
8. उभय पक्षांचे लेखी निवेदन, प्रकरणातील उपलब्ध दस्तऐवज आणि उभय पक्षांचा युक्तीवाद यावरुन न्यायमंचाचा निष्कर्ष खालील प्रमाणे-
::निष्कर्ष ::
9. प्रस्तुत प्रकरणातील एकंदर वस्तुस्थिती आणि दाखल पुरावे पाहता ही बाब निर्विवादपणे सिध्द होते की, उभय तक्रारदार यांनी, गैरअर्जदाराचे हिंगणा येथील
ग्राहक तक्रार क्रमांक: 183/2011
मौजा मुरझरी येथील ले आऊट मधील भूखंड क्रमांक 88, आराजी 2560.002 चौरसफूट, प.ह.नं.77, शेत सर्व्हे क्रमांक 20-ए व 20-बी एकूण भूखंडाची किंमत रुपये-6,91,201/- मध्ये विकत घेण्याचा करार दिनांक 02.03.2009 रोजी केला होता असे दिसून येते. तसेच अभिलेखावरील पान क्रमांक 16 वरील तक्रारदार यांचे दिनांक-25.10.2010 रोजीचे पत्रा नुसार तक्रारदार यांनी, गैरअर्जदार यांना आर्थिक अडचणीमुळे भूखंडाची उर्वरीत रक्कम भरण्यास असमर्थता असल्याचे कारणास्तव सदर भूखंड रद्य करुन, तक्रारदार यांनी गैरअर्जदाराकडे भूखंडापोटी अदा केलेली रक्कम रुपये-3,52,100/- परत करण्याची विनंती केली होती. त्यानुसार गैरअर्जदार यांनी धनादेशाद्वारे रुपये-2,64,075/- एवढी रक्कम तक्रारदार यांना परत केली होती ही बाब निर्विवादपणे दिसून येते.
10. गैरअर्जदार यांचे कथना नुसार उभय पक्षांमधील करारातील अटी नुसार जर तक्रारदार यांनी भूखंडाची नोंदणी रद्य केल्यास मूळ रकमेतून 25% रक्कम कपात करण्यात येईल असे ठरलेले असल्यामुळे, सदर रकमेची कपात करण्यात आली होती.
11. परंतु दस्तऐवजा वरील दाखल कराराचे प्रती वरुन करामध्ये अशी कुठलीही अट नमुद केल्याचे दिसून येत नाही. परंतु त्याच बरोबर हे ही खरे आहे की, तक्रारदार यांनी आर्थिक अडचणीमुळे स्वतः भूखंडाची नोंदणी रद्य केलेली असल्यामुळे तक्रारदार यांनी तक्रारीत नमुद केलेल्या मागणी नुसार नुकसान भरपाईची रक्कम मान्य करणे योग्य होणार नाही, असे न्यायमंचाचे स्पष्ट मत आहे. त्याच बरोबर गैरअर्जदार यांनी दिनांक-15.12.2010 रोजी तक्रारदार यांना भूखंडापोटी जमा केलेली एकूण रक्कम परत करताना, एकूण जमा रकमेपैकी रुपये-88,025/- एवढी रक्कम कपात करुन कमी रक्कम दिलेली आहे आणि त्यामुळे उभय तक्रारदार हे सदर
ग्राहक तक्रार क्रमांक: 183/2011
कपात केलेली रक्कम व्याजासह गैरअर्जदारा कडून परत मिळण्यास पात्र आहे तसेच मानसिक शारिरीक त्रासा बद्यल नुकसान भरपाई आणि तक्रारखर्च मिळण्यास पात्र आहेत, असे न्यायमंचाचे स्पष्ट मत आहे.
12. वरील सर्व वस्तूस्थितीचा विचार करुन, मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आ दे श
1)उभय तक्रारदारांची तक्रार गैरअर्जदारा विरुध्द अंशतः मंजूर करण्यात येते.
2) गैरअर्जदाराने, तक्रारदार यांना रुपये-88,025/-(अक्षरी रुपये अठठयाऐंशी हजार
पंचविस फक्त ) एवढी रक्कम दिनांक-15.12.2010 पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष्य
अदायगी पावेतो द.सा.द.शे.9% व्याजासह परत करावी.
3) गैरअर्जदाराने, तक्रारदार यांना मानसिक व शारीरिक त्रासापोटी रुपये 3,000/-
(अक्षरी रुपये तीन हजार फक्त ) आणि तक्रारीचे खर्चापोटी रुपये 2,000/-
(अक्षरी रुपये दोन हजार फक्त) द्यावेत.
4) गैरअर्जदाराने सदर आदेशाचे अनुपालन आदेशाची प्रत प्राप्त झाल्याचे
दिनांकापासून तीस दिवसाचे आत करावे.
5) निकालपत्राच्या प्रमाणित प्रती सर्व संबधित पक्षांना विनामुल्या द्याव्यात.