Maharashtra

Beed

cc/11/170

Vimalabai Hanumant Jadhav - Complainant(s)

Versus

United India Insurance company ltd. - Opp.Party(s)

06 Mar 2012

ORDER

 
Complaint Case No. cc/11/170
 
1. Vimalabai Hanumant Jadhav
Beed
...........Complainant(s)
Versus
1. United India Insurance company ltd.
Beed
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MR. A P Bhosrekar PRESIDENT
 
PRESENT:
 
ORDER

 

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍यायमंच, बीड यांचे समोर ...
ग्राहक तक्रार क्रमांक – 170/2011            तक्रार दाखल तारीख- 02/11/2011
                                        निकाल तारीख   - 06/03/2012
 
 
श्रीमती विमलबाई हनुमंत जाधव
वय – 29 वर्ष, धंदा – शेती व घरकाम
रा.वांगी,ता.माजलगांव.जि.बीड.                        ....... तक्रारदार
 
            विरुध्‍द
 
1.     युनायटेड इंडिया इंश्‍युरन्‍स कंपनी लि.
प्रादेशिक कार्यालय, नागपूर
अंबिकाभवन क्रं;19 तिसरा मजला,
धरमपेठ, एक्‍स्‍टेशन शंकरनगर, नागपूर-10
2.    विभाग प्रमुख,
      कबाल इंश्‍यरन्‍स ब्रोकिंग सर्व्‍हीस प्रा.लि.
राज अपार्टमेंट प्‍लॉट नं.29, जी सेक्‍टर,
टाऊन सेंटर, सिडको औरंगाबाद               ­­­........ सामनेवाले.
 
           को र म - पी.बी.भट, अध्‍यक्ष
                     अजय भोसरेकर, सदस्‍य 
 
                             तक्रारदारातर्फे – वकील – ए.एस.पावसे,
                             सामनेवाले1तर्फे – एकतर्फा आदेश
                             सामनेवाले2तर्फे – स्‍वत: 
                                                                            
                             ।। निकालपत्र ।।
                       ( घोषितद्वारा अजय भोसरेकर, सदस्‍य)
 
      तक्रारदार यांनी प्रस्‍तुतची तक्रार ही ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 प्रमाणे सामनेवाले विरुध्‍द दाखल केली आहे.  
तक्रारदारांची तक्रार थोडक्‍यात अशी की, तक्रारदार हा मौजे वांगी ता.जि.बीड येथील रहिवाशी असुन तक्रारदाराचे मयत पती हणमंत अच्‍युतराव जाधवयांचादि.03.03.2010 रोजी अपघाती मृत्‍यू झाला, म्‍हणून सदरची तक्रार ही या न्‍यायमंचात दाखल केली आहे.
      तक्रारदाराचे मयत पतीचा अपघाती मृत्‍यू झाल्‍याची नोंद माजलगांव पोलीस स्‍टेशन येथे नोंद झाली असुन, त्‍याचा मरनोत्‍तर शवविच्‍छेदन झाले आहे. तक्रारदाराने शेतकरी वैयक्‍तीक अपघात विम्‍याची रक्‍कम मिळण्‍याची नियमानुसार सर्व कागदपत्राची पूर्तता करुन दि.25.5.2010 रोजी तालुका कृषि अधिकारी, माजलगांव यांचेकडे पूर्तता केली आहे. ही सर्व कागदपत्रे तालुका कृषि अधिकारी, माजलगांव यांनी सामनेवाले नं.2 यांचेकडे विमाप्रस्‍तावासह पाठविली.
तक्रारदाराने आपल्‍या मयत पतीचा शेतकरी वैयक्‍तीक अपघात विमा योजनेअंतर्गत रक्‍कम रु.1,00,000/- त्‍यावर द.सा.द.शे.18 टक्‍के व्‍याजासह, मानसिक व शारिरीक त्रासापोटी रक्‍कम रु.10,000/-, तक्रारीचे खर्चापोटी रक्‍कम रु.5,000/- मिळण्‍याची मागणी केली आहे.
तक्रारदाराने आपले लेखी म्‍हणणेच्‍या पुष्‍ठयार्थ एकुण 15 कागदपत्रे दाखल केली आहेत.
सामनेवाले नं.1 यांनी न्‍यायमंचाची नोटीस प्राप्‍त होवूनही न्‍यायमंचात हजर नाहीत अथवा ग्राहक संरक्षण कायदयातील तरतुदी नुसार मुदतीत आपले लेखी म्‍हणणे दाखल केले नाही म्‍हणून सामनेवाले नं.1 विरुध्‍द दि.01.02.2012 रोजी एकतर्फा आदेश करुन प्रकरण एकतर्फा चालविण्‍याचा‍ निर्णय घेतला आहे.
सामनेवाले नं.2 यांनी आपले लेखी म्‍हणणे पोष्‍टाद्वारे दाखल केले असुन त्‍यात त्‍यांनी तक्रारदारास दि.19.07.2010, 12.10.2010, 13.11.2010, 06.12.2010,  या तारखास तक्रारदाराचे मयत पतीचा वयाचा दाखला व फेरफार नकल याची मागणी केली आहे. सोबत सामनेवाले नं.1 यांनी दि.31.12.2010 रोजी तक्रारदाराचे नावे अपूर्ण कागदपत्रे असल्‍या बाबतचे पत्र दाखल केले असुन, सामनेवाले नं.1 यांनी अपूर्ण कागदपत्रामुळे तक्रारदाराचा विम्‍याचे प्रकरण बंद केल्‍याचे म्‍हंटले आहे.
      सामनेवाले नं.2 यांनी आपले लेखी म्‍हणण्‍याचे पुष्‍ठयार्थ एकुण 05 कागदपत्रे दाखल केली आहेत.
तक्रारदाराची तक्रार, सोबतची कागदपत्रे, सामनेवाले नं.2 यांनी दाखल केलेले लेखी म्‍हणणे,सामनेवाले नं.2 यांनी सामनेवाले नं.1 यांचे तक्रारदाराचा विमा प्रस्‍ताव नाकारल्‍याचे दाखल केलेले पत्र, व कागदपत्रे, तक्रारदार यांचा तोंडी युक्‍तीवाद यांचे बारकाईने आवलोकन  केले असता,
सामनेवाले नं.2 यांनी मागणी केलेली तक्रारदाराचे मयत पतीचे वयाचा दाखला, फेरफार नक्‍कल याची पूर्तता केली असल्‍याचे तक्रारदाराने म्‍हणंटले आहे. त्‍याबाबातची कागदपत्रे तक्रारदाराने न्‍यायमंचात दाखल केली आहेत. परंतु सामनेवाले नं.1 यांनी नेमके कोणत्‍या कागदपत्रामुळे प्रकरण अपूर्ण आहे याचा खुलासा त्‍यांचे पत्रात केल्‍याचे दिसून येत नाही.
म्‍हणजेच सामनेवाले नं.1 यांनी तक्रारदारास द्यावयाचे सेवेत त्रूटी केली आहे हे सिध्‍द होते.
सबब, न्‍यायमंच खालील प्रमाणे आदेश देत आहे.
                    ।। आ दे श ।।
1.     तक्रारदाराची तक्रार अंशत: मंजूर करण्‍यात येते.
2.    सामनेवाले नं.1 यांना आदेश देण्‍यात येतो की, तक्रारदारास त्‍यांचे मयत पतीचा शेतकरी वैयक्‍तीक अपघात विम्‍याची रक्‍कम रु.1,00,000/-(अक्षरी रुपये एक लाख फक्‍त ) आदेश प्राप्‍तीपासुन 30 दिवसाचे आत अदा करावी.
3.    सामनेवाले नं.1 यांना आदेश देण्‍यात येतो की, आदेश क्रं.2 चे मुदतीत पालन न केल्‍यास दि.31.12.2010 पासुन द.सा.द.शे.9 टक्‍के व्‍याज तक्रारदाराचे रक्‍कम पदरी पडेपर्यन्‍त देण्‍यास जबाबदार राहतील.
4.    सामनेवाले नं.1 यांना आदेश देण्‍यात येतो की, तक्रारदारास झालेल्‍या मानसिक, शारिरीक त्रासापोटी रक्‍कम रु.5,000/- (अक्षरी रुपये पाच हजार फक्‍त) व तक्रारीचे खर्चापोटी रक्‍कम रु.2,000/- ( अक्षरी रुपये दोन हजार फक्‍त) आदेश प्राप्‍ती पासुन 30 दिवसाचे आत अदा करावी.
5.    ग्राहक संरक्षण कायदा 1986 अधिनियम 2005 मधील कलम 20 (3) प्रमाणे तक्रारीतील सदस्‍यांचे संच तक्रारदारास परत करावीत.
 
 
                                           ( अजय भोसरेकर )     ( पी. बी. भट )
                                    सदस्‍य,            अध्‍यक्ष,
                          जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍यायमंच,बीड जि.बीड
 
 
 
[HON'ABLE MR. A P Bhosrekar]
PRESIDENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.