Maharashtra

Beed

CC/11/92

Sarswati Narayan Pankhede - Complainant(s)

Versus

United India Insurance company Ltd. - Opp.Party(s)

03 Feb 2012

ORDER

 
Complaint Case No. CC/11/92
 
1. Sarswati Narayan Pankhede
Saigaon Tq.Ambejogai
Beed
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. United India Insurance company Ltd.
Shankar Nagar, Nagpur
Napur
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MR. P. B. Bhat PRESIDENT
 HON'ABLE MR. A P Bhosrekar MEMBER
 
PRESENT:
 
ORDER

 

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍यायमंच बीड यांचे
तक्रार क्रमांक 92/2011                         तक्रार दाखल तारीख –02/07/2011
                                         निकाल तारीख     –  03/02/2012    
सरस्‍वती नारायण पानखडे
वय 62 वर्षे धंदा घरकाम व शेती                         .तक्रारदार
रा.सायगांव ता.अंबाजोगाई जि.बीड
                            विरुध्‍द
1.     युनायटेड इंडिया इन्‍शुरन्‍स कंपनी लि.
      मंडल कार्यालय, क्रमांक -2 अंबिका हाऊस
      शंकर नगर, चौक, नागपुर-440 010
2.    विभाग प्रमुख,
कबाल इन्‍शुरन्‍स ब्रोकींग सर्व्‍हीस प्रा.लि.
शॉप नं.29 राज अपार्टमेंट, सिडको,औरंगाबाद.           .सामनेवाला
 
              को र म - पी.बी.भट, अध्‍यक्ष
                         अजय भोसरेकर, सदस्‍य.
 
                                             तक्रारदारातर्फे        :- अँड.ए.एस.पावसे.
                                             सामनेवाला 1  तर्फे    :- अँड.ए.पी.गंडले
                                सामनेवाला 2 तर्फे    ः- स्‍वतः
       
                                                     निकालपत्र
            तक्रारदार यांनी प्रस्‍तुतची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 प्रमाणे सामनेवाले विरुध्‍द दाखल केली आहे.
            तक्रारदाराचे पती नारायण विठोबा पानखडे हे शेतकरी होते. त्‍यांचा अपघात मृत्‍यू दि.06.10.2009 रोजी विजेचा शॉक लागून झालेला आहे. त्‍या बाबत अंबेजोगाई पोलिस स्‍टेशनला मृत्‍यूची नोंद करण्‍यात आलेली आहे. पोलिसांनी मयताचा पंचनामा करुन शवविच्‍छेदन अहवाल डॉक्‍टरांनी दिलेला आहे.
            तक्रारदारांनी शेतकरी वैयक्‍तीक अपघात विमा योजने अंतर्गत नूकसान भरपाईचा प्रस्‍ताव दावा तालूका कृषी अधिकारी अंबेजोगाई यांचे मार्फत सामनेवाला क्र.1 व 2 कडे रितसर दि.01.12.2009 रोजी दाखल केला. त्‍या अर्जासोबत तक्रारीत नमूद केल्‍याप्रमाणे कागदपत्र दाखल केली.  सदर दावा कृषी अधिकारी कार्यालयामार्फत सामनेवाला क्र.1 व 2 कडे सर्व कागदपत्रे साक्षांकित करुन पाठविण्‍यात आले. त्‍यंानी दावा मंजूर केलेला नाही. सेहवेत कसूर केलेला आहे. म्‍हणून मानसिक शारीरिक त्रासापोटी रु.10,000/- व तक्रारी खर्चापोटी रु.5,000/- ची मागणी तक्रारदार करीत आहेत.
            विनंती की, विमा रक्‍कम रु.1,00,000/- 18 टक्‍के व्‍याजासहीत तक्रारदारांना सामनेवाला यांनी देण्‍याबाबत आदेश व्‍हावेत. सामनेवाला क्र.2 यांनी प्रस्‍ताव दावा सामनेवाला क्र.1 कडे पाठवून त्‍वरीत निर्णय दयावा असे आदेश व्‍हावेत.  मानसिक त्रासापोटीरु.10,000/- व तक्रारीच्‍या खर्चापोटी रु.5,000/- देण्‍या बाबत आदेश व्‍हावेत.
            सामनेवाला क्र.1 यांनी त्‍यांचा खुलासा दि.14.12.2011 रोजी दाखल केला आहे. खुलाशात तक्रारीतील सर्व आक्षेप नाकारलेले आहेत. सामनेवाला यांनी तक्रारदाराचा दावा नाकारलेला नाही. तक्रारदारांनी दावा योग्‍यरितीने पाठविला नाही. तक्रारदारांनी 7/12 उतारा गट नंबर 485/524 चा दाखल केला. त्‍यात मयताचे नांव 2008-09 मध्‍ये नाही. सामनेवाला यांनी तक्रारदाराचा दावा योग्‍यरितीने नाकारलेला आहे. मयत नारायण विठोबा पानखडे यांचा मृत्‍यू विजेचा शॉकने झालेला आहे आणि सदरचा अपघात हा वैयक्‍तीक अपघात आहे. ते विमापत्र संरक्षीत नाही त्‍यामुळे तक्रार खर्चासहीत रदद करण्‍यात यावी.
सामनेवाला क्र.2 यांनी त्‍यांचा खुलासा पोस्‍टाद्वारे दि.25.08.2009 रोजी दाखल केला.खुलाशात श्री. नारायण विठोबा पानखडे रा.सायगांव ता.अंबाजोगाई यांचा अपघात दि.06.10.2009 यरोजी झाला. त्‍यांचा दावा दि.14.12.2009 रोजी मिळाला. सदरचा दावा सामनेवाला विमा कंपनीकडे दि.15.03.2010 रोजी पाठविला. विमा कंपनीने सदरचा दावा नामंजूर केला त्‍यांची सुचना दि.12.08.2010 रोजीचे पत्राने तक्रारदारांना दिलेले आहे.  
      तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे, तक्रारदाराचे शपथपत्र, सामनेवाला क्र. 1 व 2 यांचा खुलासा,सामनेवाला क्र.1 चे शपथपत्र, यांचे सखोल वाचन केले.
            तक्रारदाराचे विद्वान वकील श्री.पावसे व सामनेवाला क्र.1 यांचे विद्वान वकील श्री.ए.पी.गंडले यांचा यूक्‍तीवाद ऐकला.
            तक्रारीतील सर्व कागदपत्रे पाहता तक्रारदाराचा दावा सामनेवाला क्र.1 यांनी 7/12 उतारा मयत नारायण विठोबा पानखडे  यांचे नांव नसल्‍याकारणावरुन नाकारलेला आहे. या संदर्भात त्‍यांनी त्‍यांचा खुलाशासोबत तक्रारदारानी प्रस्‍ताव अर्जासोबत दाखल केलेला 7/12 उतारा इतर कागदपत्रे कूठेही दाखल केलेले नाहीत. याउलट तक्रारदारांनी सन 2000-01 ते 2010-11 पर्यतचा 7/12 उतारा दाखल केलेला आहे व त्‍यात नारायण विठोबा पानखडे  यांचे नांवाची नोंद आहे. त्‍यांला कंस करण्‍यात आलेले आहे व त्‍यांची फेरफार नोंद नंबर 328 दाखवलेले आहे. सदरच्‍या कागदपत्रावरुन मयताचे नांव 7/12 उता-यावर नाही असे म्‍हणणे उचित होणार नाही. सामनेवालाचे विधानाचे समर्थनार्थ सामनेवाल्‍यांचे कागदपत्र दाखल नसल्‍याकारणाने सामनेवाला यांनी योग्‍यरितीने दावा नाकारल्‍याची बाब स्‍पष्‍ट होत नाही. त्‍यामुळे तक्रारदाराचा दावा नाकारुन सामनेवाला यांनी तक्रारदारांना दयावयाचे सेवेतकसूर केल्‍याची बाब स्‍पष्‍ट होते असे न्‍यायमंचाचे मत आहे. सामनेवाला क्र.1 यांनी तक्रारदारांना मयत नारायण पानखडे यांचे अपघाती मृत्‍यू बददल विम्‍याची रक्‍कम रु.1,00,000/- देणे उचित होईल असे न्‍यायमंचाचे मत आहे.
            सेवेत कसूरीची बाब स्‍पष्‍ट झाल्‍याने निश्चितच तक्रारदारांना मानसिक त्रास झालेला आहे, मानसिक त्रासाची रक्‍कम रु.3,000/- व खर्चाची रक्‍कम रु.3,000/- सामनेवाला यांनी तक्रारदारांना देणे उचित होईल असे न्‍यायमंचाचे मत आहे.
            सबब, मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
                             आदेश
 1.          तक्रार अंशतः मंजूर करण्‍यात येते.
2.                सामनेवाला क्र.1 यांना आदेश देण्‍यात येतो की, तक्रारदारांना मयत   
              नारायण पानखडे यांचे अपघाती मृत्‍यू दाव्‍याची रक्‍कम 
              रु.1,00,000/- (अक्षरी एक लाख फक्‍त) आदेश मिळाल्‍यापासून   
                        एक महिन्‍याचे आंत अदा करावी.
3.               सामनेवाला क्र.1 यांना आदेश देण्‍यात येतो की,वरील रक्‍कम मूदतीत  
                       न दिल्‍यास वरील रक्‍कमेवर द.सा.द.शे. 9 टक्‍के दराने व्‍याज तक्रार  
                       दाखल दि.02.07.2011 पासून पूर्ण रक्‍कम पदरीपडेपर्यत सामनेवाला  
                       क्र.1 जबाबदार राहतील.
4.               सामनेवाला क्र.1 यांना आदेश देण्‍यात येतो की, मानसिक त्रासाची  
            रक्‍कम रु.3000/-(अक्षरी रु.पाच हजार फक्‍त) व तक्रारीच्‍या खर्चाची
            रककम रु.3000/-(अक्षरी रु.तिन हजार फक्‍त) आदेश प्राप्‍तीपासून
           30 दिवसांचे आंत अदा करावी.
5.              ग्राहक संरक्षण कायदा- 1986, अधिनियम 2005 मधील कलम-20     
           (3) प्रमाणे तक्रारीतील सदस्‍यांचे संच तक्रारदाराला परत करावेत.
 
 
 
(अजय भोसरेकर)     (पी.बी.भट)
सदस्‍य          अध्‍यक्ष
                                                जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड
 
 
[HON'ABLE MR. P. B. Bhat]
PRESIDENT
 
[HON'ABLE MR. A P Bhosrekar]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.