Maharashtra

Bhandara

CC/17/4

Smt.Geeta Dayaram Motghare - Complainant(s)

Versus

United India Insurance Co.Ltd.through Divisional Manager - Opp.Party(s)

Adv Uday Kshirsagar

14 Jun 2017

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM,BHANDARA
Near Akhil Sabhagruha, Ganeshpur Road,Bhandara
 
Complaint Case No. CC/17/4
 
1. Smt.Geeta Dayaram Motghare
R/o Chargaon Tah Sakoli
Bhandara
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. United India Insurance Co.Ltd.through Divisional Manager
Divisional Office No.2,Ambika House,Shankarnagar
Nagpur 440010
Maharashtra
2. M/s.Cabal Insurance Broking Servises Ltd through Mr.Subhash Agre
Plot No.101,Karandikar House,Near Mangala Talkies, Shivajinagar
Pune 411005
Maharashtra
3. Taluka Agricultural Officer
Sakoli Tah Sakoli
Bhandara
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. M.G.CHILBULE PRESIDENT
 HON'BLE MR. HEMANTKUMAR PATERIA MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
Dated : 14 Jun 2017
Final Order / Judgement

श्री. मनोहर चिलबुले, अध्‍यक्ष यांचे आदेशांन्‍वये.

 

आ दे श  -

 

(पारित दिनांक – 14 जून, 2017)

 

                   तक्रारकर्तीने  ग्राहक संरक्षण अधिनियम 1986 चे कलम 12 प्रमाणे सदर तक्रार दाखल केली आहे. तक्रारकर्त्‍याची  संक्षिप्‍त तक्रार  पुढीलप्रमाणे –

 

1.                 तक्रारकर्ती गीता दयाराम मोटघरे हिचे मृतक पती दयाराम लक्ष्‍मण मोटघरे  व्‍यवसायाने  शेतकरी होते व त्‍यांच्‍या मालकीची मौजा-चारगांव, ता.साकोली, जि.भंडारा येथे भूमापन क्र. 53 ही शेतजमीन होती.

 

                  महाराष्‍ट्र शासनाने सन 2009-2010 करिता शेतकरी जनता  अपघात विमा योजनेंतर्गत विरुद्ध पक्ष दि युनायटेड इंडिया इंन्‍शुरन्‍स कंपनी लि. कडे सर्व शेतक-यांचा अपघात विमा काढला होता व मृतक दयाराम मोटघरे हे शेतकरी असल्‍याने सदर विम्‍याचे लाभधारक होते. दि.15.09.2009 रोजी मृतक दयाराम मोटघरे मिलींद गणवीर यांच्‍या मोटार सायकलवर मागे बसून सानगडीकडून पळसगांवकडे जात असता अज्ञात मोटार सायकल स्‍वाराने त्‍याची मोटार सायकल निष्‍काळजीपणे चालवून धडक दिल्‍याने गंभीर जखमी होऊन उपचारादरम्‍यान मरण पावला.  

 

                  शेतकरी जनता  अपघात विमा योजनेंतर्गत विमा दावा तक्रारकर्तीने आवश्‍यक दस्‍तऐवजांसह वि.प.क्र. 3 तालुका कृषी अधिकारी, साकोली यांच्‍याकडे दि.01.04.2010 रोजी सादर केला. विमा दावा छाननी करुन पूर्ततेसह  वि.प.क्र. 1 कडे पाठविण्‍याची जबाबदारी वि.प.क्र. 2 ची होती. वि.प.नी मंजूरीबाबत काहीच कळविले नाही म्‍हणून तक्रारकर्तीने व‍कीलामार्फत दि.26.12.2016 रोजी नोटीस पाठविली व विमा रकमेची मागणी केली. परंतू वि.प.क्र. 1 ने पूर्तता केली नाही. विमा कंपनीची कृती सदर सेवेतील न्‍यूनता आणि अनुचित व्‍यापार पध्‍दतीचा अवलंब आहे म्‍हणून तक्रारकर्तीने तक्रारीत खालिलप्रमाणे मागणी केलेली आहे.

 

 

      1.     अपघात विमा दाव्‍याची रक्कम रु.1,00,000/- दि.01.04.2010 पासुन              द.सा.द.शे.18 टक्‍के व्‍याज देण्‍याचा विरुध्‍द पक्षाविरुध्‍द आदेश व्‍हावा.

      2.    शारीरिक व मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई रु.30,000/- मिळावी.

      3.    तक्रारीचा खर्च रु.15,000/- देण्‍याचा विरुध्‍द पक्षास आदेश व्‍हावा.

 

                  तक्रारीच्‍या पुष्‍टयर्थ तक्रारकर्तीने तक्रारीचे पुष्‍टयर्थ शेतकरी जनता अपघात विमा योजना 2009-10 शासन निर्णय, विमादाव्‍याची प्रत, 7/12 चा उतारा, फेरफार पत्रक, आमस्मिक मृत्‍यु सुचना, वयाचा दाखला, घटनास्‍थळ पंचनामा, वि.प.क्र. 1 ते 3 ला पाठविलेली कायदेशीर नोटीस, शवविच्‍छेदन अहवाल, मृत्‍यु प्रमाणपत्र, एफ आय आर व पोलिस दस्‍तऐवज इ. दस्‍तऐवजांच्‍या प्रती दाखल केलेल्‍या आहेत.

 

2.                विरुद्ध पक्ष क्र. 1 विमा कंपनीने लेखी उत्‍तर दाखल करुन तक्रारीस सक्‍त विरोध केला आहे. तक्रारकर्तीचे पती दयाराम मोटघरे हे शेतकरी होती व त्‍यांचा मृत्‍यु मोटार सायकल अपघाताने झाल्‍याचे वि.प.क्र. 1 ने माहितीअभावी नाकबूल केले आहे. तसेच तक्रारीत नमूद केल्‍याप्रमाणे विमा प्रस्‍ताव मंजूरसाठी वि.प.क्र. 3 कडे सादर केल्‍याचे नाकबूल केले आहे. त्‍यांचे म्‍हणणे असे की, विमा योजनेप्रमाणे विमा प्रस्‍ताव विमित शेतक-याच्‍या मृत्‍युनंतर 90 दिवसाचे आंत सादर करणे आवश्‍यक आहे. मात्र तक्रारकर्तीने तालुका अधिका-यामार्फत विमा प्रस्‍ताव कधीही सादर न करता सरळ मंचासमोर 04.01.2017 रोजी तक्रार दाखल केली असून ती मुदतबाह्य असल्‍याने खारीज होण्‍यास पात्र आहे. वि.प.क्र. 2 कबाल इन्‍शुरन्‍स ब्रोकिंग एजंट म्‍हणून कमिशन घेत होते. परंतू त्‍यांनी तक्रारकर्तीकडून विमा प्रस्‍ताव प्राप्‍त करुन तो मंजूरीसाठी वि.प.क्र. 1 कडे न पाठविता आपल्‍या कर्तव्‍यात कसूर केला आहे.    

 

3.          वि.प.क्र. 2 कबाल इंशुरन्‍स ब्रोकिंग सर्व्हिसेस यांना नोटीस मिळूनही गैरहजर राहिल्‍याने त्‍यांचेविरुध्‍द प्रकरण एकतर्फा चालविण्‍यांत आले.

 

4.          वि.प.क्र. 3 तालुका कृषी अधिकारी, साकोली यांना नोटीस मिळाल्‍यावर त्‍यांनी  लेखी जवाब दाखल करुन कळविले की, तक्रारकर्तीच्‍या पतीचा अपघाती मृत्‍यु दि.16.09.2009 रोजी झाल्‍यावर त्‍याबाबत विमा प्रस्‍ताव दि.01.04.2010 रोजी त्‍यांच्‍या कार्यालयास प्राप्‍त झाल्‍यावर त्‍यांनी तो 05.05.2010 रोजी पुढील कार्यवाहीसाठी जिल्‍हा कृषी अधिक्षक अधिकारी कार्यालय भंडारा यांचेकडे पाठविला. त्‍यांनी आपले कर्तव्‍यात कोणताही कसूर केला नसल्‍याने  त्‍यांना तक्रारीतून मुक्‍त करण्‍यांत यावे.

 

4.          तक्रारकर्ती  व वि.प.च्‍या  परस्‍पर विरोधी कथनावरुन खालील मुद्दे मंचासमोर विचारार्थ घेण्‍यात आले. त्‍यावरील मंचाचे निष्‍कर्ष व त्‍याबाबतची कारणमिमांसा पुढीलप्रमाणे.  

                  

          मुद्दे                                           निष्‍कर्ष

 

1.     वि.प.क्रं.1 ने सेवेत त्रुटीपूर्ण व्‍यवहार व अनुचित व्‍यापार                                 पध्‍दतीचा अवलंब केला आहे काय ?                           होय.

2.    तक्रारकर्ता मागणीप्रमाणे लाभ मिळण्‍यास                                      पात्र आहे काय ?                                        अंशतः.

3.    आदेश काय ?                                अंतीम आदेशाप्रमाणे .

- कारणमिमांसा -

 

5.         मुद्दा क्र. 1 व 2 बाबत – सदरच्‍या प्रकरणात महाराष्‍ट्र शासनाने वि.प.क्र. 1 युनायटेड इंडिया इंन्‍शुरन्‍स कंपनी लिमिटेड यांचेकडे सन 2009-2010 या कालावधीसाठी भंडारा जिल्‍ह्यातील शेतक-यांचा ‘शेतकरी जनता अपघात विमा’ उतरविला होता ही बाब उभय पक्षांना मान्‍य आहे. तक्रारकर्तीचे पती दयाराम लक्ष्‍मण मोटघरे यांच्‍या नावाने मौजा चारगांव त.सा.क्र. 18, ता. साकोली, जि. भंडारा येथे भू.क्र.52/2 आणि 53/2 क्षेत्रफळ 0.27 हे. आणि 0.23 हे. एकूण 0.50 हे. शेतजमीन असल्‍याबाबत  7/12 चा उतारा, गाव नमुना आठ-अ, फेरफाराची नक्‍कल, गाव नमुना सहा-क इत्‍यादी दस्‍तावेज  दस्‍त क्र. 3 प्रमाणे दाखल केले आहेत.  त्‍यावरुन मृतक दयाराम लक्ष्‍मण मोटघरे हे नोंदणीकृत शेतकरी होते व शेतकरी जनता अपघात विमा योजनेचे लाभार्थी होते हे सिध्‍द होते.

 

 

                  तक्रारककर्तीने दस्‍तऐवज क्र. 4 प्रमाणे अपघाताबाबत पो.स्‍टे.साकोली येथे नोंदविलेली प्रथम खबरी क्र. 165/09 दि.20.10.2009, गुन्‍ह्याच्‍या तपशिलाचा नमुना/घटनास्‍थळ पंचनामा, शवविच्‍छेदन अहवाल इ. इस्‍तऐवज दाखल केले आहेत. त्‍यावरुन मृतक दयाराम लक्ष्‍मण मोटघरे दि.15.09.2009 रोजी मिलींद गणवीर याच्‍या मोटार सायकलवर मागे बसून जात असता अज्ञात मोटार सायकल स्‍वाराने त्‍याची मोटार सायकल बेदरकारपणे व निष्‍काळजीपणे चालवून धडक दिल्‍याने झालेल्‍या अपघातात गंभीर जखमी झाला व शासकीय आयुर्विज्ञान रुग्‍णालय नागपूर येथे उपचार घेत असतांना दि.16.09.2009 रोजी मरण पावल्‍याचे स्‍पष्‍ट होते. म्‍हणजेच तक्रारकर्तीच्‍या पतीचा अपघाती मृत्‍यु झाल्‍याचे सिध्‍द होते. 

 

 

                 

            वि.प.क्र. 1 ने जरी तक्रारकर्तीने विमा दावा वि.प.कडे सादर केला नव्‍हता असे म्‍हटले तरी वि.प.क्र. 3  तालुका कृषी अधिकारी साकोली यांनी त्‍यांच्‍या लेखी जवाबात तक्रारकर्तीच्‍या पतीचा दि.16.09.2009 रोजी अपघातातील दुखापतीमुळे मृत्‍यु झाल्‍यावर तिने त्‍यांच्‍याकडे दि.01.04.2010 रोजी विमा दावा सादर केला आणि तो त्‍यांनी दि.05.05.2010 रोजी जि.अ.कृअधिकारी कार्यालय भंडारा यांचेकडे पुढील कारवाईसाठी पाठविल्‍याचे म्‍हटले आहे. कृषी अधिकारी यांच्‍याकडे दावासादर करण्‍यांस 90 दिवसांपेक्षा साडेतीन महिने अधिक कालावधी लागला असेल तरी केवळ याच कारणाने दावा नामंजूर करता येणार नाही अशी तरतूद शासन परिपत्रक दि. 04 डिेसेंबर, 2009 मध्‍ये खालीलप्रमाणे आहे.

 

 

इ) विमा कंपनी –

 

  1. ....................
  2. ....................
  3. .........................
  4. शेतक-यांचा विमा प्रस्‍ताव विहित कागदपत्रांसह विमा योजनेच्‍या कालावधीत कधीही प्राप्‍त झाला तरी तो विचारात घेणेविमा कंपनीला बंधनकारक राहील. अखेरच्‍या दिवसात झालेल्‍या अपघातासाठी योजनेचा कालावधी संपल्‍यापासून 90 दिवसापर्यंत विमाप्रस्‍ताव स्विकारावेत. समर्थनीय कारणास्‍तव 90 दिवसानंतर प्राप्‍त दावे स्विकारावेत. तथापि अपघाताचे सूचनापत्र विमा कालावधी संपल्‍यानंतर 90 दिवसांपर्यंत घेणे बंधनकारक राहील व त्‍यानुसार सविस्‍तर प्रस्‍तावांवर कार्यवाही करणे कंपनीस बंधनकारक राहील.

 

 

वरील तरतूदीप्रमाणे तक्रारकर्तीने विमादावा योजना कालावधीत दाखल केला असल्‍याने तो स्विकारुन त्‍यावर निर्णय करण्‍याची व तो निर्णय तक्रारकर्तीला कळविण्‍याची जबाबदारी वि.प.क्र. 1 ची होती परंतू त्‍यांनी ती पार पाडली नाही. जोपर्यंत विमा कंपनी विमा दाव्‍याचा निर्णय विमा लाभधारकास लेखी कळवित नाही, तोपर्यंत विमा दाव्‍याबाबत तक्रारीचे कारण सतत घडत असल्‍याने व सदर प्रकरणांत 2010 मध्‍ये दाखल विमा दाव्‍याचा निर्णय वि.प.क्र. 1 ने तक्रारकर्तीस कधीही कळविला नसल्‍याने सदरची तक्रार जरी 12.01.2017 रोजी दाखल केली असली तरी ती ग्राहक संरक्षण अधिनियमाचे कलम 24 अ प्रमाणे मुदतीत आहे.  

 

 

            तक्रारकर्तीने दि.01.04.2010 रोजी सर्व कागदपत्रांसह विमा दावा वि.प.क्र. 3 मार्फत वि.प.क्र.1 कडे सादर करुनही वि.प.क्र. 1 ने त्‍यावर कोणताही निर्णय तक्रारकर्तीस कळविला नाही आणि तक्रारकर्तीने विमा दावा सादरच केला नव्‍हता म्‍हणून सन 2017 मध्‍ये दाखल केलेली तक्रार मुदतबाह्य असल्‍याचा खोटा बचाव घेतला आहे. सदरची बाब निश्चितच विमा लाभार्थ्‍याप्रती सेवेतील न्‍यूनता आणि अनुचित व्‍यापार पध्‍दतीचा अवलंब असल्‍याने मुद्दा क्र. 1 वरील निष्‍कर्ष होकारार्थी नोंदविला आहे.                  

 

6.          मुद्दा क्र. 2 व 3 बाबत -  मुद्दा क्र. 1 वरील निष्‍कर्षाप्रमाणे तक्रारकर्ती विमा दाव्‍याची रक्‍कम रु.1,00,000/- दि.01.10.2010 पासून (प्रस्‍ताव दाखल केल्‍यापासून मंजूरीसाठी आवश्‍यक 6 महिन्‍याचा वाजवी कालावधी सोडून) प्रत्‍यक्ष अदायगीपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्‍के व्‍याजासह मिळण्‍यास पात्र आहे. याशिवाय शारिक व मानसिक त्रासाबाबत नुकसान भरपाई रु.10,000/- आणि तक्रारीचा खर्च रु.5,000/- मिळण्‍यास तक्रारकर्ती पात्र आहे. म्‍हणून मुद्दा क्र. 2 व 3 वरील निष्‍कर्ष त्‍याप्रमाणे नोंदविला आहे.

 

 

वरील निष्‍कर्षास अनुसरुन मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.

 

  • आदेश

 

तक्रारकर्तीची ग्राहक संरक्षण अधिनियमाचे कलम 12 खालील तक्रार  खालीलप्रमाणे     अंशतः मंजूर करण्‍यांत येत आहे.

 

1)    वि.प.क्र. 1 युनायटेड इंडिया इन्‍शुरन्‍स कं.लि.यांनी तक्रारकर्तीस तिचा पती दयाराम लक्ष्‍मण मोटघरे याच्‍या मृत्‍युबाबत शेतकरी व्‍यक्तिगत अपघात विम्‍याची रक्‍कम रु.1,00,000/- दि.01.10.2010 पासून  रक्‍कम तक्रारकर्तीचे  हातात पडेपर्यंत द.सा.द.शे.  9 टक्‍के  व्‍याजासह द्यावी.

2)    वि.प.क्र. 2 व 3  यांना रक्‍कम देण्‍याच्‍या दायित्‍वातून मुक्‍त करण्‍यात येते.

3)    वि.प.क्र. 1 युनायटेड इंडिया इन्‍शुरन्‍स कं.लि.ने अर्जदारास शारिरीक व मानसिक त्रासाबद्दल नुकसान भरपाई रु.10,000/- आणि तक्रारीचा खर्च  रु.5,000/- द्यावा.

4)    आदेशाची पूर्तता आदेशाची प्रत प्राप्‍त झाल्‍याचे तारखेपासून 1 महिन्‍याचे आंत करावी.

5)    उभय पक्षांना आदेशाची प्रत विनामुल्‍य द्यावी.

6)    तक्रारकर्तीला प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ प्रत परत करावी.

 

 

 
 
[HON'BLE MR. M.G.CHILBULE]
PRESIDENT
 
[HON'BLE MR. HEMANTKUMAR PATERIA]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.