Maharashtra

Satara

CC/11/2

Santosh Rajaram Sapkal - Complainant(s)

Versus

The Oriental Insurance Ltd Co.,Maneger - Opp.Party(s)

Kaveri

21 May 2011

ORDER


ReportsDistrict Consumer disputes redressal Forum Satara Near Cooperative Court Sadara Bazar Satara-415001
CONSUMER CASE NO. 11 of 2
1. Santosh Rajaram SapkalA/P Shelti Eakambe Tal Koregow Dist SatarasataraMaharashtra ...........Appellant(s)

Vs.
1. The Oriental Insurance Ltd Co.,Maneger Div2,8 Hindustan Colony Anjani \Chowk VardhaRood Nagpur Nagpur Maharashtra2. Kabal Insurance Services Pvt. Ltd.PunePune3. Maharashtra Shasan Colleetor SataraSataraSatara ...........Respondent(s)


For the Appellant :Kaveri, Advocate for
For the Respondent :

Dated : 21 May 2011
ORDER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

 

                                                            नि.21
मे. जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा यांचेसमोर
 
                                          तक्रार क्र. 2/2011
 
                                          नोंदणी तारीख – 5/1/2011
                                          निकाल तारीख – 21/5/2011
                                          निकाल कालावधी – 140 दिवस
 
श्री विजयसिंह दि. देशमुख, अध्‍यक्ष
श्रीमती सुचेता मलवाडे, सदस्‍या
श्री सुनिल कापसे, सदस्‍य
 (श्री सुनिल कापसे, सदस्‍य यांनी न्‍यायनिर्णय पारीत केला)
------------------------------------------------------------------------------------
 
श्री संतोष राजाराम संकपाळ
रा.शेलटी, पो.एकांबे ता.कोरेगाव
जि.सातारा                                        ----- अर्जदार
                                            (वकील श्री.एम.एन.शेटे)
      विरुध्‍द
 
1. व्‍यवस्‍थापक,
   दी ओरिएन्‍टल इन्‍शुरन्‍स कंपनी लि.
   डिव्‍हीजन ऑफिस नं.2, 8, हिंदुस्‍थान कॉलनी,
   अजनी चौकाजवळ, वर्धा रोड, नागपूर – 440 015    ----- जाबदार क्र.1
                                               (व‍कील श्री.कालिदास माने)
2. श्रीमती सुचेता प्रधान, विभागीय प्रमुख,
   कबाल इन्‍शुरन्‍स सर्व्हिसेस प्रा.लि.,
   101, शिवाजीनगर, 3 रा मजला,
   मंगला टॉकीज जवळ, पुणे – 411 005
3. महाराष्‍ट्र शासन तर्फे मा.जिल्‍हाधिकारी सो,
   सातारा, जिल्‍हाधिकारी कार्यालय, सातारा             ----- जाबदार क्र.2 व 3
 
न्‍यायनिर्णय
 
 
    अर्जदार यांनी प्रस्‍तुतचा अर्ज ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 12 नुसार केलेला आहे. अर्जदार यांचे अर्जातील कथन थोडक्‍यात खालीलप्रमाणे –
 
1.     श्रीमती फुलाबाई राजाराम संकपाळ या दि.14/10/08 रोजी कण्‍हेर जलाशयात पडून मयत झाल्‍या आहेत. त्‍या शेतकरी होत्‍या. त्‍या हक्‍काने शेतकरी अपघात विमा योजनेची रक्‍कम मिळणेसाठी अर्जदार यांनी आवश्‍यक ती कागदपत्रे जोडून त्‍यांचा विमा क्‍लेम गावकामगार तलाठी, विसापूर यांचेकडे सादर केला. त्‍यांनी तो प्रस्‍ताव तहसिलदार, खटाव यांचेकडे पाठविला. तहसिलदार खटाव यांनी सदरचे प्रकरण जाबदार क्र.1 यांचेकडे पाठविले, परंतु, जाबदार क्र.1 यांनी विमा दावा मंजूर केलेला नाही अथवा फेटाळलेला नाही. क्‍लेम फॉर्म मिळाल्‍यापासून 30 दिवसांच्‍या आत रक्‍कम मयताचे वारसाचे खातेवर जमा करणेची जबाबदारी जाबदार क्र.1 ते 3 यांची आहे. सबब, विम्‍याची रक्‍कम रु.1,00,000/- मिळावी, मानसिक व शारिरिक त्रासापोटी रक्‍कम रु.40,000/- व खर्चापोटी रक्‍कम रु.3,000/- यासाठी अर्जदार यांनी प्रस्‍तुतचा अर्ज दाखल केला आहे.
 
2.    जाबदार क्र.1 यांनी प्रस्‍तुतचे कामी त्‍यांचे लेखी म्‍हणणे/कैफियत नि.10 ला दाखल केली आहे. त्‍यामध्‍ये त्‍यांनी अर्जदारचे तक्रारअर्जातील बहुतांश मजकूर नाकारलेला आहे. अर्जदार यांनी घटना घडलेनंतर पोलिसांकडे जो खबरी जबाब दिला आहे त्‍यामध्‍ये त्‍यांनी असे स्‍पष्‍ट कथन केले आहे की, अर्जदारची आई सुमारे दोन वर्षापासून वेडयासारखी बडबड करीत होती व ती घरातून कोठेही निघून जात होती. सदरचे कथन पाहता मयत फुलाबाई ही मानसिक दृष्‍टया भ्रमिष्‍ट होती व त्‍यातून तिचा मृत्‍यू झाला आहे. महाराष्‍ट्र शासनाचे शासन निर्णयामध्‍ये विमा संरक्षण  नसणा-या ज्‍या बाबींचा समावेश केला आहे त्‍यामध्‍ये अनुक्रमांक 6 ला भ्रमिष्‍टपणाचा उल्‍लेख आहे. सदरची बाब विचारात घेवून जाबदार यांनी अर्जदार यांचा विमा दावा नाकारलेला आहे. ग्राहक संरक्षण कायद्यातील तरतुदींप्रमाणे तक्रारअर्ज मुदतीत नाही.   त्‍यामुळे अर्जदार या विमा रक्‍कम मिळणेस पात्र नाहीत. वारस असल्‍याबाबत अर्जदार यांनी पुरावा दाखल केलेला नाही. अर्जदार हे जाबदार यांचे ग्राहक नाहीत. महाराष्‍ट्र शासनाने 2232 शेतक-यांचे विमा दावेंबाबतची प्रकरणे राष्‍ट्रीय आयोग, नवी दिल्‍ली येथे दाखल केली आहेत. प्रस्‍तुतचे प्रकरणही त्‍यामध्‍ये समाविष्‍ट आहे. त्‍यामुळे अर्जदार यांना याच कारणासाठी या मंचामध्‍ये दाद मागता येणार नाही. सबब, अर्जदार यांचा तक्रारअर्ज फेटाळणेत यावा असे जाबदार क्र.1 यांनी त्‍यांचे कैफियतीमध्‍ये कथन केले आहे.
 
3.    जाबदार क्र.2 यांनी याकामी नि.15 कडे पोस्‍टाद्वारे पत्र पाठवून त्‍यांचे म्‍हणणे सादर केले आहे. जाबदार क्र.2 ही केवळ सल्‍लागार कंपनी आहे. विमाधारकांच्‍या कागदपत्रांची पूर्तता व पडताळणी करुन ती विमा कंपनीकडे पाठवून देण्‍याचे काम जाबदार क्र.2 कंपनी करीत असते. त्‍यासाठी जाबदार कंपनी शासनाकडून अगर शेतक-यांकडून कोणताही मोबदला घेत नाही. सबब जाबदार क्र.2 यांना मुक्‍त करण्‍यात यावे असे जाबदार क्र.2 यांनी कथन केले आहे.
 
4.    जाबदार क्र.3 यांना प्रस्‍तुत तक्रारअर्जाचे नोटीसची बजावणी होऊनही त्‍यांनी याकामी त्‍यांचे लेखी म्‍हणणे व शपथपत्र दाखल केलेले नाही. सबब त्‍यांचेविरुध्‍द म्‍हणणे दाखल नाही असा आदेश करण्‍यात आला आहे.
 
5.    अर्जदारतर्फे लेखी युक्तिवाद नि.20 पाहिला. जाबदार क्र.1 तर्फे अभियोक्‍त्‍यांनी केलेला युक्तिवाद ऐकला. तसेच अर्जदार व जाबदार यांची दाखल कागदपत्रे पाहिली.
 
6.  प्रस्‍तुतचे कामी प्रामुख्‍याने खालीलप्रमाणे मुद्दे उपस्थित होत आहेत. हे मुद्दे व त्‍यांना दिलेली उत्‍तरे खालीलप्रमाणे आहेत.
           मुद्दे                                   उत्‍तरे
अ) अर्जदार व जाबदार यांचे दरम्‍यान ग्राहक व
     सेवा देणारे असे नाते आहे काय ?              होय.
ब)   जाबदार यांनी अर्जदार यांना सेवा देण्‍यामध्‍ये
     कमतरता केली आहे काय ?                          नाही.
क)   अंतिम आदेश -                                 खाली दिलेल्‍या कारणास्‍तव
                                             अर्जदार यांचा तक्रारअर्ज
               नामंजूर करणेत येत आहे.
 
कारणे
7.    जाबदार क्र.1 यांनी त्‍यांचे कैफियतीमध्‍ये असे कथन केले आहे की, अर्जदार यांनी घटना घडलेनंतर पोलिसांकडे जो खबरी जबाब दिला आहे त्‍यामध्‍ये त्‍यांनी असे स्‍पष्‍ट कथन केले आहे की, अर्जदारची आई सुमारे दोन वर्षापासून वेडयासारखी बडबड करीत होती व ती घरातून कोठेही निघून जात होती. सबब मयत फुलाबाई ही मानसिक दृष्‍टया भ्रमिष्‍ट होती व त्‍यातून तिचा मृत्‍यू झाला आहे. महाराष्‍ट्र शासनाचे शासन निर्णयामध्‍ये विमा संरक्षण नसणा-या ज्‍या बाबींचा समावेश केला आहे त्‍यामध्‍ये अनुक्रमांक 6 ला भ्रमिष्‍टपणाचा उल्‍लेख आहे. सदरची बाब विचारात घेवून जाबदार यांनी अर्जदार यांचा विमा दावा नाकारलेला आहे. सदरचे कथनाचे पृष्‍ठयर्थ जाबदार यांनी अर्जदार यांनी मयत फुलाबाई हिचे मृत्‍यूनंतर पोलिसांकडे जो खबरी जबाब दिला त्‍याची प्रत दाखल केली आहे, त्‍याचे अवलोकन केले असता असे स्‍पष्‍ट दिसून येते की, अर्जदार यांची आई वेडयासारखी बडबड करत होती व ती घरातून कोठेही निघून जात होती. जाबदार यांनी शासन निर्णय क्र. शेअवि 2008/प्र.क्र.187/11ए दि. 6 सप्‍टेंबर 2008 ची प्रत दाखल केली आहे. त्‍यामध्‍ये प्रपत्र क मध्‍ये विमा संरक्षण नसणा-या बाबींमध्‍ये भ्रमिष्‍टपणा हे कारण नमूद करण्‍यात आले आहे. अर्जदारचा पोलिसांकडील खबरी जबाब पाहता मयत फुलाबाई या मानसिकदृष्‍टया सक्षम नव्‍हत्‍या ही बाब स्‍पष्‍टपणे दिसून येते. सबब भ्रमिष्‍टपणाचे कारणास्‍तव अर्जदार यांचा विमादावा नाकारण्‍याचा जाबदार यांचा निर्णय योग्‍य, संयुक्तिक व कायदेशीर आहे असे या मंचाचे मत आहे. 
 
8.    अर्जदार यांचे तक्रारअर्जातील कथन पहाता अर्जदार यांचे पतीचे निधन दि.14/10/08 रोजी झालेले आहे. तदनंतर त्‍यांनी त्‍यांची आवश्‍यक ती कागदपत्रे दि.23/11/2008 रोजी गावकामगार तलाठी विसापूर यांचेमार्फत तहसिलदार खटाव  यांचेकडे पाठविली. तहसिलदार खटाव  यांनी ती जाबदार क्र.1 यांचेकडे पाठविली असे अर्जदार यांनी कथन केले आहे. परंतु, सदरचा प्रस्‍ताव तलाठी यांनी तहसिलदारांकडे निश्चित कोणत्‍या तारखेस पाठविले, तहसिलदार यांनी नंतर तो जाबदार यांचेकडे कधी पाठविला याबाबत कोणताही सविस्‍तर तपशील अगर पुरावा अर्जदार यांनी त्‍यांचे तक्रारअर्जात नमूद केलेला नाही.   तसेच सदरचा प्रस्‍ताव जाबदार क्र.1 यांचेकडे पाठविलेनंतर अर्जदार यांनी जाबदार क्र.1 यांचेकडे विमा दावा रक्‍कम मिळणेसाठी लेखी स्‍वरुपात कोणता पाठपुरावा केला याबाबत कोणतीही कागदपत्रे दाखल केलेली नाहीत. अर्जदार यांनी दि.23/11/2008 रोजी तलाठी यांचेकडे प्रस्‍ताव पाठविला. तदनंतर त्‍यांनी दि.5/1/2011 रोजी प्रस्‍तुतचा तक्रारअर्ज दाखल केला आहे. ग्राहक संरक्षण कायद्यातील तरतुदीनुसार त‍क्रारीस कारण घडल्‍यापासून दोन वर्षांचे आत तक्रार दाखल करणे बंधनकारक आहे. परंतु, अर्जदार यांनी सुमारे दोन वर्षांचा कालावधी उलटून गेल्‍यानंतर प्रस्‍तुतची तक्रार दाखल केली आहे. अर्जदार यांनी याकामी योग्‍य ती सबळ कारणे नमूद करुन उशिरामाफीचा अर्ज दाखल केलेला नाही. सबब, प्रस्‍तुतची तक्रार मुदतीत नसल्‍यामुळे ती फेटाळणेस पात्र आहे असे या मंचाचे मत आहे. 
 
9.    प्रस्‍तुत तक्रारअर्जाचे कामी जाबदार क्र.1 असे कथन केले आहे की, महाराष्‍ट्र सरकारतर्फे संबंधीत विमा योजनेप्रकरणी एकूण 2232 प्रकरणांबाबत एक तक्रार क्र.27/08 राष्‍ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोग, नवी दिल्‍ली यांचेकडे दाखल केलेली आहे, तसेच, त्‍यामध्‍ये अर्जदार यांचे प्रकरणाचा समावेश असून सदर प्रकरण न्‍यायप्रविष्‍ट आहे असे कथन केले आहे. जाबदार क्र.1 यांची कैफियत दाखल झालेनंतर अर्जदार यांनी याकामी लेखी प्रतिउत्‍तर दाखल केले आहे. त्‍यामध्‍ये सदरची बाब अर्जदार यांनी कोठेही नाकारलेली नाही. अशा या पार्श्‍वभूमीवर जर तक्रारअर्जदार यांचे प्रकरण राष्‍ट्रीय आयोगाकडे विचाराधीन असल्‍यामुळे प्रस्‍तुतच्‍या ग्राहक तक्रार निवारण मंचास कोणताही न्‍यायनिर्णय करता येणार नाही.
 
10.   अर्जदार यांनी याप्रकरणी वरिष्‍ठ न्‍यायालयांचे काही निवाडे दाखल केलेले आहेत. परंतु सदरचे निवाडयांचे अवलोकन केले असता असे दिसून येते की, सदरचे निवाडयातील घटनाक्रम व प्रस्‍तुत प्रकरणातील घटनाक्रम हा भिन्‍न आहे. सबब अर्जदार यांनी दाखल केलेले निवाडे याकामी लागू होत नाहीत असे या मंचाचे मत आहे.
 
 
11.    या सर्व कारणास्‍तव व वर नमूद मुद्दयांच्‍या दिलेल्‍या उत्‍तरास अनुसरुन अर्जदार यांचा तक्रारअर्ज नामंजूर करणेत येत आहे.
 
 
 
 
आदेश
 
1. अर्जदार यांचा तक्रारअर्ज नामंजूर येत आहे.
2. खर्चाबाबत काहीही आदेश करणेत येत नाहीत.
3. सदरचा न्‍यायनिर्णय खुल्‍या न्‍यायमंचात जाहीर करणेत आला.
 
सातारा
दि.21/5/2011
 
 
 
 
(सुनिल कापसे)           (सुचेता मलवाडे)           (विजयसिंह दि. देशमुख)
    सदस्‍य                   सदस्‍या                    अध्‍यक्ष
 
 
 
 
 

Smt. S. A. Malwade, MEMBERHONABLE MR. Vijaysinh D. Deshmukh, PRESIDENT Mr. Sunil K Kapse, MEMBER