Maharashtra

Chandrapur

CC/18/47

Smt Suman Wasudeo Dhote At Nandgaon - Complainant(s)

Versus

The Oriental Insurance Company Ltd through Branch Manager chandrapur - Opp.Party(s)

Adv. Kshirsagar

29 Oct 2018

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTE REDRESSAL FORUM
CHANDRAPUR
 
Complaint Case No. CC/18/47
( Date of Filing : 05 Mar 2018 )
 
1. Smt Suman Wasudeo Dhote At Nandgaon
At Nandgaon Tah Bramhapuri
chandrapur
maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. The Oriental Insurance Company Ltd through Branch Manager chandrapur
Dhanraj Plza Chandrapur
chandrapur
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. Atul D.Alsi PRESIDENT
 HON'BLE MRS. Kirti Vaidya Gadgil MEMBER
 HON'BLE MRS. Kalpana Jangade Kute MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
Dated : 29 Oct 2018
Final Order / Judgement

::: नि का ल प ञ:::

(मंचाचे निर्णयान्‍वये,  मा. सौ. किर्ती वैदय (गाडगीळ) मा.सदस्‍या) (पारीत दिनांक :- 29/10/2018)

 

      1.     अर्जदाराने ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 12 अंतर्गत गैरअर्जदाराविरूध्‍द प्रस्‍तूत तक्रार दाखल केली आहे. 

2.  अर्जदार ही राहणार पो.नांदगांव जानी, ता.ब्रम्‍हपूरी, जिल्हा चंद्रपूर येथील रहिवासी असून तिचे पती श्री.वासुदेव आत्‍माराम धोटे यांच्‍या मालकीची  मौजा नांदगांव जानी, ता.ब्रम्‍हपूरी, जिल्हा चंद्रपूर येथे भूमापन क्रमांक 628 ही शेतजमीन आहे. गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 हे विमा कंपनी असून गैरअर्जदार क्रमांक 3 हे विमा सल्लागार आहेत. गैरअर्जदार क्रमांक 4 हे गैरअर्जदार क्रमांक एक व दोन यांचे वतीने दावे स्वीकारतात. अर्जदाराचे पतीचा दिनांक 10.10.2008 रोजी रस्‍त्‍याने मोटरसायकलने जात असताना दुसऱ्या सायकलस्‍वारास  धडक दिल्यामुळे पडून जखमी होऊन मृत्यू झाला. अर्जदाराचे पतीचा शेतकरी विमा योजनेअंतर्गत गैरअर्जदार क्रमांक एक व दोन यांचेकडे विमा उतरविला असल्यामुळे अर्जदार हिने गैरअर्जदार क्रमांक 4 कडे दस्तावेजांसह विमा दावा दाखल केला. परंतु सदर दावा दाखल केल्यानंतरही नऊ वर्षे उलटून गेल्यावरही दावा मंजूर वा नामंजूर झाला याबद्दल अर्जदाराला काहीही कळविण्यात आले नाही. त्याबद्दल अर्जदाराने वकिलामार्फत नोटीस पाठवूनही उत्तर न मिळाल्यामुळे सदर तक्रार गैरअर्जदारांविरुद्ध दाखल केली आहे. अर्जदाराची मागणी अशी आहे की अर्जदाराला विमादाव्याची रक्कम रू.1 लाख, अर्जदाराने

 

 

गैरअर्जदाराकडे प्रस्ताव दाखल केल्याचा दिनांक 10/12/2008 पासून दर साल दर शेकडा 18 टक्के व्याजासह देण्यात यावे तसेच शारीरिक मानसिक त्रासापोटी रुपये 30,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रू.10,000/- मिळण्याचे आदेश व्हावेत.
.
3.      अर्जदार यांची तक्रार दाखल करून गैर अर्जदार विरुद्ध नोटीस काढण्यात आले. गैरअर्जदार क्रमांक 3 व 4 यांनी मंचाचा नोटीस नि.क्र.10 प्राप्त होऊन देखील ते मंचात उपस्थित न झाल्यामुळे त्यांचे विरुद्ध प्रकरण एकतर्फा चालविण्यात आले.

4.      विरुद्ध पक्ष क्रमांक 1 व 2 यांनी मंचासमक्ष हजर होऊन आपले लेखी उत्तर दाखल करून त्यामध्ये अर्जदार चे म्हणणे खोडून काढले. त्यांनी आक्षेप घेतला  की कृषी आयुक्त पुणे यांना सदर तक्रारीत पक्ष न केल्यामुळे आवश्यक पक्षकार अभावी तक्रार खारीज करण्यात यावी. तसेच अर्जदाराचे पतीचा अपघाती मृत्यू झाला याबद्दल माहिती नसल्यामुळे ती बाब मान्य नाही. गैरअर्जदार क्रमांक 3 व 4 यांनी त्यांची जबाबदारी व्यवस्थित रित्या पार न पडल्यामुळे त्यांचेवर सदर तक्रारीची जबाबदारी येऊन पडते. अर्जदाराने विमाधारकाच्या मृत्यूपासून 90 दिवसाच्या आत कृषी अधिकारी यांचेकडे विमादावा द्यायला हवा होता. परंतु तसा कोणताही पुरावा तक्रारीत दाखल नाही.  सबब तसा कायदेशीर नोटीसही अर्जदाराला पाठविण्यात आला त्याच प्रमाणे अर्जदाराने आवश्यक दस्तावेजांची पूर्तता केली नाही. कोणतेही वैध लायसन्स नसताना दिनांक 10/10/2008 रोजी मयत वासुदेव याने निश्‍काळजीपणे मोटरसायकल चालविल्यामुळे सदर अपघात झाला व त्याप्रमाणे ब्रह्मपुरी पोलिस स्टेशन यांनी त्‍याचेविरुध्‍द गुन्हा दाखल केला. अर्जदाराचे पती वैध परवाना नसताना गाडी चालवीत होते. तसेच अर्जदाराने त्याचे एमडीएल प्रस्तुत न केल्यामुळे सदर दावा फेटाळण्यात आला व तसे दिनांक 22/01/2010 च्‍या पत्रान्‍वये अर्जदारांस कळविण्‍यांत आले. मोटर वेहिकल अॅक्ट च्या कलम 3 नुसार वैध परवाना आवश्यक आहे. त्यापासून कोणालाही सुटका नाही. विद्यमान न्यायालयालाही शेतकऱ्यांना त्यापासून सुटका देण्याचा अधिकार नाही. सदर तक्रारीचे कारण दिनांक 10/10/2008 रोजी घडले तेव्हा अर्जदाराचे पती मयत झाले परंतु तक्रार दिनांक 5/3/2018 रोजी दाखल झाली. सोबत अर्जदाराने कोणताही विलंब माफीचा अर्ज जोडलेला नाही सबब सदर तक्रार मुदतबाह्य असून खारीज करण्यात यावी.

5.     अर्जदाराची तक्रार, दस्तावेज, पुरावा शपथपत्र, लेखी युक्‍तीवाद व गैरअर्जदार क्र. 1 व 2  यांचे लेखी म्‍हणणे, पुरावा शपथपत्र लेखी युक्‍तीवाद तसेच अर्जदार व गैरअर्जदार क्र.1 व 2 यांचे तोंडी युक्तिवादावरून तक्रार निकाली कामी खालील मुद्दे कायम करण्‍यात येत आहे.

             मुद्दे                                                 निष्कर्ष

 (1)   अर्जदार गैरअर्जदार क्रं. 1 व 2 यांची  ग्राहक आहे काय ?          होय.        

 (2)   अर्जदार गैरअर्जदार क्रं.3  व 4 यांची ग्राहक आहे काय ?           नाही. 

 (3)   गैरअर्जदार क्रं. 1 व 2 यांनी  अर्जदारांस न्‍युनतापूर्ण

        सेवा दिली आहे  काय ?                                                    होय.   

     

 (4)  आदेश काय  ?                                                    अंतीम आदेशाप्रमाणे.

          कारण मिमांसा

मुद्दा क्रं. 1 बाबत :-

6.      अर्जदार हिने निशाणी क्रमांक 4 वर दाखल केलेल्‍या दस्‍त 7/12 उतारा, फेरफारपत्रक व शेतीचे दस्‍ताऐवज यांचे अवलोकन केले असता असे निदर्शनांस येते की अर्जदाराचे पती श्री.वासुदेव आत्‍माराम धोटे यांच्‍या मालकीची  मौजा नांदगांव जानी, ता.ब्रम्‍हपूरी, जिल्हा चंद्रपूर येथे भूमापन क्रमांक 628 ही शेतजमीन आहे. यावरून अर्जदाराचे पती हे शेतकरी होते व शेतीतील उत्‍पन्‍नावर ते कुटूंबाचे पालन पोषण करीत होते हे सिध्‍द होते.  शासन निर्णयानुसार अपघातग्रस्‍त शेतक-यांचे कुटूंबीयांस लाभ देण्‍याकरीता काढलेल्‍या शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत अर्जदाराचे पतीचा 2008-09  या कालावधीकरता रू.1,00,000/- चा शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा काढण्यात आला होता ही बाब स्पष्ट दिसून येत आहे. तक्रारकर्ती ही मयत विमाधारक शेतक-याची पत्‍नी असून सदर विम्‍याची लाभधारक आहे. सबब अर्जदार ही गैरअर्जदारक्र.1 व 2 ची ग्राहक आहे हे सिध्‍द होते. सबब मुद्दा क्रं. 1 चे उत्‍तर हे होकारार्थी नोंदविण्‍यात येते.

. मुद्दा क्रं. 2 बाबत :

7.     गैरअर्जदार क्रं. 3 व 4 यांनी महाराष्‍ट्र शासनाच्‍या निर्णयानुसार शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत शेतक-यांचा गैरअर्जदार क्र.1 व 2 कडे विमा काढला व सदर विमा काढण्‍याकरीता विरूध्‍द पक्ष क्र. 3 व 4 ने विना मोबदला मदत केली असल्‍याने अर्जदार ही विरूध्‍द पक्ष क्र. 3 व 4 यांची ग्राहक नाही. सबब  मुद्दा क्रं. 2 चे उत्‍तर हे नकारार्थी नोंदविण्‍यात येत आहे. 


मुद्दा क्रमांक 3 बाबत..


8.     सदर प्रकरणात महाराष्ट्र शासनाच्या शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत मयत विमाधारकाची पॉलिसी काढण्‍यांत आलेली असून सदर योजनेअंतर्गत गैरअर्जदार क्रमांक 1 हे विमा योजनेनुसार जोखीम स्वीकारतात. अर्जदार ही सदर विमा पॉलिसीअंतर्गत मयत विमाधारकाची पत्‍नी व वारस या नात्‍याने लाभार्थी असून ती गैरअर्जदार क्र.1 व 2 यांची ग्राहक ठरते.   अर्जदाराचे निवेदन तथा दाखल दस्तऐवजांवरून असे स्पष्ट दिसून येते की अर्जदाराचे पती श्री.वासुदेव आत्‍माराम धोटे हे दिनांक 10/10/2008 रोजी मोटरसायकलने जात असता अपघातात अन्‍य सायकलस्‍वारास धडक दिल्याने जखमी होऊन मृत्यू पावले. अर्जदार ही मयत विमाधारक शेतक-याची पत्‍नी असल्याने तिने शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत विमा रकमेची मागणी केलेली आहे. अर्जदाराने दाखल केलेल्या दस्तऐवजांवरून तिच्या पतीचा मृत्यू अपघातात जखमी होऊन झाला ही बाब निशाणी क्रमांक 4 वरील शवविच्छेदन अहवाल व घटनास्थळ पंचनामा यावरून सिद्ध होत आहे.
गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 यांनी त्यांचे लेखी उत्तरात मयत श्री वासुदेव यांचा दिनांक 10/10/2008 रोजी रस्ते अपघातात मृत्यू झाला व त्याच्या वारसांनी शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत दाखल केलेला  विमा दावा त्यांना प्राप्त देखील झाला हे मान्‍य केले आहे, परंतु अपघाताचे वेळी मयत श्री वासूदेव जवळ वाहन चालविण्याचा वैध परवाना नसल्याकारणाने सदर विमा दावा नामंजुर केला व तसे दिनांक 22/01/2010 च्‍या पत्रान्‍वये अर्जदारांस कळविण्‍यांत आले असे त्‍यांनी नमूद केले आहे. परंतु विमादावा नाकारल्‍याचे पत्र अर्जदारास प्राप्‍त झाल्‍याबाबत कोणतीही पोचपावती गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी दाखल केलेली नाही.

9.       तक्रारकर्तीच्‍या पतीचा मृत्‍यु रस्‍ते अपघातात झाला हयाबद्दल विवाद नाही. अर्जदाराने दाखल केलेल्‍या दस्‍तऐवजांचे अवलोकन केले असता असे दिसून येते की अर्जदाराचे पतीने हयगयीने मोटरसायकल चालविल्‍याने समोरील सायकलस्‍वारास धक्‍का लागून अपघात झाला व त्‍यात अर्जदाराचे पतीचा खाली पडून जखमी होऊन मृत्‍यु झाला. शवविच्‍छेदन अहवालातदेखील अपघातामुळे डोक्‍याला जखमा झालेल्‍या आहेत असे नमूद आहे. यावरून अर्जदाराच्‍या पतीचा मृत्‍यु अपघातात झाला ही बाब सिध्‍द होते. शासनाच्‍या परिपत्रकाप्रमाणे अपघात  घडला असे सिध्‍द झाल्‍यास अनावश्‍यक धोका पत्‍करला या कारणास्‍तव गैरअर्जदाराला विमादावा नाकारता येत नाही किंवा अर्जदाराच्‍यापतीजवळ वाहन चालविण्‍याचा परवाना असता तर सदर्हु अपघात घडला नसता हे म्‍हणणे काल्‍पनीक ठरेल. तसेच शासनाच्‍या परिपत्रकाप्रमाणे जर परवाना सादर केला नसेल तर तो प्रस्‍ताव नाकारण्‍यात यावा असे कुठेही नमूद नव्‍हते. सबब वैध परवान्‍यासंबंधी प्रकरण् आल्‍यांस ते प्रकरण गैरअर्जदाराने निकाली काढावयास हवे होते. जर पॉलीसीच्‍या अटी व शर्तीमध्‍ये अर्थबोध होत नसेल व दोन अर्थ निघत असतील तर ग्राहकाच्‍या बाजूने अर्थबोध ग्राहय धरला पाहिजे. तसेच सदर प्रकरणात मयत वासुदेव धोटे यांचा अपघाती मृत्‍यु हा दिनांक10/10/2008 रोजी झाला व महाराष्ट्र शासनाने दिनांक 29 मे 2009 रोजी काढलेल्या शुद्धी पत्रकानुसार, जर शेतकऱ्याचा मृत्यू वाहन अपघातात झाला असेल व सदर वाहन शेतकरी चालवीत असेल तर अशा प्रकरणी त्याचा वाहन चालविण्याचा वैध परवाना सादर करणे आवश्यक राहील असे नमूद केले असले तरी सदर शुद्धिपत्रक शासनाने दिनांक 29 मे 2009 रोजी कार्यान्वित केले असून प्रस्तुत प्रकरणातील विमाधारक श्री वासुदेव धोटे याचा मृत्यू त्यापूर्वीच 10/10/2008 रोजी झालेला असल्यामुळे सदर परिपत्रकातील तरतूद प्रस्तुत प्रकरणात लागू होत नाहीत. सबब गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 ने मयत विमाधारकाजवळ वैध वाहन परवाना नव्हता या कारणास्तव विमा दावा फेटाळणे व अर्जदाराला विम्याच्या लाभापासून वंचित ठेवणे न्यायोचीत नाही. त्यामुळे गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 यांची कृती ही न्यूनता पूर्ण सेवा या संज्ञेत मोडते व ते अर्जदाराला विमा दाव्याची रक्कम देण्यास जबाबदार ठरतात.

मुद्दा क्र. 4 बाबत :-  

10.   सबब उपरोक्त विवेचनावरून मंच खालील आदेश पारित करीत आहे.  

आदेश

           (1) अर्जदाराची तक्रार क्र.47/2018 अंशतः मंजूर करण्‍यात येते.

          (2) गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी वैयक्‍तीक किंवा संयुक्‍तरीत्‍या अर्जदारांस विमादाव्‍याची रक्‍कम रू.1,00,000/- त्‍यावर तक्रार दाखल दिनांक 5/3/2018 पासून रक्‍कम अर्जदाराचे हाती पडेपर्यंत द.सा.द.शे.9 टक्‍के दराने व्‍याजासह अर्जदारांस द्यावी.

          (3) गैरअर्जदार क्र.3 व 4 विरुध्‍द कोणताही आदेश नाही.

          (4) गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी वैयक्‍तीक किंवा संयुक्‍तरीत्‍या अर्जदारांस शारिरीक व मानसीक त्रासाचे नुकसान भरपाईपोटी रू.10,000/- व तक्रारीच्‍या खर्चापोटी रू.5,000/- द्यावेत. 

          (5) उभय पक्षांना आदेशाची प्रत तात्‍काळ पाठविण्‍यात यावी.

 

 

चंद्रपूर

दिनांक – 29/10/2018

 

 

                             

(श्रीमती.कल्‍पना जांगडे(कुटे))  (श्रीमती. किर्ती वैदय (गाडगीळ))  (श्री. श्री.अतुल डी. आळशी)                     

      सदस्‍या                     सदस्‍या                      अध्‍यक्ष 

                जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, चंद्रपूर.

 

 

 

 
 
[HON'BLE MR. Atul D.Alsi]
PRESIDENT
 
[HON'BLE MRS. Kirti Vaidya Gadgil]
MEMBER
 
[HON'BLE MRS. Kalpana Jangade Kute]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.