जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, गडचिरोली
ग्राहक तक्रार क्रमांक :- 43/2016 तक्रार नोंदणी दि. :-7/9/2016
तक्रार निकाली दि. :- 11/01/2017
निकाल कालावधी :- 4 म.4 दिवस
अर्जदार/तक्रारकर्ता :- 1) श्री.रेवनाथ शंकर साखरे,
वय 65 वर्षे, व्यवसाय-शेती,
2) श्री.निळकंठ शंकर साखरे
वय 52 वर्ष, व्यवसाय-शेती
3) श्री जनार्धन शंकर साखरे
वय 44 वर्ष, व्यवसाय-शेती
सर्व रा.साखरा, ता. जि.गडचिरोली.
- विरुध्द -
गैरअर्जदार/विरुध्दपक्ष :- (1) द ओरीयंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड,
तर्फे डिव्हीजनल मॅनेजर,
डिव्हीजनल ऑफीस नं.2, प्लॉट नं.8,
हिंदुस्थान कॉलनी, अजनी चौकाजवळ, वर्धा रोड,
नागपूर-400015.
(2) मे.कबाल इंशुरन्स ब्रोकींग सर्व्हीसेस लिमिटेड,
तर्फे श्री.सुभाष आग्रे, प्लॉट नं.101,
करंदीकर हाऊस, मंगला टॉकीजच्या शेजारी,
शिवाजी नगर, पुणे-411005..
(3) तालुका कृषि अधिकारी, गडचिरोली,
तालुका व जिल्हा गडचिरोली.
अर्जदार तर्फे वकील :- अधि.श्री.उदय क्षिरसागर
गैरअर्जदार क्र.1 तर्फे वकील :- अधि.श्री ए.एम.काझी
गैरअर्जदार क्र.2 व 3 तर्फे वकील :- स्वतः
गणपूर्ती :- (1) श्रीमती रोझा फुलचंद्र खोब्रागडे, अध्यक्ष (प्र.)
(2) श्री सादिक मोहसिनभाई झवेरी, सदस्य
- आ दे श -
( मंचाचे निर्णयान्वये, सादिक मो.झवेरी, सदस्य)
(पारीत दिनांक : 11 जानेवारी 2017)
तक्रारकर्त्याने सदर तक्रार, ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 12 अन्वये दाखल केली असून, तक्रारीचा आशय थोडक्यात येणे प्रमाणे.
1. तक्रारकर्त्याचे वडील शेतीचा व्यवसाय करीत होते. शेतातील उत्पन्नावर तक्रारकर्त्याचे वडील कुटूंबाचे पालनपोषण करीत होते. तक्रारकर्त्याचे वडील श्री. शंकर गोविंदराव साखरे यांचा मृत्यु दि.15.5.2009 रोजी एका ट्रॅक्टरने धडक दिल्याने झाला. शासनातर्फे तक्रारकर्त्याचे वडीलांचा शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा काढला असल्याने व तक्रारकर्त्याचे वडील शेतकरी असल्याने तक्रारकर्ते, गैरअर्जदार क्र.1 कडून रुपये 1,00,000/- च्या विमा रकमेसाठी पाञ होते. अपघातात मृत्यु झाल्याने गैरअर्जदार क्र.3 कडे विमा योजने अंतर्गत क्लेम नं.181200/48/2010/217 रितसर अर्ज केला, तसेच वेळोवेळी गैरअर्जदारांनी मागीतलेल्या दस्ताऐवजाची पुर्तता केली. तक्रारकर्त्यांच्या वडीलांच्या दाव्याबाबत गैरअर्जदार यांनी कोणताही निर्णय न घेतल्याने अर्जदाराने वकीलामार्फत दिनांक 13.7.2016 ला गैरअर्जदारांना नोटीस पाठविला. शासनाने ज्या उद्देशाने मृत शेतक-याच्या पत्नी व मुलांसाठी ही योजना सुरु केली त्या उद्देशालाच गैरअर्जदार हे तडा देत आहे. त्यामुळे गैरअर्जदार क्र.1 ने दावा प्रलंबित ठेवून सेवेमध्ये ञृटी केली. त्यामुळे तक्रारकर्त्यांस मानसिक, शारिरीक ञास व आर्थिक नुकसान झाले. त्यामुळे तक्रारकर्त्यांनी, गैरअर्जदारांनी विमा दाव्याची रक्कम रुपये 1,00,000/- प्रस्ताव सादर केल्यापासून द.सा.द.शे. 18 % व्याजाने मिळण्याचे, तसेच मानसिक, शारिरीक व आर्थिक ञासापोटी रुपये 30,000/- व तक्रारीचे खर्चापोटी रुपये 15,000/- अर्जदारास गैरअर्जदारांकडून मिळण्याचे आदेश व्हावे, अशी प्रार्थना केली.
2. अर्जदाराने नि.क्र.2 नुसार 8 झेरॉक्स दस्ताऐवज दाखल केले. अर्जदाराची तक्रार नोंदणीकरुन गैरअर्जदारास नोटीस काढण्यात आली. गैरअर्जदार क्र.1 ने नि.क्र.12 नुसार लेखी उत्तर दाखल केले. गैरअर्जदार क्र.2 ने नि.क्र.15 नुसार व गैरअर्जदार क्र.3 ने नि.क्र.11 नुसार लेखी उत्तर दाखल केले.
3. गैरअर्जदार क्र.1 ने नि.क्र.12 नुसार दाखल केलेल्या लेखी उत्तरात नमूद केले की, अर्जदाराने तक्रारीत केले सर्व आरोप त्यांना नाकबूल आहे. गैरअर्जदाराने पुढे त्याचे लेखी उत्तरात नमूद केले आहे की, अर्जदाराचे वडीलांचा मृत्यु दिनांक 15.5.2009 ला झालेला असून तक्रारीचे कारण दिनांक 15.5.2009 ला उदभवले आहे, असे अर्जदाराने त्यांच्या तक्रारीत नमुद केले आहे. परंतु, अर्जदाराने, गैरअर्जदाराकडे दावा कधी दाखल केला, याबाबत दिनांक किंवा वर्ष तक्रारीत नमुद केलेले नाही. अर्जदाराने आपल्या तक्रारीत दावा क्र.181200/48/2010/217 अन्वये, गैरअर्जदार क्र.3 कडे दाखल केलयाचे नमुद केले आहे. परंतु संपुर्ण तक्रारीमध्ये तारीख, महिना व वर्ष नमुद केले नाही. अर्जदाराने माहे सप्टेंबर 2016 पर्यंत अर्जदारांच्या विमा दाव्याबाबत कोणताही निर्णय न घेतल्याचे नमुद केले आहे. परंतु, गैरअर्जदार क्र.1 यांनी दिनांक 16.11.2009 रोजी अर्जदाराचे वडीलांचे वय 85 वर्ष असल्यामुळे नाकारण्यात आल्याचे कळविले आहे. गैरअर्जदार क्र.2 ने देखील विमा पॉलीसी फक्त वयाच्या 75 व्या वर्षापर्यंत लागू असल्याचे कळविले आहे. गैरअर्जदार क्र.1 ने पुढे असे नमुद केले की, अर्जदारांनी तब्बल 7 वर्षानंतर तक्रार दाखल केलेली असल्यामुळे सदर तक्रार मुदतबाहय आहे. तसेच, अर्जदारांनी विलंब माफीचा कोणताही अर्ज विद्यमान मंचासमोर सादर केलेला नाही. त्यामुळे, अर्जदारांची तक्रार खारीज होण्यास पात्र आहे. सदर तक्रारीचे कारण दिनांक 15.5.2009 ला उदभवले असून सदर तक्रार मुदतबाहय आहे. सदरची तक्रार मुदतबाहय असल्यामुळे अर्जदाराची तक्रार खारीज करण्यात यावी, अशी विनंती केली.
4. गैरअर्जदार क्र.2 ने नि.क्र.15 नुसार दाखल केलेल्या लेखी उत्तरात नमूद केले की, गैरअर्जदारक्र.1 ने राज्य शासनाकडून विमा प्रिमियम स्विकारुन जोखीम स्विकारली असल्यामुळे, अर्जदार हे गैरअर्जदार क्र.1 चे ग्राहक आहेत. गैरअर्जदार क्र.2 हे केवळ विमा सल्लागार असून, ते विनामोबदला शासनास मदत करतात. मयत शंकर गोविंद साखरे यांचा अपघात दिनांक 15.5.2009 ला झाला. त्याचा प्रस्ताव जिल्हा अधिक्षक, कृषि अधिकारी, गडचिरोली मार्फत गैरअर्जदार क्र.2 ने गैरअर्जदार क्र.1 ला दिनांक 14.9.2009 रोजी पाठविला असता, गैरअर्जदार क्र.1 ने सदर प्रस्ताव दिनांक 16.11.2009 ला नामंजूर करुन वारसदारास कळविल्याचे दिसून येते. त्यामुळे, अर्जदाराची तक्रार गैरअर्जदार क्र.2 विरुध्द खारीज करण्यात यावी, अशी विनंती केली.
4. गैरअर्जदार क्र.3 ने नि.क्र.11 नुसार दाखल केलेल्या लेखी उत्तरात नमूद केले की, अर्जदार यांचेकडून प्राप्त अर्ज वरीष्ठ कार्यालयास सादर करण्यात आला व मे.कबाल इंशुरन्स ब्रोकींग सर्व्हीसेस लिमिटेड यांनी दावा नामंजूर केला आहे.
5. अर्जदार व गैरअर्जदार क्र.1 ते 3 यांनी दाखल केलेले लेखी बयान, शपथपञ, तोंडी युक्तीवादावरुन खालील मुद्दे निघतात.
मुद्दे : निष्कर्ष
1) अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक आहे काय ? : होय
2) गैरअर्जदार क्र.1 ने लाभार्थ्याप्रती सेवेत न्युनतापूर्ण : होय
व्यवहार केला आहे काय ?
3) अर्जदार हा गैरअर्जदार क्र.1 कडून विमा पॉलिसीचा लाभ : होय
मिळण्यास पाञ आहे काय ?
4) आदेश काय ? : अंतिम आदेशाप्रमाणे
- कारण मिमांसा –
मुद्दा क्रमांक 1 बाबत :-
6. अर्जदाराचे वडील श्री.शंकर गोविंदराव साखरे हे शेतकरी असून त्यांचे नावाने शेतजमीन असल्यामुळे व शासनाच्या वतीने शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत अर्जदाराचे वडीलांचे शेतकरी म्हूणन या विमा योजनेअंतर्गत विमा काढण्यात आला असून व अर्जदार हा मयत शंकर गोविंद साखरे यांचे वारस असल्यामुळे सदर विम्याचे लाभधारक आहेत. म्हणून अर्जदार हे गैरअर्जदाराचे ग्राहक आहेत. म्हणून, मुद्दा क्र.1 चे उत्तर होकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
मुद्दा क्रमांक 2 बाबत :-
6. गैरअर्जदार क्र.1 ने दाखल केलेले लेखी उत्तर, शपथपत्र, दस्तऐवज वरुन दिसून येते की, अर्जदारांचे वडील मयत शंकर गोविंद साखरे यांचा अपघाती मृत्यु दिनांक 15.5.2009 ला झाला असन अर्जदाराच्या वतीने शेतकरी अपघात विमा दाव्याची रक्कम मिळण्यासाठी रितसर केलेला अर्ज क्लेम नं. 181200/48/2010/217 व्दारा सादर केलेला आहे, हे दाखल दस्तऐवजावरुन सिध्द होत आहे. गैरअर्जदाराने अर्जदाराचे विमा दाव्याची रक्कम न देता गैरअर्जदाराचे दाखल दस्तऐवज क्र.1 नुसार विमा दावा दिनांक 16.11.2009 रोजी साधे पत्र देवून मयताचे वय जास्त आहे, या कारणाने खारीज केला असल्याचे दिसून येते. परंतु, सदर दस्तऐवज अर्जदारास मिळाला किंवा नाही याचा कोणताही पुरावा गैरअर्जदाराने दाखल केलेला नाही. तसेच, गैरअर्जदाराचे दिनांक 16.11.2009 च्या पत्रावरुन हे म्हणणे सुध्दा गृहीत धरता येत नाही की, अर्जदारातर्फे दावा कधी दाखल करण्यात आला.
मंचाच्या वतीने जेव्हा गैरअर्जदारास विचारण्यात आले की, तुमच्याव्दारे सदर पत्र पाठविण्याची पोचपावती असते का ? तेव्हा गैरअर्जदाराचे म्हणणे होते की, आम्ही असे पत्र साध्या पोष्टाने पाठवितो, कारण आमचेकडे हजारो असे पत्र असतात, कोणा-कोणाला रजिष्ट्रीने पाठविणार व तशी पध्दत नाही. गैरअर्जदाराचे हे म्हणणे सोपे असले तरी, अर्जदार जो की एक साधारण कुटुंबाचा साधारण शेतकरी आहे व ज्यांचे वडील वारल्यानंतर कुटुंबाचे भरणपोषणाची जबाबदारी अर्जदारांवर आली असता आणि त्याच्यासाठी ही लहानशी रक्कम ही खुप मोठी आहे व असते. अशा वेळी गैरअर्जदाराव्दारे फक्त हे म्हणणे की आम्ही साध्या पोष्टाने पत्र पाठवितो, हे चुकीचे असून सेवा देण्यात त्रृटी आहे, असे या मंचाचे मत आहे. अर्जदार हे आदिवासी भागात राहणारे अर्धशिक्षित असल्याने व त्याच्या वयाचे पुरावे देणे जरुरी आहे हे समजणे व समजायचे प्रयत्न करणारे कोणी नसल्यामुळे तो आज किंवा उदया विमा दावा मिळेल याची वाट बघत असावा, म्हणून गैरअर्जदाराचे हे ही म्हणणे की, अर्जदाराची तक्रार वेळेत दाखल केलेली नाही, गृहीत धरण्यासारखे नाही. फक्त एक पत्र जो की त्याला मिळालेले आहे किंवा नाही यांची कोणतीही शहानिशा न करता विमा दावा रद्द करणे हे अनुचित व्यापार पध्दतीमध्ये अवलंबिलेली प्रक्रिया आहे.
गैरअर्जदाराचे हे ही म्हणणे संयुक्तीक नाही की, मयत शंकर गोविंद साखरे यांचे वय मृत्युच्या वेळी 85 वर्ष होते. कारण अर्जदार व गैरअर्जदार यांनी दाखल केलेल्या दस्तऐवजावरुन वेगवेगळे वय दिसून येत आहे. म्हणून फक्त एका दस्तऐवजावर 85 वर्ष वय असल्यामुळे दावा खारीज करणे चुकीचे आहे, असे या मंचाचे मत आहे.
एकंदरीत, गैरअर्जदाराने अर्जदारास फक्त एक मयताचे वय जास्त आहे, असे पत्र पाठवून विमा दावा नाकारलेला आहे. परंतु, अर्जदाराव्दारे दाखल दस्तऐवज निवडणूक आयोगाच्या ओळखपत्रावरुन मयताचे वय मृत्युच्या वेळी 71 वर्ष होते असे दिसून येते. पोलीस अहवालामध्ये 75 वर्ष आहे व पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये 62 वर्ष आहे. एकंदरीत मयताचे वय स्पष्ट नसल्यामुळे, गैरअर्जदाराव्दारे फक्त एक राशन कार्डवर नमुद वयाचे आधारे विमा दावा खारीज करणे चुकीचे आहे, तसेच, मा.राष्ट्रीय व राज्य आयोगाचे अनेक प्रकरणात स्पष्ट मत आहे की, जोपर्यंत पोचपावती प्राप्त होत नाही तोपर्यंत तक्रार मुदतबाहय आहे हे गृहीत धरता येत नाही म्हणून या मुद्दयाचे उत्तर होकारार्थी देण्यात येत आहे.
मुद्दा क्रमांक 3 बाबत :-
या तक्रारीचे आदेश वरील विवेचनावरुन खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारीत करण्यात येत आहे.
- अंतिम आदेश –
(1)
(2)
1,00,000/- दिनांक 16.11.2009 पासून, द.सा.द.शे. 9 टक्के व्याजासह,
आदेशाची प्रत मिळाल्यापासून 45 दिवसांत द्यावे.
(3)
त्रासापोटी रुपये 20,000/- व तक्रारीचा खर्च रुपये 5,000/- आदेशाची
प्रत मिळाल्यापासून 45 दिवसांत द्यावे.
(4)
(5)
गडचिरोली.
दिनांक – 11.01.2017.
(सादिक मो.झवेरी) ( रोझा फु.खोब्रागडे )
सदस्य अध्यक्ष (प्र.)