नि का ल प त्र :- (दि.23/08/2011) (द्वारा-श्री.एम्.डी.देशमुख, अध्यक्ष) (1) प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला क्र. 1 यांनी म्हणणे दाखल केले. सामनेवाला क्र. 2 गैरहजर. सुनावणीचेवेळेस, तक्रारदार व सामनेवाला क्र. 1 यांचे वकिलांनी युक्तिवाद केला. (2) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी, तक्रारदारांचे पती मयत सुधाकर शामराव कांबळे यांना दि. 22/07/2007 रोजी मोटर सायकल क्र. एम.एच. 08- डी-7905 वरुन चिपळूणकडे जात असतांना समोरुन एक ट्रॅक्स नं. एम.एच. 08 सी 6207 ही भरघाव वेगाने आली व मोटर सायकलीस धडक दिली व सदर अपघातामध्ये सुधाकर कांबळे हे गंभीररित्या जखमी होऊन मयत झाले. सामनेवाला विमा कंपनीकडे तहसिलदार कार्यालय, शाहूवाडी यांचेमार्फत ’शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजने’ अंतर्गत पॉलिसी दि. 5/11/2007 रोजी विमी क्लेमची मागणी केली. त्यानंतर सामनेवाला कंपनीकडे वारंवार विचारणा करुनही त्यांनी विमा क्लेम रक्कम दिलेली नाही. त्यामुळे तक्रारदारांनी कबाल इन्शुरन्स सर्व्हिसेस प्रा. लि. यांचेविरुध्द ग्राहक तक्रार क्र.296/09 ही तक्रार दाखल केली. त्यावेळेस चौकशी केली असता कबाल इन्शुरन्स प्रोसिंग सर्व्हिसेस प्रा. लि. कंपनीने सदरचा तक्रारदाराचा क्लेम ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी यांचेकडे पाठविल्याचे समजले. त्यांना सदर प्रकरणी पक्षकार करावे असा अर्ज दिला असता तो नामंजूर झाला. त्यामुळे सदरची तक्रार सामनेवाला कंपनी दि ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लि. यांचेविरुध्द दाखल केली आहे. सदर विमा कंपनीस वकिलामार्फत नोटीसही पाठविली परंतु त्यांनी त्याचे उत्तर दिलेले नाही. सबब, विमा रक्कम रु. 1,00,000/- द.सा.द.शे. 18 टक्के व्याजासहीत मिळावी, मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 25,000/- व तक्रारीचा खर्च रक्कम रु. 2,000/- देणेबाबत आदेश व्हावेत अशी विनंती केली आहे. (3) तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारीसोबत पॉवर ऑफ अटॉर्नी, वकिलामार्फत पाठविलेली रजि. नोटीस, नोटीसीची पोहच पावती इत्यादींच्या प्रती दाखल केलेल्या आहेत. (4) सामनेवाला क्र. 1 विमा कंपनीने त्यांच्या म्हणण्याअन्वये तक्रारदारांच्या तक्रारीतील कथने नाकारलेली आहेत. ते त्यांच्या म्हणण्यात पुढे सांगतात, तक्रारदारांच्या पतीचा विमा सामनेवाला क्र. 1 यांचेकडे उतरविलेला नाही. तसेच तक्रारदारांच्या पतीच्या मृत्यूबाबत कोणतेही कागदपत्र अगर क्लेम दाखल केलेला नाही. तक्रारदारांचे कथनाप्रमाणे तक्रारदारांचे पती सुधाकर कांबळे यांचा मृत्यू दि. 22/07/2007 रोजी झालेला आहे असे दिसून येते. व सामनेवाला क्र. 1 यांनी शासनाबरोबर दि. 15/08/2007 रोजीच्या करारपत्राप्रमाणे कंपनीची दि. 15/08/2007 नंतर जबाबदारी चालू होते. तक्रारदारांचे पतीचे मृत्यूचेवेळी सामनेवाला क्र. 1 कंपनीकडे विमा चालू नव्हता त्यामुळे सदरचा अर्ज नामंजूर करणेत यावा अशी विनंती केली आहे. सामनेवाला यांनी आपले म्हणण्यासोबत विमा पॉलिसीची प्रत दाखल केली आहे. (5) या मंचाने उपलब्ध कागदपत्रांचे अवलोकन केले असता तक्रारदार क्र. 1 यांचे पती सुधाकर शामराव कांबळे यांचा दि. 22/07/2007 रोजी अपघाती मृत्यू झाला असल्याबाबतची वस्तुस्थिती दिसून येते. मृत्यूच्यावेळेस सामनेवाला कंपनीच्या वकिलांनी सदर दिवशी पॉलिसी अस्तित्वात नसल्याचे या मंचाचे निर्दशनास आणून दिलेले आहे. शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजना या विमा योजनेचा करार हा दि. 15/08/2007 या दिवशी झालेला आहे. व विमा क्लेम रक्कम देण्याची जबाबदारी सदर दिवसांपासून सुरु होते. याबाबतचे पॉलिसी शेडयूल विमा कंपनीने दाखल केलेले आहे. सदरच्या पॉलिसी शेडयूल विचारात घेतले असता तक्रारदारांचे पती मयत झाले त्यावेळेस सामनेवाला क्र. 1 विमा कंपनीकडे शेतकरी अपघात विमा पॉलिसी अस्तित्वात नव्हती ही वस्तुस्थिती दिसून येते. सबब, तक्रारदार हे विमा रक्कम मिळण्यास पात्र नाहीत. तक्रारदारांची तक्रार फेटाळण्यात यावी या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब, आदेश. - आ दे श - 1. तक्रारदाराची तक्रार फेटाळण्यात येते. 2. खर्चाबाबत कोणतेही आदेश नाहीत.
| [HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT | |