Maharashtra

Bhandara

CC/19/120

PPRABHAVATI AMARDAS KANGALE - Complainant(s)

Versus

THE ORIENTAL INSURANCE CO. LTD - Opp.Party(s)

MR. UDAY P. KSHIRSAGAR

05 Mar 2021

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION,BHANDARA
Near Akhil Sabhagruha, Ganeshpur Road,Bhandara
PINCODE-441904
 
Complaint Case No. CC/19/120
( Date of Filing : 05 Dec 2019 )
 
1. PPRABHAVATI AMARDAS KANGALE
R/O MADGI POST.KESALWADA TA.BHANDRA
BHANDARA
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. THE ORIENTAL INSURANCE CO. LTD
DIVISIONAL OFFICE. 4 FLOOR. S.K.TOWERS.NELSON SQUARE. CHHINDWADA ROAD. NAGPUR 440013
NAGPUR
MAHARASHTRA
2. MANAGER. JAIKA INSURANCE BROKRAJE PVT.LTD
2 FLOOR. JAIKA BUILDING. COMMERCIAL ROAD. CIVIL LINES NAGPUR. NAGPUR 440001
NAGPUR
MAHARASHTRA
3. TALUKA KRUSHI ADHIKARI. BHANDARA
TA.BHANDARA
BHANDARA
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. NITIN M. GHARDE PRESIDING MEMBER
 HON'BLE MRS. VRUSHALI JAGIRDAR MEMBER
 
PRESENT:
 
Dated : 05 Mar 2021
Final Order / Judgement

(पारीत व्‍दारा श्री नितीन माणिकराव घरडे, मा.पिठासीन अध्‍यक्ष)

                                                                      (पारीत दिनांक–  05 मार्च, 2021)

   

01.  तक्रारकर्तीने प्रस्‍तूत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्‍या कलम 12 खाली विरुध्‍दपक्ष क्रं-1 क्षेत्रीय कार्यालय, ओरिएंटल इन्‍शुरन्‍स कंपनी नागपूर आणि इतर दोन यांचे विरुध्‍द शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत तिचे मुलाचे अपघाती मृत्‍यू संबधात विमा दाव्‍याची रक्‍कम मिळण्‍यासाठी दाखल केलेली आहे.

02.  तक्रारीचा थोडक्‍यात आशय खालील प्रमाणे-      

      तक्रारकर्ती ही उपरोक्‍त नमुद पत्‍त्‍यावर राहत असून, तिचा मृतक अविवाहित मुलगा नामे श्री गौरीशंकर अमरदास कंगाले हा व्‍यवसायाने शेतकरी होता व त्‍याचे मालकीची शेत जमिन ही मौजा- माडगी, तालुका-जिल्‍हा- भंडारा येथे भुमापन क्रं -320 या वर्णनाची होती व सदर शेतीचे उत्‍पन्‍नावर कुटूंबाचे पालनपोषण तो करीत होता.

    तक्रारकर्तीने पुढे असे नमुद केले की, यातील विरुध्‍दपक्ष क्रं 1 व 2 अनुक्रमे  विमा कंपनी आणि विमा सल्‍लागार कंपनी आहे तर विरुध्‍दपक्ष क्रं-3 तालुका कृषी अधिकारी, भंडारा असून ते महाराष्‍ट्र शासनाचे वतीने शेतक-याचा विमा काढतात व विमा दावा स्विकारुन व आवश्‍यक दस्‍तऐवजाची पुर्तता करुन घेऊन पुढे तो विमा दावा विमा कंपनीकडे दाखल करतात. सदर शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत तक्रारकर्तीच्‍या अविवाहित मुलाचा  रुपये-2,00,000/- एवढया रकमेचा विमा विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीकडे काढण्‍यात आला असल्‍याने ती मुलाचे अपघाती मृत्‍यू नंतर आई या नात्‍याने  विमा योजने मध्‍ये “लाभार्थी” आहे. तक्रारकर्तीचा मुलगा हा दिनांक-27.01.2017 रोजी रस्‍त्‍याने पायी जात असताना एका मोटार सायकलस्‍वाराने  धडक दिल्‍याने जखमी होऊन त्‍याचा मृत्‍यू झाला होता. तिचे अविवाहित मुलाचे  मृत्‍यू नंतर तिने शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत आवश्‍यक दस्‍तऐवजांसह विरुध्‍दपक्ष क्रं-3 तालुका कृषी अधिकारी भंडारा,  तालुका-जिल्‍हा- भंडारा यांचे कार्यालयात विमा दावा प्रस्‍ताव दिनांक-15.05.2017 रोजी दाखल केला होता.विरुध्‍दपक्षाने ज्‍या दस्‍ताऐवजाची मागणी केली त्‍या दस्‍ताऐवजांची पुर्तता तिने केली होती.

    तिने  पुढे नमुद केले आहे की, विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने दिनांक-01.12.2017 राजीचे पत्राव्‍दारे तिचे मुलाचे नावावर दिनांक-30.11.2016 पूर्वीचा फेरफार उतारा-6 ड नाही म्‍हणून विमा दावा रद्द करण्‍यात येतो असे कळविले. या संदर्भात तिचे असे म्‍हणणे आहे की, तिचे पतीचा दिनांक-06.06.2011 रोजी मृत्‍यू झाला होता, त्‍यामुळे वडीलांचे मृत्‍यू नंतर तिचा मृतक मुलगा हा आपोआपच शेतकरी होतो व तसा फेरफार व सातबारा उतारा दाखल केलेला आहे. ही बाब तिने वारंवार विरुध्‍दपक्षांना सांगितली परंतु विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने तिचे मुलाचे शेती संबधी कोणतीही शहानिशा न करता तिचा विमा दावा नामंजूर केला. विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीला विमा दाव्‍याची रक्‍कम देण्‍याची ईच्‍छा नसलयाने त्‍यांनी विमा दावा नामंजूर केला, त्‍यामुळे तक्रारकर्तीचे विमा दावा रकमेचे आणि व्‍याजाचे नुकसान होत आहे. ज्‍या उद्देश्‍याने शासनाचे मृतक शेतक-याचे पत्‍नी आणि मुलांसाठी ही योजना सुरु केली, त्‍या उद्देश्‍यालाच विरुध्‍दपक्ष तडा देत आहेत. अशाप्रकारे विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने चुकीचे कारण दर्शवून विमा दावा नाकारुन तिला दिलेली दोषपूर्ण सेवा  दिलेली असून, त्‍यामुळे तिला शारिरीक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. म्‍हणून शेवटी तिने प्रस्‍तुत तक्रार विरुध्‍दपक्षां विरुध्‍द जिल्‍हा ग्राहक आयोगा समक्ष दाखल करुन त्‍याव्‍दारे विरुध्‍दपक्षा कडून विमा दाव्‍याची रक्‍कम रुपये-2,00,000/- विमा दावा प्रस्‍ताव दाखल केल्‍याचा दिनांक-15.05.2017 पासून द.सा.द.शे. 18 टक्‍के व्‍याजासह मिळावी तसेच तिला झालेल्‍या शारिरीक, मानसिक व आर्थिक त्रासाबद्दल नुकसान भरपाई रुपये 30,000/- आणि तक्रार खर्च रुपये-15,000/- अशा रकमांची मागणी विरुध्‍दपक्षा विरुध्‍द केलेली आहे.

03.   विरुध्‍दपक्ष क्रं 1 ओरिएंटल इन्‍शुरन्‍स कंपनी नागपूर तर्फे वरिष्‍ठ मंडलीय प्रबंधक यांनी लेखी उत्‍तर अभिलेखावर पान क्रं 58 ते 71 वर दाखल केले. त्‍यांनी  मृतकाचे दिनांक-27.01.2017 मृत्‍यू पूर्वी  त्‍याचे नाव 7/12 चे उता-यामध्‍ये होते ही बाब नामंजूर केली. विम्‍याचे वेळी ज्‍या शेतक-यांचे नावाची नोंद 7/12 उता-या मध्‍ये असते त्‍याच शेतक-यांचा विमा हप्‍ता शासनाव्‍दारे विमा कंपनीला प्राप्‍त होतो. प्रस्‍तुत तक्रारी मधील मृतकाचे नाव 7/12 उता-यामध्‍ये नसल्‍याने त्‍याचा विमा हप्‍ता भरण्‍याचा कोणताही प्रश्‍नच उदभवत नाही, त्‍यामुळे मृतकाचा विमा नसल्‍याने विमा रक्‍कम देता येत नाही. तक्रारकर्तीने सर्व कागदपत्रांसह विमा दावा सादर केला होता, सर्व दस्‍तऐवजाची शहानिशा केल्‍या नंतर तिला विरुध्‍दपक्ष क्रं 3 तालुका कृषी अधिकारी यांचे मार्फतीने तिला कळविले होते की, विमा रक्‍कम देता येणार नाही कारण तिचा मुलगा विमाधारक नव्‍हता. दिनांक-30.11.2016 पूर्वीच्‍या फेरफार उतारा 6-ड मध्‍ये मृतकाचे नावाचा समावेश नसल्‍याने विमा दावा रद्द केलेला आहे. तक्रारकर्तीने विरुध्‍दपक्ष क्रं 3 तालुका कृषी अधिका-यांकडे दिनांक-15.05.2017 रोजी विमा दावा दाखल केला होता. वस्‍तुतः तक्रारकर्तीचे पतीचा मृत्‍यू सन-2011 मध्‍ये झाल्‍या नंतर तिने तिचा मुलगा गौरीशंकर कंगाले याचे नावाची 7/12 उता-या मध्‍ये नोंद केलेली नव्‍हती. तक्रारकर्तीला विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने त्‍यांचे दिनांक-22.03.2017 रोजीचे पत्रान्‍वये नमुना-6-ड मध्‍ये मृतकाचे नावाची नोंद नसल्‍याने विमा दावा रद्द केला आहे असे कळविले होते. सदर विमा पॉलिसीचा कालावधी सन-2016-2017 असा आहे. दिनांक-30.11.2016 पूर्वी मृतक गौरीशंकर याचे नावसचा फेरफार झाला  नव्‍हता, त्‍यामुळे विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीची विमा दावा नामंजूर करण्‍याची कृती योग्‍य व कायदेशीर असून त्‍यांनी तिला कोणतीही दोषपूर्ण सेवा दिलेली नसल्‍याने तक्रार खारीज करण्‍यात यावी अशी विनंती केली.

04.    विरुध्‍दपक्ष क्रं 2 जयका इन्‍शुरन्‍स ब्रोकरेज प्रायव्‍हेट लिमिटेड यांनी आपले लेखी उत्‍तर पान क्रं 61 व 62 वर दाखल केले. त्‍यांनी लेखी उत्‍तरा मध्‍ये ते फक्‍त विमा कंपनी आणि महाराष्‍ट्र शासन यांचे वतीने मध्‍यस्‍थ म्‍हणून कार्य करतात. विमा दावा मंजूर करणे वा नामंजूर करणे ही बाब विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीचे अधिकारातील बाब आहे, त्‍याचेशी विरुध्‍दपक्ष क्रं 2 चा कोणताही संबध नाही. जिल्‍हा अधिक्षक कृषी अधिकारी यांचे मार्फतीने त्‍यांना विमा दावा दिनांक-21.09.2017 रोजी प्राप्‍त झाला होता व त्‍यांनी तो विमा दावा विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीकडे दिनांक-15.11.2017 रोजी सादर केला होता. विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने मृतकाचे नावाचा दिनांक-30.11.2016 पूर्वीचा फेरफार उतारा 6 ड नसल्‍याने दिनांक-01.12.2017 रोजीचे पत्रान्‍वये नामंजूर केला होता. त्‍यांनी तक्रारकर्तीस कोणतीही दोषपूर्ण सेवा दिलेली नसल्‍याने त्‍यांचे विरुध्‍दची तक्रार खारीज करण्‍यात यावी अशी विनंती केली.

05.   विरुध्‍दपक्ष क्रं 3 तालुका कृषी अधिकारी, भंडारा यांनी आपले लेखी उत्‍तर पान क्रं 65 व 66 वर दाखल केले. त्‍यांनी तक्रारकर्ती श्रीमती प्रभावती कंगाले यांनी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत विमा दावा कार्यालयीन आवक क्रं-1126, दिनांक-15.05.2017 रोजी दाखल केला होता. त्‍यांनी विमा दाव्‍यातील त्रृटींची पुर्तता करुन सदर विमा दावा जिल्‍हा अधिक्षक कृषी अधिकारी भंडारा यांचे कार्यालयात दिनांक-18.05.2017 रोजी सादर केला होता. जिल्‍हा अधिक्षक कृषी अधिकारी यांनी सदर विमा दावा दिनांक-20.06.2018 रोजीचे पत्रा नुसार जयका इन्‍शुरन्‍स ब्रोकरेज प्रायव्‍हेट लिमिटेड, नागपूर यांचेकडे पाठविला होता.  विभागीय व्‍यवस्‍थापक, ओरिएन्‍टल इन्‍शुरन्‍स कंपनी लिमिटेड यांनी मृतकाच्‍या नावावर दिनांक-30.11.2016 पूर्वीचा फेरफार उतारा 6-ड नाही म्‍हणून विमा दावा नामंजूर करीत असल्‍याचे कळविले. त्‍यांनी त्‍यांचे कर्तव्‍य योग्‍य रितीने विहित मुदतीत केलेले असल्‍याने त्‍यांचे विरुध्‍दची तक्रार खारीज करण्‍यात यावी अशी विनंती केली.

06.  तक्रारकर्तीने तक्रारीचे पृष्‍टयर्थ दस्‍तऐवज यादी पृष्‍ट क्रं- 10 नुसार एकूण-09 दस्‍तऐवजाच्‍या प्रती दाखल केल्‍यात. पृष्‍ट क्रं- 74 व 75 वर तक्रारकर्तीने शपथेवरील पुरावा दाखल केला असून, पृष्‍ट क्रं-76 व 77 नुसार लेखी युक्‍तीवाद दाखल केला आहे. तसेच मा.वरिष्‍ठ न्‍यायालयाचे न्‍यायनिवाडे दाखल केलेत.

07.   विरुध्‍दपक्ष क्रं- 1 विमा कंपनी तर्फे लेखी उत्‍तर अभिलेखावरील पान क्रं 68 ते 71  वर दाखल केले. पान क्रं 72 व 72 वर शपथेवरील पुरावा दाखल केला. तसेच पान क्रं 79 ते 81 वर लेखी युक्‍तीवाद दाखल केला. विरुध्‍दपक्ष क्रं 2 जयका इन्‍शुरन्‍स ब्रोकरेज प्रायव्‍हेट लिमिटेड यांनी आपले लेखी उत्‍तर पान क्रं 61 व 62 वर दाखल केले. तर विरुध्‍दपक्ष क्रं 3 तालुका कृषी अधिकारी, भंडारा यांनी आपले लेखी उत्‍तर पान क्रं 65 व 66 वर दाखल केले.

08.  तक्रारकर्तीची तक्रार, शपथपत्र आणि तिने दाखल केलेले दस्‍तऐवज तसेच  विरुध्‍दपक्ष  क्रं-1 विमा कंपनी तर्फे दाखल लेखी उत्‍तर व शपथे वरील पुरावा  तसेच विरुध्‍दपक्ष क्रं-2 आणि विरुध्‍दपक्ष क्रं 3 यांचे लेखी उत्‍तर  इत्‍यादीचे जिल्‍हा ग्राहक आयोगा तर्फे अवलोकन करण्‍यात आले. तक्रारकर्ती तर्फे वकील श्री उदय क्षिरसागर यांचा मौखीक युक्‍तीवाद ऐकण्‍यात आला.  विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनी तर्फे वकील श्रीमती निला नशिने यांचा मौखीक युक्‍तीवाद ऐकला, त्‍यावरुन जिल्‍हा  ग्राहक आयोगा समोर न्‍यायनिवारणार्थ खालील मुद्दे उपस्थित होतात-

अक्रं

मुद्या

उत्‍तर

1

तक्रारकर्ती ही विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीची ग्राहक होते काय?

-होय-

 

 

2

वि.प क्रं 1 विमा कंपनीने तक्रारकर्तीचा विमा दावा नामंजूर करुन दोषपूर्ण सेवा दिल्‍याची बाब सिध्‍द होते काय?

-होय-

3

काय आदेश?

अंतिम आदेशा नुसार

                                                                               :: निष्‍कर्ष ::

मुद्दा क्रं 1 बाबत

09.  तक्रारकर्ती कडे संयुक्‍त कुटूंबाची शेती असल्‍याने, तिचा मृतक मुलगा हा सुध्‍दा वडीलांचे मृत्‍यू नंतर शेतकरी होतो, त्‍यामुळे तिचे मुलाचे अपघाती मृत्‍यू नंतर आई व कायदेशीर वारसदार या नात्‍याने ती विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीची ग्राहक (लाभार्थी) आहे करीता मुद्दा क्रं 1 चे उत्‍तर आम्‍ही होकारार्थी नोंदवित आहोत.

मुद्दा क्रं 2 व 3 बाबत

10.   तक्रारकर्तीचे मुलाचा अपघाती मृत्‍यू, त्‍यानंतर तिने दाखल केलेला विमा दावा, विम्‍याचा कालावधी या बाबीं संबधाने उभय पक्षांमध्‍ये कोणताही विवाद नाही. या प्रकरणातील मुख्‍य विवादीत मुद्दा असा आहे की, विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनी तर्फे तक्रारकर्तीचे नावे दिनांक-01.12.2017 रोजीचे पत्र पाठवून त्‍याव्‍दारे तिचा मृतक मुलगा श्री गौरीशंकर अमरदास कंगाले याचे नावावर  दिनांक-30.11.2016 पूर्वीचा फेरफार उतारा-6-ड नाही यामुळे तिचा विमा दावा रद्द करण्‍यात येत आहे असे सुचित केले. तक्रारकर्तीचा मुलगा श्री गौरीशंकर अमरदास कंगाले याचा दिनांक-27.01.2017 रोजी अपघाती मृत्‍यू (Due to Head Injury) झाल्‍या बाबत शासकीय वैद्दकीय महाविद्दालय, धुळे यांचे मृत्‍यू प्रमाणपत्र पान क्रं 49 वर दाखल आहे. तसेच अपघाता संबधाने पोलीस दस्‍तऐवज सुध्‍दा दाखल आहेत. महाराष्‍ट्र शासन कृषी पशुसंवर्धन दुग्‍ध व्‍यवसाय व मत्‍स व्‍यवसाय विभाग, मंत्रालय मुंबई यांचे दिनांक-25.11.2016 रोजीचे शासन निर्णया प्रमाणे सन-2016-2017 वर्षा करीता गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना राबविण्‍यात आली असून अपघाती मृत्‍यू मुळे रुपये-2,00,000/- एवढया रकमेचे विमा संरक्षण देण्‍यात आलेले आहे.

11.  तक्रारकर्तीने पान क्रं 23 वर 7/12 उता-याची प्रत दाखल केली त्‍यावरुन सदर 7/12 उतारा हा सन-2016-2017 वर्षाचा असून दिनांक-13.04.2017 पर्यंत अद्दायावत आहे. सदर 7/12 मौजा माडगी, तालुका जिल्‍हा भंडारा  उपविभाग क्रं 320 चा असून त्‍यामध्‍ये मृतक गौरीशंकर अमरदास कंगाले याचे नाव नमुद आहे. विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीचे असे म्‍हणणे आहे की, तक्रारकर्तीचा मृतक मुलगा श्री गौरीशंकर अमरदास कंगाले याचे नावावर  दिनांक-30.11.2016 पूर्वीचा फेरफार उतारा-6-ड नाही. तक्रारकर्तीने पान क्रं 27 वर फेरफार नोंदीचा दस्‍तऐवज दाखल केला, त्‍यामध्‍ये फेरफार नोंद दिनांक-15.03.2017 रोजी मंजूर केलेली असून त्‍यामध्‍ये मृतकाचे वडील श्री अमरदास सिताराम कंगाले यांचा दिनांक-06.06.2011 रोजी मृत्‍यू झाल्‍या मुळे मुले  श्री प्रेमदास अमरदास कंगाले, श्री गौरीशंकर अमरदास कंगाले (मृतक), मुलगी भागवती गणेश मलकाम आणि पत्‍नी श्रीमती प्रभावती उर्फ लिलाबाई अमरदास कंगाले यांचे नावाची फेरफार नोंद आहे.

12.   मृतक श्री गौरींशंकर अमरदास कंगाले याचे वडील श्री अमरदास सिताराम कंगाले यांचा दिनांक-06.06.2011 रोजी मृत्‍यू झाल्‍या नंतर त्‍याची आई (तक्रारकर्ती) प्रभावती अमरदास कंगाले आणि मृतक श्री गौरीशंकर, त्‍याचा भाऊ श्री प्रेमदास आणि मुलगी भागवती हे संयुक्‍त कुटूंबातील असल्‍याने आपोआपच शेतकरी झालेत. जरी मृतक श्री गौरीशंकर अमरदास कंगाले याचे नावाची फेरफार नोंद दिनांक-15 मार्च, 2017 रोजी शासकीय अभिलेखामध्‍ये उशिराने करण्‍यात आलेली असली तरीही मृतक हा संयुक्‍त कुटूंबातील शेती असल्‍याने कायदेशीर वारसदार या नात्‍याने वडीलांचे निधनानंतर शेतकरी झालेला आहे कारण शेताचे मालकी हक्‍क आपोआपच वडीलांचे निधना नंतर मृतक मुलगा आणि इतर वारसदार यांचेकडे हस्‍तांतरीत होतात.

13.   तक्रारकर्तीचे वकील श्री उदय क्षिरसागर यांनी खालील मा.राष्‍ट्रीय ग्राहक आयोगाचे निवाडयावर आपली भिस्‍त ठेवली-

  1.      IV (2012) CPJ 51 (N.C.)  NATIONAL CONSUMER DISUTES REDRESSAL COMMISSION, NEW DELHI –“Reliance General Insu. co. ltd. – Vs- Sakorba Hetubha Jadeja  & ors”  या प्रकरणात शेतकरी अपघात विमा योजना लागू होण्यापूर्वी शेतक-याच्या वडिलांच्या मृत्‍युमुळे शेतजमिनीत वारसा हक्काने तो मालक झाला असेल परंतु त्‍याचे नावाचा वेळीच फेरफार घेण्यांत न आल्याने विमा योजना सुरू झाली त्या दिवशी अशा शेतक-याचे नांव 7/12 उता-या मध्ये नोंदविले नसेल आणि ते नंतर 7/12 उता-यामध्‍ये नोंदविण्यात आले असेल तर असा शेतकरी अपघाताने मरण पावल्यास त्याचे वारस शेतकरी अपघात विमा योजनेचा लाभ मिळण्यास पात्र ठरतात काय? असा मुद्दा माननीय राष्ट्रीय आयोगासमोर उपस्थित झाला होता,  त्या संबधात मा. राष्ट्रीय आयोगाने खालीलप्रमाणे अभिप्राय नोंदविला आहे.

      “ Nothing among the records produced by Mr. Nandwani (from among those produced before and considered by the District Forum) is contrary to the cogent analysis of the documentary evidence by the District Forum. Moreover, if as per the entries in  Village Form 6 extract, the date of death of Bharmalji Bapeeji Jadeja was nearly five months before the date of the said entry, i.e., 12.04.2002, Bharmalji died sometime in December 2001.   Hence, all his legal heirs became registered farmers immediately after the death of their father and it was only the statutory process  of registration of the legal heirs in the village record of rights after the death of a farmer that took time, leading to the final entry   showing the names of Hetubha Jadeja and others as the legal right   pertaining to the agricultural land owned by their father being    made in Village Form 6 on 12.04.2002. Therefore, it has to be held that sometime in December 2001, i.e., well before  26.01.2002, the date of inception of the insurance policy in question, Hetubha Jadeja become a registered farmer as one of the legal heir of his deceased father who was a registered farmer.   Hence, on his death in May 2002, his heirs, i.e. the    respondents/complainants were entitled to receive the sum assured within 30 days of the proposal for claim being submitted.”

           उपरोक्‍त मा.राष्‍ट्रीय ग्राहक आयोगाचे निवाडया मध्‍ये श्री भारमलजी बापजी जडेजा यांचा मृत्‍यू हा डिसेंबर-2011 मध्‍ये झाला होता आणि त्‍यांचे मृत्‍यू नंतर त्‍यांचे कायदेशीर वारसदारांची नावाची नोंद शासकीय अभिलेखामध्‍ये दिनांक-12.04.2002 रोजी घेण्‍यात आली होती आणि शेतकरी अपघात विमा योजनेचा कालावधी हा दिनांक-26.01.2002 ते 25.01.2003 असा होता. वडील श्री भारमलजी बापजी जडेजा यांचे मृत्‍यू नंतर त्‍यांचा मुलगा मृतक  श्री हेतूभा जडेजा व ईतर कायदेशीर वारसदार यांचेकडे आपोआपच शेताचे मालकी हक्‍क हस्‍तांतरीत झाल्‍यामुळे ते शेतकरी झालेत. सदर शेतकरी अपघात विमा योजना ही दिनांक-26 जानेवारी, 2002  रोजी सुरु झाली होती परंतु कायदेशीर वारसदारांचे नावाची फेरफार नोंद दिनांक-12.04.2002 रोजी घेण्‍यात आली. मे-2002 मध्‍ये हेतूबा जडेजा याचा मृत्‍यू झाल्‍यामुळे त्‍याचे कायदेशीर वारसदार हे विम्‍याची रक्‍कम मिळण्‍यास पात्र ठरतात असा निर्वाळा मा.राष्‍ट्रीय ग्राहक आयोगाने दिलेला आहे.

14.   आमचे समोरील हातातील प्रकरणात सुध्‍दा मृतक श्री गौरींशंकर अमरदास कंगाले याचे वडील श्री अमरदास सिताराम कंगाले यांचा दिनांक-06.06.2011 रोजी मृत्‍यू झाल्‍या नंतर त्‍याची आई (तक्रारकर्ती) प्रभावती अमरदास कंगाले आणि मृतक श्री गौरीशंकर, त्‍याचा भाऊ श्री प्रेमदास आणि मुलगी भागवती हे संयुक्‍त कुटूंबातील असल्‍याने आपोआपच शेतकरी झालेत. जरी मृतक श्री गौरीशंकर अमरदास कंगाले याचे नावाची फेरफार नोंद दिनांक-15 मार्च, 2017 रोजी शासकीय अभिलेखामध्‍ये उशिराने करण्‍यात आलेली असली तरीही संयुक्‍त कुटूंबातील शेती असल्‍याने वडीलांचे निधनानंतर मृतक हा कायदेशीर वारसदार या नात्‍याने शेतकरी झालेला आहे कारण शेताचे मालकी हक्‍क आपोआपच वडीलांचे निधना नंतर मृतक मुलगा आणि इतर कायदेशीर वारसदार यांचेकडे हस्‍तांतरीत होतात. तक्रारकर्तीचा मुलगा श्री गौरीशंकर अमरदास कंगाले याचा दिनांक-27.01.2017 रोजी अपघाती मृत्‍यू (Due to Head Injury) झाल्‍याने व सदर अपघाती मृत्‍यू हा विम्‍याचे वैध कालावधी मध्‍ये झाला असल्‍याने तक्रारकर्ती ही कायदेशीर वारसदार या नात्‍याने विमा दाव्‍याची रक्‍कम मिळण्‍यास पात्र आहे असे जिल्‍हा ग्राहक आयोगाचे स्‍पष्‍ट मत आहे.

15. या व्‍यतिरिक्‍त तक्रारकर्तीचे वकील श्री क्षिरसागर यांनी खालील मा.वरिष्‍ठ न्‍यायालयाचे निवाडे दाखल केलेत-

II)          Order of Hon’ble State Commission Circuit Bench Nagpur in First Appeal No.-A/16/149 –“Tata AIG General Insurance Company Ltd.-Versus-Smt. Asha Gunwant Koche” Order Dated-20/03/2019

उपरोक्‍त मा.राज्‍य ग्राहक आयोग, खंडपिठ नागपूर यांचे समोरील अपिलीय निवाडया मध्‍ये मा.राष्‍ट्रीय ग्राहक आयोग, दिल्‍ली यांचे समोरील प्रकरण IV (2012) CPJ 51 (N.C.)  NATIONAL CONSUMER DISUTES REDRESSAL COMMISSION, NEW DELHI – “Reliance General Insu. co. ltd.. – Vs Sakorba Hetubha Jadeja  & ors”या निवाडयाचा आधार घेऊन विमा कंपनीचे अपिल नामंजूर केले होते. सदर मा.राज्‍य ग्राहक आयोग, खंडपिठ नागपूर यांचा न्‍यायनिवाडा हातातील प्रकरणात तंतोतंत लागू होतो, असे जिल्‍हा ग्राहक आयोगाचे मत आहे.

 

  1.     Order of Hon’ble State Commission Circuit Bench  Aurangabad in First Appeal No.-307 of 2018 –“National  Insurance Company Ltd.-Versus-Smt. Rukhmini Kharat” Order Dated-08/08/2019

          उपरोक्‍त मा.राज्‍य आयोग, खंडपिठ औरंगाबाद यांचे निवाडया मध्‍ये तक्रारकर्तीचे मृतक पतीचा अपघाती मृत्‍यू हा दिनांक-06.06.2016 रोजी झाला होता आणि शासकीय जमीन अभिलेखा मध्‍ये त्‍याचे नावाची नोंद दिनांक-16.05.2016 रोजी घेण्‍यात आली होती. विमा कंपनीने मृतकाचे नावची नोंद 7/12 उता-यामध्‍ये दिनांक-01.12.2015 रोजी म्‍हणजे विमा योजना सुरु झाल्‍याचे दिनांकास आवश्‍यक होती असे म्‍हणून विमा दावा फेटाळला होता परंतु मा.राष्‍ट्रीय ग्राहक आयोग, दिल्‍ली यांचे समोरील प्रकरण IV (2012) CPJ 51 (N.C.)  NATIONAL CONSUMER DISUTES REDRESSAL COMMISSION, NEW DELHI – “Reliance General Insu. co. ltd.. – Vs Sakorba Hetubha Jadeja  & ors”या निवाडयाचा आधार घेऊन विमा कंपनीचे अपिल खारीज केले होते. ज्‍या शेतक-यांचे वय 12 वर्ष पूर्ण झाले असे शेतकरी हे आपोआपच सदर अपघाती विमा योजने मध्‍ये अंर्तभूत होतात असे सुध्‍दा नमुद केलेले आहे. सदर मा.राज्‍य ग्राहक आयोग, खंडपिठ औरंगाबाद यांचा न्‍यायनिवाडा हातातील प्रकरणात तंतोतंत लागू होतो, असे जिल्‍हा ग्राहक आयोगाचे मत आहे.

16.   उपरोक्‍त सखोल विवेचन आणि मा.वरिष्‍ठ न्‍यायालयांचे न्‍यायनिवाडे यावरुन तक्रारकर्तीला तिच्‍या मुलाचे अपघाती मृत्‍यू बाबत देय विमा रक्‍कम रुपये-2,00,000/- (अक्षरी रुपये दोन लक्ष फक्‍त) आणि सदर विमा रकमेवर  विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने विमा दावा नामंजूर केल्‍याचे पत्र दिनांक-01.12.2017 पासून ते रकमेच्‍या प्रत्‍यक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे.-9 टक्‍के दराने व्‍याज मंजूर करणे योग्‍य व न्‍यायोचित होईल. याशिवाय ति‍ला झालेल्‍या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-10,000/- आणि तक्रारीचा खर्च म्‍हणून रुपये-5000/- अशा नुकसानभरपाईच्‍या  रकमा मंजूर करणे योग्‍य व न्‍यायोचित होईल असे जिल्‍हा ग्राहक आयोगाचे स्‍पष्‍ट मत आहे.  विरुध्‍दपक्ष क्रं-2 जयका इन्‍शुरन्‍स ब्रोकरेज प्रायव्‍हेट लिमिटेड यांनी विहित मुदतीत तक्रारकर्तीचा विमा दावा विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीकडे पाठविला व कोणतीही दोषपूर्ण सेवा दिलेली नाही म्‍हणून विरुध्‍दपक्ष क्रं 2 यांचे विरुध्‍दची तक्रार खारीज करण्‍यात येते. विरुध्‍दपक्ष क्रं 3 तालुका कृषी अधिकारी भंडारा, तालुका-जिल्‍हा भंडारा यांनी तक्रारकर्तीचा विमा दावा आवश्‍यक दस्‍तऐवजांसह विरुध्‍दपक्ष विमा कंपनीकडे विहित मुदतीत दाखल केल्‍याने त्‍यांचे सेवेत कोणतीही त्रृटी दिसून येत नाही व तक्रारकर्तीची सुध्‍दा त्‍यांचे विरुध्‍द तशी कोणतीही तक्रार नसल्‍याने विरुध्‍दपक्ष क्रं 3 तालुका कृषी अधिकारी पवनी, जिल्‍हा भंडारा यांचे विरुध्‍दची तक्रार खारीज होण्‍यास पात्र आहे.

17.   उपरोक्‍त नमुद सर्व वस्‍तुस्थितीचा विचार करुन जिल्‍हा ग्राहक आयोग प्रस्‍तुत तक्रारीमध्‍ये खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे-

                                                              :: अंतिम आदेश ::

 

  1.  तक्रारकर्तीची तक्रार, विरुध्‍दपक्ष क्रं 1 ओरिएन्‍टल इन्‍शुरन्‍स कंपनी लिमिटेड तर्फे क्षेत्रीय व्‍यवस्‍थापक, क्षेत्रीय कार्यालय, नागपूर यांचे विरुध्‍द अंशतः मंजूर करण्‍यात येते.
  2. विरुध्‍दपक्ष 1 विमा कंपनीला आदेशित करण्‍यात येते की, त्‍यांनी तक्रारकर्तीला तिचे मुलाचे अपघाती मृत्‍यू संबधाने शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत देय विमा रक्‍कम रुपये-2,00,000/- (अक्षरी रुपये दोन लक्ष फक्‍त) अदा करावी आणि सदर विमा रकमेवर विमा दावा नाकारल्‍याचा दिनांक-01.12.2017 पासून ते रकमेच्‍या प्रत्‍यक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे.-9% दराने व्‍याज तक्रारकर्तीला निकालपत्राची प्रमाणित प्रत प्राप्‍त झाल्‍याचे दिनांका पासून 30 दिवसांचे आत दयावे. विहित मुदतीत आदेशाचे अनुपालन न केल्‍यास सदर विमा रक्‍कम  आणि त्‍यावर दिनांक-01.12.2017 पासून ते रकमेच्‍या प्रत्‍यक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे.-12% दराने दंडनीय व्‍याज यासह येणारी रक्‍कम तक्रारकर्तीला रक्‍कम देण्‍यास विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनी जबाबदार राहिल.
  3. विरुध्‍दपक्ष क्रं.-1 विमा कंपनीचे दोषपूर्ण सेवेमुळे तक्रारकर्तीला झालेल्‍या  मानसिक व शारिरीक त्रासाबद्दल नुकसान भरपाई रुपये-10,000/-(अक्षरी रुपये दहा हजार फक्‍त) आणि तक्रारीचा खर्च रुपये-5000/-(अक्षरी रुपये पाच हजार फक्‍त) विरुध्‍दपक्ष क्रं- 1 विमा कंपनीने तक्रारकर्तीला द्यावेत.
  4. विरुध्‍दपक्ष क्रं-2 जायका इन्‍शुरन्‍स ब्रोकरेज प्रायव्‍हेट लिमिटेड यांचे विरुध्‍दची तक्रार खारीज करण्‍यात येते.

(05)  विरुध्‍दपक्ष क्रं-(3) तालुका कृषी अधिकारी, भंडारा, तालुका- जिल्‍हा भंडारा यांचे विरुध्‍दची तक्रार खारीज करण्‍यात येते.

(06)  सदर आदेशाचे अनुपालन विरुध्‍दपक्ष क्रं- 1 विमा कंपनीने प्रस्‍तुत निकालपत्राची  प्रथम प्रमाणित प्रत प्राप्‍त झाल्‍याचे दिनांकापासून 30 दिवसांचे आत करावे.

(07) निकालपत्राच्‍या प्रमाणित प्रती सर्व पक्षकारानां निःशुल्‍क उपलब्‍ध   करुन देण्‍यात याव्‍यात.

(08)  तक्रारकर्ती व विरुध्‍दपक्ष यांचे तर्फे दाखल संच त्‍यांना  परत करण्‍यात यावे.              

 

 
 
[HON'BLE MR. NITIN M. GHARDE]
PRESIDING MEMBER
 
 
[HON'BLE MRS. VRUSHALI JAGIRDAR]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.