Maharashtra

Satara

CC/11/4

Sunita nandakumar Dhygude - Complainant(s)

Versus

The Oriental Insurance Co. Ltd Manager - Opp.Party(s)

Kavare

21 May 2011

ORDER


ReportsDistrict Consumer disputes redressal Forum Satara Near Cooperative Court Sadara Bazar Satara-415001
CONSUMER CASE NO. 11 of 4
1. Sunita nandakumar DhygudeGhodke vasti,Ahire Tal KhandalasataraMaharashtra ...........Appellant(s)

Vs.
1. The Oriental Insurance Co. Ltd ManagerDivisional officeNo 2,8,Hindustan colony, varDha Road NagpureNagpure maharashtra2. Kabal Insurance Services Pvt. Ltd.PunePune3. Maharashtra Shasan Colleetor Satarasatarasatara ...........Respondent(s)


For the Appellant :Kavare, Advocate for
For the Respondent :

Dated : 21 May 2011
ORDER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

 

                                                            नि.17
मे. जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा यांचेसमोर
 
                                          तक्रार क्र. 4/2011
 
                                          नोंदणी तारीख – 5/1/2011
                                          निकाल तारीख – 21/5/2011
                                          निकाल कालावधी – 140 दिवस
 
श्री विजयसिंह दि. देशमुख, अध्‍यक्ष
श्रीमती सुचेता मलवाडे, सदस्‍या
श्री सुनिल कापसे, सदस्‍य
 
 (श्री सुनिल कापसे, सदस्‍य यांनी न्‍यायनिर्णय पारीत केला)
------------------------------------------------------------------------------------
 
श्रीमती सुनिता नंदकुमार धायगुडे
रा.घोडके वस्‍ती, अहिरे, ता.खंडाळा
जि.सातारा                                        ----- अर्जदार
                                            (वकील श्री.एम.एन.शेटे)
      विरुध्‍द
 
1. व्‍यवस्‍थापक,
   दी ओरिएन्‍टल इन्‍शुरन्‍स कंपनी लि.
   डिव्‍हीजन ऑफिस नं.2, 8, हिंदुस्‍थान कॉलनी,
   अजनी चौकाजवळ, वर्धा रोड, नागपूर – 440 015    ----- जाबदार क्र.1
                                               (व‍कील श्री.कालिदास माने)
2. श्रीमती सुचेता प्रधान, विभागीय प्रमुख,
   कबाल इन्‍शुरन्‍स सर्व्हिसेस प्रा.लि.,
   101, शिवाजीनगर, 3 रा मजला,
   मंगला टॉकीज जवळ, पुणे – 411 005
3. महाराष्‍ट्र शासन तर्फे मा.जिल्‍हाधिकारी सो,
   सातारा, जिल्‍हाधिकारी कार्यालय, सातारा             ----- जाबदार क्र.2 व 3
 
1.     अर्जदार यांचे पती श्री.नंदकुमार पांडुरंग धायगुडे हे शेतकरी असून त्‍यांचे दि.13/10/08 रोजी मारहाणीमुळे गंभीर जखमा होवून निधन झाले आहे.   म्‍हणून अर्जदार यांनी शेतकरी अपघात विमा योजनेखाली गावकामगार तलाठी, मौजे अहिरे यांचेकडे आवश्‍यक कागदपत्रांसह प्रस्‍ताव दाखल केला. त्‍यांनी तो तहसिलदार खंडाळा यांचेकडे नोव्‍हेंबर 2008 मध्‍ये पाठविला. तहसिलदार खंडाळा यांनी तो जाबदार क्र.1 यांचेकडे योग्‍य त्‍या शिफारशींसह पाठविला. परंतु, जाबदार क्र.1 यांनी विमा दावा मंजूर केलेला नाही अथवा फेटाळलेला नाही. क्‍लेम फॉर्म मिळाल्‍यापासून 30 दिवसांच्‍या आत रक्‍कम मयताचे वारसाचे खातेवर जमा करणेची जबाबदारी जाबदार क्र.1 ते 3 यांची आहे. सबब, विम्‍याची रक्‍कम रु.1,00,000/- मिळावी, विमादावा मंजूर केला नाही म्‍हणून रु.50,000/-, मानसिक व शारिरिक त्रासापोटी रक्‍कम रु.40,000/- व खर्चापोटी रक्‍कम रु.3,000/- यासाठी अर्जदार यांनी प्रस्‍तुतचा अर्ज दाखल केला आहे.
 
2.    जाबदार क्र.1 यांनी प्रस्‍तुतचे कामी त्‍यांचे लेखी म्‍हणणे/कैफियत नि.10 ला दाखल केली आहे. त्‍यामध्‍ये त्‍यांनी अर्जदारचे तक्रारअर्जातील बहुतांश मजकूर नाकारलेला आहे. अर्जदारचे पतीचा खून हा त्‍याच्‍या सख्‍ख्‍या भावाकडून झाला असल्‍याने पॉलिसीच्‍या अटी व शर्ती प्रमाणे अर्जदार रक्‍कम मिळण्‍यास पात्र ठरत नाहीत. अर्जदार यांनी सदरची तक्रार तक्रारीस कारण घडल्‍यानंतर सव्‍वादोन वर्षांचा कालावधी उलटून गेल्‍यानंतर दाखल केली आहे. त्‍यामुळे तक्रारअर्ज मुदतीत नाही. त्रिपक्षीय करारानुसार क्‍लेमबाबत वाद उदभवल्‍यास त्‍याचे निराकरण विशिष्‍ट समितीमार्फत करण्‍यात यावे. सदरचे समितीचा निर्णय मान्‍य नसेल तर लोकपाल अगर ग्राहक मंचाकडे दाद मागता येईल. अर्जदार यांनी सदरचे समितीकडे दाद न मागता थेट या मंचाकडे दाद मागितली आहे. सबब तक्रारअर्ज अवकाळी आहे. महाराष्‍ट्र शासनाने 2232 शेतक-यांचे विमा दावेंबाबतची प्रकरणे राष्‍ट्रीय आयोग, नवी दिल्‍ली येथे दाखल केली आहेत. प्रस्‍तुतचे प्रकरणही त्‍यामध्‍ये समाविष्‍ट आहे. त्‍यामुळे अर्जदार यांना याच कारणासाठी या मंचामध्‍ये दाद मागता येणार नाही. अर्जदार हे जाबदार यांचे ग्राहक होत नाहीत. सबब, अर्जदार यांचा तक्रारअर्ज फेटाळणेत यावा असे जाबदार क्र.1 यांनी त्‍यांचे कैफियतीमध्‍ये कथन केले आहे.
 
3.    जाबदार क्र.2 यांनी नि.13 ला पत्र दाखल केले असून त्‍यामध्‍ये त्‍यांनी असे कथन केले आहे की, जाबदार क्र.2 ही केवळ सल्‍लागार कंपनी आहे. कागदपत्रांची पूर्तता करुन ती विमा कंपनीकडे पाठविण्‍याचे काम जाबदार क्र.2 करतात. यासाठी जाबदार क्र.2 कोणताही मोबदला घेत नाही. सबब तक्रारअर्ज फेटाळणेत यावा असे जाबदार क्र.2 यांनी कथन केले आहे.
 
4.    जाबदार क्र.3 यांना प्रस्‍तुत तक्रारअर्जाचे नोटीसची बजावणी होऊनही त्‍यांनी याकामी त्‍यांचे लेखी म्‍हणणे व शपथपत्र दाखल केलेले नाही. 
 
5.    अर्जदारतर्फे दाखल लेखी युक्तिवाद नि.16 पाहिला. तसेच अर्जदार व जाबदार यांची दाखल कागदपत्रे पाहिली.
6.  प्रस्‍तुतचे कामी प्रामुख्‍याने खालीलप्रमाणे मुद्दे उपस्थित होत आहेत. हे मुद्दे व त्‍यांना दिलेली उत्‍तरे खालीलप्रमाणे आहेत.
           मुद्दे                                   उत्‍तरे
अ) अर्जदार व जाबदार यांचे दरम्‍यान ग्राहक व
     सेवा देणारे असे नाते आहे काय ?              होय.
ब)   जाबदार यांनी अर्जदार यांना सेवा देण्‍यामध्‍ये
     कमतरता केली आहे काय ?                          नाही.
क)   अंतिम आदेश -                                 खाली दिलेल्‍या कारणास्‍तव
                                             अर्जदार यांचा तक्रारअर्ज
               नामंजूर करणेत येत आहे.
 
कारणे
7.    अर्जदार यांचे तक्रारअर्जातील कथन पहाता अर्जदार यांचे पतीचे निधन दि.13/10/08 रोजी झालेले आहे. तदनंतर त्‍यांनी त्‍यांची आवश्‍यक ती कागदपत्रे नोव्‍हेंबर 2008 मध्‍ये गावकामगार तलाठी अहिरे यांचेकडे पाठविली. परंतु सदरचा प्रस्‍ताव जाबदार क्र.1 यांचेकडे पाठविलेनंतर अर्जदार यांनी जाबदार क्र.1 यांचेकडे विमा दावा रक्‍कम मिळणेसाठी लेखी स्‍वरुपात कोणता पाठपुरावा केला याबाबत कोणतीही कागदपत्रे दाखल केलेली नाहीत. अर्जदार यांनी गावकामगार तलाठी नोव्‍हेंबर 2008 मध्‍ये प्रस्‍ताव पाठविलेनंतर तदनंतर त्‍यांनी दि.5/1/2011 रोजी प्रस्‍तुतचा तक्रारअर्ज दाखल केला आहे म्‍हणजेच तक्रारीस कारण घडल्‍यापासून दोन वर्षांचा कालावधी उलटून गेल्‍यानंतर दाखल केला आहे. ग्राहक संरक्षण कायद्यातील तरतुदीनुसार त‍क्रारीस कारण घडल्‍यापासून दोन वर्षांचे आत तक्रार दाखल करणे बंधनकारक आहे. परंतु, त्‍यानुसार अर्जदार यांनी दोन वर्षाचे आत प्रस्‍तुतची तक्रार दाखल केलेली नाही.   सबब, प्रस्‍तुतची तक्रार मुदतीत नसल्‍यामुळे ती फेटाळणेस पात्र आहे असे या मंचाचे मत आहे. 
 
8.    याकामी महत्‍वाची बाब अशी आहे की, कृषी आयुक्‍त, महाराष्‍ट्र शासन, जाबदार क्र.2 व जाबदार क्र.1 यांचेमध्‍ये नागपूर येथे त्रिपक्षीय करार झाला असून त्‍यानुसार शेतकरी अपघात विमा पॉलिसी उतरविण्‍यात आली आहे. सदरचे त्रिपक्षीय करारानुसार क्‍लेमबाबत वाद उदभवल्‍यास त्‍याचे निराकरण विशिष्‍ट समितीमार्फत करण्‍यात यावे. सदरचे समितीचा निर्णय मान्‍य नसेल तर लोकपाल अगर ग्राहक मंचाकडे दाद मागता येईल अशी तरतूद करण्‍यात आलेली आहे. परंतु अर्जदार यांनी दाखल केलेली कागदपत्रे पाहता त्‍यांनी सदरचे समितीकडे दाद मागितल्‍याबाबत व सदरचे समितीने निर्णय दिल्‍याबाबत कोणतीही कागदपत्रे अर्जदार यांनी दाखल केलेली नाहीत. यावरुन अर्जदार यांनी सदरचे समितीकडे दाद न मागता थेट या मंचाकडे दाद मागितली आहे हे स्‍पष्‍ट होते. सदरची बाब विचारात घेता अर्जदार यांचा तक्रारअर्ज या मंचासमोर चालणेस पात्र नाही असे या मंचाचे मत आहे.
9.    जाबदार यांनी त्‍यांचे कैफियत व अर्जदार यांनी नि.5 सोबत दाखल केलेली महत्‍वाची कागदपत्रे म्‍हणजे प्रथम खबरी जबाब‍ पाहिला असता असे स्‍पष्‍टपणे दिसून येते की, अर्जदारचे पती हे आरोपीचे सख्‍खे भाऊ होते. म्‍हणजेच अर्जदारचे पती व आरोपी यांचेमध्‍ये रक्‍ताचे नातेसंबंध होते. परंतु सदरची बाब अर्जदार यांनी त्‍यांचे तक्रारअर्जात जाणीवपूर्वक लपवून ठेवल्‍याचे दिसून येते. यावरुन अर्जदार हे स्‍वच्‍छ हाताने या मंचासमोर आलेले नाहीत ही बाब स्‍पष्‍ट होते. जाबदार यांनी त्‍यांचे कैफियतीमध्‍ये असे कथन केले आहे की, जवळच्‍या रक्‍तसंबंधातील लाभधारकाकडून खून झाल्‍यास शेतकरी अपघात योजनेअंतर्गत विमा रक्‍कम मिळण्‍यास संबंधीत व्‍यक्‍ती पात्र ठरत नाही.  महाराष्‍ट्र शासनाचे शासन निर्णय क्र.एनएआयएस 1204/प्र.क्र.166/11ए दि.31 मार्च 2005 मध्‍ये शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत विमा संरक्षणामध्‍ये समाविष्‍ट नसणा-या बाबी नमूद केल्‍या आहेत. त्‍यामध्‍ये अनुक्रमांक 12 ला जवळच्‍या लाभधारकाकडून झालेला खून याचा समावेश आहे. अर्जदार यांचे पतीचा खून त्‍याचे सख्‍ख्‍या भावाने म्‍हणजे जवळच्‍या नातेसंबंधातील लाभधारकाकडून झाला असल्‍यामुळे सदरचे शासन निर्णयातील तरतूदीचा विचार करता  अर्जदार यांचा विमादावा नाकारण्‍याचा जाबदार यांचा निर्णय योग्‍य, संयुक्तिक व कायदेशीर आहे असे या मंचाचे मत आहे. 
 
10.  या सर्व कारणास्‍तव व वर नमूद मुद्दयांच्‍या दिलेल्‍या उत्‍तरास अनुसरुन अर्जदार यांचा तक्रारअर्ज नामंजूर करणेत येत आहे.
 
आदेश
 
1. अर्जदार यांचा तक्रारअर्ज नामंजूर येत आहे.
2. खर्चाबाबत काहीही आदेश करणेत येत नाहीत.
3. सदरचा न्‍यायनिर्णय खुल्‍या न्‍यायमंचात जाहीर करणेत आला.
 
सातारा
दि.21/5/2011
 
 
 
 
(सुनिल कापसे)           (सुचेता मलवाडे)           (विजयसिंह दि. देशमुख)
    सदस्‍य                   सदस्‍या                    अध्‍यक्ष
 
 

Smt. S. A. Malwade, MEMBERHONABLE MR. Vijaysinh D. Deshmukh, PRESIDENT Mr. Sunil K Kapse, MEMBER