Maharashtra

Satara

CC/11/14

Rekha Sanbhaji Bhosle - Complainant(s)

Versus

The Oriental Insurance Co. Ltd Manager - Opp.Party(s)

Kavare

26 Apr 2011

ORDER


ReportsDistrict Consumer disputes redressal Forum Satara Near Cooperative Court Sadara Bazar Satara-415001
CONSUMER CASE NO. 11 of 14
1. Rekha Sanbhaji BhosleA/p Akaiwadhi Tal Karad Dist Satara ...........Appellant(s)

Vs.
1. The Oriental Insurance Co. Ltd ManagerAjani Cookajaval Vrdha rood NagapurNagapur2. Kabal Insurance Services Pvt. Ltd. Sucheta Pradhan PunePune3. Maharashtra Shasan . Colleetor , Satarasatarasatara ...........Respondent(s)


For the Appellant :
For the Respondent :

Dated : 26 Apr 2011
ORDER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

 

                                                            नि.22
मे. जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा यांचेसमोर
                                          तक्रार क्र. 14/2011
                                          नोंदणी तारीख – 25/01/2011
                                          निकाल तारीख – 26/4/2011
                                          निकाल कालावधी – 90 दिवस
 
श्री विजयसिंह दि. देशमुख, अध्‍यक्ष
श्रीमती सुचेता मलवाडे, सदस्‍या
श्री सुनिल कापसे, सदस्‍य
 
 (श्री सुनिल कापसे, सदस्‍य यांनी न्‍यायनिर्णय पारीत केला)
------------------------------------------------------------------------------------
 
श्रीमती रेखा संभाजी भोसले
रा.आकाईवाडी, ता.कराड
जि.सातारा                                        ----- अर्जदार
                                            (अभियोक्‍ता श्री एम.एन.शेटे)    विरुध्‍द
1.  व्‍यवस्‍थापक,
   दी ओरिएन्‍टल इन्‍शुरन्‍स कंपनी लि.,
   डिव्‍हीजन ऑफिस नं.2,8, हिंदुस्‍थान कॉलनी,
   अजनी चौकाजवळ,वर्धा रोड, नागपूर 440 015       ----- जाबदार क्र.1
                                           (अभियोक्‍ता श्री.कालिदास माने)
2. श्रीमती सुचेता प्रधान
   कबाल इन्‍शुरन्‍स सर्व्हिसेस प्रा.लि.,
   101, शिवाजीनगर, तिसरा मजला,
   पुणे-411 005
3. महाराष्‍ट्र शासन तर्फे मा.जिल्‍हाधिकारी,
   जिल्‍हाधिकारी कार्यालय, सातारा                    ----- जाबदार क्र.2 व 3
 
 
 
न्‍यायनिर्णय
 
 
    अर्जदार यांनी प्रस्‍तुतचा अर्ज ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 12 नुसार केलेला आहे. अर्जदार यांचे अर्जातील कथन थोडक्‍यात खालीलप्रमाणे -
1.     अर्जदार यांचे पती श्री.संभाजी यशवंत भोसले हे शेतकरी असून त्‍यांचे दि.26/11/07 रोजी अपघाती निधन झाले. ते शेतकरी होते.  म्‍हणून अर्जदार यांनी शेतकरी अपघात विमा योजनेखाली गावकामगार तलाठी, आकाईचीवाडी यांचेमार्फत त‍हसिलदार कराड यांचेकडे आवश्‍यक कागदपत्रांसह प्रस्‍ताव पाठविला. त्‍यानंतर जाबदार क्र.2 यांनी पुन्‍हा काही कागदपत्रांची पूर्तता करण्‍यास सांगितले त्‍यानुसार अर्जदार यांनी सर्व कागदपत्रे पाठवून दिली आहेत. प्रस्‍ताव प्राप्‍त झालेनंतर 30 दिवसांचे आत रु.1 लाख जमा करण्‍याची जबादार जाबदार क्र.1 यांची आहे. परंतु जाबदार यांनी अर्जदार यांचा दावा मंजूरही केला नाही किंवा फेटाळलेलाही नाही.   सबब शेतकरी अपघात योजनेखाली रक्‍कम रु.1 लाख व्‍याजासहित मिळावेत, मानसिक त्रासापोटी व अर्जाचे खर्चापोटी रक्‍कम मिळावी यासाठी अर्जदार यांनी प्रस्‍तुतचा अर्ज दाखल केला आहे.
 
2.    जाबदार क्र.1 यांनी प्रस्‍तुतचे कामी त्‍यांचे लेखी म्‍हणणे/कैफियत नि.19 ला दाखल केली आहे. त्‍यामध्‍ये त्‍यांनी अर्जदारचे तक्रारअर्जातील बहुतांश मजकूर नाकारलेला आहे. कृषी आयुक्‍त, महाराष्‍ट्र शासन, जाबदार क्र.2 व जाबदार क्र.1 यांचेमध्‍ये नागपूर येथे त्रिपक्षीय करार झाला असून त्‍यानुसार शेतकरी अपघात विमा पॉलिसी उतरविण्‍यात आली आहे. जाबदार यांचे वास्‍तव्‍य हे नागपूर येथील असल्‍याने सदरचे मंचास तक्रार चालविण्‍याचे अधिकारक्षेत्र नाही. अर्जदार यांनी सदरची तक्रार तक्रारीस कारण घडल्‍यानंतर तीन ते चार वर्षानंतर दाखल केली आहे. त्‍यामुळे तक्रारअर्ज मुदतीत नाही. अर्जदार यांचा विमादावा सामनेवालास अद्याप प्राप्‍त झालेला नाही. त्रिपक्षीय करारानुसार क्‍लेमबाबत वाद उदभवल्‍यास त्‍याचे निराकरण विशिष्‍ट समितीमार्फत करण्‍यात यावे. सदरचे समितीचा निर्णय मान्‍य नसेल तर लोकपाल अगर ग्राहक मंचाकडे दाद मागता येईल. अर्जदार यांनी सदरचे समितीकडे दाद न मागता थेट या मंचाकडे दाद मागितली आहे. सबब तक्रारअर्ज अवकाळी आहे. अर्जदार हे जाबदार यांचे ग्राहक होत नाहीत. अर्जदारने वारस म्‍हणून कुटुंबातील इतर व्‍यक्‍तींना याकामी सामील केलेले नाही. महाराष्‍ट्र शासनाने जाबदार क्र.1 विरुध्‍द 2232 शेतक-यांचे दावे मा. राष्‍ट्रीय ग्राहकवाद निवारण आयोग, नवी दिल्‍ली यांचेसमोर दाखल केलेले आहेत. त्‍यामध्‍ये अर्जदार यांच्‍या दाव्‍याचा समावेश आहे. त्‍यामुळे अर्जदार यांना या मंचासमोर दाद मागता येणार नाही. सबब, अर्जदार यांचा तक्रारअर्ज फेटाळणेत यावा असे जाबदार क्र.1 यांनी त्‍यांचे कैफियतीमध्‍ये कथन केले आहे.
 
3.    जाबदार क्र.2 यांनी नि.15 ला पत्र दाखल केले असून त्‍यामध्‍ये त्‍यांनी असे कथन केले आहे की, जाबदार क्र.2 ही केवळ सल्‍लागार कंपनी आहे. कागदपत्रांची पूर्तता करुन ती विमा कंपनीकडे पाठविण्‍याचे काम जाबदार क्र.2 करतात. यासाठी जाबदार क्र.2 कोणताही मोबदला घेत नाही. सबब तक्रारअर्ज फेटाळणेत यावा असे जाबदार क्र.2 यांनी कथन केले आहे.
 
4.    जाबदार क्र.3 यांचेतर्फे नि.21 ला म्‍हणणे दाखल केले आहे. सदरचे म्‍हणणेमध्‍ये त्‍यांनी अर्जदार यांचा प्रस्‍ताव विमा कंपनीकडे कागदपत्रांसह पाठविला आहे. परंतु सदरचे प्रस्‍तावाबाबत इतर कोणताही अभिप्राय जाबदार क्र.3 यांनी दिलेला नाही. 
5.    जाबदार क्र.1 तर्फे युक्तिवाद ऐकला. तसेच अर्जदार व जाबदार यांची दाखल कागदपत्रे पाहिली.
6.  प्रस्‍तुतचे कामी प्रामुख्‍याने खालीलप्रमाणे मुद्दे उपस्थित होत आहेत. हे मुद्दे व त्‍यांना दिलेली उत्‍तरे खालीलप्रमाणे आहेत.
           मुद्दे                                   उत्‍तरे
अ) अर्जदार व जाबदार यांचे दरम्‍यान ग्राहक व
     सेवा देणारे असे नाते आहे काय ?              होय.
ब)   जाबदार यांनी अर्जदार यांना सेवा देण्‍यामध्‍ये
     कमतरता केली आहे काय ?                          नाही.
क)   अंतिम आदेश -                                 खाली दिलेल्‍या कारणास्‍तव
                                             अर्जदार यांचा तक्रारअर्ज
               नामंजूर करणेत येत आहे.
 
कारणे
7.    अर्जदार यांचे तक्रारअर्जातील कथन पहाता अर्जदार यांचे पतीचे अपघाती निधन दि.26/11/07 रोजी झालेले आहे. तदनंतर त्‍यांनी त्‍यांची आवश्‍यक ती कागदपत्रे दि.21/2/2008 रोजी तलाठी, आकाईचीवाडी यांचेकडे सादर केली. परंतु सदरचा प्रस्‍ताव जाबदार क्र.1 यांचेकडे पाठविलेनंतर अर्जदार यांनी जाबदार क्र.1 यांचेकडे विमा दावा रक्‍कम मिळणेसाठी लेखी स्‍वरुपात कोणता पाठपुरावा केला याबाबत कोणतीही कागदपत्रे दाखल केलेली नाहीत. अर्जदार यांनी तलाठी, आकाईचीवाडी यांचेकडे दि.21/2/2008 रोजी प्रस्‍ताव दिलेनंतर त्‍यांनी दि.25/1/2011 रोजी प्रस्‍तुतचा तक्रारअर्ज दाखल केला आहे. ग्राहक संरक्षण कायद्यातील तरतुदीनुसार त‍क्रारीस कारण घडल्‍यापासून दोन वर्षांचे आत तक्रार दाखल करणे बंधनकारक आहे. परंतु, त्‍यानुसार अर्जदार यांनी दोन वर्षाचे आत प्रस्‍तुतची तक्रार दाखल केलेली नाही.   सबब, प्रस्‍तुतची तक्रार मुदतीत नसल्‍यामुळे ती फेटाळणेस पात्र आहे असे या मंचाचे मत आहे. 
 
8.    याकामी महत्‍वाची बाब अशी आहे की, कृषी आयुक्‍त, महाराष्‍ट्र शासन, जाबदार क्र.2 व जाबदार क्र.1 यांचेमध्‍ये नागपूर येथे त्रिपक्षीय करार झाला असून त्‍यानुसार शेतकरी अपघात विमा पॉलिसी उतरविण्‍यात आली आहे. सदरचे त्रिपक्षीय करारानुसार क्‍लेमबाबत वाद उदभवल्‍यास त्‍याचे निराकरण विशिष्‍ट समितीमार्फत करण्‍यात यावे. सदरचे समितीचा निर्णय मान्‍य नसेल तर लोकपाल अगर ग्राहक मंचाकडे दाद मागता येईल अशी तरतूद करण्‍यात आलेली आहे. परंतु अर्जदार यांनी दाखल केलेली कागदपत्रे पाहता त्‍यांनी सदरचे समितीकडे दाद मागितल्‍याबाबत व सदरचे समितीने निर्णय दिल्‍याबाबत कोणतीही कागदपत्रे अर्जदार यांनी दाखल केलेली नाहीत. यावरुन अर्जदार यांनी सदरचे समितीकडे दाद न मागता थेट या मंचाकडे दाद मागितली आहे हे स्‍पष्‍ट होते. सदरची बाब विचारात घेता अर्जदार यांचा तक्रारअर्ज या मंचासमोर चालणेस पात्र नाही असे या मंचाचे मत आहे.
9.    जाबदार क्र.1 यांनी त्‍यांचे म्‍हणणेमध्‍ये असेही कथन केले आहे की, महाराष्‍ट्र शासनाने जाबदार क्र.1 विरुध्‍द 2232 शेतक-यांचे दावे मा. राष्‍ट्रीय ग्राहकवाद निवारण आयोग, नवी दिल्‍ली यांचेसमोर दाखल केलेले आहेत. त्‍यामध्‍ये अर्जदार यांच्‍या दाव्‍याचा समावेश आहे. त्‍यामुळे अर्जदार यांना या मंचासमोर दाद मागता येणार नाही. सदरची बाब अर्जदार यांनी प्रतिउत्‍तर दाखल करुन योग्‍य त्‍या पुराव्‍यांसह नाकारलेली नाही. सबब अशा परिस्थितीत जर अर्जदार यांचे प्रकरण मा.राष्‍ट्रीय ग्राहकवाद निवारण आयोग, नवी दिल्‍ली यांचेसमोर प्रलंबित असेल तर या मंचास प्रस्‍तुत तक्रारअर्जाबाबत कोणताही निर्णय देता येणार नाही. 
 
10.  या सर्व कारणास्‍तव व वर नमूद मुद्दयांच्‍या दिलेल्‍या उत्‍तरास अनुसरुन अर्जदार यांचा तक्रारअर्ज नामंजूर करणेत येत आहे.
 
आदेश
1. अर्जदार यांचा तक्रारअर्ज नामंजूर येत आहे.
2. खर्चाबाबत काहीही आदेश करणेत येत नाहीत.
3. सदरचा न्‍यायनिर्णय खुल्‍या न्‍यायमंचात जाहीर करणेत आला.
 
सातारा
दि.26/4/2011
 
 
 
 
(सुनिल कापसे)          (सुचेता मलवाडे)           (विजयसिंह दि. देशमुख)
    सदस्‍य                   सदस्‍या                    अध्‍यक्ष
 
 
 
 
 
 

Smt. S. A. Malwade, MEMBERHONABLE MR. Vijaysinh D. Deshmukh, PRESIDENT Mr. Sunil K Kapse, MEMBER