Maharashtra

Satara

CC/10/259

Smt.Ratnabai Namdev Dhumal - Complainant(s)

Versus

The Oriental Insurance C0.Ltd Brance Maneger Vinod Ingale - Opp.Party(s)

Adv Kadam

14 Mar 2011

ORDER


ReportsDistrict Consumer disputes redressal Forum Satara Near Cooperative Court Sadara Bazar Satara-415001
CONSUMER CASE NO. 10 of 259
1. Smt.Ratnabai Namdev DhumalA/p Karang Khop Tal Koregow Dist Satara SataraMaharashtra ...........Appellant(s)

Vs.
1. The Oriental Insurance C0.Ltd Brance Maneger Vinod Ingale Nagpur/Powai Naka Satara sataramaharastra2. kabala Insurance services Pvt ltd Smt.sucheta Pradhan Shivaji Nagar pune punemaharashtara3. Distic Krushi Adhikarisadar bazar sataramaharashtra4. Collector Satara Maharashtra Shasansatarasataramaharashtra ...........Respondent(s)


For the Appellant :
For the Respondent :

Dated : 14 Mar 2011
ORDER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

 

                                                            नि.31
मे. जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा यांचेसमोर
                                          तक्रार क्र. 259/2010
                                          नोंदणी तारीख – 12/11/2010
                                          निकाल तारीख – 14/3/2011
                                          निकाल कालावधी – 122 दिवस
 
श्री विजयसिंह दि. देशमुख, अध्‍यक्ष
श्रीमती सुचेता मलवाडे, सदस्‍या
श्री सुनिल कापसे, सदस्‍य
 (श्री सुनिल कापसे, सदस्‍य यांनी न्‍यायनिर्णय पारीत केला)
------------------------------------------------------------------------------------
 
श्रीमती रत्‍नाबाई नामदेव धुमाळ
रा.करंजखोप, ता.कोरेगाव
जि.सातारा                                        ----- अर्जदार
                                            (वकील श्री.एम.एन.शेटे)
      विरुध्‍द
1. दी ओरिएन्‍टल इन्‍शुरन्‍स कंपनी लि.,
   शाखा विभाग नं.2
   8, हिंदुस्‍थान कॉलनी अंजनी चौकाशेजारी,
   वर्धा रोड, नागपूर 440 015 तर्फे
   शाखा व्‍यवस्‍थापक श्री विनोद इंगळे
  दी ओरिएन्‍टल इन्‍शुरन्‍स कंपनी लि.,  
   कलेक्‍टर ऑफिस समोर, जीवनतारा बिल्‍डींग,
   पोवई नाका, सातारा                             ----- जाबदार क्र.1
                                               (व‍कील श्री.कालिदास माने)
2. कबाली इन्‍शुरन्‍स सर्व्हिसेस प्रा.लि.,
   द्वारा श्रीमती सुचेता प्रधान
   करंदीकर हाऊस, तिसरा मजला,
   101, शिवाजीनगर, पुणे-411 005
3. जिल्‍हा अधिक्षक, कृषी अधिकारी,
    नवीन प्रशासकीय इमारत, सदर बझार,
    सातारा, ता.जि.सातारा
4. मा.जिल्‍हाधिकारी सो,
    जिल्‍हाधिकारी कार्यालय, सातारा                   ----- जाबदार क्र.2 ते 4
 
 
न्‍यायनिर्णय
 
    अर्जदार यांनी प्रस्‍तुतचा अर्ज ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 12 नुसार केलेला आहे. अर्जदार यांचे अर्जातील कथन थोडक्‍यात खालीलप्रमाणे -
1.     अर्जदार यांचे पती श्री.नामदेव ज्ञानोबा धुमाळ हे शेतकरी असून त्‍यांचे दि.18/11/07 रोजी अपघाती खुनामुळे निधन झाले आहे. श्री नामदेव धुमाळ हे प्रतिष्ठित व समाजसेवेत भाग घेणारे होते. त्‍यांच्‍या गावातील विनायक धुमाळ हा दारु विक्रीचा व्‍यवसाय करायचा. त्‍यास अर्जदारचे पतीने विरोध केल्‍याने विनायक धुमाळ याने दारुच्‍या नशेत अर्जदारचे पतीचा खून केला. म्‍हणून अर्जदार यांनी शेतकरी अपघात विमा योजनेखाली त‍हसिलदार कोरेगाव यांचेकडे आवश्‍यक कागदपत्रांसह प्रस्‍ताव पाठविला. त्‍यानंतर अनेक वेळा याबाबत चौकशी केल्‍यानंतर जाबदार यांनी अर्जदारचे पतीचा मृत्‍यू हा रक्‍ताचे संबंधातून झाला असल्‍याचे कारण दाखवून क्‍लेम नामंजूर झाल्‍याचे कळविले. अर्जदार यांनी परिपत्रकाप्रमाणे संबंधीत समिती म्‍हणजेच जिल्‍हाधिकारी, जिल्‍हा अधिक्षक, कृषी अधिकारी, तहसिलदार यांना नोटीस देवून दाद मागितली परंतु त्‍यास प्रतिसाद मिळाला नाही. अर्जदारचे पती व खूनी यांचेदरम्‍यान गेल्‍या पाच पिढयांपेक्षा जास्‍त काळ संबंध नाही. अर्जदारचे पती यांचा खून कोणत्‍याही लाभाकरिता झालेला नाही. सबब शेतकरी अपघात योजनेखाली रक्‍कम रु.1 लाख व्‍याजासहित मिळावेत, मानसिक त्रासापोटी व अर्जाचे खर्चापोटी रक्‍कम मिळावी  यासाठी अर्जदार यांनी प्रस्‍तुतचा अर्ज दाखल केला आहे.
2.    जाबदार क्र.1 यांनी प्रस्‍तुतचे कामी त्‍यांचे लेखी म्‍हणणे/कैफियत नि.18 ला दाखल केली आहे. त्‍यामध्‍ये त्‍यांनी अर्जदारचे तक्रारअर्जातील बहुतांश मजकूर नाकारलेला आहे. कृषी आयुक्‍त, महाराष्‍ट्र शासन, जाबदार क्र.2 व जाबदार क्र.1 यांचेमध्‍ये नागपूर येथे त्रिपक्षीय करार झाला असून त्‍यानुसार शेतकरी अपघात विमा पॉलिसी उतरविण्‍यात आली आहे. जाबदार यांचे वास्‍तव्‍य हे नागपूर येथील असल्‍याने सदरचे मंचास तक्रार चालविण्‍याचे अधिकारक्षेत्र नाही. अर्जदार यांनी सदरची तक्रार तक्रारीस कारण घडल्‍यानंतर तीन वर्षानंतर दाखल केली आहे. त्‍यामुळे तक्रारअर्ज मुदतीत नाही. अर्जदारचे पतीचा खून हा भावकीतील व रक्‍तसंबधातील व्‍यक्‍तीकडून झाला असल्‍याने पॉलिसीच्‍या अटी व शर्ती प्रमाणे अर्जदार रक्‍कम मिळण्‍यास पात्र ठरत नाहीत. त्रिपक्षीय करारानुसार क्‍लेमबाबत वाद उदभवल्‍यास त्‍याचे निराकरण विशिष्‍ट समितीमार्फत करण्‍यात यावे. सदरचे समितीचा निर्णय मान्‍य नसेल तर लोकपाल अगर ग्राहक मंचाकडे दाद मागता येईल. अर्जदार यांनी सदरचे समितीकडे दाद न मागता थेट या मंचाकडे दाद मागितली आहे. सबब तक्रारअर्ज अवकाळी आहे. अर्जदार हे जाबदार यांचे ग्राहक होत नाहीत. सबब, अर्जदार यांचा तक्रारअर्ज फेटाळणेत यावा असे जाबदार क्र.1 यांनी त्‍यांचे कैफियतीमध्‍ये कथन केले आहे.
3.    जाबदार क्र.2 यांनी नि.21 ला पत्र दाखल केले असून त्‍यामध्‍ये त्‍यांनी असे कथन केले आहे की, जाबदार क्र.2 ही केवळ सल्‍लागार कंपनी आहे. कागदपत्रांची पूर्तता करुन ती विमा कंपनीकडे पाठविण्‍याचे काम जाबदार क्र.2 करतात. यासाठी जाबदार क्र.2 कोणताही मोबदला घेत नाही. सबब तक्रारअर्ज फेटाळणेत यावा असे जाबदार क्र.2 यांनी कथन केले आहे.
 
4.    जाबदार क्र.3 यांनी अर्जदार हे जाबदार यांचे ग्राहक आहेत. अर्जदारने सर्व कागदपत्रांची पूर्तता केली असल्‍याचे सिध्‍द होते. रक्‍तातील नात्‍याच्‍या नातेवाईकाने खून केला असल्‍याचे कारणास्‍तव जाबदार यांनी जो क्‍लेम नामंजूर केला आहे तो जाबदार क्र.3 यांना मान्‍य नाही. अर्जदारचे पती व आरोपी यांचेमध्‍ये रक्‍ताचे संबंध नाहीत. ते एकाच गावातील असून फक्‍त आडनाव एक आहे.  जाबदार क्र.1 यांनी विमा रक्‍कम देणे बंधनकारक आहे. सबब जाबदार क्र.3 यांना या प्रकरणातून वगळण्‍यात यावे असे जाबदार क्र.3 यांनी कथन केले आहे. 
                जाबदार क्र.4 यांना याकामी नोटीसची बजावणी होवूनही त्‍यांनी त्‍यांचे लेखी म्‍हणणे व प्रतिज्ञापत्र याकामी दाखल केलेले नाही. सबब याकामी म्‍हणणे दाखल नाही असा आदेश करण्‍यात आला आहे.
5.    अर्जदार व जाबदार क्र.1 तर्फे दाखल लेखी युक्तिवाद पाहिला. तसेच अर्जदार व जाबदार यांची दाखल कागदपत्रे पाहिली.
6.  प्रस्‍तुतचे कामी प्रामुख्‍याने खालीलप्रमाणे मुद्दे उपस्थित होत आहेत. हे मुद्दे व त्‍यांना दिलेली उत्‍तरे खालीलप्रमाणे आहेत.
           मुद्दे                                   उत्‍तरे
अ) अर्जदार व जाबदार यांचे दरम्‍यान ग्राहक व
     सेवा देणारे असे नाते आहे काय ?              होय.
ब)   जाबदार यांनी अर्जदार यांना सेवा देण्‍यामध्‍ये
     कमतरता केली आहे काय ?                          नाही.
क)   अंतिम आदेश -                                 खाली दिलेल्‍या कारणास्‍तव
                                             अर्जदार यांचा तक्रारअर्ज
               नामंजूर करणेत येत आहे.
 
कारणे
7.    अर्जदार यांचे तक्रारअर्जातील कथन पहाता अर्जदार यांचे पतीचे निधन दि.18/11/07 रोजी झालेले आहे. तदनंतर त्‍यांनी त्‍यांची आवश्‍यक ती कागदपत्रे दि.8/4/2008 रोजी तहसिलदार कोरेगाव यांचेकडे पाठविली. परंतु सदरचा प्रस्‍ताव जाबदार क्र.1 यांचेकडे पाठविलेनंतर अर्जदार यांनी जाबदार क्र.1 यांचेकडे विमा दावा रक्‍कम मिळणेसाठी लेखी स्‍वरुपात कोणता पाठपुरावा केला याबाबत कोणतीही कागदपत्रे दाखल केलेली नाहीत. अर्जदार यांनी तहसिलदार कोरेगाव यांचेकडे दि.8/4/2008 रोजी प्रस्‍ताव पाठविलेनंतर तदनंतर त्‍यांनी दि.12/11/2010 रोजी प्रस्‍तुतचा तक्रारअर्ज दाखल केला आहे. ग्राहक संरक्षण कायद्यातील तरतुदीनुसार त‍क्रारीस कारण घडल्‍यापासून दोन वर्षांचे आत तक्रार दाखल करणे बंधनकारक आहे. परंतु, त्‍यानुसार अर्जदार यांनी दोन वर्षाचे आत प्रस्‍तुतची तक्रार दाखल केलेली नाही.   सबब, प्रस्‍तुतची तक्रार मुदतीत नसल्‍यामुळे ती फेटाळणेस पात्र आहे असे या मंचाचे मत आहे. 
 
8.    याकामी महत्‍वाची बाब अशी आहे की, कृषी आयुक्‍त, महाराष्‍ट्र शासन, जाबदार क्र.2 व जाबदार क्र.1 यांचेमध्‍ये नागपूर येथे त्रिपक्षीय करार झाला असून त्‍यानुसार शेतकरी अपघात विमा पॉलिसी उतरविण्‍यात आली आहे. सदरचे त्रिपक्षीय करारानुसार क्‍लेमबाबत वाद उदभवल्‍यास त्‍याचे निराकरण विशिष्‍ट समितीमार्फत करण्‍यात यावे. सदरचे समितीचा निर्णय मान्‍य नसेल तर लोकपाल अगर ग्राहक मंचाकडे दाद मागता येईल अशी तरतूद करण्‍यात आलेली आहे. परंतु अर्जदार यांनी दाखल केलेली कागदपत्रे पाहता त्‍यांनी सदरचे समितीकडे दाद मागितल्‍याबाबत व सदरचे समितीने निर्णय दिल्‍याबाबत कोणतीही कागदपत्रे अर्जदार यांनी दाखल केलेली नाहीत. यावरुन अर्जदार यांनी सदरचे समितीकडे दाद न मागता थेट या मंचाकडे दाद मागितली आहे हे स्‍पष्‍ट होते. सदरची बाब विचारात घेता अर्जदार यांचा तक्रारअर्ज या मंचासमोर चालणेस पात्र नाही असे या मंचाचे मत आहे.
9.    अर्जदार यांच्‍या तक्रारअर्जातील कथन पाहता त्‍यांनी असे कथन केले आहे की, त्‍यांचे पतीचे व आरोपी विनायक धुमाळ यांचे रक्‍ताचे नातेसंबंध नव्‍हते परंतु याकामी जाबदार क्र.1 यांनी दाखल केलेली महत्‍वाची कागदपत्रे म्‍हणजे आरोपीचा जबाब, प्रथम खबरी जबाब‍ इ. कागदपत्रे पाहिली असता असे स्‍पष्‍टपणे दिसून येते की, अर्जदारचे पती हे आरोपीचे चुलत चुलते होते. म्‍हणजेच अर्जदारचे पती व आरोपी यांचेमध्‍ये रक्‍ताचे नातेसंबंध होते. परंतु सदरची बाब अर्जदार यांनी त्‍यांचे तक्रारअर्जात जाणीवपूर्वक लपवून ठेवल्‍याचे दिसून येते. यावरुन अर्जदार हे स्‍वच्‍छ हाताने या मंचासमोर आलेले नाहीत ही बाब स्‍पष्‍ट होते. याही कारणास्‍तव अर्जदार यांचा तक्रारअर्ज फेटाळणेस पात्र आहे.
10.  या सर्व कारणास्‍तव व वर नमूद मुद्दयांच्‍या दिलेल्‍या उत्‍तरास अनुसरुन अर्जदार यांचा तक्रारअर्ज नामंजूर करणेत येत आहे.
आदेश
1. अर्जदार यांचा तक्रारअर्ज नामंजूर येत आहे.
2. खर्चाबाबत काहीही आदेश करणेत येत नाहीत.
3. सदरचा न्‍यायनिर्णय खुल्‍या न्‍यायमंचात जाहीर करणेत आला.
 
सातारा
दि.14/3/2011
 
 
 
 
(सुनिल कापसे)           (सुचेता मलवाडे)           (विजयसिंह दि. देशमुख)
    सदस्‍य                   सदस्‍या                    अध्‍यक्ष
 
 
 
 
 

Smt. S. A. Malwade, MEMBERHONABLE MR. Vijaysinh D. Deshmukh, PRESIDENT Mr. Sunil K Kapse, MEMBER