Complaint Case No. CC/155/2017 | ( Date of Filing : 20 Mar 2017 ) |
| | 1. Smt. Dayawanti Haridas Mendhe | R/o. Hamlapuri, Post Nagardhan, Tah. Ramtek, Dist. Nagpur | Nagpur | Maharashtra |
| ...........Complainant(s) | |
Versus | 1. The New India Insurance Co.Ltd. | Mandal Karyalaya- 130800, 17/A, 7th floor, Kuprej Road, New India Center, Mumbai 400 039 | Mumbai | Maharashtra | 2. Zilla Krushi Adhikari | Kadimbagh, Civil Lines, Nagpur-1 | Nagpur | Maharashtra |
| ............Opp.Party(s) |
|
|
Final Order / Judgement | आदेश मा. सदस्य, श्री. सुभाष रा. आजने यांच्या आदेशान्वये - - तक्रारकर्तीने ग्राहक संरक्षण कायदा 2019 च्या कलम 35 अन्वये दाखल केली असून त्यात नमूद केले की, तिच्या पती हरिदास पुंडलीक मेंढे याच्या मालकिचे मौजा- हमलापुरी, तह. रामटेक, जि. नागपूर येथे भूमापन क्रं. 138/1, प.ह.नं. 40, खाते क्रं. 150, एकूण आराजी 2.14 हे.आर. ही शेतजमीन होती. वि.प. ही विमा कंपनी असून वि.प. 2 हे शासनाच्या वतीने शेतकरी अपघात विमा योजना अंतर्गत दावा स्वीकारतात व मंजूर करतात. त.क.चे पतीचा महाराष्ट्र शासना तर्फे रुपये 1,00,000/- विमा उतरविण्यात आला होता. त.क. ही मयत हरिदास पुंडलीक मेंढेची पत्नी असल्याने विमा दाव्याची लाभधारक आहे.
- तक्रारकर्तीचा पती अॅटोने जात असतांना अॅटो पलटून झालेल्या अपघातामुळे त्याचा दि. 01.06.2013 रोजी मृत्यु झाला. त.क.ही अशिक्षित व दुर्गम भागात राहत असल्यामुळे आणि तिला विमा दाव्या संदर्भात काहीही माहिती नव्हती. तक्रारकर्तीला जेव्हा सदरच्या विम्याबाबत माहिती मिळाली तेव्हा तक्रारकर्तीने वि.प. 2 मार्फत वि.प. 1 कडे विमा दावा मिळण्याकरिता संपूर्ण आवश्यक दस्तावेजासह रीतसर विमा दावा प्रस्ताव दि. 24.11.2014 ला सादर केला. परंतु विरुध्द पक्षाने तक्रारकर्तीचा विमा दावा मंजूर अथवा नामंजूर केल्याबाबत काहीही कळविले नाही व तक्रारकर्तीला त्रुटीपूर्ण सेवा दिल्यामुळे तक्रारकर्तीने प्रस्तुत तक्रार आयोगासमक्ष दाखल करुन मागणी केली की, त.क.चा विमा दावा रक्कम रुपये 1,00,000/- दि. 24.11.2014 पासून 18 टक्के दराने व्याजासह देण्याचा आदेश द्यावा. त्याचप्रमाणे मानसिक, शारीरिक त्रासाकरिता नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च देण्याचा ही आदेश द्यावा.
- विरुध्द पक्ष 1 यांनी आपला लेखी जबाब दाखल केला असून आपलया विशेष कथनात नमूद केले की, तक्रारकर्तीने सदर तक्रार दाखल करतांना वि.प.ने त.क.ला त्रुटीपूर्ण सेवा दिल्याचे दर्शविण्यात आणि त्यासंबंधीचे दस्तावेज दाखल करण्यात अपयशी ठरली आहे. त.क.च्या पतीचा मृत्यु रस्त्यात अपघात झाल्याने झाला आहे परंतु त्यासंबंधीचा प्रथम खबरी अहवाल उशिराने पोलिस स्टेशनला सादर करण्याचे कारण तक्रारीत नमूद केलेले नाही व अॅटो रिक्षाचा नोंदणी क्रं. प्रथम खबरी अहवालात नमूद नाही. अपघात झाल्यानंतर लगेच प्रथम एफ.आय.आर. नोंदविणे आवश्यक होते. तसेच घटनास्थळ पंचनामा हा घटनेला धरुन नाही व मृत्यु कशाने झाला हे शवविच्छेदन अहवालात नमूद नाही. त्यामुळे तक्रारकर्तीच्या पतीचे निधन अपघातामुळे झाले असे म्हणता येणार नाही. म्हणून तक्रारकर्तीचा विमा दावा संशयास्पद असल्यामुळे तो रद्द होण्यास पात्र आहे.
- तक्रारकर्तीचा पती हा शेतजमीनीची मालक व तक्रारकर्ती ही त्याची वारस असल्याबाबतचे दस्तावेज 6 डी व 6 ए सादर करण्यास अपयशी ठरली आहे. तक्रारकर्तीने शासन निर्णयानुसार दस्तावेज सादर केलेले नाही व तक्रारकर्तीने तिचा विमा दावा आवश्यक दस्तावेजासह सादर केल्याचा पुरावा दाखल केलेला नाही. तक्रारकर्तीच्या पतीचे निधन रोड अपघातात झाला व त.क.ने तिचा विमा दावा प्रस्ताव 17 महिने उशिराने म्हणजेच दि. 24.11.2014 ला सादर केला. सदरची तक्रार त.क.ने उशिराने दाखल केली, त्यामुळे प्रस्तुत तक्रार आयोगा समक्ष चालू शकत नाही. वि.प. 2 यांनी त्यांना देण्यात आलेले कार्य त्यांनी योग्यरित्या पूर्ण केलेले नाही. त.क.ने वि.प. 2 कडे विमा दावा सादर केल्यानंतर वि.प. 2 ने विमा दाव्या सोबत दाखल केलेले दस्तावेजाची पडताळणी केल्यानंतरच विमा दावा प्रस्ताव स्वीकारावयास पाहिजे होते. त्यामुळे वि.प. 2 हे त.क.चा विमा दावा करिता जबाबदार आहेत. वि.प. 1 ने त.क.ला कोणतीही दोषपूर्ण सेवा दिलेली नसल्यामुळे त्यांच्या विरुध्दची तक्रारी खारीज करण्यात यावी अशी विनंती केलेली आहे.
- विरुध्द पक्ष 2 यांना आयोगा मार्फत पाठविलेली नोटीस प्राप्त होऊन ही ते आयोगा समक्ष हजर झाले नाही अथवा आपला लेखी जबाब दाखल केलेला नाही. म्हणून विरुध्द पक्ष 2 विरुध्द प्रकरण एकतर्फी चालविण्याचा आदेश दि. 10.06.2019 रोजी पारित करण्यात आला.
- उभय पक्षांनी तक्रारी सोबत दाखल केलेले दस्तावेज, लेखी युक्तिवाद व तोंडी युक्तिवादाबाबतची पुरसीसवरुन आयोगाने निकाली कामी खालील मुद्दे विचारार्थ घेतले.
1 तक्रारकर्ता विरुध्द पक्षाचा ग्राहक आहे काय? होय 2 विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याला दोषपूर्ण सेवा दिली काय? नाही 3. विरुध्द पक्षाने अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब केला काय? नाही 4 काय आदेश ? अंतिम आदेशानुसार कारणमीमांसा - मुद्दा क्रमांक 1 ते 3 बाबत – तक्रारकर्तीचा पती हरिदास पुंडलीक मेंढे याच्या मालकिचे मौजा- हमलापुरी, तह. रामटेक, जि. नागपूर येथे भूमापन क्रं. 138/1, प.ह.नं. 40, खाते क्रं. 150, एकूण आराजी 2.14 हे.आर. ही शेतजमीन असल्याबाबतचे गावठान नमुना क्रं. 7, 7-अ व 12, गावठान नमुना 7, गावठान नमुना 8 –अ चे नि.क्रं. 2 वर दाखल दस्तावेजावरुन स्पष्ट होते. तसेच नि.क्रं. 2(5, 8 )वर दाखल मृत्यु प्रमाणपत्र व तलाठी प्रमाणपत्र नि.क्रं. 2 (6, 7 व 8 ) वर दाखल मृत्यु नोंदपत्र, प्रथम खबरी अहवाल, शवविच्छेदन अहवाल इत्यादी अवलोकन केले असता तक्रारकर्तीच्या पतीचे निधन दि. 01.06.2013 ला रोड अपघातात झाल्याचे दिसून येते. तसेच तलाठयाने दिलेल्या प्रमाणपत्रावरुन तक्रारकर्ती ही शेतकरी व्यक्तीगत विमा योजना अंतर्गत देय असलेल्या विमा दाव्याची रक्कम मिळण्यास पात्र असल्याचे दिसून येते.
- शासन निर्णय क्रं. शेअवि 2009/पत्र क्रं. 268, 11-अे, मंत्रालय विस्तार भवन मुंबई 32, दि. 04.12.2009 नुसार त.क.ने तिचा विमा दावा विहित कागदपत्रासह तालुका कृषी अधिकारी / कृषी पर्यवेक्षक यांच्या मार्फत सादर करणे आवश्यक होते व त्याची रीतसर पोच पावती घेणे आवश्यक होते. परंतु तक्रारकर्तीने तिचा विमा दावा जिल्हा कृषी अधिकारी नागपूर यांच्याकडे दि. 24.11.2014 ला सादर केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. परंतु विमा दावा संबंधीत अधिका-याकडे दाखल केल्याचा पुरावा अभिलेखावर दाखल केलेला नाही व त्याला प्रतिवादी न केल्यामुळे ग्राहक आयोग विमा दावा योजने अंतर्गत देय असणारी विमा दाव्याची रक्कम देण्याच्या निर्णयास पोहचू शकत नाही.
सबब खालील प्रमाणे अंतिम आदेश पारित. अंतिम आदेश - तक्रारकर्तीची तक्रार खारीज.
- उभय पक्षांना आदेशाची प्रथम प्रत निशुल्क द्यावी.
- तक्रारकर्त्याला प्रकरणाची ब व क फाईल परत करावी.
| |