Maharashtra

Nagpur

CC/599/2017

SMT. PARBATIBAI HARI JIVTODE - Complainant(s)

Versus

THE NEW INDIA INSURANCE CO. LTD., THROUGH CHIEF REGIONAL MANAGER - Opp.Party(s)

ADV. U.Y. SONKUSARE

12 Jul 2022

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/599/2017
( Date of Filing : 22 Dec 2017 )
 
1. SMT. PARBATIBAI HARI JIVTODE
R/O. AMADI , POST- KHANDALA, PARSHIVNI, NAGPUR
NAGPUR
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. THE NEW INDIA INSURANCE CO. LTD., THROUGH CHIEF REGIONAL MANAGER
NEAR T.V. TOWER, M.E.C.L. BUILDING, SEMINARRY HILL, NAGPUR
NAGPUR
MAHARASHTRA
2. District Agricultural Officer
KADIMBAG, CIVIL LINE, NAGPUR-1
NAGPUR
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
PRESENT:ADV. U.Y. SONKUSARE, Advocate for the Complainant 1
 
Dated : 12 Jul 2022
Final Order / Judgement

आदेश

आदेश पारीत व्‍दारा श्री. एस आर आजनेमासदस्‍य       

  1. तक्रारकर्ती मौजा-आमडी, पोस्‍ट-खंडाळा तह.पारशिवनी, जि. नागपूर येथील रहिवासी असून तक्रारकर्तीच्या पतीची मौजा-आमडी, तह.  तह.पारशिवनी, जि. नागपूर येथे भुमापन क्रं.33, प.ह.न.23, खाते कं. 144, एकुण आराजी 1.60 हेक्टर आर एवढी जमिन होती. तक्रारकर्तीचे पती हरी तात्या जिवतोड यांचा मोटार वाहन अपघातात दिनांक 3.2.2013 रोजी मृत्यु झाला त्यामूळे तक्रारकर्ती शेतकरी व्यक्तीगत अपघात योजने अंतर्गत विम्याची लाभधारक आहे.
  2. वि.प.क्रं.1 हे विमा कंपनी व वि.प.क्रं.2 शासनाचे वतीने शेतकरी व्यक्तीगत अपघात योजनेअंतर्गत विमा दावा स्वि‍कारतात व मंजूर करतात. तक्रारकर्तीचा पती हरी तात्या जीवतोडेचा विमा महाराष्‍ट्र शासनातर्फे काढण्‍यात आला होता. वि.प.कं. 2 विमा दावा प्रस्तावाची छाननी करुन वि.प.क्रं.1 यांचेकडे सादर करतात. तक्रारकर्तीच्यापतीचा दिनांक 3.2.2013 ला मोटार वाहन अपघात मृत्यु झाला. तक्रारकर्तीने वि.प.क्रं.2 यांचे मार्फत वि.प.क्रं. 1 यांचे कडे दिनांक 3.2.2014 ला अर्ज आवश्‍यक दस्तऐवजांसह सादर केला. परंतु वि.प.ने तक्रारकर्तीचा विमा दावा मंजूर किंवा नामंजूर केला नाही. वि.प.ने तक्रारकर्तीला सेवेमध्‍ये त्रुटी केल्याने तक्रारकर्तीने सदर तक्रार मंचासमक्ष दाखल करुन तक्रारकर्तीला विमा दावा रक्कम रुपये 1,00000/- विमा दावा सादर दिनांक 3.2.2014 पासुन द.सा.द.शे18 टक्के व्याजासह मिळावे तसेच मानसिक व शारिरिक त्रासापोटी  रुपये 20,000 व तक्रारीचे खर्चापोटी रुपये 10,000/- मिळावे अशी मागणी केली.
  3. वि.प.1 व 2 यांना मंचामार्फत नोटीस पाठविण्‍यात आली. वि.प.क्रं.1  हे नोटीस मिळुन तक्रारीत हजर झाले व आपले लेखी उत्तर तक्रारीत दाखल केले. वि.प.क्रं. 2 हे नोटीस मिळुनही तक्रारीत हजर झाले नाही म्हणुन वि.प.क्रं.2 यांचे विरुध्‍द तक्रार एकतर्फी चालविण्‍याचा आदेश दिनांक 17.6.2019 रोजी पारित करण्‍यात आला.
  4. वि.प.क्रं.1 आपले लेखी उत्तरात नमुद करतात की, तक्रारकर्तीने दाखल केलेली तक्रार मुदतबाह्य आहे. तसेच तक्रारकर्तीने वि.प.ला नोटीस पाठविली नाही व तक्रारकर्ती शासनाचे अधिसुचनेनुसार आवश्‍यक दस्तऐवज सादर करण्‍यास अपयशी ठरली आहे. तकारकर्तीने विमा दावा उशीराने सादर करण्‍याचे कारण नमुद केले नाही. त्यामूळे सदर तक्रार या आयोगासमक्ष चालू शकत नाही व ती खारीज होण्‍यास पात्र आहे. तक्रारकर्तीने इंन्श्‍युरन्स अडव्हाईजरला तक्रारीत प्रतीवादी बनविले नाही. सदर तक्रार वि.प.क्रं.2 यांनी कोणतीही छाननी न करता वि.प.क्रं.1 ला विमा दावा सादर केला. त्यामूळे सदर तक्रार इंन्श्‍युरन्स अॅडव्हाईजरला तक्रारीत प्रतीवादी बनविले नाही या कारणास्तव खारीज करण्‍यात यावी. तक्रारकर्तीच्या पतीचा अपघात त्याच्या निष्‍काळजीपणामूळे झालेला आहे. तक्रारकर्तीच्या पतीने रस्ता ओलांडतांना कोणतीही काळजी घेतली नव्हती. तक्रारकर्तीने पतीच्या मृत्युच्या शवविच्‍छेदन अहवालाची प्रत सादर केली नाही. तक्रारकर्तीने सादर केलेल्या दस्तऐवजांचे अवलोकन केल्यावर तक्रारकर्तीच्या पतीचा मृत्य हा संशयास्पद आहे. त्यामूळे वि.प. कोणतीही नुकसान भरपाई देण्‍यास पात्र नाही. वि.प.ने  तकारकर्तीला कोणती त्रुटीपूर्ण सेवा दिली हे तक्रारकर्ती सिध्‍द करु शकली नाही. वि.प.ने त्यांचे परिच्‍छेदनिहाय लेखी उत्तरात तक्रारकर्तीचे म्हणणे नाकारले आहे.
  5. तक्रारदाराने अभिलेखावर दाखल केलेले दस्‍तावेजांचे अवलोकन करता खालील मुद्दे विचारार्थ घेण्यात आले.

मुद्दे                                               उत्तरे

  1. तक्रारकर्ता विरुध्‍द पक्षाचा ग्राहक आहे काय ?                           होय
  2. विरुध्‍द पक्षाने तक्रारदाराला त्रुटीपूर्ण सेवा दिली काय ?           नाही
  3. विरुध्‍दपक्षाने तक्रारदाराचे प्रती अनुचित व्यापारी

पध्‍दतीचा  अवलंब केला आहे काय ?                                            नाही 

  1. काय आदेश                                                                        अंतिम आदेशानुसार
    •  
  1. तक्रारकर्ती मौजा आमडी पोस्‍ट खंडाळा तह.पारशिवनी, जि. नागपूर येथील रहिवासी असून तक्रारकर्तीच्या पतीची मौजा-आमडी, तह.  तह.पारशिवनी, जि. नागपूर येथे भुमापन क्रं.33, प.ह.न.23, खाते कं. 144, एकुण आराजी 1.60 हेक्टर आर एवढी जमिन होती हे नि.क्रं. 2 वर दाखल गाव नमुना क्रं. 7,7-अ व 12 , फेरफार नोंदवही, गावनमुना 6 –क, गावनमुना 7,7-अ, व /12 चे अवलोकन केल्यावर स्पष्‍ट होती. तक्रारकर्तीच्या पतीचे दिनांक 3.2.2013 ला मोटार अपघातात निधन झाल्याने नि.क्रं. 2 वरील दस्तऐवज क्रं. 7 वर दाखल मृत्यु प्रमाणपत्र व एफआयआर, घटरनास्थळ पंचनामा, शवविच्‍छेदन अहवालाचे अवलोकन केल्यावर स्पष्‍ट होते. त्यामूळे तक्रारकर्ती ही लाभार्थी या नात्याने वि.प.ची शेतकरी अपघात योजनेची ग्राहक ठरते.
  2. तकारकर्तीने तिचा विमा दावा जिल्हा कृषी अधिकारी नागपूरयांचे कडे दिनांक 25.3.2014 रोजी सादर केल्याचे नमुद केले आहे. परंतु विमा दावा संबंधीत अधिका-याकडे दाखल केल्याचा पूरवा अभिलेखावर दाखल केला नाही. तसेच महाराष्‍ट्र शासनाने शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत सन 2012-13 मध्‍ये दिलेल्या सुचनेनुसार तक्रारकर्तीने तिचा विमा दावा विहित कागदपत्रांसह तालुका कृषी अधिकारी यांचे मार्फत सादर करावयास पाहिजे होता व त्याची पोचपावती घ्‍यावयास हवी होती. त्यामूळे ग्राहक आयोग तक्रारकर्तीला शेतकरी अपघात योजने अतर्गत विमा दावा देऊ शकत नाही.
  3. दिनांक 18.2.2020 ला तक्रारकर्तीचे वकील यांनी मा. मंचासमोर वि.प.क्रं.3 जिल्हा कृषी अधिकारी यांचे नाव वगळून तालुका कृषी अधिकारी यांना प्रतीवादी क्रं.3 करण्‍याबाबत अर्ज सादर केला असता सदर अर्ज दिनांक 28.2.2020 रोजी मंजूर केला व त्यानंतर पुनश्‍च तक्रारकर्तीचे वकीलांनी दिनांक 22.9.2021 ला मा. आयोगासमक्ष अर्ज सादर करुन जिल्हा कृषी अधिकारी यांनाच प्रतीवादी ठेवण्‍याबाबात अर्ज केला व त्यानंतर तक्रारकर्ती व त्यांचे वकील दिनांक 22.9.2021 पासुन गैरहजर आहेत. त्यामूळे सदर तक्रार ग्राहक सरंक्षण कायद्याचे कलम 38(3)(सी)नुसार निकाली काढण्‍यात येते सबब आदेश खालीलप्रमाणे पारित करण्‍यात येतो.

 

  •  
  1. तक्रारकर्तीची तक्रार खारीज करण्‍यात येते.
  2. तक्रारीचा खर्च तक्रारकर्तीने स्वतः सोसावा.
  3. तक्रारकर्तीला आदेशाची प्रथम प्रत निःशुल्‍क द्यावी.
  4. तक्रारकर्त्‍याला प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी.
 
 
[HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.