Maharashtra

Gadchiroli

CC/37/2016

Sukumar Chittaranjan Mandal - Complainant(s)

Versus

The New India Assurance Company Limited Through Divisional Manager & 2 others - Opp.Party(s)

Adv. Uday Kshirsagar

27 Oct 2016

ORDER

District Consumer Disputes Redressal Forum Gadchiroli.
M.I.D.C. Road, T - Point, Navegaon,
Tah. Dist. Gadchiroli.
Pin No. 442605.
Maharashtra
 
Complaint Case No. CC/37/2016
 
1. Sukumar Chittaranjan Mandal
Age- 40 Yr., Occu.-Farmer, At. Gandhinagar, Tah. Mulchera, Dist. Gadchiroli
Gadchiroli
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. The New India Assurance Company Limited Through Divisional Manager & 2 others
Divisional Office No. 130800, New India Center, 7th Floor, 17-A, Kuprej Road, Mumbai-400001
Mumbai
Maharashtra
2. The New India Assurance Company Limited Through Regional Manager
M.E.C.L. Complex, Seminary Hills, Nagpur- 440018
Nagpur
Maharashtra
3. Taluka Agriculture Officer, Mulchera
Tal. Mulchera, Dist. Gadchiroli
Gadchiroli
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MS. Roza F. Khobragade PRESIDENT
 HON'BLE MR. Sadik M. Zaveri MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
Dated : 27 Oct 2016
Final Order / Judgement

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍यायमंच, गडचिरोली

 

ग्राहक तक्रार क्रमांक :-  37/2016            तक्रार नोंदणी दि. :- 15/6/2016

                        तक्रार निकाली दि. :- 27/10/2016

                                          निकाल कालावधी :-  4 म.12 दिवस

 

अर्जदार/तक्रारकर्ता      :-    सुकुमार चित्‍तरंजन मंडल,

                              वय 40 वर्षे, व्‍यवसाय-शेती, 

                              रा.गांधीनगर, ता.मुलचेरा, जि.गडचिरोली.

                       

                        - विरुध्‍द -

गैरअर्जदार/विरुध्‍दपक्ष   :-   (1) द न्‍यु इंडिया अॅश्‍युरन्‍स कंपनी लिमिटेड,

  तर्फे डिव्‍हीजनल मॅनेजर,

         डिव्‍हीजनल ऑफीस नं.130800, न्‍यु इंडिया

   सेंटर, 7 वा माळा, 17-ए, कुपरेज रोड,

   मुंबई-400 001.

                             (2) द न्‍यु इंडिया अॅश्‍युरन्‍स कंपनी लिमिटेड,

   तर्फे क्षेत्रीय मॅनेजर,

    एम.ई.सी.एल.कॉम्‍प्‍लेक्‍स, सेमिनरी हिल्‍स,

    नागपूर-440018.

                             (3)  तालुका कृषि अधिकारी, मुलचेरा,

    तालुका मुलचेरा, जिल्‍हा गडचिरोली.

                               

अर्जदार तर्फे वकील                :-  अधि.श्री.उदय क्षिरसागर    

गैरअर्जदार क्र.1 तर्फे वकील        :-    अधि.श्री.राजेश ठाकूर व अन्‍य

गैरअर्जदार क्र.3 तर्फे               :-   स्‍वतः

 

गणपूर्ती         :-    (1) श्रीमती रोझा फुलचंद्र खोब्रागडे, अध्‍यक्ष (प्र.)

                                      (2) श्री सादिक मो‍हसिनभाई झवेरी, सदस्‍य

 

आ दे श  -

(मंचाचे निर्णयान्‍वये, सादिक मो.झवेरी, सदस्‍य)

(पारीत दिनांक : 27 ऑक्‍टोंबर 2016)

                                      

                              तक्रारकर्त्‍याने सदर तक्रार, ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 12 अन्‍वये दाखल केली असून, तक्रारीचा आशय थोडक्‍यात येणे प्रमाणे.

 

1.          तक्रारकर्त्‍याचे वडील शेतीचा व्‍यवसाय करीत होते. शेतातील उत्‍पन्‍नावर तक्रारकर्त्‍याचे वडील कुटूंबाचे पालनपोषण करीत होते. तक्रारकर्त्‍याचे वडील श्री.चित्‍तरंजन मादार मंडल हे दि.17.07.2012 रोजी शेतात काम करीत असतांना अंगावर विज पडून जखमी होऊन मृत्‍यु पावले.  शासनातर्फे तक्रारकर्त्‍याचे वडील शेतकरी व्‍यक्‍तीगत अपघात विमा काढला असल्‍याने व तक्रारकर्त्‍याचे वडील शेतकरी असल्‍याने तक्रारकर्ता मृत  शेतक-याचा वारसदार म्‍हणून गैरअर्जदार क्र.1 व 2  कडून रुपये 1,00,000/- च्‍या विमा रकमेसाठी पाञ होता.  तक्रारकर्त्‍याचे वडीलांचा अपघाती मृत्‍यु झाल्‍याने गैरअर्जदार क्र.3  कडे विमा योजने अंतर्गत दि.17.10.2012 ला रितसर अर्ज केला, तसेच वेळोवेळी गैरअर्जदारांनी मागीतलेल्‍या दस्‍ताऐवजाची पुर्तता केली.  तक्रारकर्त्‍याचे वडीलांच्‍या दाव्‍याबाबत गैरअर्जदार क्र.1 यांनी कोणताही निर्णय न घेतल्‍याने अर्जदाराने माहिती अधिकार कायद्याअंतर्गत दिनांक 8.3.2016 रोजी माहिती मागितली. परंतु, गैरअर्जदार यांनी दावा फेटाळला की नाही याबाबत माहिती न दिल्‍यामुळे, सदर तक्रार दाखल करावी लागत आहे.    गैरअर्जदार क्र.1 ने तक्रारकर्त्‍याचा दावा अकारण प्रलंबित ठेवून तक्रारकर्तीची फसवणूक केली आहे. शासनाने ज्‍या उद्देशाने मृत शेतक-याच्‍या पत्‍नी व मुलांसाठी ही योजना सुरु केली त्‍या उद्देशालाच गैरअर्जदार हे तडा देत आहे. त्‍यामुळे गैरअर्जदार क्र.1 ने दावा प्रलंबित ठेवून सेवेमध्‍ये ञृटी केली. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍यास मानसिक, शारिरीक ञास व आर्थिक नुकसान झाले. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने गैरअर्जदारांनी विमा दाव्‍याची रक्‍कम रुपये 1,00,000/- दि.17.10.2012 पासून द.सा.द.शे. 18 % व्‍याजाने मिळण्‍याचे, तसेच मानसिक, शारिरीक व आर्थिक ञासापोटी रुपये 30,000/- व तक्रारीचे खर्चापोटी रुपये 15,000/- अर्जदारास गैरअर्जदारांकडून मिळण्‍याचे आदेश व्‍हावे, अशी प्रार्थना केली.

 

2.          अर्जदाराने नि.क्र.2 नुसार 11 झेरॉक्‍स दस्‍ताऐवज दाखल केले. अर्जदाराची तक्रार नोंदणीकरुन गैरअर्जदारास नोटीस काढण्‍यात आली. गैरअर्जदार क्र.1 ने नि.क्र.15 नुसार लेखी उत्‍तर दाखल केले व गैरअर्जदार क्र.3 यांनी नि.क्र.11 नुसार लेखी उत्‍तर दाखल केले.

 

3.          गैरअर्जदार क्र.1  ने  नि.क्र.15 नुसार दाखल केलेल्‍या लेखी उत्‍तरात नमूद केले की, अर्जदाराने तक्रारीत केले सर्व आरोप त्‍यांना नाकबूल आहे.  गैरअर्जदाराने पुढे त्‍याचे लेखी उत्‍तरात नमूद केले आहे की, गैरअर्जदार क्र.1 व 2 ही विमा कंपनी असून शासनाच्‍या वतीने गैरअर्जदार क्र.3 मार्फत शेतकरी विमा योजनेअंतर्गत दावे स्विकारतात. मात्र, गैरअर्जदार क्र.3 तर्फे अर्जदाराच्‍या वडीलांचा रुपये 1,00,000/- चा विमा उतरविला होता, हे अमान्‍य आहे. गैरअर्जदार क्र.1 यांनी, विशेष कथनामध्‍ये असे नमुद केले की, अर्जदाराचे कथनाप्रमाणे माहिती अधिकार कायद्याप्रमाणे प्राप्‍त माहितीच्‍या दस्‍तऐवजाची पाहणी केली असता, अर्जदाराचे प्रकरण गैरअर्जदार क्र.1 च्‍या कार्यालयात आलेले नाही तसेच, त्‍याबाबतची माहिती गैरअर्जदार क्र.1 यांना देण्‍यात आलेली नाही. गैरअर्जदार क्र.3 यांनी अर्जदाराचे प्रकरण गैरअर्जदार क्र.1 कडे पाठविले नसल्‍यामुळे, सेवेत त्रृटी असल्‍याचा प्रश्‍नच उद्भवत नाही. तसेच, अर्जदार यांनी मे.कबाल इन्‍शुरन्‍स कंपनी यांना तक्रारीत विरुध्‍दपक्ष म्‍हणून समाविष्‍ट केलेले नाही, त्‍यामुळे, सदर तक्रार खारीज होण्‍यास पात्र आहे. अर्जदार यांनी घटना घडल्‍यापासून विहित मुदतीचे आंत विमा दावा दाखल करणे आवश्‍यक होते. सदरची तक्रार मुदतबाहय असल्‍यामुळे अर्जदाराची तक्रार खारीज करण्‍यात यावी, अशी विनंती केली. 

 

4.          गैरअर्जदार क्र.1  ने  नि.क्र.11 नुसार दाखल केलेल्‍या लेखी उत्‍तरात नमूद केले की, अर्जदार यांनी माहिती अधिकार कायद्यांतर्गत दिनांक 8.3.2016 रोजी केलेल्‍या अर्जात अर्जदाराचा दावा फेटाळला की नाही, याबाबत माहिती देण्‍यात नाही, असे नमुद केले आहे. अर्जदाराच्‍या वतीने त्‍यांचे वकीलांनी दिनांक 8.3.2016 ला गैरअर्जदार क्र.3 चे कार्यालयास माहिती मागितली. परंतु, अर्ज हा त्रयस्‍थ पक्षाचा असल्‍यामुळे, दिनांक 11.3.2016 ला माहिती दिली व माहितीच्‍या विरुध्‍द अपील करता येते याबाबत माहिती दिली. तथापि, दिलेल्‍या माहितीबाबत अर्जदाराकडून कोणतेही अपील करण्‍यात आलेले नाही.

 

4.          अर्जदार व गैरअर्जदार क्र.1 व 3 यांनी दाखल केलेले लेखी बयान, तसेच अर्जदार व गैरअर्जदार क्र.1  ने दाखल केलेले तोंडी व लेखी युक्‍तीवादावरुन खालील मुद्दे निघतात.

 

मुद्दे                                       :  निष्‍कर्ष

 

1)    अर्जदार हा गैरअर्जदार क्र.1 व 2 चा ग्राहक आहे काय ?         :  होय

2)    गैरअर्जदार क्र.1 व 2 ने लाभार्थ्‍याप्रती सेवेत न्‍युनतापूर्ण         :  होय

व्‍यवहार केला आहे काय ?

3)    अर्जदार हा गैरअर्जदार क्र.1 व 2 कडून विमा पॉलिसीचा लाभ    :  होय

मिळण्‍यास पाञ आहे काय ?

4)    आदेश काय ?                                      : अंतिम आदेशाप्रमाणे 

                                                      

- कारण मिमांसा

मुद्दा क्रमांक 1 बाबत :-    

 

     

5.          अर्जदाराचे वडीलाचे नावाने नि.क्र.2 नुसार दाखल दस्‍तऐवजावरुन सिध्‍द होते की, अर्जदाराचे वडीलांची शेतजमीन होती व आहे. तसेच, अर्जदार हा वडीलांच्‍या आकस्मिक मृत्‍युनंतर शेतकरी जनता अपघात विमा दाव्‍याचा लाभार्थी आहे.  म्‍हणून मुद्दा क्र.1 चे उत्‍तर होकारार्थी नोंदविण्‍यात येत आहे.

       

 मुद्दा क्रमांक 2 व 3 बाबत :-     

 

6.          गैरअर्जदार क्र.1 व 2 ने आपल्‍या लेखी उत्‍तराच्‍या विशेष कथनात असे म्‍हटले आहे की, अर्जदाराचे प्रकरण आमचेकडे कधीच आले नाही. तसेच आम्‍हाला माहितीसुध्‍दा नाही, हे कथन मान्‍य करण्‍यासारखे नाही, कारण अर्जदाराने नि.क्र.2 नुसार दाखल दस्‍तऐवज क्र.5 चे अवलोकन केले असता असे दिसून येते की, अर्जदाराचे प्रकरण गैरअर्जदाराकडे पाठविण्‍यात आले आहे. सदर दस्‍तऐवजातील विषयानुसार त्रृटीच्‍या पुर्ततेचे कागदपत्रे सादर करण्‍याबाबत म्‍हणजेच गैरअर्जदाराने काढलेल्‍या त्रृटींची पुर्तता करुन गैरअर्जदार क्र.3 चे मार्फत पाठविण्‍यात येत असल्‍याचे दस्‍तऐवज आहे. म्‍हणून गैरअर्जदाराचे हे म्‍हणणे की, अर्जदाराचे प्रकरण मिळाले नाही, हे गृहीत धरता येत नाही. तसेच गैरअर्जदाराचे हे म्‍हणणे की, अर्जदाराने प्रकरण कबाल इन्‍शुरन्‍स मार्फत पाठविले नाही हे ही वरील उल्‍लेखित दस्‍तऐवजावरुन सिध्‍द होते की, सदर प्रकरण कबाल इन्‍शुरन्‍स मार्फत गैरअर्जदारास पाठविण्‍यात आले आहे. नि.क्र.2 वरील दस्‍तऐवज क्र.5 व इतर जे दस्‍तऐवज गैरअर्जदार क्र.3 ने कबाल इन्‍शुरन्‍स मार्फत पाठविले आहे. वरील दोन्‍ही कारण मिमांसावरुन सिध्‍द होते की, अर्जदाराचे प्रकरण कबाल इन्‍शुरस मार्फत गैरअर्जदारास मिळालेले आहे व त्‍यांनी सदर प्रकरण जाणून-बुजून अर्जदारास त्रास देण्‍यासाठी निकाली काढलेले नाही.

 

      वरील विवेचनावरुन हे मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.

 

       - अंतिम आदेश

 

(1)

 

(2)

             1,00,000/- प्रस्‍ताव दाखल केल्‍यापासून म्‍हणजेच दिनांक 14.02.2014

             पासून,  द.सा.द.शे. 6 टक्‍के व्‍याजासह, आदेशाची प्रत मिळाल्‍यापासून

             45 दिवसांत द्यावे.

 

(3)

    त्रासापोटी रुपये 5,000/- व तक्रारीचा खर्च रुपये 5,000/- आदेशाची

    प्रत मिळाल्‍यापासून 45 दिवसांत द्यावे.

 

(4)

 

(5)

 

गडचिरोली.

दिनांक –  27.10.2016.

 

 

        (सादिक मो.झवेरी)                             ( रोझा फु.खोब्रागडे ) 

            सदस्‍य                                      अध्‍यक्ष (प्र.)  

 
 
[HON'BLE MS. Roza F. Khobragade]
PRESIDENT
 
[HON'BLE MR. Sadik M. Zaveri]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.