Maharashtra

Gadchiroli

CC/35/2016

Smt. Parvatibai Shankar Battinwar - Complainant(s)

Versus

The New India Assurance Company Limited Through Divisional Manager & 2 others - Opp.Party(s)

Adv. Uday Kshirsagar

27 Oct 2016

ORDER

District Consumer Disputes Redressal Forum Gadchiroli.
M.I.D.C. Road, T - Point, Navegaon,
Tah. Dist. Gadchiroli.
Pin No. 442605.
Maharashtra
 
Complaint Case No. CC/35/2016
 
1. Smt. Parvatibai Shankar Battinwar
वय- ४३ वर्ष, व्यवसाय- घरकाम, रा.पो. कुनघाडा, ता.चामोर्शी, जि. गडचिरोली.
Gadchiroli
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. The New India Assurance Company Limited Through Divisional Manager & 2 others
Divisional Office N0, 130800, New India Center, 7th Floor,17-A, Kuprej Road,Mumbai-400001
Mumbai
Maharashtra
2. The New India Assurance Company Limited Through Regional Manager
डॉ. आंबेडकर भवन, एम.ई.सी.एल. कॉम्प्लेक्स, सेमिनरी हिल्स, नागपूर-४४००१८
Nagpur
Maharashtra
3. Taluka Agriculture Officer, Chamorshi
तालुका. चामोर्शी, जिल्हा. गडचिरोली
Gadchiroli
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MS. Roza F. Khobragade PRESIDENT
 HON'BLE MR. Sadik M. Zaveri MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
Dated : 27 Oct 2016
Final Order / Judgement

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍यायमंच, गडचिरोली

 

ग्राहक तक्रार क्रमांक :-  35/2016            तक्रार नोंदणी दि. :- 15/6/2016

                        तक्रार निकाली दि. :- 27/10/2016

                                          निकाल कालावधी :-  4 म.12 दिवस

 

अर्जदार/तक्रारकर्ता      :-    श्रीमती पार्वतीबाई शंकर बत्‍तीनवार,

                              वय 43 वर्षे, व्‍यवसाय-घरकाम, 

                              रा.पो.कुनघाडा, ता.चामोर्शी, जि.गडचिरोली.

                       

                        - विरुध्‍द -

गैरअर्जदार/विरुध्‍दपक्ष   :-   (1) द न्‍यु इंडिया अॅश्‍युरन्‍स कंपनी लिमिटेड,

  तर्फे डिव्‍हीजनल मॅनेजर,

         डिव्‍हीजनल ऑफीस नं.130800, न्‍यु इंडिया

   सेंटर, 7 वा माळा, 17-ए, कुपरेज रोड,

   मुंबई-400 001.

                             (2) द न्‍यु इंडिया अॅश्‍युरन्‍स कंपनी लिमिटेड,

   तर्फे क्षेत्रीय मॅनेजर,

    एम.ई.सी.एल.कॉम्‍प्‍लेक्‍स, सेमिनरी हिल्‍स,

    नागपूर-440018.

                             (3)  तालुका कृषि अधिकारी, चामोर्शी,

    तालुका चामोर्शी, जिल्‍हा गडचिरोली.

                               

अर्जदार तर्फे वकील                :-  अधि.श्री.उदय क्षिरसागर    

गैरअर्जदार क्र.1 तर्फे वकील        :-    अधि.श्री.राजेश ठाकूर व अन्‍य

गैरअर्जदार क्र.3 तर्फे               :-   गैरहजर

 

गणपूर्ती         :-    (1) श्रीमती रोझा फुलचंद्र खोब्रागडे, अध्‍यक्ष (प्र.)

                                      (2) श्री सादिक मो‍हसिनभाई झवेरी, सदस्‍य

 

आ दे श  -

(मंचाचे निर्णयान्‍वये, सादिक मो.झवेरी, सदस्‍य)

(पारीत दिनांक : 27 ऑक्‍टोंबर 2016)

                                      

                              तक्रारकर्तीने सदर तक्रार, ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 12 अन्‍वये दाखल केली असून, तक्रारीचा आशय थोडक्‍यात येणे प्रमाणे.

 

1.          तक्रारकर्तीचे पती शेतीचा व्‍यवसाय करीत होते. शेतातील उत्‍पन्‍नावर तक्रारकर्तीचे पती कुटूंबाचे पालनपोषण करीत होते. तक्रारकर्तीचे पती श्री.शंकर हनमया बत्‍तीनवार हे दि.14.10.2013 रोजी सायकलने जात असतांना घसरुन डोक्‍यावर पडून व जखमी होऊन मृत्‍यु पावले.  शासनातर्फे तक्रारकर्तीचे पतीचा शेतकरी व्‍यक्‍तीगत अपघात विमा काढला असल्‍याने व तक्रारकर्तीचे पती शेतकरी असल्‍याने तक्रारकर्ता मृत   शेतक-याची वारसदार म्‍हणून गैरअर्जदार क्र.1 व 2  कडून रुपये 1,00,000/- च्‍या विमा रकमेसाठी पाञ होती.  तक्रारकर्तीचे पतीचा अपघाती मृत्‍यु झाल्‍याने गैरअर्जदार क्र.3  कडे विमा योजने अंतर्गत दि.11.6.2014 ला रितसर अर्ज केला, तथापि, गैरअर्जदार क्र.1 ने दिनांक 20.6.2014 रोजी तक्रारर्तीचा दावा ‘’दिलेल्‍या कागदपत्रानुसार सदर दावा आपण उशीरा का दिला याचे सबळ कारण नमुद न केल्‍याने हा दावा नामंजूर करण्‍यात येत आहे’’ या शे-यानिशी फेटाळला. वास्‍तविक, गैरअर्जदार क्र.1 ने तक्रारर्तीचा दावा नामंजूर करण्‍याआधी तक्रारकर्तीला दावा दाखल करण्‍यास उशीर का झाला याचे स्‍पष्‍टीकरण मागितले नाही व शासन निर्णयानुसार दावा उशिरा दाखल केला या कारणास्‍तव नाकारता येणार नाही, असे स्‍पष्‍ट नमुद केले आहे. पतीच्‍या मृत्‍युनंतर अर्जदार ही शोकात होती तसेच ती निरक्षर असल्‍यामुळे तीला याबाबत माहिती नव्‍हती. तसेच, शासकीय कार्यालयात सदर योजनेबाबत माहिती फलक लावलेले नाहीत . सदर योजनेची माहिती तिला उशिरा प्राप्‍त झाल्‍यामुळे, आवश्‍यक दस्‍तऐवज मिळविण्‍यास सुरुवात केली. त्‍यामुळे, अर्जदारास दावा दाखल करण्‍यास उशीर झाला. शासनाने ज्‍या उद्देशाने मृत शेतक-याच्‍या पत्‍नी व मुलांसाठी ही योजना सुरु केली त्‍या उद्देशालाच गैरअर्जदार हे तडा देत आहे. त्‍यामुळे गैरअर्जदार क्र.1 ने दावा फेटाळून सेवेमध्‍ये ञृटी केली. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍यास मानसिक, शारिरीक ञास व आर्थिक नुकसान झाले. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने गैरअर्जदारांनी विमा दाव्‍याची रक्‍कम रुपये 1,00,000/- दि.11.6.2014 पासून द.सा.द.शे. 18 % व्‍याजाने मिळण्‍याचे, तसेच मानसिक, शारिरीक व आर्थिक ञासापोटी रुपये 30,000/- व तक्रारीचे खर्चापोटी रुपये 15,000/- अर्जदारास गैरअर्जदारांकडून मिळण्‍याचे आदेश व्‍हावे, अशी प्रार्थना केली.

 

2.          अर्जदाराने नि.क्र.2 नुसार 7 झेरॉक्‍स दस्‍ताऐवज दाखल केले. अर्जदाराची तक्रार नोंदणीकरुन गैरअर्जदारास नोटीस काढण्‍यात आली. गैरअर्जदार क्र.1 ने नि.क्र.14 नुसार लेखी उत्‍तर दाखल केले व गैरअर्जदार क्र.2 व 3 विरुध्‍द लेखी उत्‍तराशिवाय प्रकरण पुढे चालविण्‍याचा आदेश नि.क्र.1 वर पारीत करण्‍यात आला.  

 

3.          गैरअर्जदार क्र.1  ने  नि.क्र.14 नुसार दाखल केलेल्‍या लेखी उत्‍तरात नमूद केले की, अर्जदाराने तक्रारीत केले सर्व आरोप त्‍यांना नाकबूल आहे.  गैरअर्जदाराने पुढे त्‍याचे लेखी उत्‍तरात नमूद केले आहे की, गैरअर्जदार क्र.1 व 2 ही विमा कंपनी असून शासनाच्‍या वतीने गैरअर्जदार क्र.3 मार्फत शेतकरी विमा योजनेअंतर्गत दावे स्विकारतात. मात्र, गैरअर्जदार क्र.3 तर्फे अर्जदाराच्‍या वडीलांचा रुपये 1,00,000/- चा विमा उतरविला होता, हे अमान्‍य आहे. याबाबत वाद नाही की, रितसर अर्ज केल्‍यानंतर व आवश्‍यक ते दस्‍ताऐवज दिल्‍यानंतरही गैरअर्जदार क्र.1 ने 20.6.2014 रोजी तक्रारकर्तीचा दावा ‘’दिलेल्‍या कागदपत्रानुसार सदर दावा आपण का उशिरा दिला याचे सबळ कारण नमुद न केल्‍याने हा नामंजूर करण्‍यात येत आहे’’ हया शे-याने फेटाळला.   गैरअर्जदार क्र.1 यांनी, विशेष कथनामध्‍ये असे नमुद केले की, गैरअर्जदार क्र.1 ने दावा निकालाकरीता कुठलाही विलंब केला नाही. सबब गैरअर्जदार क्र.1 कडून सेवेत कुठलीही त्रृटी झाली नाही. उलट, अर्जदार स्‍वतः शेतकरी विमा योजनेच्‍या अटी व शर्तीच्‍या विरुध्‍द त्‍यात नमुद विहित मुदतीच्‍या आंत दावा सादर न केल्‍याचे मान्‍य करीत आहे तसेच, आवश्‍यक दस्‍तऐवज व माहिती पुरविली नसल्‍याचे मान्‍य करीत आहे.  अर्जदार यांनी घटना घडल्‍यापासून विहित मुदतीचे आंत विमा दावा दाखल करणे आवश्‍यक होते. त्‍यामुळे, अर्जदाराची तक्रार खारीज करण्‍यात यावी, अशी विनंती केली. 

 

 

4.          अर्जदार व गैरअर्जदार क्र.1 यांनी दाखल केलेले लेखी बयान, तसेच अर्जदार व गैरअर्जदार क्र.1  ने दाखल केलेले तोंडी व लेखी युक्‍तीवादावरुन खालील मुद्दे निघतात.

 

मुद्दे                                       :  निष्‍कर्ष

 

1)    अर्जदार हा गैरअर्जदार क्र.1 व 2 चा ग्राहक आहे काय ?         :  होय

2)    गैरअर्जदार क्र.1 व 2 ने लाभार्थ्‍याप्रती सेवेत न्‍युनतापूर्ण         :  होय

व्‍यवहार केला आहे काय ?

3)    अर्जदार हा गैरअर्जदार क्र.1 व 2 कडून विमा पॉलिसीचा लाभ    :  होय

मिळण्‍यास पाञ आहे काय ?

4)    आदेश काय ?                                      : अंतिम आदेशाप्रमाणे 

                                                      

- कारण मिमांसा

मुद्दा क्रमांक 1 बाबत :-    

 

     

5.          अर्जदाराचे पती हे शेतीचा व्‍यवसाय करीत होते व शेतातील उत्‍पन्‍नावर कुटुंबाचे पालनपोषण करीत होते, ही बाब अर्जदाराने दाखल केलेल्‍या नि.क्र.2 वरील दस्‍तऐवजावरुन सिध्‍द होते. शासनातर्फे काढण्‍यात येणा-या शेतकरी अपघात विमा योजनेची शेतक-याच्‍या अपघाती मृत्‍युनंतर अर्जदार ही लाभार्थी असल्‍यामुळे गैरअर्जदार क्र.1 चे ग्राहक आहे. म्‍हणून मुद्दा क्र.1 चे उत्‍तर होकारार्थी नोंदविण्‍यात येत आहे.

       

 मुद्दा क्रमांक 2 व 3 बाबत :-     

 

6.          गैरअर्जदार क्र.1 ने दाखल केलेले लेखी उत्‍तर, युक्‍तीवाद तसेच तोंडी युक्‍तीवादावरुन हे म्‍हणणे की, सदर तक्रार ही मुदतीत नसल्‍यामुळे दावा फेटाळण्‍यात येत आहे, हे चुकीचे आहे. कारण अर्जदार ही पतीच्‍या मृत्‍युनंतर शोकात होती. तसेच अशिक्षित असल्‍यामुळे तिला या योजनेची माहिती उशिरा मिळाली व आवश्‍यक कागदपत्रांची जुळवाजुळव या सर्व कारणामुळे तक्रार दाखल करण्‍यास उशीर झाला. अर्जदार ही दुर्गम भागातील अशिक्षित असल्‍यामुळे तिला योजनेच्‍या अटी व शर्तीची माहिती नसावी व शासनातर्फे योजनेची माहिती देण्‍याचे काम व्‍यवस्थित न झाल्‍यामुळे अर्जदार वेळेवर अर्ज करु शकली नसावी, त्‍यामुळे या कारणाने दावा फेटाळणे चुकीचे आहे. अर्जदाराचे पतीचा मृत्‍यु दिनांक 14.10.2013 ला झाला व अर्जदाराने दिनांक 11.6.2014 ला विमा प्रस्‍ताव गैरअर्जदाराकडे सादर केलेला आहे. तसेच, अर्जदारातर्फे दाखल न्‍यायनिवाडे या प्रकरणात लागू पडत असल्‍यामुळे सुध्‍दा अर्जदाराने दाखल केलेला विमा दावा गैरअर्जदाराने निकाली काढण्‍यात कसूर केल्‍याचे सिध्‍द होते.

 

गैरअर्जदाराचे हे म्‍हणणे की, आवश्‍यक दस्‍तऐवज पुरविण्‍यात आलेले नाही

याबाबत कोणतेही दस्‍तऐवज गैरअर्जदार क्र.1 ने दाखल केलेले नाही. गैरअर्जदार क्र.1 चे अर्जदाराप्रती सदर कृत्‍य अनुचित व न्‍युनतापुर्ण सेवा आहे, असे या मंचाचे मत असल्‍यामुळे, मुद्दा क्र. 2 व 3 चे उत्‍तर होकारार्थी देण्‍यात येत आहे.

 

मुद्दा क्रमांक 4 बाबत :-    

 

7.    वरील विवेचनावरुन हे मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.

 

 

 

       - अंतिम आदेश

 

(1)

 

(2)

             1,00,000/- प्रस्‍ताव दाखल केल्‍यापासून म्‍हणजेच दिनांक 11.06.2014

             पासून,  द.सा.द.शे. 6 टक्‍के व्‍याजासह, आदेशाची प्रत मिळाल्‍यापासून

             45 दिवसांत द्यावे.

 

(3)

    त्रासापोटी रुपये 5,000/- व तक्रारीचा खर्च रुपये 3,000/- आदेशाची

    प्रत मिळाल्‍यापासून 45 दिवसांत द्यावे.

 

(4)

 

(5)

 

गडचिरोली.

दिनांक –  27.10.2016.

 

 

        (सादिक मो.झवेरी)                             ( रोझा फु.खोब्रागडे ) 

            सदस्‍य                                      अध्‍यक्ष (प्र.)  

 
 
[HON'BLE MS. Roza F. Khobragade]
PRESIDENT
 
[HON'BLE MR. Sadik M. Zaveri]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.