(मंचाचे निर्णयान्वये, श्री सादीक मोहसीनभाई झवेरी, सदस्य)
(पारीत दिनांक : 27 नोव्हेंबर 2014)
अर्जदार हीने सदर तक्रार, ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 अन्वये दाखल केली असून, तक्रारीचा आशय थोडक्यात येणे प्रमाणे.
1. अर्जदार ही मय्यत सुकरु श्रावण ठाकुर याची पत्नी असून त्याच्या मालकीची मौजा मारोडा, ता.चामोर्शी, जि. गडचिरोली येथील भुमापन क्र.37 व 70 शेतजमीन आहे. अर्जदार हिचा पती शेतीचा व्यवसाय करीत होता व शेतातील उत्पन्नावर अर्जदार व कुटूंबाचे पालनपोषण करीत होता. अर्जदार हिचे पतीचा मृत्यु अंगावर आकाशातून वीज पडल्याने दि.30.8.2012 ला झाला. शासनाने शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा गैरअर्जदार क्र.1 कडून काढला. अर्जदार ही मय्यत सुकरु श्रावण ठाकुर यांची पत्नी असल्याने सदर विम्याची लाभधारक आहे. विमा दाव्याचा प्रस्ताव दि.5.8.2013 रोजी गैरअर्जदार क्र.3 तर्फे सर्व कागदपञांची शहानिशा करुन गैरअर्जदार क्र.1 व 2 ला दिला. अर्जदार ही पतीचा अपघाती मृत्यु झाल्याने गैरअर्जदार क्र.1 कडून रुपये 1,00,000/- मिळण्यास पाञ होती. अर्जदार हीने गैरअर्जदारास दि.20.6.2014 रोजी वकीलामार्फत नोटीस पाठविली. नोटीसाचे गैरअर्जदारांनी काहीही उत्तर दिले नाही. गैरअर्जदारांच्या सदर कृतीमुळे अर्जदारास मानसिक व आर्थिक ञास झाला. त्यामुळे गैरअर्जदार यांनी अर्जदार हिला विमा दाव्याची रक्कम रुपये 1,00,000/- प्रस्ताव दिल्याची ता.5.8.2013 पासून द.सा.द.शे. 18 टक्के व्याजासह देण्याचे आदेश व्हावे. गैरअर्जदारांनी अर्जदारास मानसिक, शारीरीक व आर्थिक ञासापोटी रुपये 30,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रुपये 15,000/- देण्याचे आदेश व्हावे अशी प्रार्थना केली.
2. अर्जदाराने नि.क्र.2 नुसार 9 दस्ताऐवज दाखल केले. अर्जदाराची तक्रार नोंदणी करुन गैरअर्जदाराविरुध्द नोटीस काढण्यात आले. गैरअर्जदार क्र.1 ने नि.क्र.13 नुसार लेखी उत्तर व सोबत 4 दस्ताऐवज दाखल केले. गैरअर्जदार क्र.2 ने नि.क्र.14 नुसार गैरअर्जदार क्र.1 ने दाखल केलेले उत्तर हे गैरअर्जदार क्र.2 चे समजण्यात यावे अशी पुरसीस दाखल केली. गैरअर्जदार क्र.3 ने नि.क्र.16 नुसार लेखी उत्तर व सोबत 3 दस्ताऐवज दाखल केले.
3. गैरअर्जदार क्र.1 ने नि.क्र.13 वर त्याचे लेखी उत्तरात दाखल केले की, अर्जदाराने तक्रारीत लावलेले सर्व आरोप गैरअर्जदार क्र.1 ला नाकबूल आहे. गैरअर्जदाराने त्याचे लेखी उत्तरात पुढे असे कथन केले आहे की, गैरअर्जदार कंपनी 15 ऑगष्ट 2011 ते 14 ऑगष्ट 2012 व 15 ऑगष्ट 2012 ते 14 ऑगष्ट 2013 या कालावधीकरीता महाराष्ट्र शासनाचे निर्णयानुसार गैरअर्जदार कंपनी शेतकरी अपघात विमा योजना अंतर्गत गैरअर्जदार कंपनीची नियुक्ती करण्यात आली होती. गैरअर्जदाराने असे कथन केले आहे की, गैरअर्जदाराने दाखल केलेल्या दस्ताऐवजानुसार सदर विमा अपघाताची मागणी युनायटेड इंडिया इंशुरन्स कंपनी यांचेकडून केलेली आहे. गैरअर्जदार कंपनीकडून अर्जदाराने कोणतेही अपघात विमा क्लेमची मागणी केली नाही. महाराष्ट्र शासनाने दिलेल्या निर्णयानुसार सदर योजने अंतर्गत मे.कबाल इंशुरन्स ब्रोकींग सर्व्हीसेस लि. यांची सुध्दा नियुक्ती करुन ञिपक्षीय करार करण्यात आला होता. सदर प्रकरणात अर्जदाराने मे.कबाल इंशुरन्स ब्रोकींग सर्व्हीसेस लि. यांना गैरअर्जदार म्हणून पार्टी केलेले नसल्याने, सदर तक्रार खर्चासह खारीज होण्यास पाञ आहे.
4. गैरअर्जदार क्र.3 ने नि.क्र.16 नुसार दाखल केलेल्या लेखी उत्तरात नमूद केले की, अर्जदाराचे पतीचा दि.30.8.2012 रोजी शेतात कामाला गेला असता आकाशातून विज पडल्याने मृत्यु झाला. प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर या कार्यालयाचे पञ क्र./ताकृअ/आस्था/1538/2013 दिनांक 12.9.2013 अन्वये या कार्यालयाकडून मा.जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, गडचिरोली यांचेकडे व्दिप्रतीत सादर केला. त्याची प्रत गैरअर्जदार क्र.1 व 2 यांना देण्यात आली. मा.जिल्हा कृषि अधिकारी गडचिरोली यांचे पञ क्र.तां./शेअवि/3255/2013 दिनांक 23.9.2013 अन्वये अपघात विमा प्रस्तावात ञृटी असल्याने पुर्ततेकरीता प्रस्ताव या कार्यालयास परत केला. या कार्यालयाचे पञ क्र.ताकृअ/शेअवि/1619/2013 दिनांक 15.10.2013 अन्वये ञृटीची पुर्तता करण्याकरीता अर्जदार हीला प्रस्ताव परत करण्यात आला. परंतु, अर्जदार हीने अजुनही प्रस्तावाची पुर्तता करुन प्रस्ताव या कार्यालयास सादर केलेला नाही. याप्रकरणात या कार्यालयाकडून कुठल्याची प्रकारची दिरंगाई झालेली नाही. वरीष्ठ कार्यालयास प्रस्ताव सादर होऊ शकला नाही त्यास अर्जदार हे दोषी आहे. गैरअर्जदार क्र.3 यांची काहीही चुक नसल्याने दोषमुक्त करण्यात यावे, अशी विनंती केली.
5. अर्जदाराने नि.क्र.17 नुसार पुरसीस व नि.क्र.18 नुसार लेखी युक्तीवाद दाखल केले. गैरअर्जदार क्र.1 व 2 ने नि.क्र.19 नुसार शपथपञ व नि.क्र.20 नुसार लेखी युक्तीवाद दाखल केले. अर्जदार व गैरअर्जदार यांनी दाखल केलेले लेखी बयान, दस्ताऐवज, शपथपञ, लेखी युक्तीवादावरुन खालील मुद्दे निघतात.
मुद्दे : निष्कर्ष
1) अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक आहे काय ? : नाही
2) अर्जदाराचा विमा दावा मंजूर होण्यास पाञ आहे काय ? : नाही
3) अंतीम आदेश काय ? : अंतिम आदेशाप्रमाणे
- कारण मिमांसा –
मुद्दा क्रमांक 1 व 2 बाबत :-
6. अर्जदाराने दाखल केलेली तक्रार दि न्यु इंडिया अॅश्युरन्स कंपनी विरुध्द दाखल केलेली असून, अर्जदाराने सदर तक्रारीत दाखल केलेले सर्व दस्ताऐवज तलाठी, जिल्हा कृषि अधिकारी व कबाल इंशुरन्स ब्रोकींग सर्व्हीसेस लि. तर्फे युनायटेड इंडिया इंशुरन्स कंपनीला पाठविले आहे. तसेच, अर्जदाराचे वकीलाने सुध्दा अर्जदारातर्फे युनायटेड इंडिया इंशुरन्स कंपनीला नोटीस पाठविलेली आहे. एकंदरीत, पूर्ण तक्रारीत कुठेही न्यु इंडिया अॅशुरन्स कंपनी विरुध्द काहीही पुरावे नाही. जेणेकरुन हे सिध्द होते की, न्यु इंडिया अॅशुरन्स कंपनीने अर्जदारास न्युनतापूर्ण सेवा दिली आहे किंवा अनुचीत व्यापार पध्दती अवलंबलेली आहे. गैरअर्जदार क्र.3 ने सुध्दा अर्जदाराव्दारे दिलेले सर्व दस्ताऐवज कागदपञांची शहानिशा करुन युनायटेड इंडिया इंशुरन्स कंपनीला पाठविले असल्यामुळे गैरअर्जदार क्र.3 ने अर्जदारास कोणतीही न्युनतापूर्ण सेवा दिलेली नाही, असे या न्यायमंचाचे मत आहे. तसेच, गैरअर्जदार क्र.1 व 2 ने आपल्या लेखीउत्तर, शपथपञात व युक्तीवादात सुध्दा ही बाब सांगितलेली असून सुध्दा अर्जदाराने याबाबत कोणताही खुलासा किंवा साक्षी पुरावा व दस्ताऐवज प्रकरणात दाखल केलेले नाही. सबब, मुद्दा क्र.1 व 2 चे उत्तर नकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
मुद्दा क्रमांक 3 बाबत :-
7. मुद्दा क्र.1 व 2 चे कारण मिमांसावरुन अर्जदाराची सदर तक्रार खारीज होण्यास पाञ आहे असे या न्यायमंचाचे मत असून, सदर तक्रार अंतिम आदेशाप्रमाणे खारीज करण्यात येत आहे.
- अंतिम आदेश -
(1) तक्रारदाराची तक्रार खारीज करण्यात येत आहे.
(2) दोन्ही पक्षानी आप-आपला खर्च स्वतः सोसावा.
(3) उभय पक्षांना आदेशाची प्रत विनामुल्य पाठविण्यात यावी.
गडचिरोली.
दिनांक :- 27/11/2014