निकालपत्र
तक्रार दाखल दिनांकः- 01/04/2013
तक्रार नोदणी दिनांकः- 02/04/2013 तक्रार निकाल दिनांकः- 15/05/2014
कालावधी 01वर्ष.01महिना.13दिवस.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी
अध्यक्ष श्री.पी.पी.निटूरकर.B.Com.LL.B.
सदस्या
सौ.अनिता ओस्तवाल.M.Sc. L.L.B.
---------------------------------------------------------------------------------------------------------
अब्दूल वाहेब मुहंमद मोहजम अब्दूल, अर्जदार
वय 50 वर्षे. धंदा. वाहतूक व्यवसाय, अॅड.एस.एन.वेलणकर.
रा.आझम कॉलनी,हिंगोली.
विरुध्द
अधिकृत प्रतिनिधी, गैरअर्जदार.
श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स कंपनी लि. अॅड.ए.जी.सोनी.
परभणी शाखा, वसमत रोड,परभणी.
______________________________________________________________________
कोरम - 1) श्री.पी.पी.निटूरकर. अध्यक्ष.
2) सौ.अनिता ओस्तवाल. सदस्या.
(निकालपत्र पारित व्दारा.श्री.पी.पी.निटूरकर.अध्यक्ष.)
गैरअर्जदाराने अर्जदारास त्रुटीची सेवा दिली, म्हणून सदरची तक्रार आहे.
अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी आहे की, अर्जदार हा हिंगोली येथील रहिवाशी असून स्वतः वाहन चालवुन आपल्या उपजिवीकेसाठी वाहतूक व्यवसाय करतो. अर्जदाराने जानेवारी 2010 मध्ये आपल्या व्यवसाया करीता एक ट्रक विकत घेण्याचे ठरविले व त्याप्रमाणे अर्जदाराने ट्रक क्रमांक MH-26/B/4477 विकत घेण्याकरीता 2 लाख रु. चे गैरअर्जदाराकडून अर्थसहाय्य घेवुन खरेदी केला. त्याकरीता प्रथम दिनांक 19/01/2010 रोजी Document Charges व इतर Charges चे 5,493/- रु. गैरअर्जदाराकडे भरले, त्यानंतर दिनांक 05/02/2010 रोजी Goods carriage चे परमीट दिनांक 04/02/2015 पर्यंत आर.टी. ओ. हिंगोली येथून नुतनीकरण करुन घेतले व अर्जदाराने दिनांक 06/03/2010 रोजी 1 वर्षाचे सदर ट्रकचे Fitness Certificate पण घेतले.
अर्जदाराचे म्हणणे की, सदर कर्जाची परतफेड अर्जदाराने 6,400/- रु. दरमहा प्रमाणे एकुण 36 हप्ते ( महिन्यात ) गैरअर्जदाराकडे करायची ठरली होती, म्हणजेच एकुण 2,30,600/- एवढी रक्कम परतफेड करायची होती. सदर कर्जफेडीचा पहिला हप्ता मार्च 2010 पासून सुरु होवुन शेवटचा हप्ता फेब्रुवारी 2013 पर्यंत होता.
अर्जदाराचे म्हणणे की, मार्च 2010 पासून डिसेंबर 2012 पर्यंत अर्जदाराने खालील प्रमाणे रक्कम भरलेली आहे.
मार्च 2010 ते डिसेंबर 2010 ( 10 पावत्या ) 58,000/- रु.
जानेवारी 2011 ते डिसेंबर 2011 ( 8 पावत्या ) 52,700/- रु.
जानेवारी 2012 ते डिसेंबर 2012 ( 8 पावत्या ) 62,370/- रु.
----------------------- एकुण 1,73,070/-
-----------------------
अर्जदाराचे म्हणणे की, अर्जदाराकडे फेब्रुवारी 2013 पर्यंत एकुण कर्ज परतफेड 2,30,600/- पैकी 57,530/- एवढी रक्कम बाकी होती. परंतु कांही अडचणीमुळे अर्जदार जानेवारी 2013 मध्ये कांही रक्कम भरु शकला नाही.
अर्जदाराचे म्हणणे की, गैरअर्जदाराने अचानक फेब्रुवारी 2013 मध्ये अर्जदारास परभणी कार्यालयात बोलावले व सांगीतले की, त्याने वेळेवर कर्जफेड न केल्याने करार संपुष्टात आले आहे. व शिल्लक राहिलेल्या रक्कमेसाठी Refinance करावे लागेल असे सांगुन पुन्हा नविन कागदावर अर्जदाराच्या सहया घेतल्या, व मार्च 2013 पासून पुन्हा नवीन कराराप्रमाणे हप्ते भरावे लागतील, असे गैरअर्जदाराने अर्जदारास सांगीतले.
अर्जदाराचे म्हणणे की, गैरअर्जदाराचे सदरचे कृत्य चुकीचे व धक्कादायक आहे. कारण त्याने गैरअर्जदारास Refinance ची मागणी कधीही केलेली नव्हती. विनाकारण त्यात गुंतवले आहे. व गैरअर्जदाराने Refinance चे कागदपत्रे अर्जदारास दिली नाहीत.
अर्जदाराचे म्हणणे की, शेवटी मार्च 2013 मध्ये अर्जदाराने गैरअर्जदाराची भेट घेवुन 60,000/- रु. भरायची तयारी दर्शविली, परंतु गैरअर्जदारांनी 1,60,000/- रु. अर्जदारास भरावे लागतील असे सांगीतले, म्हणून सदरची तक्रार दाखल करणे भाग पडले व मंचास विनंती केली आहे की, सदरचा तक्रार अर्ज मंजूर करुन गैरअर्जदारास आदेश करावा की, त्यांनी अर्जदाराकडून 57,530/- रु. स्विकारुन अर्जदारास वाहन क्रमांक MH-26-B-4477 चे कर्ज बेबाकी प्रमाणपत्र व NOC अर्जदारास द्यावेत. तसेच मानसिक त्रासापोटी 5000/- व तक्रार अर्ज खर्चापोटी 5000/- रु. गैरअर्जदाराने अर्जदारास देण्याचा आदेश व्हावा.
अर्जदाराने तक्रार अर्जाच्या पुष्टयार्थ नि.क्रमांक 2 वर आपले शपथपत्र दाखल केले आहे.
अर्जदाराने पुराव्याबाबत नि.क्रमांक 6 वर 28 कागदपत्राच्या यादीसह 28 कागदपत्रे दाखल केले आहेत. ज्यामध्ये पावती क्रमांक 9465908 ची प्रत, वाहन नुतनीकरणाची प्रत, वाहन ताबा पावती, दिनांक 03/03/2010 ची पावती,
05/04/2010 ची पावती, 28/05/2010 ची पावती, 12/06/2010 ची पावती, 13/08/2010 ची पावती, 06/09/2010 ची पावती, 18/09/2010 ची पावती, 12/10/2010 ची पावती, 04/11/2010 ची पावती, 14/12/2010 ची पावती, 05/01/2011 ची पावती, 05/03/2011 ची पावती, 06/04/2011 ची पावती, 05/05/2011 ची पावती, 06/06/2011 ची पावती, इ.प्रती दाखल केले आहेत.
तक्रार अर्जास लेखी निवेदन सादर करण्यासाठी मंचातर्फे गैरअर्जदारास नोटीस काढण्यात आली.
गैरअर्जदार वकिला मार्फत मंचासमोर हजर व नि.क्रमांक 16 वर आपला लेखी जबाब सादर केला, त्यात त्यांचे असे म्हणणे आहे की, सदरची तक्रार चालवण्याचा मंचास अधिकार नाही, करारानुसार अर्जदाराने सदरचे प्रकरण आरबिट्रेटरकडे दाखल करणे आवश्यक होते. म्हणून सदरचे प्रकरण चालवण्याचा मंचास अधिकार नाही.
गैरअर्जदाराचे म्हणणे की, अर्जदार हा जानेवारी 2010 मध्ये गैरअर्जदाराकडे आला व कर्जपुरवठा करण्यासाठी विनंती केली, त्याप्रमाणे गैरअर्जदाराने दिनांक 01/02/2010 रोजी अर्जदारास 1,50,000/- रु. चा कर्ज पुरवठा ट्रक खरेदी करण्यासाठी केला, ज्यावर व्याज आकारणी 82,513/- अशी होती. म्हणजेच एकुण रक्कम 2,32,513/- ही रक्कम अर्जदारास 6,446/- रु. मासिक हप्त्याने एकुण 36 महिण्यात परतफेड करायची होंती व सदर करारावर अर्जदाराने सहया केल्या आहेत.
गैरअर्जदाराचे म्हणणे की, फेब्रुवारी 2013 पर्यंत 57,530/- रु. एवढीच रक्कम बाकी होती, असे म्हणणे अर्जदाराचे एकदम चुकीचे आहे.
अर्जदाराने मंचापासून सत्यपरिस्थिती लपवुन ठेवलेली आहे. वास्तविक पहाता अर्जदार दिनांक 04/10/2010 रोजी गैरअर्जदाराकडून WCL ( Working Capital Loan ) म्हणून 24,000/- रु. घेतले होते. तसेच दिनांक 06/08/2011 रोजी 40,000/- रु. WCL म्हणून अर्जदाराने गैरअर्जदाराकडून घेतले आहेत व ही बाब अर्जदाराने मंचापासून लपवुन ठेवलेली आहे. तसेच सदर वाहनावर गैरअर्जदाराने कर्ज पुरवठा केलेला असले कारणाने आर.टी.ओ. कार्यालया मधील नोंदणीवर गैरअर्जदाराच्या नावाने अधिभार असल्याने सदर वाहनाचा विमा हा गैरअर्जदारा मार्फतच निघतो व त्या विम्याचे पैसे हे अर्जदार जो हे वाहन वापरत असतो हा भरतो, त्यानुसार अर्जदाराने कर्ज खात्यात दिनांक 09/03/2010, 09/03/2011 व 09/03/2012 रोजी विम्याच्या रक्कमे संबंधी नोंदी आहेत.
गैरअर्जदाराचे म्हणणे की, अर्जदाराने घेतलेल्या कर्ज रक्कमेची परतफेड ही पुर्णपणे केली नसलेमुळे त्यास दिलेल्या परतफेडीचा अवधी संपल्यामुळे गैरअर्जदाराने उर्वरित रक्कम भरुन खाते बंद करावे अशी सुचना अर्जदारास दिली होती. त्यावेळी अर्जदार त्याच्या वैयक्तिक अडचणीमुळे रक्कम भरु शकत नाही, असे गैरअर्जदारास सांगीतले व तुम्ही मला परत माझ्याकडे शिल्लक असलेल्या रक्कमे एवढे Refinance करुन द्या, असे अर्जदाराने गैरअर्जदारास विनंती केली. त्यानुसार गैरअर्जदाराने अर्जदाराने मागील केलेल्या रक्कमेचा भरणा लक्षात घेवुन त्याचे खाते उता-यामध्ये बाकी असलेली रक्कम पाहून त्यानुसार अर्जदाराला रु. 1,46,500/- एवढे कर्ज दिले त्यास 85,184/- व्याज असे एकुण 2,31,684/- 6,255/- रु. मासिक हप्ता नुसार 37 हप्त्यामध्ये फेडण्यास सांगीतले व ते अर्जदाराने मान्य केले व त्यानुसार नवीन करार केला. आम्ही अर्जदारास कसल्याही प्रकारची सेवेत त्रुटी दिली नाही. म्हणून गैरअर्जदाराने मंचास विनंती केली आहे की, सदरची तक्रार अर्जदारास दंड आकारुन खारीज करण्यात यावी.
गैरअर्जदाराने पुराव्याबाबत नि.क्रमांक 15 वर एक कागदपत्राच्या यादीसह 1 कागदपत्रे दाखल केले आहेत. ज्यामध्ये कर्ज कराराची प्रत दाखल केली आहे.
दोन्ही बाजुंच्या कैफियतीवरुन निर्णयास उपस्थित होणारे मुद्दे खालील प्रमाणे आहेत.
मुद्दे. उत्तर.
1 गैरअर्जदाराने अर्जदारास कर्जाची अतीरिक्त रक्कमेची
मागणी करुन अर्जदारास सेवेत त्रुटी दिली आहे काय ? नाही.
2 आदेश काय ? अंतिम आदेशा प्रमाणे.
कारणे.
मुद्दा क्रमांक 1.
अर्जदाराचे म्हणणे की, ट्रक क्रमांक MH-26/B/4477 खरेदी करतांना त्याने गैरअर्जदाराकडून 2 लाखाचे कर्ज घेतले होते. व ज्याची एकुण परतफेड रक्कम 2,30,600/- एवढी होती. व सदर कर्जाची परतफेड एकुण 36 हप्त्यामध्ये व प्रत्येक मासिक हप्ता 6400/- रु. चा होता व सदर परतफेडीचा कालावधी मार्च 2010 ते फेब्रुवारी 2013 पर्यंत होता, याबाबत अर्जदाराने सदर कर्ज कराराची प्रत पुरावा म्हणून मंचासमोर दाखल केली नाही.
सदर कर्जाबाबत गैरअर्जदाराचे लेखी जबाबात म्हंणणे की, अर्जदाराने त्यांचेकडून दिनांक 01/02/2010 रोजी 1,50,000/- रु. चे ट्रक खरेदीसाठी कर्ज घेतले होते व व्याज आकारणी 82,513/- अशी होती व अर्जदाराने एकुण 2,32,513/- रक्कम प्रत्येक मासिक हप्ता 6446/- प्रमाणे 36 महिन्या मध्ये करायची ठरली होती. गैरअर्जदाराने देखील सदर कर्जा बाबतच्या कराराची प्रत मंचासमोर दाखल केली नाही. अर्जदाराचे म्हणणे की, त्याने गैरअर्जदाराकडे कर्जाच्या परतफेडीपोटी
मार्च 2010 ते डिसेंबर 2010 पर्यंत 58,000/- रु.
जानेवारी 2011 ते डिसेंबर 2011 पर्यंत 52,700/- रु.
जानेवारी 2012 ते डिसेंबर 2012 पर्यंत 62,370/- रु.
-------------------------------- 1,73,070/- भरले आहेत. --------------------------------
याबाबत अर्जदाराने नि.क्रमांक 6 वरील दाखल केलेल्या पावत्याचे अवलोकन केले असता, अर्जदाराने गैरअर्जदाराकडे खालील रक्कमा भरल्याचे निदर्शनास येते.
दिनांक रक्कम
03/03/2010 6,500/-
05/04/2010 7,000/-
28/05/2010 5,000/-
12/06/2010 5,000/-
13/08/2010 6,500/-
06/09/2010 4,000/-
18/09/2010 6,500/-
12/10/2010 3,000/-
04/11/2010 7,000/-
14/12/2010 7,500/-
05/01/2011 7,100/-
05/03/2011 7,100/-
06/04/2011 7,000/-
05/05/2011 7,500/-
06/06/2011 5,000/-
10/10/2011 5,000/-
05/11/2011 7,000/-
05/12/2011 7,000/-
04/01/2012 8,170/-
06/02/2012 7,000/-
05/03/2012 9,000/-
03/04/2012 5,000/-
09/05/2012 7,000/-
05/07/2012 10,000/-
29/09/2012 8,000/-
05/12/2012 8,200/-
अर्जदाराने सदर कर्जाची परतफेड अर्जदाराच्या म्हणणेनुसार प्रत्येकी मासिक हप्ता 6,400/- रु. ठरल्याप्रमाणे गैरअर्जदाराकडे भरल्याचे सदर कागदपत्रावरुन दिसून येत नाही.
गैरअर्जदाराचे लेखी जबाबात म्हणणे की, अर्जदाराने सदर कर्जाचे परतफेड पूर्ण केली नाही, म्हणून अर्जदाराने गैरअर्जदाराकडे परत एकदा Refinance केले व ही बाब नि.क्रमांक 15 वर दाखल केलेल्या कर्ज कराराच्या प्रतीवरुन सिध्द होते. व निश्चित अर्जदाराने सदरची बाब मंचासमोर लपवुन ठेवली आहे. हे सिध्द होते.
अर्जदार आपली तक्रार सिध्द करणेस पुर्णपणे असमर्थ ठरला आहे. असे मंचाचे मत आहे. गैरअर्जदाराने अर्जदारास सेवेत त्रुटी दिल्याचे कोठेही दिसून येत नाही. म्हणून मुद्दा क्रमांक 1 चे नकारार्थी उत्तर देवुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1 अर्जदाराचा तक्रार अर्ज नामंजूर करण्यात येते.
2 तक्रारीचा खर्च ज्याचा त्यांनी सोसावा.
3 आदेशाच्या प्रती पक्षकारांना मोफत पुरवाव्यात.
सौ.अनिता ओस्तवाल. श्री. पी.पी.निटूरकर
मा.सदस्या. मा.अध्यक्ष.