Maharashtra

Nanded

CC/09/5

Kisan Maroti Patil - Complainant(s)

Versus

Thasildar,Mukhad - Opp.Party(s)

Adv.Bhure B.V.

26 Jun 2009

ORDER


District Consumer Reddressal Forum , NandedDistrict Consumer Forum , Visava Nagar, V.I.P. Road, Nanded
Complaint Case No. CC/09/5
1. Kisan Maroti Patil R/o.LadgaTq.Mukhad Dist.NandedNandedMaharastra ...........Appellant(s)

Versus.
1. Thasildar,Mukhad Thasil office,Mukhad tq.mukhad dist.nandedNandedMaharastra2. Director,National Insurance Company Limited.Stalinge Senema Bilding 2nd flower 65 musban road,D.O.14 K Fourt,Mumbai.NandedMaharastra3. National Insurance Company Limited,C/O.Branch Manger,Branch,Nagina ghata road,nanded.NandedMaharastra4. Ditecter,Kabal insurance service pvt limited.Shop no.2 desha alankar town center cidco,Aurangabad.NandedMaharastra ...........Respondent(s)



BEFORE:

PRESENT :

Dated : 26 Jun 2009
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

 

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍यायमंच, नांदेड
प्रकरण क्र.2009/05.
                                                     प्रकरण दाखल दिनांक  06/01/2009.
                                                     प्रकरण निकाल दिनांक 23/06/2009.
                                                   
समक्ष         -    मा.श्री.बी.टी. नरवाडे,पाटील       अध्‍यक्ष.
                       मा.श्रीमती सुजाता पाटणकर,   सदस्‍या.
                       मा. श्री.सतीश सामते.                सदस्‍य.
किशन मारोती पाटील,
वय, 65 वर्षे, धंदा शेती                                   अर्जदार रा. लादगा ता. मुखेड जि. नांदेड.
 
विरुध्‍द
 
1.   तहसीलदार,
     तहसील कार्यालय, मुखेड ता. मुखेड जि.नांदेड.
2.   व्‍यवस्‍थापक,
     नॅशनल इन्‍शुरन्‍स कंपनी लि.
     स्‍टलिंग सिनेमा बिल्‍डींग, दूसरा मजला, 65 मर्झबान रोड,
     डि.ओ.14 ख फोर्ट मुंबई 400 001                     गैरअर्जदार
3.   नॅशनल इन्‍शुरन्‍स कंपनी लि.
     मार्फत शाखा व्‍यवस्‍थापक,
     शाखा नगिना घाट रोड, नांदेड.
4.   व्‍यवस्‍थापक,
     कबाल इन्‍शुरन्‍स ब्रोकींग सर्व्‍हीसेस प्रा.लि. 
     शॉप नंबर 2, दीशा अलंकार टाऊन सेंटर, सिडको,
     औरंगाबाद.
5.   शशीकलाबाई देविदास पाटील,
     वय, 35 वर्षे, धंदा शेती,
     रा. लादगा पो. सावरगांव ता. मुखेड जि.नांदेड.
अर्जदारा तर्फे.               - अड.बी.व्‍ही.भूरे
गैरअर्जदार क्र.1 तर्फे          - अड.एल.एस.एकलारे.
गैरअर्जदार क्र.2 व 3 तर्फे     - अड.एम.बी.टेळकीकर.
गैरअर्जदार क्र.4 तर्फे         -   स्‍वत
गैरअर्जदार क्र.5 तर्फे         -   अड.ए.व्‍ही.चौधरी.
 
निकालपत्र
(द्वारा,मा.श्री.सतीश सामते, सदस्‍य)
 
              गैरअर्जदार नॅशनल इन्‍शुरन्‍स कंपनीच्‍या सेवेतील ञूटी बददल अर्जदार यांनी आपली तक्रार खालील प्रमाणे नोंदविली आहे.
              प्रकरणतील हकीकत खालील प्रमाणे अर्जदार हे मयत देविदास कीशन पाटील यांचे पिता असून ते राहणारे लादगा ता. मुखेड येथील रहीवासी असून मयत हे येथील गट नंबर 270 मधील 1 हेक्‍टर 20 आर या जमिनीचे मालक  व शेतकरी होते. दि.21.5.2007 रोजी सोनखेड येथील विश्रामगृहा समोर अपे अटो नंबर एम.एच.26-एच-1929 ला अज्ञात वाहनाने समोरुन धडक दिल्‍यामूळे अर्जदाराच्‍या मूलाचा जागेवरच मृत्‍यू झाला. त्‍या बाबत पी.एम.रिपोर्ट, मृत्‍यू पञ, मरणोत्‍तर पंचनामा, इत्‍यादी दस्‍ताऐवज तसेच शेतकरी असल्‍या बददल शेतीचा 7/12 असे कागदपञ दाखल केलेले आहे.  महाराष्‍ट्र शासनाने महाराष्‍ट्र राज्‍यातील शेतक-याचे विमा संरक्षण देण्‍यासाठी शेतकरी अपघात विमा योजना गैरअर्जदार क्र.2 यांचेकडे घेतली होती. ज्‍यांचे प्रिमियम शासनाने भरलेले आहे.  त्‍यामूळे गैरअर्जदार क्र.2 ने शेतक-यांची सर्व प्रकारची जोखीम स्विकारलेली आहे. अर्जदाराची पत्‍नी ही शेतकरी असून म्‍हणून तीही लाभार्थी आहे. सदर पॉलिसीचा कालावधी हा दि.15.7.2006 ते 14.7.2007 असा आहे. शासनाच्‍या जी आर नुसार मूलाच्‍या मृत्‍यूनंतर तलाठी सज्‍जा यांचेकडून क्‍लेम फॉर्म घेतला व आवश्‍यक त्‍या कागदपञासह तहसिलदार, मूखेड यांचेकडे विम्‍याची रक्‍कम मिळण्‍यासाठी दिला पण हा अर्ज देण्‍यास विलंब झाला त्‍यांचे कारण अर्जदार हा ग्रामीण भागातील अडाणी असल्‍यामूळे व त्‍यांस सदरील योजनेची माहीती नसल्‍यामूळे तसेच सर्व कूटूंब हे दूखात असल्‍यामूळे गैरअर्जदार यांचेकडे क्‍लेम दाखल करण्‍यास उशिर झाला. अर्जदार हा सदर पॉलिसीनुसार रक्‍कम मिळण्‍यास हक्‍कदार आहे. गैरअर्जदार यांनी क्‍लेम दाखल केल्‍यानंतर देखील वेळोवेळी बेकायेदशीरपणे मागितलेली सर्व कागदपञे गैरअर्जदार यांचेकडे दाखल केली परंतु त्‍यांनी चूकीचे कारण देऊन  क्‍लेम नाकारला. केवळ क्‍लेम दाखल करण्‍यास उशिर झाला म्‍हणून नो क्‍लेम केल्‍याचे कळविले. अर्जदारांची मागणी आहे की, विम्‍याची रक्‍कम रु.1,00,000/- व त्‍यावर 18 टक्‍के व्‍याज तसेच मानसिक ञासापोटी रु.50,000/- व दावा खर्च म्‍हणून रु.5,000/- अर्जदार यांना मिळावेत.
              गैरअर्जदार क्र.1 हे हजर झाले त्‍यांनी आपले लेखी म्‍हणणे स्‍वतः दाखल केलेले आहे. याप्रमाणे अर्जदार हे लादगा ता. मूखेड येथील रहीवासी असून त्‍यांचा अपघातात मृत्‍यू झाला व ते शेतकरी विमा योजनेचा लाभ मिळण्‍यास पाञ आहेत. अर्जदार यांनी सादर केलेल्‍या विम्‍याची कागदपञ नॅशनल इन्‍शूरन्‍स कंपनी मुंबई यांचेकडे सादर केलेली आहेत. अर्जदार यांचा लाभ देण्‍या बाबतचा विमा प्रस्‍ताव प्रलंबित नाही.  म्‍हणून अर्जदार यांनी या कार्यालयात नूकसान भरपाईसाठी दि.18.7.2007 रोजी सादर केलेले कागदपञ कबाल इन्‍शुरन्‍स सर्व्‍हीस प्रा.लि. औरंगाबाद यांचे कडे पाठविले आहेत.
              गैरअर्जदार क्र.2 व 3 यांनी आपले म्‍हणणे एकञित व संयूक्‍तीकरित्‍या दाखल केलेले आहेत. गैरअर्जदार यांचा पहिला आक्षेप असा आहे की. दावा मूदतीत नाही. विमा पॉलिसीतील  शर्थी व अटी विरुध्‍द तो विसंगत आहे. दावा संबंधी पॉलिसीच्‍या अधीन नसून तो फेटाळण्‍याजोगा आहे. अर्जदाराचा कथीत मयत देविदास कीशन पाटील हे दि.21.5.2007 रोजी सोनखेड येथील विश्राम गृहासमोरील त्‍यांच्‍या अपे ऑटो नंबर एम.एच.-26-एच-1929 यांला अज्ञात वाहनाने धडक दिल्‍यामूळे त्‍यांचा मृत्‍यू झाला हे त्‍यांचे म्‍हणणे खोटे आहे. उलट मयत देविदास यांचा मृत्‍यू हा नैसर्गिक आहे म्‍हणून ते नूकसान भरपाई मिळण्‍यास हक्‍कदार नाहीत. अर्जदाराच्‍या  मूलाचा मृत्‍यू झाल्‍यामूळे अज्ञात चालक विरुध्‍द गून्‍हा दाखल करण्‍यात आलेला आहे. जो की चूकीचा असून नूकसान भरपाई साठी जाणीवपूर्वक करण्‍यात आलेला आहे. तसेच अर्जदाराचा मूलगा हा व्‍यवसायाने शेतकरी होता हे सूध्‍दा त्‍यांचे म्‍हणणे खोटे आहे.त्‍यांचे कारण अर्जदाराचा कथीत मयत मूलगा हा अटो रिक्षा चालवित होता परंतु दाव्‍यात तो शेतकरी होता अशी नोंद आहे. जे की गैरअर्जदार यांना मान्‍य नाही. अर्जदाराच्‍या कथीत मयत मूला कडे मोटार वाहन चालविण्‍याचा परवाना होता व सदरील अटो तो चालवित होता. अर्जदाराचा प्रस्‍तूत दावा विमा पॉलिसीच्‍या करारातील तरतूदी, शर्ती तथा अटीत बसत नाही. अर्जदाराचा क्‍लेम हा 90 दिवसांनी मिळाला आहे व विलंब का झाला यांचा खूलासा करण्‍यात आलेला नाही. अर्जदाराने मोटार वाहन प्राधीकरणाकडे नूकसान भरपाई मिळण्‍या संबंधीचा दावा का केला नाही यासंबंधी खूलासा केलेला नाही. अर्जदाराला एकाच अपघातासंबंधी एकच क्‍लेम मागता येईल. मयताच्‍या मृत्‍यू संबंधी दोन वेगवेगळे नूकसान भरपाई मागता येणार नाही. म्‍हणून अर्जदाराचा नूकसान भरपाईचा दावा खर्चासह फेटाळण्‍यात यावा अशी विनंती केली आहे.
              गैरअर्जदार क्र.4 यांनी आपले लेखी म्‍हणणे पोस्‍टाने पाठविले आहे. त्‍यात ते IRDA Approved Insurance Advisor Company appointed as a consultant by Govt. of Maharashtra  व यासाठी ते शासनाकडून कोणतीही रक्‍कम मानधन म्‍हणून देखील स्विकारत नाहीत. त्‍यामूळे त्‍यांचे विरुध्‍द दावा चालू शकत नाही. अर्जदार यांचा क्‍लेम त्‍यांचेकडे दि.14.4.2008 रोजी तहसिलदार यांचेकडून आला परंतु एमओयू  प्रमाणे क्‍लेम हा 90 दिवसांनी उशिराने आला व त्‍यांची ती योग्‍य ती कारणे दिलेले नाहीत. त्‍यामूळे पॉलिसीतल शर्ती व अटीनुसार अर्जदार यांना क्‍लेम मिळू शकणार नाही. त्‍यामूळे तो न स्विकारता तहसिलदार यांचेकडे वापस पाठविण्‍यात आला. मध्‍यस्‍थ करणे व शेतक-यांच्‍या प्रस्‍तावाची छाननी करणे व योग्‍य त्‍या शिफारशीसह इन्‍शूरन्‍स कंपनीकडे पाठवीणे एवढेच त्‍यांचे काम आहे. त्‍यामूळे त्‍यांचे विरुध्‍दचा दावा खारीज करावा.
               गैरअर्जदार क्र.5 हे वकिलामार्फत हजर झाले व त्‍यांनी आपले लेखी म्‍हणणे दाखल केलेले आहे. याप्रमाणे शंशीकलाबाई ही मयत देवीदास पाटील यांची पत्‍नी आहे. यात गैरअर्जदार क्र.5 हे देखील वारसदार आहे ही बाब अर्जदार यांनी लक्षात घेणे आवश्‍यक होते परंतु त्‍यांनी ते हेतूपूरस्‍पर जाणूनबूजून टाळलेले आहे. अर्जदार यांनी गैरअर्जदार क्र.1 व 2 यांचेकडे क्‍लेम फॉर्म पाठविला या बाबतची सूचना त्‍यांना दिली नाही व त्‍यांचे अधिकार व हक्‍क डावलून केलेली आहे. त्‍यामूळे त्‍यांचा यांला आक्षेप आहे. अर्जदार हा मयताच्‍या पॉलिसीनुसार नूकसान भरपाई मिळण्‍यास हक्‍कदार आहे हे त्‍यांचे म्‍हणणे अत्‍यंत चूकीचे आहे. फक्‍त गैरअर्जदार क्र.5 ही पॉलिसीनुसार मयताची एकमेव वारसदार ठरते. कारण मयत देविदास कीशन पाटील यांना अर्जदार यांनी गट नंबर 170 मध्‍हये 1 हेक्‍टर 20 आर ही जमीन वाटणी नुसार दिलेली आहे. ज्‍याचा मयताच्‍या पश्‍चात केवळ कायदेशीर वारस म्‍हणून त्‍यांची पत्‍नी  म्‍हणजे गैरअर्जदार क्र.5 ही एकमेव वारस ठरते. मयतास मिळालेली जमीन मयतानंतर गैरअर्जदार क्र.5 यांचे नांवे झालेली ेआहे. याबददल 7/12 व वारसा प्रमाणपञ गैरअर्जदार क्र.5 यांनी पूराव्‍याकामी सादर केलेले आहे. मयत देवीदास यांच्‍या अपघाताबददल वस्‍तूस्थिती व घडलेली घटना याबददल त्‍यांचेवर काळाने घाला घातला आहे त्‍यामूळे गैरअर्जदार क्र.5 हया पूर्णतः निराधार व हतबल झाल्‍या आहेत. मयताशिवाय त्‍यांचा कोणताही आधार नसल्‍यामूळे तक्रार मंजूर करावी पण तक्रारदाराची मागणी ही गैरअर्जदार क्र.5 यांना देण्‍यात यावी असे म्‍हटले आहे. शेतक-यांचा विमा योजनेनुसार अशा प्रकारची रक्‍कम मिळते व ती आपल्‍याला देखील मिळू शकते अशी कोणतीही माहीती हेतूपूरस्‍पर व जाणीवपूर्वक तसेच स्‍वार्थापोटी अर्जदार यांनी दिलेली नाही. एवढेच तर अर्जदार यांना मयत देविदास यांची लाईफलाईन केअर अंतर्गत आकस्‍मात मृत्‍यूचा लाभ मिळण्‍या संदर्भात असलेली पॉलिसी ही परस्‍पर रु.1,00,000/- रक्‍कम उचलून घेतली आहे व त्‍यांचे कार्यालय नांदेड येथे आहे व ही बाब  त्‍यांचे उशिरा लक्षात आली. यांचेही वारस पत्‍नी म्‍हणून गैरअर्जदार क्र.5 हीच आहे. अशा प्रकारे अर्जदार यांनी त्‍यांची फसवणूक केली आहे. ही बाब या तक्रारीत स्‍वतंञपणे दिसून येते. कारण  अर्जदार यांचा हेतू स्‍वच्‍छ व सरळ असता तर त्‍यांनी गैरअर्जदार क्र.5 यांचे संमतीपञक घेतले असते अथवा त्‍यांच्‍या मार्फत सदरची तक्रार दाखल केली असती. अर्जदार यांनी मंचात वारस प्रमाणपञ संदर्भात न्‍यायालयीन कागदपञ दाखल केलेले आहेत. त्‍यात देखील गैरअर्जदार क्र.5 यांचे नांव दाखवले आहे. कायदेशीर वारस हिंदू वारस कायदयाप्रमाणे असल्‍यामूळे त्‍यांना सदरील लाभ मिळावयास पाहिजे त्‍यामूळे गैरअर्जदार यांची मागणी आहे की, पॉलिसीचा लाभ हा त्‍यांचे एकटयाचे नांवे करुन दयावा व तक्रार त्‍यांचे हक्‍कात मंजूर करुन दयावी.
              अर्जदार यांनी पूरावा म्‍हणून आपले शपथपञ तसेच गैरअर्जदार यांनी पूरावा म्‍हणून आपले शपथपञ दाखल केलेले आहे. दोन्‍ही पक्षकारांनी दाखल केलेले दस्‍ताऐवज बारकाईने तपासून व वकिलामार्फत केलेला यूक्‍तीवाद ऐकून खालील मूददे उपस्थित होतात.
          मूददे                               उत्‍तर
 
   1. अर्जदार यांचा दावा मूदतीत आहे काय ?              होय.
2. गैरअर्जदार यांचे सेवेतील ञूटी सिध्‍द
       होते काय  ?                                     होय. 
   3. अर्जदार विम्‍याची रक्‍कम मिळण्‍यास पाञ आहेत
       काय ?                                        नाही.
   4. विम्‍याची रक्‍कम मिळण्‍यास कोण पाञ आहे ?     गैरअर्जदार क्र.5
 3. काय आदेश ?                            अंतिम आदेशाप्रमाणे
                          कारणे
मूददा क्र.1 ः- 
                             अर्जदार यांनी आपला दावा दि.14.11.2007 रोजी तलाठयामार्फत तहसिलदार यांचेकडे दाखल केलेला होता व तो गैरअर्जदार क्र.4 यांना दि.16.4.2008 रोजी मिळाला. गैरअर्जदार यांचे म्‍हणण्‍यानुसार व पॉलिसीतील अटी व शर्तीनुसार शेतक-याचा अपघाती मृत्‍यू झाल्‍यानंतर 90 दिवसांचे आंत तो प्रस्‍ताव तहसिलदार यांचेकडे यावयास पाहिजे. ही पॉलिसीतील अट जरी असली तरी ती बंधनकारक किंवा मॅन्‍डेंटरी नाही व त्‍यात अर्जदार यांनी आपल्‍या तक्रार अर्जात परिच्‍छेद क्र.8 मध्‍ये असे नमूद केलेले आहे की, अर्जदार हा ग्रामीण भागातील अडाणी आहे व त्‍यांना या योजनेबददलची माहीती नाही तसेच त्‍यांचा मूलगा यांचा मृत्‍यू झाल्‍यामूळे सर्व कूटूंब दूखात होते व अशा परिस्थितीत पॉलिसीच्‍या नियमाप्रमाणे क्‍लेम दाखल करणे शक्‍य नाही. म्‍हणून गैरअर्जदार यांचेकडे क्‍लेम दाखल करण्‍यास उशिर झाला हे अर्जदाराने नमूद केलेली कारणे योग्‍य व संयूक्‍तीक वाटतात. ग्रामीण भागामध्‍ये अजूनही शासन आपल्‍यासाठी विमा योजना राबविते यांची माहीती नसते म्‍हणून  आम्‍हास शासनास अशी सूचना करावीसी वाटते की,त्‍यांनी वर्तमान पञात,टेलीव्‍हीजन किंवा अशा अनेक प्रसार माध्‍यमातून  यांचा प्रसार करावा जेणे करुन यांची माहीती अर्जदार यांना कळेल. अर्जदार यांना विलंब होण्‍यासाठी जे कारण दाखविले आहे ते अतीशय योग्‍य असल्‍याकारणाने त्‍यांना विलंब माफी आम्‍ही देत आहोत. म्‍हणून हा दावा मूदतीत येतो. याबददल शासनाचे परिपञक दाखल केलेले आहे. कालावधी बददल गैरअर्जदार यांना आक्षेप नाही. परिपञकातील नियम नंबर 11 हे दाखल करण्‍यास बंधनकारक नाही. त्‍याचप्रमाणे शेतक-याचा विमा प्रस्‍ताव  विहीत कागदपञासह विमा योजनेच्‍या कालावधीत केव्‍हाही प्राप्‍त णला तर तो मंजूर करणे बंधनकारक राहील असे परिपञकात स्‍पष्‍ट नमूद केलेले आहे. तसेच प्रस्‍ताव तांञिक मूदयावर टाळता येणार नाही. विलंब झाल्‍याबददल 2008 (2) ALL MR (JOURNAL) 13  मा. राज्‍य आयोग, महाराष्‍ट्र यातील आयसीआयसीआय लोम्‍बार्ड जनरल इन्‍शूरन्‍स कंपनी लि. विरुध्‍द श्रीमती सिंधूबाई खंडेराव खैरनार   या प्रकरणात आपल्‍याच राज्‍य आयोगाने  Moreover such time limit not found to be mandatory   असे स्‍पष्‍ट म्‍हटले आहे, वरील कारणानुसार दावा मुदतीत येतो.
 
मूददा क्र.2 ः-
              गैरअर्जदार क्र.4 मार्फत गैरअर्जदार क्र.2 व 3 यांना अर्जदाराचा प्रस्‍ताव गैरअर्जदार क्र.1 मार्फत मिळाला आहे. प्रकरणात क्‍लेम देण्‍यासाठी आवश्‍यक असलेली कागदपञे उपलब्‍ध आहेत असे असताना काही तरी कारण देऊन व ञूटी दाखवून ते कागदपञ दया, ते कागदपञ दया असे म्‍हणून  गैरअर्जदार क्र.4 यांनी पञव्‍यवहार केलेला आहे तो योग्‍य नाही. गैरअर्जदार क्र.1 यांनी अर्जदार मौजे लादगा ता. मूखेड  येथील गट नंबर 270 मधील 1 हेक्‍टर 20 आर जमिनीचे मालक आहे व तो शेतकरी आहे हे दाखविण्‍यासाठी  7/12 पूरावा म्‍हणून दाखल केलेले आहे. शिवाय शेतकरी असल्‍याबददल नमूना नंबर 8 मध्‍ये पिक घेतल्‍या बददलची माहीती या प्रकरणात दाखल केलेली आहे. त्‍यामूळे मयत देविदास हा शेतकरी होता याबददल कोणतीही शंका नाही. पॉलिसीतील काही अटी नियम म्‍हणून व मार्गदर्शक म्‍हणून जरी असल्‍या तरी मा. राष्‍ट्रीय आयोग यांचे ब-यायशा नीर्णयानुसार अशा अटी बंधनकारक नाहीत असे स्‍पष्‍ट झालेले आहे. म्‍हणून केवळ उशीर झाला या कारणाने क्‍लेम नाकारुन स्‍वतःची जबाबदारी गैरअर्जदार यांना टाळता येणार नाही व ते विम्‍याची रक्‍कम देण्‍यास बांधील आहेत.  गैरअर्जदार यांनी अपघाताबददल  संशय व आक्षेप घेतलेला आहे. मयत देविदास हे शेतकरी असल्‍याबददल  लादगा येथील संरपचाने तसे प्रमाणपञ दिलेले आहे व त्‍यांचे नोंदीचा 7/12  देखील दाखल आहे. पॉलिसीतील एफ.आय.आर. व पंचनाम्‍यामध्‍ये मयत देविदास हा अटो चालवित होता असे जरी म्‍हटले असले तरी तो शेतकरीही होता हे देखील स्‍पष्‍ट होते. रिकाम्‍या वेळेत पूरक धंदा म्‍हणून काही वेगळा व्‍यवसाय केल्‍यास तो शेतकरी नाही असे म्‍हणता येणार नाही. अपघाताबददल एफ.आय.आर., पंचनामा, पी.एम. रिपोर्ट, ग्रामपंचायतचे मृत्‍यू प्रमाणपञ, इत्‍यादी कागदपञे दाखल आहेत. एवढी कागदपञ क्‍लेम सेंटल करण्‍यास पूरेशी आहेत. त्‍यामूळे गैरअर्जदार यांचा आक्षेप फेटाळण्‍यात येतो. क्‍लेमची रक्‍कम गैरअर्जदार यांना देण्‍याचे जाणीवपूवक टाळले असे करुन त्‍यांनी सेवेत ञूटी केलेली आहे हे स्‍पष्‍ट होते.
मूददा क्र.3 ः-
              अर्जदार हे मयत देविदास यांचे पिता आहेत व त्‍यांना अजूनही मूले आहेत. मयत हयात असताना त्‍यांनी वाटणीपञक करुन जमिन मयत देविदास यांचे नांवाने करुन दिलेली आहे. याबददलचे मयताचे होल्‍डींग प्रकरणात दाखल आहे. तसेच फेरफार रजिस्‍ट्ररचा उतारा हा ही दाखल आहे. अर्जदार यांनी आपले तीन मूले मयत देविदास व विलास व नागेशला वाटणीपञका आधारे जमिन वाटून दिलेली आहे व त्‍यांचे रजिस्‍ट्ररला दि.29.3.1997 रोजी नोंद मंजूर होऊन 7/12 वर त्‍याप्रमाणे मयताचे नांव टाकलेले आहे. या प्रकरणात गैरअर्जदार क्र.5 यांनी प्रतिवादी म्‍हणून नोटीस पाठविली आहे त्‍यांनी आपले म्‍हणण्‍यात आक्षेप घेतलेला आहे व हिंदू कायदयाप्रमाणे वारस व पॉलिसीची नॉमिनी मयताची पत्‍नीच होऊ शकते पिता होऊ शकत नाही असा आक्षेप घेतलेला आहे व यात मयताचे पिता म्‍हणजे अर्जदार यांनी त्‍यांची फसवणूक केली, त्‍यांना परस्‍पर विम्‍याची रक्‍कम हाडपण्‍यासाठी हा दावा दाखल केला असा आक्षेप घेतलेला आहे. वरील गैरअर्जदार क्र.5 यांचे म्‍हणण्‍यास लक्ष देऊन हिंदू कायदयाप्रमाणे तसेच पॉलिसीची नॉमिनी म्‍हणून सर्वात पहिले निराधार पत्‍नी हिचाच अधिकार पोहचतो. म्‍हणून विम्‍याची रक्‍कम अर्जदार यांना मिळू शकत नाही. अर्जदाराच्‍या मनात जर खोट नसती व मयत देविदास यांचे पत्‍नीस न्‍याय दयायचा असता तर त्‍यांनी गैरअर्जदार क्र.5 यांना सोबत घेऊन या विम्‍याच्‍या मागणीसाठी तक्रार अर्ज दाखल केला असता असे अर्जदार यांनी केलेले नाही म्‍हणजे अर्जदार यांचे मनामध्‍ये खोडसाळपणा व फसवणूक करण्‍याचा इरादा होता हे स्‍पष्‍टपणे दिसून येते. विम्‍याचा लाभ मिळण्‍यास अर्जदाराची पत्‍नी हीच हक्‍कदार ठरते. म्‍हणून अर्जदार हे विम्‍याची रक्‍कम मिळण्‍यास पाञ ठरणार नाहीत.
 
मूददा क्र.4 ः-
              मयत देविदास कीशन पाटील यांची पत्‍नी शशीकलाबाई देविदास पाटील ही आहे व कायदयाप्रमाणे मृत्‍युनंतर त्‍यांची वारस पत्‍नी व मूले असतात व नॉमिनी म्‍हणून विम्‍याची रक्‍कम मिळण्‍यास पहिली हक्‍कदार ही पत्‍नी असते.  7/12 वर व होल्‍डींग वर मयत देविदास पाटील यांचे नांव आहे व त्‍यांची वारस ही त्‍यांची पत्‍नी शंशीकलाबाई हिंच्‍या नांवाने जमीन करुन देण्‍यात यावी म्‍हणून तिने तलाठयाकडे अर्ज दिला तो त्‍यांना मिळाला अशी नोंद फेरफार रजिस्‍ट्ररवर दि.27.2.2008 रोजी घेण्‍यात आलेली आहे. मयत देविदास यांचा अपघाती मृत्‍यू हा दि.21.5.2007 रोजी झाला. जमीन ही मयताचे नांवानेच होती व मृत्‍यूनंतर ती जमिन आपल्‍या नांवाने करावी म्‍हणून अर्ज केलेलो आहे व ती नंतर शेतकरी होईल. अर्जदार यांनी दिवाणी न्‍यायालयात वारसा प्रमाणपञ मिळणे बाबत अर्जदार व त्‍यांचे पत्‍नीचे नांव टाकून अर्ज दावा दिला आहे व त्‍यात हेतूपूरस्‍पर मयताची पत्‍नी‍ हिचे नांव टाकल्‍याचे दिसून येते. विम्‍याची रक्‍कम रु.1,00,000/- व दि.2.7.2008 रोजी पासून म्‍हणजे क्‍लेम नाकारल्‍यापासून त्‍यावर 9 टक्‍के व्‍याज तसेच मानसिक ञासाबददल रु.10,000/- व दावा खर्च म्‍हणून रु.,2,000/- ही रक्‍कम मिळण्‍यास मयत देविदास हिची पत्‍नी शंशीकलाबाई ही पाञ ठरते.   या प्रकरणातील उपलब्‍ध कागदपञ पाहता गैरअर्जदार क्र.5 हीच वारस असून तीच हा क्‍लेम मिळण्‍यास पाञ आहे. गैरअर्जदार क्र.5 ने आपल्‍या जवाबात मानसिक ञास व खर्च मागितला नाही म्‍हणुन तो देय नाही.
              वरील सर्व बाबीचा विचार करुन आम्‍ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
                             आदेश
1.                                         तक्रार खालील प्रमाणे मंजूर करण्‍यात येते व अर्जदार यांचे हक्‍कात खारीज करण्‍यात येते.
 
2.                                         गैरअर्जदार क्र. 2 व 3 यांनी गैरअर्जदार क्र.5 यांना निकाल कळाल्‍यापासून 30 दिवसांचे आंत रु.1,00,000/- व त्‍यावर दि.2.7.2008 पासून 9 टक्‍के व्‍याजासह पूर्ण रक्‍कम मिळेपर्यत व्‍याजासह दयावेत.
 
3.                                         मानसिक ञासाबददल आदेश नाही.
4.                                         पक्षकारांनी आपआपला खर्च सोसावा.
5.                                         पक्षकारांना आदेश कळविण्‍यात यावा.
 
 
 
 
(श्री.बी.टी.नरवाडे,पाटील)    (श्रीमती सुजाता पाटणकर)    (श्री.सतीश सामते)    
           अध्यक्ष.                          सदस्‍या                               सदस्‍य
 
 
 
 
जे.यु, पारवेकर
लघुलेखक.