Maharashtra

Gondia

CC/14/85

BHAGRATABAI YASHWANTRAO MENDHE - Complainant(s)

Versus

TATA AIG GENERAL INSURANCE COMPANY LIMITED - Opp.Party(s)

MR.S.K.ANKAR

30 Jul 2016

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, GONDIA
ROOM NO. 214, SECOND FLOOR, COLLECTORATE BUILDING,
AMGOAN ROAD, GONDIA
MAHARASHTRA
 
Complaint Case No. CC/14/85
 
1. BHAGRATABAI YASHWANTRAO MENDHE
R/O.GORTHA, TAH.AMGAON
GONDIA
MAHARASHTRA
2. PRAVIN YASHWANTRAO MENDHE
R/O.GORTHA, TAH.AMGAON
GONDIA
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. TATA AIG GENERAL INSURANCE COMPANY LIMITED
R/O.A-501, 5 TH FLOOR, BUILDING NO.4, INFINITY I.T. PARK, DINDOSHI, MALAD (E), MUMBAI-400097
MUMBAI
MAHARASHTRA
2. JAIKA INSURANCE BROKERAGE PRIVATE LIMITED
R/O.2 ND FLOOR, JAIKA BUILDING COMMERCIAL ROAD, CIVIL LINES, NAGPUR-400001
NAGPUR
MAHARASHTRA
3. TAHSILDAR, AMGAON
R/O.AMGAON, TAH.AMGAON
GONDIA
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. M. G. CHILBULE PRESIDENT
 HON'BLE MS. VARSHA O. PATIL MEMBER
 
For the Complainant:MR. S. V. KHANTED, Advocate,Advocate, Proxy for MR.S.K.ANKAR, Advocate for
For the Opp. Party: MRS. SUCHITA DEHADRAI, Advocate
Dated : 30 Jul 2016
Final Order / Judgement

(आदेश पारित द्वारा मा. अध्‍यक्ष, श्री. एम. जी. चिलबुले)

(पारित दि. 30 जुलै, 2016)

        तक्रारकर्त्यांचा शेतकरी जनता अपघात विमा योजनेची नुकसानभरपाई मिळण्‍याबाबतचा विमा दावा विरूध्‍द पक्ष 1 ने नामंजूर केल्यामुळे तक्रारकर्त्यांनी सदरहू प्रकरण दाखल केले आहे.   तक्रारकर्त्यांच्‍या तक्रारीचा आशय थोडक्‍यात खालीलप्रमाणेः-

2.    तक्रारकर्ती क्रमांक 1 भागरथाबाई हिचे पती आणि तक्रारकर्ता क्रमांक 2 प्रवीण याचे पिता मयत यशवंत गणपत मेंढे हे व्यवसायाने शेतकरी होते व त्यांच्या मालकीची मौजा गोरठा, ता. आमगांव, जिल्हा गोंदीया येथे भूमापन क्रमांक 806, 812, 823, 805, 808, 824, 825, 826, 827 या वर्णनाची शेतजमीन होती.    

3.    महाराष्‍ट्र शासनाने सन 2013-14 करिता शेतकरी जनता अपघात विमा योजनेअंतर्गत विरूध्द पक्ष क्रमांक 1 टाटा एआयजी जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कडे सर्व शेतक-यांचा अपघात विमा काढला होता व मयत यशवंत मेंढे हे शेतकरी असल्याने सदर विम्याचे लाभधारक होते.

4.    दिनांक 04/05/2014 रोजी मयत यशवंत मेंढे त्यांच्या शेताकडे सायकलने जात असतांना गोंदीयावरून आमगांवकडे जाणा-या ट्रक क्रमांक MH-35/K-5051 च्या चालकाने ट्रक निष्काळजीपणे चालवून त्यांच्या सायकलला मागील बाजूने धडक दिली आणि त्यामुळे झालेल्या अपघातात यशवंत मेंढे जागीच मरण पावला. 

      शेतकरी जनता अपघात विमा योजनेअंतर्गत विमा दावा तक्रारकर्तीने आवश्यक दस्तावेजांसह विरूध्द पक्ष क्रमांक 3 तहसीलदार, आमगांव यांच्याकडे विरूध्द पक्ष क्रमांक 2 मार्फत विरूध्द पक्ष क्रमाक 1 कडे मंजुरीस्तव पाठविण्यासाठी सादर केला.  मात्र विरूध्द पक्ष 1 ने सदरचा विमा दावा "दिनांक 01/11/2013 रोजी योजना सुरू झाली त्या दिवशी मयत यशवंत मेंढे यांचे 7/12 मध्ये नांव नसल्याने ते शेतकरी नव्हते" असे चुकीचे कारण देऊन दिनांक 29/09/2014 च्या पत्रान्‍वये नामंजूर केला.  ज्या शेतक-याचे नांव त्याच्या मृत्‍युपूर्वी 7/12 मध्ये नोंदले होते असे सर्व शेतकरी विमा कालावधीत झालेल्या अपघाती मृत्‍युमुळे शेतकरी जनता अपघात विमा योजनेच्या लाभास पात्र ठरत असतांना वरील चुकीचे कारण देऊन तक्रारकर्त्यांचा विमा दावा नामंजुरीची विरूध्द पक्ष 1 विमा कंपनीची कृती सेवेतील न्यूनता आणि अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब आहे.  म्हणून तक्रारीत खालीलप्रमाणे मागणी केली आहे.  

      1.     अपघात विमा दाव्याची रक्‍कम रू. 1,00,000/- द. सा. द. शे. 12% व्‍याजासह देण्याचा विरूध्द पक्षांना आदेश व्हावा.

      2.    शारीरिक व मानसिक त्रासाबाबत नुकसानभरपाई रू. 10,000/- मिळावी.

      3.    तक्रार खर्च विरूध्द पक्षाकडून मिळावा.

5.    तक्रारीचे पुष्‍ठ्यर्थ तक्रारकर्त्यांनी विरूध्द पक्ष 1 चे दावा नामंजूर केल्याबाबतचे पत्र, 7/12 चा उतारा, फेरफार पत्रक, पोस्‍ट-मार्टेम रिपोर्ट, घटनास्थळ पंचनामा, एफ.आय.आर. इत्यादी दस्‍तावेज दाखल केले आहेत.

6.    विरूध्‍द पक्ष क्रमांक 1 विमा कंपनीने लेखी जबा‍ब दाखल करून तक्रारीस सक्‍त विरोध केला आहे.  महाराष्ट्र शासनाने दिनांक 01/11/2013 ते 31/10/2014 या कालावधीसाठी शेतकरी जनता अपघात विमा योजना 2005 अंतर्गत औरंगाबाद पुणे, नागपूर व नाशिक विभागातील शेतक-यांचा विमा त्यांचेकडे उतरविला असल्याचे मान्य केले आहे.  मात्र त्यांचे म्हणणे असे की, पॉलीसी सुरू होण्याच्या दिवशी ज्या शेतक-याचे नांव 7/12 मध्ये नोंदले असेल असेच शेतकरी विमा पॉलीसीच्या लाभास पात्र आहेत.  मयत यशवंत मेंढे यांचे नांव पॉलीसी सुरू होण्याचे दिवशी म्हणजे दिनांक 01/11/2013 रोजी 7/12 मध्ये नोंदलेले नव्हते. ते दिनांक 20/03/2014 रोजीच्या फेरफारान्वये नोंदण्यात आले आहे.  त्यामुळे शेतकरी जनता अपघात विमा पॉलीसीप्रमाणे मयत यशवंत मेंढे विमित शेतकरी नसल्याने त्याचे वारस असलेले तक्रारकर्ते शेतकरी जनता अपघात विम्याचा लाभ मिळण्यास पात्र नसल्याने विरूध्द पक्ष क्रमांक 1 ने दिनांक 29/09/2014 च्या पत्रान्वये तक्रारकर्त्यांचा विमा दावा नामंजूर केला.  विरूध्द पक्ष 1 यांची सदरची कृती ही विमा पॉलीसीच्या अटी व शर्तीस अनुसरून असल्याने त्याद्वारे सेवेत कोणताही न्यूनतापूर्ण व्यवहार झाला नाही.  म्हणून तक्रारीस कारणच घडले नसल्याने ती खारीज करावी अशी विरूध्द पक्ष क्रमाक 1 ने विनंती केली आहे.

7.    विरूध्द पक्ष क्रमांक 2 जायका इन्शुरन्स ब्रोकरेज यांनी आपला लेखी जबाब दाखल केला आहे.  त्यांचे म्हणणे असे की, त्यांची भूमिका इन्शुरन्स ऍडव्हायझरची असून त्यांच्याकडे आलेला विमा प्रस्ताव योग्य कागदपत्रांसह त्यांनी विरूध्द पक्ष क्रमांक 1 कडे मंजुरीसाठी पाठविला होता.  विरूध्द पक्ष क्रमांक 1 ने तो नामंजूर केला यांत विरूध्द पक्ष क्रमांक 2 चा कोणताही दोष नाही.  विरूध्द पक्ष क्रमांक 2 ने विमा प्रव्याजी घेतली नसल्याने विमा दाव्याची रक्कम देण्याची त्यांची जबाबदारी नसल्याने त्यांचेकडून सेवेत कोणताही न्यूनतापूर्ण व्यवहार घडलेला नाही.  म्हणून त्यांच्या विरूध्दची तक्रार खारीज करावी अशी विनंती केली आहे.

8.    विरूध्द पक्ष क्रमांक 3 ला नोटीस मिळूनही गैरहजर राहिल्‍याने प्रकरण त्यांचेविरूध्द एकतर्फा चालविण्यांत आले.

9.    तक्रारकर्ते व विरूध्‍द पक्ष यांच्या परस्‍पर विरोधी कथनांवरून तक्रारीच्‍या निर्णितीसाठी  खालील  मुद्दे  विचारार्थ  घेण्यात  आले.   त्‍यावरील  निष्‍कर्ष व कारणमिमांसा खालीलप्रमाणेः-

अ.क्र.

मुद्दे

निर्णय

1.

विरूध्द पक्ष क्र. 1 यांनी सेवेत न्यूनतापूर्ण व्यवहार केला आहे काय?

होय

3.

तक्रारकर्ते मागणीप्रमाणे दाद मिळण्यास पात्र आहेत काय?

अंशतः

4.

या तक्रारीचा अंतिम आदेश काय?

अंतिम आदेशाप्रमाणे

- कारणमिमांसा

10.   मुद्दा क्रमांक 1 बाबतः-          सदरच्या प्रकरणात महाराष्‍ट्र शासनाने विरूध्द पक्ष क्रमांक 1 टाटा एआयजी जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड यांचेकडे दिनांक 01/11/2013 ते 31/10/2014 या कालावधीसाठी औरंगाबाद, पुणे, नागपूर आणि नाशिक महसूल विभागातील शेतक-यांचा "शेतकरी जनता अपघात विमा" उतरविला होता ही बाब उभय पक्षांना मान्य आहे.  तसेच महाराष्ट्र शासनाच्या दिनांक 04 डिसेंबर, 2009 च्या शासन निर्णयात लाभार्थी पात्रतेच्या अटी प्रपत्र-ब मध्येः-

      1.     महाराष्ट्र राज्यातील 10 ते 75 वयोगटातील महसूल नोंदीनुसार असलेला खातेदार शेतकरी 

अशी विमा पॉलीसीचा लाभ मिळण्यासाठी पात्रतेची अट निश्चित केली आहे.  

      तक्रारकर्ती क्र. 1 चे पती यशवंत गणपत मेंढे यांचे वडील गणपत हरी मेंढे हे दिनांक 19/04/2001 रोजी मरण पावले.  तसेच गणपत यांचे वडील हरी गोंदी मेंढे दिनांक 26/04/1983 रोजी मरण पावले.  हरी गोंदी मेंढे याच्या मालकीची मौजा गोरठा, ता. आमगांव, जिल्हा गोंदीया येथे तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे खालील वर्णनाची शेतजमीन होती.

      गांव               भूमापन                  क्षेत्रफळ

      गोरठा             806               0.42 हे.आर.

      गोरठा             812               0.58 हे.आर.

      गोरठा             823               0.12 हे.आर.

      गोरठा             805               0.47 हे.आर.

      गोरठा             808               0.34 हे.आर.

      गोरठा             817               0.33 हे.आर.

      गोरठा             824               0.22 हे.आर.

      गोरठा             825               0.01 हे.आर.

      गोरठा             826               0.09 हे.आर.

      गोरठा             827               0.14 हे.आर.

      हरी गोंदी मेंढे आणि गणपत हरी मेंढे यांच्या अनुक्रमे दिनांक 26/04/1983 व दिनांक 19/04/2007 रोजी झालेल्या मृत्‍युनंतर त्यांच्या वारसानांचे नांवे वेळीच फेरफार घेण्यात आला नाही.  दिनांक 20/03/2014 रोजी फेरफार क्रमांक 807 प्रमाणे एकत्र फेरफार घेण्यात आला आणि मयत हरी गोंदी मेंढे यांचे वारस मुले 1) गणपत हरी मेंढे, 2) यादोराव हरी मेंढे आणि मुली 3) नर्मदा शिवणकर व भागरताबाई भांडारकर यांचे नावांची नोंद घेण्यात आली.  तसेच त्याच नोंदीद्वारे मयत गणपत हरी मेंढेचे वारस म्हणून मुले 1) केशवराव, 2) यशवंत, 3) सुकराम, 4) शालीकराम आणि मुली 5) फुलाबाई शिवणकर व विधवा मोताबाई मेंढे यांच्या नावांची नोंद घेण्यात आली.  सदर फेरफाराची प्रमाणित प्रत तसेच 7/12 ची प्रत तक्रारकर्त्यांनी दस्त क्रमांक 2 वर दाखल केली आहे.  

       वरील नोंदीवरून हे स्पष्ट होते की, गणपत हरी मेंढे यांचा दिनांक 19/04/2001 रोजी मृत्‍यु झाला त्याच दिवशी त्याची मुले यशवंत मेंढे व इतर वारसा हक्काने त्याच्या शेतजमिनीचे मालक झाले.  मात्र त्याबाबतचा फेरफार वेळीच न घेता दिनांक 20/03/2014 रोजी घेण्यात आल्याने शेतकरी जनता अपघात विमा योजना 2013-14 सुरू होण्याचे दिवशी म्हणजे दिनांक 01/11/2013 रोजी तक्रारकर्ती क्रमांक 1 चे पती मयत यशवंत मेंढे यांचे नांव 7/12 मध्ये नोंदण्यात आले नव्हते.  मात्र योजना कालावधीत ते दिनंक 20/03/2014 रोजी वरीलप्रमाणे फेरफार क्रमांक 807 अन्वये नोंदण्यात आले. 

      तक्रारकर्तीचे पती यशवंत गणपत मेंढे हे दिनांक 04/05/2014 रोजी सायकलने शेतावर जात असता रेती वाहून नेणा-या टिप्पर क्रमांक MH-35/K-5051 च्या चालकाने सदर वाहन भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवून यशवंत मेंढे यांच्या सायकलला जोरदार धडक दिली आणि त्यामुळे झालेल्या अपघातात यशवंत मेंढे जागीच मरण पावले.  धर्मराज टिकाराम पाथोडे या प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराने पोलीस स्टेशन, आमगांव येथे दिलेल्या रिपोर्टवरून पोलीसांनी टिप्पर चालकाविरूध्द अपराध क्रमांक 42/14 भा. दं. वि. चे कलम 279, 337, 304(अ) व मोटार वाहन कायद्याचे कलम 184 अन्‍वये गुन्हा नोंदवून तपासात घेतला.  प्रथम खबरीची प्रत दस्त क्रमांक 5 वर आणि घटनास्थळ पंचनाम्याची प्रत दस्त क्रमांक 4 वर दाखल आहे.  मेडिकल सुपरिटेन्डेन्ट, ग्रामीण रूग्णालय, आमगांव यांनी मयत यशवंत मेंढेच्या प्रेताचे शवविच्छेदन केले.  त्याचा अहवाल दस्त क्रमांक 3 वर दाखल आहे.  त्यात मृत्‍युचे कारण “Avulsion of trunks. Causing excessive Hemorrhage causing cardio pulmonary collapse due to hypo-xolmic shock”  असे नमूद आहे.  यावरून तक्रारकर्ती क्रमांक 1 चा पती यशवंत मेंढे याचा मृत्‍यु वाहन अपघाताने झाल्याचे सिध्द होते.

11.   विरूध्द पक्ष क्रमांक 1 च्या अधिवक्ता श्रीमती सुचिता देहाडराय यांचा युक्तिवाद असा की, योजनेत नमूद असल्याप्रमाणे विमा योजना सुरू झाली त्या दिवशी म्हणजे दिनांक 01/11/2013 रोजी ज्या शेतक-याचे नाव 7/12 मध्ये नमूद होते तेवढ्याच शेतक-यांसाठी शासनाकडून विरूध्द पक्ष क्रमांक 1 टाटा एआयजी जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड यांना विमा प्रव्याजी मिळाली असून त्या दिवशी 7/12 मध्ये नांव नसलेल्या यशवंत मेंढे याच्यासाठी कोणतीही विमा प्रव्याजी मिळाली नाही.  म्हणून योजना सुरू झाल्यानंतर त्याच्या दिनांक 04/05/2014 रोजी झालेल्या मृत्‍युपूर्वी म्हणजे दिनांक 20/03/2014 रोजी योजना कालावधीत जरी त्याच्या नावाची वारसा हक्काने 7/12 मध्ये नोंद झाली असली तरी तो विमित व्यक्ती नसल्याने त्याचे वारस शेतकरी जनता अपघात विम्याचा लाभ मिळण्यास पात्र ठरत नाहीत.   

12.   याउलट तक्रारकर्त्यांचे अधिवक्ता श्री. एस. व्ही. खान्तेड यांचा युक्तिवाद असा की, शासनाने राज्यातील सर्व शेतक-यांचा विमा उतरविलेला आहे.  मृतक यशवंत मेंढे याचे आजोबा हरी मेंढे यांच्या मालकीची शेती त्यांच्या मरणानंतर त्यांच्या वारसानांच्या म्हणजे गणपत व इतर यांच्या मालकीची आपोआप झाली.  तसेच हरी मेंढेचे वारस गणपत मेंढे यांचा दिनांक 19/04/2001 रोजी मृत्‍यु झाला त्याच दिवशी त्यांच्या शेतीची मालकी त्यांचे वारस असलेल्या यशवंत मेंढे व इतरांकडे आली.  केवळ वेळीच फेरफार झाला नाही म्हणून मयत हरी मेंढे यांचेच नांव दिनांक 20/03/2014 पर्यंत 7/12 मध्ये कायम होते.  त्यामुळे योजना सुरू झाली त्यावेळी तक्रारीत नमूद शेतीवर वारसा हक्काने प्रत्यक्ष मालकी असलेला शेतकरी यशवंत मेंढे हा देखील शासनाच्या शेतकरी जनता अपघात विमा योजनेप्रमाणे विमित शेतकरी असून विमा कालावधीत त्याचा मृत्‍यु झाल्यामुळे त्याचे वारस असलेले तक्रारकर्ते विमा लाभ मिळण्यास पात्र ठरतात. 

IV (2012) CPJ 51 (N.C.) . NATIONAL CONSUMER DISUTES REDRESSAL COMMISSION, NEW DELHI – Reliance General Insu. co. ltd.. – VsSakorba Hetubha Jadeja  & ors.  या प्रकरणात जर शेतकरी अपघात विमा योजना लागू होण्यापूर्वी शेतक-याच्या वडिलांच्या मृत्‍युमुळे त्याला शेतजमिनीत वारसा हक्काने मालकी झाली असेल परंतु वेळीच फेरफार घेण्यांत न आल्याने विमा योजना सुरू झाली त्या दिवशी अशा शेतक-याचे नांव 7/12 मध्ये नोंदले नसेल आणि ते नंतर नोंदण्यात आले असेल तर असा शेतकरी अपघाताने मरण पावल्यास त्याचे वारस शेतकरी अपघात विमा योजनेचा लाभ मिळण्यास पात्र ठरतात काय? असा मुद्दा माननीय राष्ट्रीय आयोगासमोर उपस्थित झाला होता.  त्यात माननीय राष्ट्रीय आयोगाने खालीलप्रमाणे अभिप्राय नोंदविला आहे.

“8. Nothing among the records produced by Mr. Nandwani (from among those produced before and considered by the District Forum) is contrary to the cogent analysis of the documentary evidence by the District Forum. Moreover, if as per the entries in Village Form 6 extract, the date of death of Bharmalji Bapeeji Jadeja was nearly five months before the date of the said entry’ i.e., 12.04.2002, Bharmalji died sometime in December 2001. Hence, all his legal heirs became registered farmers immediately after the death of their father and it was only the statutory process of registration of the legal heirs in the village record of rights after the death of a farmer that took time, leading to the final entry showing the names of Hetubha Jadeja and others as the legal right pertaining to the agricultural land owned by their father being made in Village Form 6 on 12.04.2002. Therefore, it has to be held that sometime in December 2001, i.e., well before 26.01.2002, the date of inception of the insurance policy in question, Hetubha Jadeja become a registered farmer as one of the legal heir of his deceased father who was a registered farmer. Hence, on his death in May 2002, his heirs, i.e. the respondents/complainants were entitled to receive the sum assured within 30 days of the proposal for claim being submitted.”

            माननीय राष्ट्रीय आयोगाच्या वरील निर्णयाच्या आधारे हे स्पष्ट होते की, यशवंत मेंढे यांचे वडील गणपत मेंढे हे मरण पावले त्याच दिवशी म्हणजे दिनांक 19/04/2001 रोजीच यशवंत मेंढे वारसा हक्काने त्यांच्या वडिलांच्या मालकीच्या शेतीचे मालक झाले.  म्हणून त्यांच्या नांवाने महसूल रेकॉर्डमध्ये फेरफार उशीराने म्हणजे दिनांक 20/03/2014 रोजी म्हणजे दिनांक 01/11/2013 रोजी शेतकरी जनता अपघात विमा योजना सुरू झाल्यावर घेण्यात आला असला तरी योजना काळात दिनांक 04/05/2014 रोजी झालेल्या त्याच्या अपघाती मृत्‍युबाबत विमा दाव्याची रक्कम रू. 1,00,000/- मिळण्यास त्याचे वारस असलेले तक्रारकर्ते पात्र ठरतात.  परंतु, विरूध्द पक्ष क्रमाक 1 ने योजना सुरू होण्याचे दिवशी मयत यशवंत गणपत मेंढे यांचे नांव 7/12 मध्ये नोंदले नव्हते म्हणून तक्रारकर्त्यांचा विमा दावा नामंजूर केलेला आहे.  विरूध्द पक्ष क्रमांक 1 ची सदरची कृती सेवेतील न्यूनता व अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब या सदरात मोडणारी असल्याने मुद्दा क्रमांक 1 वरील निष्कर्ष होकारार्थी नोंदविला आहे. 

13.   मुद्दा क्रमांक 2 व 3 बाबतः-     मुद्दा क्रमांक 1 वरील निष्कर्षाप्रमाणे तक्रारकर्ते विमा दाव्याची रक्कम रू. 1,00,000/- विरूध्द पक्ष क्रमांक 1 ने विमा दावा नाकारल्याच्या तारखेपासून म्हणजे दिनांक 29/09/2014 पासून प्रत्यक्ष अदायगीपर्यंत द. सा. द. शे. 9% व्याजासह मिळण्यास पात्र आहेत.  याशिवाय शारीरिक व मानसिक त्रासाबाबत नुकसानीभरपाई रू. 10,000/- आणि तक्रार खर्च रू. 5,000/- मिळण्यास पात्र आहेत.  म्हणून मुद्दा क्रमांक 2 व 3 वरील निष्कर्ष त्याप्रमाणे नोंदविले आहेत.       

      वरील निष्कर्षास अनुसरून मंच खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे. 

-// अंतिम आदेश //-

            1.     तक्रारकर्त्यांची तक्रार अंशतः मंजूर करण्‍यात येते.

2.    विरूध्द पक्ष 1 टाटा एआयजी जनरल इन्‍शुरन्स कंपनी लिमिटेड यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी तक्रारकर्त्यांना मृतक श्री. यशवंत गणपत मेंढे यांच्या मृत्युबाबत शेतकरी जनता अपघात विम्याची रक्कम रू. 1,00,000/- विमा दावा नाकारल्याच्या तारखेपासून म्हणजे दिनांक 29/09/2014 पासून प्रत्यक्ष अदायगीपर्यंत द. सा. द. शे. 9% व्याजासह द्यावी.

3.    विरूध्द पक्ष 1 टाटा एआयजी जनरल इन्‍शुरन्स कंपनी लिमिटेड यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी तक्रारकर्त्यांना शारीरिक व मानसिक त्रासाबाबत नुकसानभरपाई म्हणून रू. 10,000/- आणि तक्रारीचा खर्च म्हणून रू. 5,000/- द्यावे.

4.    विरूध्द पक्ष 1 टाटा एआयजी जनरल इन्‍शुरन्स कंपनी लिमिटेड यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी उपरोक्त आदेशाचे पालन आदेशाची प्रत प्राप्त झाल्याच्या‍ दिनांकापासून 30 दिवसांचे आंत करावे.

5.    विरूध्द पक्ष 2 व 3 यांचेविरूध्द कोणताही आदेश नाही.

6.    आदेशाची प्रत उभय पक्षांना विनामूल्य पुरविण्यात यावी.

7.    प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ प्रत तक्रारकर्त्यांना परत करावी.  

 
 
[HON'BLE MR. M. G. CHILBULE]
PRESIDENT
 
[HON'BLE MS. VARSHA O. PATIL]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.