Maharashtra

Gadchiroli

CC/10/2016

Lav Jitendra Gain - Complainant(s)

Versus

Tata AIG General Insurance Company Limited Through Divisional Manager & Other 2 - Opp.Party(s)

Shri.Uday P. Kshirsagar

30 Aug 2016

ORDER

District Consumer Disputes Redressal Forum Gadchiroli.
M.I.D.C. Road, T - Point, Navegaon,
Tah. Dist. Gadchiroli.
Pin No. 442605.
Maharashtra
 
Complaint Case No. CC/10/2016
 
1. Lav Jitendra Gain
At-Po-Sundernagar, Tah-Mulchera
Gadchiroli
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Tata AIG General Insurance Company Limited Through Divisional Manager & Other 2
A-501, 5th Floor, Building No.4, Infinity Park, Dindoshi, Malad(East), Mumbai-400097
Mumbai
Maharashtra
2. M/s. Jaika Insurance Brokers Private Limited Through Manager
2nd Floor, Jaika Building, Commercial Road, Civil Lines, Nagpur -440001
Nagpur
Maharashtra
3. Taluka Krishi Adhikari, Mulchera
At-Po-Tah-Mulchera
Gadchiroli
Maharashtra
4. NA
NA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. Sadik M. Zaveri PRESIDENT
 HON'BLE MS. Roza F. Khobragade MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
Dated : 30 Aug 2016
Final Order / Judgement

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍यायमंच, गडचिरोली

 

ग्राहक तक्रार क्रमांक :-  10/2016            तक्रार नोंदणी दि. :-17/2/2016

                        तक्रार निकाली दि. :- 30/08/2016

                                          निकाल कालावधी :- 6 म.13 दिवस

 

अर्जदार/तक्रारकर्ता      :-    श्री.लव जितेंद्र गाईन,

                              वय 40 वर्षे, व्‍यवसाय-खाजगी, 

                              रा.पो.सुंदरनगर, ता.मुलचेरा, जि.गडचिरोली.

                       

                        - विरुध्‍द -

गैरअर्जदार/विरुध्‍दपक्ष   :-   (1) टाटा एआयजी जनरल इंश्‍युरन्‍स कंपनी लिमिटेड,

   तर्फे डिव्‍हीजनल मॅनेजर,

         अे 501, पाचवा माळा, इमारत क्र.4,

   इन्‍फीनिटी पार्क, दिंडोशी, मालाड (पुर्व),

   मुंबई-400 097.

(2) मे.जयका इंशुरन्‍स ब्रोकर्स प्रा. लिमिटेड,

   तर्फे मॅनेजर,

    दुसरा मजला, जायका बिल्‍डींग, कमर्शियल,

    रोड, सिवील लाईन्‍स, नागपूर-440001.

(3)  तालुका कृषि अधिकारी, मुलचेरा,

     तालुका मुलचेरा, जिल्‍हा गडचिरोली.

                               

अर्जदार तर्फे वकील           :-    अधि.श्री.उदय क्षिरसागर    

गैरअर्जदार क्र.1 तर्फे वकील   :-    अधि.श्री प्रमोद बोरावार व अन्‍य  

गैरअर्जदार क्र.2 तर्फे वकील   :-    अधि.श्री दिपक परांजपे 

गैरअर्जदार क्र.3 तर्फे        :-    स्‍वतः 

 

 

गणपूर्ती         :-    (1) श्री सादिक मो‍हसिनभाई झवेरी, अध्‍यक्ष (प्र.)

                                      (2) श्रीमती रोझा फुलचंद्र खोब्रागडे, सदस्‍या

आ दे श  -

(मंचाचे निर्णयान्‍वये, रोझा फु.खोब्रागडे, सदस्‍या)

(पारीत दिनांक : 30 ऑगष्‍ट 2016)

                                      

                              तक्रारकर्त्‍याने सदर तक्रार, ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 12 अन्‍वये दाखल केली असून, तक्रारीचा आशय थोडक्‍यात येणे प्रमाणे.

 

1.          तक्रारकर्त्‍याची पत्‍नी श्रीमती शेफाली लव गाईन यांच्‍या मालकीची मौजा गणेशनगर, ता.मुलचेरा, जि.गडचिरोली येथे भुमापन क्र.37 ही शेतजमीन असून,  शेतातील उत्‍पन्‍नावर तक्रारकर्त्‍याची पत्‍नी कुटूंबाचे पालनपोषण करीत होती. तक्रारकर्त्‍याची पत्‍नी शेतकरी असल्‍याने गैरअर्जदार क्र.1 कडून तक्रारकर्त्‍याची पत्‍नीचा रुपये 1,00,000/- चा विमा शासनाच्‍या वतीने उतरविला होता. तक्रारकर्त्‍याची पत्‍नीचा मृत्‍यु दिनांक 30.10.2014 ला सरकारी बसने धडक दिल्‍याने झाला. त्‍यामुळे, तक्रारकर्ता गैरअर्जदार क्र.1 व 2  कडून रुपये 1,00,000/- च्‍या विमा रकमेसाठी पाञ होता.  त्‍यानुसार तक्रारकर्त्‍याने, गैरअर्जदार क्र.3 कडे दिनांक 20.3.2015 रोजी रितसर अर्ज केला व विरुध्‍द पक्षाच्‍या मागणीनुसार दस्‍तऐवजांची पुर्तता केली. सर्व दस्‍तऐवजांची पुर्तता केल्‍यानंतर गैरअर्जदार क्र.1 ने तक्रारकर्त्‍याला दि.29.7.2015 रोजी पत्र पाठवून सदर दावा विमा योजना दिनांक 31.10.2014 रोजी संपल्‍यानंतर 90 दिवस उलटून गेल्‍यानंतर सादर केल्‍यामुळे दावा मंजूर करता येत नाही, असे कळविले.गैरअर्जदार यांनी अर्जदाराचा विमा दावा अकारण फेटाळा आहे. विमा प्रस्‍ताव विमा पॉलीसी कालावधी संपल्‍यानंतर तीन महिन्‍यात द्यावा, ही अट मार्गदर्शक आहे आवश्‍यक नाही व सदर तीन महिने संपल्‍यावरही विलंबानंतर समर्थनीय कारणासह प्रस्‍ताव स्विकारावा असे शासन निर्णयात नमुद आहे. प्रत्‍यक्षात गैरअर्जदार यांनी अर्जदारास विलंबाबाबत कोणताही खुलासा मागितलेला नाही. पत्‍नीच्‍या मृत्‍युनंतर तक्रारकर्ता शोकात होता व ग्रामीण भागातील असल्‍यामुळे शेतकरी अपघात विमा योजनेबाबत माहिती नव्‍हती व याबाबतचे फलक कोणत्‍याही शासकीय कार्यालयात लावलेले नाहीत. अर्जदारास ज्‍यावेळी सदर योजनेबाबत माहिती मिळाली त्‍यानंतर अर्जदाराने विमा प्रस्‍ताव सादर केलेला आहे. तथापि, गैरअर्जदार यांनी अर्जदाराचा विमा दावा मंजूर न केल्‍यामुळे,  तक्रारकर्त्‍यास मानसिक, शारिरीक ञास व आर्थिक नुकसान झाले. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने गैरअर्जदारांनी विमा दाव्‍याची रक्‍कम रुपये 1,00,000/- दि.20.3.2015 पासून द.सा.द.शे. 18 % व्‍याजाने मिळण्‍याचे, तसेच मानसिक, शारिरीक व आर्थिक ञासापोटी रुपये 30,000/- व तक्रारीचे खर्चापोटी रुपये 15,000/- अर्जदारास गैरअर्जदारांकडून मिळण्‍याचे आदेश व्‍हावे, अशी प्रार्थना केली.

 

2.          अर्जदाराने नि.क्र.2 नुसार 9 झेरॉक्‍स दस्‍ताऐवज दाखल केले. अर्जदाराची तक्रार नोंदणीकरुन गैरअर्जदारास नोटीस काढण्‍यात आली. गैरअर्जदार क्र.1 ने नि.क्र.21 नुसार लेखी उत्‍तर दाखल केले. गैरअर्जदार क्र.2 ने नि.क्र.10 नुसार लेखी उत्‍तर दाखल केले.गैरअर्जदार क्र.3  ने नि.क्र.11 प्रमाणे  लेखी उत्‍तर दाखल केले.

 

3.          गैरअर्जदार क्र.1 ने  नि.क्र.21 नुसार दाखल केलेल्‍या लेखी उत्‍तरात नमूद केले की, अर्जदाराने तक्रारीत केले सर्व आरोप त्‍यांना नाकबूल आहे.  गैरअर्जदाराने पुढे त्‍याचे लेखी उत्‍तरात नमूद केले आहे की, अर्जदाराची पत्‍नी ही शेतकरी आहे व त्‍यांचे नावे शेतजमीन होती व शेतीच्‍या उत्‍पन्‍नावर कुटुंबाचे पालन करीत होती हे अमान्‍य आहे. गैरअर्जदार क्र.1 यांनी विशेष कथनामध्‍ये असे नमुद केले की, तक्रारकर्त्‍याची पत्‍नी मयत शेफाली हीचे वडील दिनांक 28.9.2013 ला मृत्‍यु पावल्‍यामुळे शेफालीचे नाव वारसान म्‍हणून दि.17.1.2014 ला मौजा गणेशनगर येथील शेतजमीन स.न.37 चे 7/12 अभिलेखात घेण्‍यात आले. मयत शेफाली हिचे सहहिस्‍सेदार म्‍हणून शेतकरी अपघात विमा योजना चारलु झाल्‍यानंतर शेतजमीन स.न.37 चे 7/12 अभिलेखात नाव दर्ज झाले, त्‍यामुळे स्‍व.शेफाली हिचे मृत्‍युनंतर तक्रारदार हे शतकरी अपघात योजनचे लाभ प्राप्‍त करण्‍यास अपात्र आहेत व म्‍हणून गैरअर्जदार क्र.1 ने दावा नामंजूर केलेला आहे. अर्जदार हा सुशिक्षित असून तो व्‍यवसायाने शेतकरी व व्‍यापारी आहे, त्‍यामुळे तो मयत शेफाली यांच्‍या उत्‍पन्‍नावर अवलंबून नव्‍हता. अर्जदारास तीन मुली असून, त्‍या मयताच्‍या वारसान असल्‍यामुळे त्‍यांना तक्रारीत जोडणे आवश्‍यक होते. त्‍यामुळे, दावा खारीज होण्‍यास पात्र आहे. अर्जदाराला सर्व कायदेशिर प्रक्रियेची माहिती असून सदर दावा अर्जदाराने दि.17.2.2016 रोजी दाखल केलेला आहे. त्‍याआधी अर्जदाराने माटार अपघात न्‍यायाधिकरण, गडचिरोली यांचे न्‍यायालयात मो.अ.दा.क्र.21/2015 अन्‍वये महाराष्‍ट्र राज्‍य परिवहन महामंडळाचे विरुध्‍द रुपये 4,00,000/- नुकसानभरपाई दावा दाखल केलेला आहे, अशी गैरअर्जदार क्र.1 ची माहिती आहे. अर्जदाराने या सर्व बाबी लपवून ठेवल्‍यामुळे अर्जदाराची तक्रार खारीज होण्‍यास पात्र आहे व अर्जदाराने 90 दिवसानंतर दावा दाखल केल्‍यामुळे अर्जदार विलंब माफी मिळण्‍यास पात्र नाही. सबब, अर्जदाराची तक्रार खारीज करण्‍यात यावी, अशी मागणी केली आहे.

 

4.          गैरअर्जदार क्र.2 ने  नि.क्र.10 नुसार दाखल केलेल्‍या लेखी उत्‍तरात नमूद केले की, हे म्‍हणणे खरे आहे की, अर्जदाराची पत्‍नी शेतकरी होती व दिनांक 30.10.2014 रोजी तिचे अपघाती निधन झाले. गैरअर्जदार क्र.1 ही विमा कंपनी असून, गैरअर्जदार क्र.2 हे विमा सल्‍लागार आहेत. शासनाच्‍या वतीने राबविण्‍यात येणारी शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत दावे हे गैरअर्जदार क्र.3 स्विकारुन गैरअर्जदार क्र.2 मार्फत गैरअर्जदार क्र.1 कडे सादर करण्‍यात येतात. सदर दावे मंजूर की नामंजूर करावे हे गैरअर्जदार क्र.1 च्‍या अखत्‍यारीतील बाब असून, गैरअर्जदार क्र.2 चा काहीही संबंध नाही. अर्जदाराचा विमा दावा गैरअर्जदार क्र.3 कडून गैरअर्जदार क्र.2 यांना दिनांक 10.7.2015 ला प्राप्‍त झाला व गैरअर्जदार क्र.2 यांनी दिनांक 14.7.2015 ला गैरअर्जदार क्र.1 कडे सादर केला. अर्जदाराच्‍या पत्‍नीचे दिनांक 30.0.2014 रोजी अपघाती निधन झाले. सदर योजना दिनांक 1.11.2013 ते 31.10.2014 पर्यंत होती. अर्जदाराने 90 दिवसानंतर दाखल केल्‍यामुळे, गैरअर्जदार क्र.1 यांनी दि.29.7.2015 अन्‍वये दावा नामंजूर केला. गैरअर्जदार क्र.2 यांनी अर्जदाराचा विमा दावा विनाविलंब गैरअर्जदार क्र.1 कडे पाठविला असल्‍यामुळे, गैरअर्जदार क्र.2 यांचेकडून अर्जदारास कोणताही शारिरीक व मानसिक त्रास झालेला नाही व त्‍यामुळे, गैरअर्जदार क्र.2 हे कोणतीही नुकसानभरपाई देण्‍यास जबाबदार नाही, त्‍यामुळे, गैरअर्जदार क्र.2 विरुध्‍द अर्जदाराची तक्रार खारीज करण्‍यात यावी.

 

5.          गैरअर्जदार क्र.3 ने नि.क्र.11 नुसार दाखल केलेल्‍या लेखी उत्‍तरात नमूद केले की, तक्रारकर्त्‍याची पत्‍नी शेफाली लव गाईन यांचा दिनांक 30.10.2014 रोजी अपघाती मृत्‍यु झाला, त्‍याबाबत अर्जदाराने दिनांक 20.3.2015 रोजी गैरअर्जदार क्र.3 कडे रितसर अर्ज केला. सदर प्रस्‍ताव  दिनांक 24.3.2015 रोजी  वरीष्‍ठ कार्यालय मा.जिल्‍हा अधिक्षक, कृषि अधिकारी गडचिरोली यांचेकडे सादर केला होता. सदर प्रकरणात गैरअर्जदार क्र.3 ची काहीही चुक नसल्‍यामुळे, त्‍यांचेविरुध्‍द दावा खारीज करण्‍यात यावा, अशी विनंती केली.

 

6.          अर्जदार व गैरअर्जदार क्र.1 ते 3 यांनी दाखल केलेले लेखी बयान, तसेच अर्जदार व गैरअर्जदार क्र.1 ने दाखल केलेले दस्‍ताऐवज, शपथपञ, तोंडी व लेखी युक्‍तीवादावरुन खालील मुद्दे निघतात.    

 

 

 

 

मुद्दे                                       :  निष्‍कर्ष

 

1)    अर्जदार ही गैरअर्जदाराचे विमा योजनेची लाभार्थी आहे काय ?     :  होय

2)    गैरअर्जदार क्र.1 व 2 ने लाभार्थ्‍याप्रती सेवेत न्‍युनतापूर्ण         :  होय

व्‍यवहार केला आहे काय ?

3)    अर्जदार ही गैरअर्जदार क्र.1 व 2 कडून विमा पॉलिसीचा लाभ    :  होय

मिळण्‍यास पाञ आहे काय ?

4)    आदेश काय ?                                       :अंतिम आदेशाप्रमाणे 

- कारण मिमांसा

 

मुद्दा क्रमांक 1 बाबत :-    

 

7.    तक्रारकर्त्‍याची पत्‍नी शेतीचा व्‍यवसाय करीत होती व शेतातील उत्‍पन्‍नावर तक्रारकर्त्‍याची पत्‍नी कुटुंबाचे पालनपोषण करीत होती, ही बाब अर्जदाराने दाखल केलेल्‍या नि.क्र.2 वरील दस्‍तऐवजावरुन सिध्‍द होते. अर्जदाराने दाखल केलेले दस्‍तऐवज क्र.1 वरील महाराष्‍ट्र शासनाचे शासन निर्णय दिनांक 31.10.2013 नुसार अर्जदाराची मयत पत्‍नी ही शेतकरी असल्‍यामुळे गैरअर्जदार क्र.1 ची ग्राहक आहे. तिचे मृत्‍युनंतर अर्जदार हा त्‍या विमा योजनचे लाभार्थी असल्‍यामुळे गैरअर्जदार क्र.1 चा ग्राहक आहे, म्‍हणून मुद्दा क्र.1 चे उत्‍तर होकारार्थी नोंदविण्‍यात येत आहे.

 

 

मुद्दा क्रमांक 2 बाबत :-

 

8.    गैरअर्जदार क्र.1 चे लेखी उत्‍तरात व तोंडी युक्‍तीवादात असे म्‍हणणे होते की, मयत शेफाली हीचे सहहिस्‍सेदार म्‍हणून शेतकरी अपघात विमा योजना सुरु झाल्‍यानंतर शेतजमीन स.न.37 चे 7/12 अभिलेखात नाव दर्ज झाले, त्‍यामुळे स्‍व.शेफाली हिचे मृत्‍युनंतर तक्रारदार हे शेतकरी अपघात विमा योजनेचा लाभ घेऊ शकत नाही. तसेच, अर्जदाराने मोटार अपघात न्‍यायाधिकरण, गडचिरोली न्‍यायालयात महाराष्‍ट्र राज्‍य परिवहन महामंडळाविरुध्‍द नुकसान भरपाईचा दावा दाखल केला आणि विद्यमान मंचामध्‍ये विलंबाने दावा दाखल केला या सबबीवरुन दावा नाकारला आहे. अर्जदाराने दाखल केलेल्‍या दस्‍तऐवजावरुन निदर्शनास येते की, मयत शेफालीचा मृत्‍यु झाला त्‍यावेळेस ती शेतकरी होती, त्‍यामुळे अर्जदार हा दाव्‍याचा लाभ मिळण्‍यास पात्र आहे. तसेच, शेतकरी अपघात विमा योजनेच्‍या शासन निर्णयानुसार ही पॉलीसी स्‍वतंत्र असून इतर विमा योजनेचा लाभ लाभार्थी घेवू शकतो. महाराष्‍ट्र शासनाचे शासन निर्णय दिनांक 31.10.2013 चे अवलोकन केले असता असे दिसूनयेते की, गैरअर्जदार क्र.3 ला शासन निर्णय अथ्‍वा त्रिपक्षीय करारनुसार दावा नाकरण्‍याचे अधिकार दिलेले नाहीत तसेच, गैरअर्जदारांनी दाव्‍याकरीता झालेल्‍या उशिराचे कारणही तक्रारकर्त्‍याकडून मागितले नाही. अर्जदाराने दाखल केलेले दस्‍तऐवज क्र.1 शासन निर्णयानुसार शेतक-याचा विमा प्रस्‍ताव विहित कागदपत्रासह विमा योजनेच्‍या कालावधीत केव्‍हाही प्राप्‍त झाला तरी स्विकारणे बंधनकारक राहील, असे असूनसुध्‍दा गैरअर्जदारांनी दावा नाकारुन न्‍युनतापुर्ण सेवा दिली आहे, असे सिध्‍द होते. म्‍हणून मुद्दा क्र.2 चे उत्‍तर होकारार्थी नोंदविण्‍यात येत आहे.

 

मुद्दा क्रमांक 3 बाबत :-

 

9.    वरील विवेचनावरुन व शासनाच्‍या परिपत्रकावरुन अर्जदार हा सदर विमा दाव्‍यासाठी पात्र आहे, असे गृहित धरुन हे मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.

 

 

       - अंतिम आदेश

 

  1. अर्जदाराची तक्रार अंशतः मंजूर करण्‍यात येत आहे.

     

  2. गैरअर्जदार विमा कंपनीने शेतकरी अपघात विमा दाव्‍याची रक्‍कम रुपये

                 1,00,000/- द.सा.द.शे. 9 टक्‍के व्‍याजासह, आदेशाची प्रत मिळाल्‍या-

                 पासून 45 दिवसांत द्यावे.

     

  3. गैरअर्जदार विमा कंपनीने अर्जदारास झालेल्‍या शारिरीक व मानसिक

        त्रासापोटी रुपये 10,000/- व तक्रारीचा खर्च रुपये 5,000/- आदेशाची

        प्रत मिळाल्‍यापासून 45 दिवसांत द्यावे.

     

  4. गैरअर्जदार क्र.3 विरुध्‍द कोणतेही आदेश नाहीत.

     

  5. उभय पक्षांना आदेशाची प्रत विनामुल्‍य देण्‍यात यावी.

 

 

गडचिरोली.

दिनांक – 30.8.2016.

 

 

 

 

       ( रोझा फु.खोब्रागडे )                            (सादिक मो.झवेरी)

            सदस्‍य                                      अध्‍यक्ष (प्र.) 

 
 
[HON'BLE MR. Sadik M. Zaveri]
PRESIDENT
 
[HON'BLE MS. Roza F. Khobragade]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.