Maharashtra

Gondia

CC/15/50

SURYAKANTA HASANLAL THAKARE - Complainant(s)

Versus

TATA AIG GENERAL INSURANCE COMPANY LIMITED THROUGH DIVISIONAL MANAGER - Opp.Party(s)

MR.UDAY KSHIRSAGAR

22 Mar 2016

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, GONDIA
ROOM NO. 214, SECOND FLOOR, COLLECTORATE BUILDING,
AMGOAN ROAD, GONDIA
MAHARASHTRA
 
Complaint Case No. CC/15/50
 
1. SURYAKANTA HASANLAL THAKARE
R/O.POST-KHARRA,
GONDIA
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. TATA AIG GENERAL INSURANCE COMPANY LIMITED THROUGH DIVISIONAL MANAGER
R/O.A-501, 5 TH FLOOR, BUILDING NO.4, ENFINITI PARK, DINDORI, MALAD (WEST), MUMBAI-400097
MUMBAI
MAHARASHTRA
2. JAYKA INSURANCE BROKARS PVT. LTD., THROUGH MANAGER
R/O.2 ND FLOOR, JAYKA BUILDING COMERCIAL ROAD, CIVIL LINES, NAGPUR-440001
NAGPUR
MAHARASHTRA
3. TALUKA KRUSHI ADHIKARI, GONDIA
R/O.GONDIA
GONDIA
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. ATUL D. ALSI PRESIDENT
 HON'BLE MS. VARSHA O. PATIL MEMBER
 
For the Complainant:MR.UDAY KSHIRSAGAR, Advocate
For the Opp. Party: MRS. SUCHITA DEHADRAI, Advocate
 MR. D. M. PARANJAPE, Advocate
ORDER

(आदेश पारित द्वारा मा. अध्‍यक्ष, श्री. अतुल दि. आळशी)

(पारित दि. 22 मार्च, 2016)

       तक्रारकर्ती श्रीमती सुर्यकांता हसनलाल ठाकरे हिचा शेतकरी जनता अपघात विमा योजनेची नुकसानभरपाई मिळण्‍याबाबतचा विमा दावा विरूध्‍द पक्ष यांनी निकाली न काढल्‍यामुळे तक्रारकर्तीने सदरहू प्रकरण दाखल केले आहे. तक्रारकर्तीच्‍या तक्रारीचा आशय थोडक्‍यात खालीलप्रमाणेः-

2.    तक्रारकर्तीचे पती श्री. हसनलाल रूपचंद ठाकरे यांच्‍या मालकीची मौजे खर्रा, तालुका गोंदीया, जिल्‍हा गोंदीया येथे भूमापन क्रमांक 189 या वर्णनाची शेतजमीन असल्‍यामुळे ते व्‍यवसायाने शेतकरी होते.     

3.    विरूध्‍द पक्ष 1 ही विमा कंपनी असून विरूध्‍द पक्ष 2 ही विमा सल्‍लागार कंपनी आहे.  विरूध्‍द पक्ष 3 हे शासनातर्फे राबविण्‍यात येणा-या शेतकरी व्‍यक्तिगत अपघात विमा योजनेअंतर्गत विमा दावे स्विकारण्‍याचे काम करतात.

4.    दिनांक 23/09/2014 रोजी घरातील मांडवावरून खाली पडल्‍यामुळे जखमी होऊन तक्रारकर्तीच्‍या पतीचा मृत्‍यु झाला.  तक्रारकर्तीने तिच्‍या पतीच्‍या अपघाती मृत्‍युनंतर विमा दाव्‍याची रक्‍कम मिळण्‍याकरिता विरूध्‍द पक्ष क्र. 3 यांच्‍याकडे दिनांक 17/12/2014 रोजी संपूर्ण कागदपत्रांसह रितसर विमा दावा अर्ज सादर केला.  तसेच विरूध्‍द पक्ष यांनी वेळोवेळी मागणी केलेल्‍या कागदपत्रांची पूर्तता सुध्‍दा केली.   

5.    रितसर अर्ज केल्‍यानंतर व आवश्‍यक ते दस्‍तऐवज दिल्‍यानंतरही विरूध्‍द पक्ष यांनी तक्रारकर्तीचा दावा मंजूर अथवा नामंजूर केल्‍याचे तक्रारकर्तीला कळविले नाही.  ही विरूध्‍द पक्ष यांच्‍या सेवेतील त्रुटी असल्‍यामुळे तक्रारकर्तीने न्‍याय मंचाच्‍या अधिकारक्षेत्रात विमा दाव्‍याची रक्‍कम रू. 1,00,000/- नुकसानभरपाईसह मिळण्‍यासाठी सदरहू प्रकरण दाखल केले आहे.    

6.    तक्रारकर्तीची तक्रार विद्यमान न्‍याय मंचाने दिनांक 17/04/2015 रोजी दाखल करून घेतल्‍यानंतर विरूध्‍द पक्ष यांना दिनांक 06/05/2015 रोजी मंचामार्फत नोटीसेस बजावण्‍यात आल्‍या. 

7.    विरूध्‍द पक्ष यांना नोटीस प्राप्‍त झाल्‍यानंतर विरूध्‍द पक्ष 1 यांनी त्‍यांचा लेखी जबाब दिनांक 08/10/2015 रोजी दाखल केला.  विरूध्‍द पक्ष 1 यांनी त्‍यांच्‍या लेखी जबाबात तक्रारकर्तीच्‍या तक्रारीचे खंडन केले असून तक्रारकर्तीने विमा दावा 90 दिवसानंतर म्‍हणजेच शेतकरी जनता अपघात विमा योजनेचा कालावधी संपल्‍यानंतर दाखल केल्‍यामुळे निकाली काढण्‍यात आला नाही.  यात विरूध्‍द पक्ष 1 यांची सेवेतील कुठलीही त्रुटी नसल्‍यामुळे तक्रारकर्तीची तक्रार खारीज करण्‍यात यावी असे म्‍हटले आहे.

8.    सदर प्रकरणात विरूध्‍द पक्ष 2 यांनी त्‍यांचा लेखी जबाब दिनांक 02/07/2015 रोजी दाखल केला.  विरूध्‍द पक्ष 2 यांनी त्‍यांच्‍या लेखी जबाबात असे म्‍हटले आहे की, विरूध्‍द पक्ष 3 यांचेकडून विमा दावा दिनांक 08/02/2015 रोजी त्‍याच्‍या कार्यालयास प्राप्‍त झाला.  विरूध्‍द पक्ष 2 यांनी तक्रारकर्तीचा सदरहू विमा दावा प्रस्‍ताव त्‍यासोबत जोडलेल्‍या कागदपत्रांसह विरूध्‍द पक्ष 1 यांच्‍याकडे निकाली काढण्‍याकरिता पाठविण्‍यात आला.  दाव्‍याची शहानिशा केली असता तक्रारकर्तीने योजनेचा कालावधी संपल्‍यानंतर दावा दाखल केल्‍यामुळे विरूध्‍द पक्ष 1 यांनी तक्रारकर्तीचा दावा नामंजूर केलेला असून त्‍याकरिता विरूध्‍द पक्ष 2 हे जबाबदार नसल्‍यामुळे त्‍यांच्‍याविरूध्‍द तक्रारकर्तीची तक्रार खारीज करण्‍यात यावी.

9.    सदरहू प्रकरणात विरूध्‍द पक्ष 3 यांना मंचाची नोटीस प्राप्‍त होऊनही ते मंचासमक्ष हजर झाले नाहीत अथवा त्‍यांनी त्‍यांचा लेखी जबाब देखील दाखल केलेला नाही.  त्‍यामुळे विरूध्‍द पक्ष 3 यांचेविरूध्‍द प्रकरण एकतर्फी चालविण्‍याचा आदेश दिनांक 21/01/2016 रोजी मंचामार्फत पारित करण्‍यात आला.

10.   तक्रारकर्तीने तक्रारीसोबत दस्‍तऐवज दाखल करण्‍याच्‍या यादीप्रमाणे एकूण 07 दस्‍तऐवज अनुक्रमे पृष्‍ठ क्रमांक 10 ते 34 नुसार दाखल केलेले आहेत. 

11.   तक्रारकर्तीचे वकील ऍड. उदय क्षीरसागर यांनी असा युक्तिवाद केला की,  तक्रारकर्ती ही पतीच्‍या मृत्‍युनंतर काही दिवस शोकमग्‍न अवस्‍थेत होती तसेच ती निरक्षर असल्‍याने तिला शेतकरी जनता अपघात विमा योजनेबाबतची कुठलीही माहिती नव्‍हती.  त्‍यामुळे कागदपत्रांची जुळवाजुळव करण्‍यासाठी व प्रकरण दाखल करण्‍यासाठी तिला लागलेला उशीर हे विमा दावा दाखल करण्‍याकरिता झालेल्‍या विलंबाचे संयुक्तिक कारण असल्‍यामुळे तक्रारकर्तीची तक्रार मंजूर करण्‍यात यावी.    

12.   विरूध्‍द पक्ष 1 यांच्‍या वकील ऍड. श्रीमती सुचिता देहाडराय यांनी असा युक्तिवाद केला की, तक्रारकर्तीने दाखल केलेली तक्रार ही मुदतबाह्य असल्‍यामुळे ती खारीज करण्‍यात यावी.

13.   विरूध्‍द पक्ष 2 चे वकील ऍड. डी. एम. परांजपे यांनी असा युक्तिवाद केला की, तक्रारकर्तीचा विमा दावा प्रस्‍ताव 90 दिवसांच्‍या कालावधीनंतर संयुक्तिक कारणाशिवाय दाखल करण्‍यात आलेला असल्‍यामुळे विरूध्‍द पक्ष 1 यांनी तो नामंजूर केला.  यात विरूध्‍द पक्ष 2 यांची सेवेतील कुठलीही त्रुटी नसल्‍यामुळे त्‍यांच्‍याविरूध्‍द तक्रारकर्तीची प्रस्‍तुत तक्रार खारीज करण्‍यात यावी.

14.   तक्रारकर्तीचा तक्रारअर्ज, तक्रारीसोबत दाखल केलेली कागदपत्रे, विरूध्‍द पक्ष यांचे लेखी जबाब तसेच दोन्‍ही पक्षाच्‍या वकिलांचा तोंडी युक्तिवाद यावरून खालील मुद्दे उपस्थित होतात.

अ.क्र.

मुद्दे

निर्णय

1.    

तक्रारकर्तीची तक्रार मान्‍य होण्‍यास पात्र आहे काय?

होय

2.

तक्रारकर्ती शेतकरी जनता अपघात विम्‍याचे पैसे मिळण्‍यास पात्र आहे काय?

होय

3.

या तक्रारीचा अंतिम आदेश काय?

कारणमिमांसेप्रमाणे

- कारणमिमांसा

15.   तक्रारकर्तीला कागदपत्रांची जुळवाजुळव करण्‍यासाठी सरकारी कार्यालयामधून लागलेला वेळ व तक्रारकर्ती ही अशिक्षित असल्‍यामुळे तक्रार दाखल करण्‍यासाठी झालेला उशीर हे विलंबासाठीचे संयुक्तिक कारण असल्‍याचे मंचाचे मत आहे.       

16.   तक्रारकर्तीने सदरहू प्रकरणात दाखल केलेला इन्‍क्‍वेस्‍ट पंचनामा, घटनास्‍थळ पंचनामा, पोस्‍ट मॉर्टेम रिपोर्ट, मर्ग खबरी इत्‍यादी कागदपत्रांवरून तक्रारकर्तीच्‍या पतीचा झालेला मृत्‍यु हा अपघाती मृत्‍यु आहे हे तक्रारकर्तीचे म्‍हणणे सिध्‍द होते. 

17.   तक्रारकर्तीने दाखल केलेल्‍या घटनास्‍थळ पंचनाम्‍यामध्‍ये तक्रारकर्तीचे पती राहत्‍या घराच्‍या मागील अंगणात लाकडी मंडप तयार करीत असतांना मंडपावरून पडून ते घटनास्‍थळी जखमी झाले व  पोलीस स्‍टेशन, गंगाझरी यांच्‍या मर्ग खबरीनुसार त्‍यांना के. टी. एस. रूग्‍णालयात दाखल करण्‍यात आले होते.  परंतु उपचारादरम्‍यान त्‍यांचा दिनांक 24/09/2014 रोजी मृत्‍यु झाला.  यावरून तक्रारकर्तीच्‍या पतीचा मृत्‍यु हा अपघाती मृत्‍यु असल्‍याचे सिध्‍द होते.   तसेच तक्रारकर्तीने दाखल केलेल्‍या 7/12 च्‍या उता-यानुसार तक्रारकर्तीचे पती हे शेतकरी असल्‍याचे सिध्‍द होत असून फेरफाराच्‍या नोंदीनुसार तक्रारकर्तीच्‍या पतीच्‍या मृत्‍युनंतर त्‍यांचे वारस हे शेतकरी या व्‍याख्‍येमध्‍ये समाविष्‍ट होत असल्‍यामुळे तक्रारकर्ती ही शेतकरी जनता अपघात विम्‍याची रक्‍कम खालील आदेशानुसार मिळण्‍यास पात्र आहे असे मंचाचे मत आहे. 

      करिता खालील आदेश.

-// अंतिम आदेश //-

            1.     तक्रारकर्तीची तक्रार अंशतः मंजूर करण्‍यात येते.

2.    विरूध्‍द पक्ष 1 यांना आदेश देण्‍यात येतो की, त्‍यांनी तक्रारकर्तीला तिच्‍या मृतक पतीच्‍या शेतकरी जनता अपघात विम्‍याची रक्‍कम रू. 1,00,000/- द्यावी.   या रकमेवर तक्रार दाखल केल्‍याच्‍या दिनांकापासून म्‍हणजेच दिनांक 17/04/2015 पासून ते संपूर्ण रक्‍कम तक्रारकर्तीच्‍या हातात पडेपर्यंत द. सा. द. शे. 9% दराने व्‍याज द्यावे. 

3.    विरूध्‍द पक्ष 3 यांना मंचाची नोटीस प्राप्‍त होऊनही त्यांनी मंचात हजर राहण्‍याची व लेखी जबाब दाखल कस्‍न वस्‍तुस्थिती मंचासमक्ष आणण्‍याची तसदी घेतली नसल्‍यामुळे विरूध्‍द पक्ष 3 यांना आदेश देण्‍यात येतो की, त्‍यांनी तक्रारकर्तीला झालेल्‍या शारीरिक, मानसिक व आर्थिक त्रासाची नुकसानभरपाई म्‍हणून रू. 5,000/- व या तक्रारीचा खर्च म्‍हणून रू. 5,000/- असे एकूण रू. 10,000/- तक्रारकर्तीला द्यावे.   

4.    विरूध्‍द पक्ष 1 यांनी उपरोक्‍त आदेश क्र. 2 चे पालन व्‍यक्तिशः करावे.

5.    विरूध्‍द पक्ष 3 यांनी उपरोक्‍त आदेश क्र. 3 चे पालन व्‍यक्तिशः करावे.

6.    विरूध्‍द पक्ष 1 व 3 यांना आदेश देण्‍यात येतो की, त्‍यांनी आदेशाचे पालन आदेशाची प्रत मिळाल्‍यापासून 30 दिवसांचे आंत करावे.

7.    विरूध्‍द पक्ष 2 यांचेविरूध्‍द प्रस्‍तुत तक्रार खारीज करण्‍यात येते. 

 
 
[HON'BLE MR. ATUL D. ALSI]
PRESIDENT
 
[HON'BLE MS. VARSHA O. PATIL]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.