निकाल
दिनांक- 09.09.2014
(द्वारा- श्री.विनायक रावजी लोंढे, अध्यक्ष )
तक्रारदार उषा भिमराव राऊत यांनी सदरील तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 अन्वये सामनेवाले यांनी आम आदमी विमा योजने अंतर्गत नुकसान भरपाई देण्याची टाळाटाळ करुन सेवेत त्रूटी ठेवली आहे म्हणून नुकसान भरपाई मिळण्यासाठी दाखल केली आहे.
तक्रारदारांची तक्रार थोडक्यात येणे प्रमाणे, तक्रारदार यांचे पती भिमराव बळीराम राऊत हे दि.23.3.2012 रोजी शेतात गूरे चारण्यासाठी गेले असता अपघाती मयत झाले. सदरील घटने बाबत पोलिस स्टेशन केज यांना खबर देण्यात आली. केंद्र शासनाने आम आदमी विमा योजना राज्या मार्फत राबवलेली आहे. सदरील योजने अंतर्गत भूमिहीन कूटूंबातील कमवता व्यक्ती यांचा अपघाती मृत्यू झाल्यास नुकसान भरपाई देणे बाबत निर्देश दिलेले आहेत. तक्रारदार यांनी त्यांचे पती मयत झाल्यानंतर सामनेवाले क्र.1 यांचेमार्फत सामनेवाले क्र.3 यांचे कडे प्रस्ताव पाठविला. सामनेवाल क्र.3 यांनी तक्रारदार यांना रु.30,000/- चा धनादेश पाठविला. सामनेवाले क्र.3 यांनी असे निर्देशीत केले की, तक्रारदार यांचे पतीचा मृत्यू नैसर्गिक कारणामुळे झाला. तक्रारदार यांचे कथन की, तक्रारदार यांचे पतीचा मृत्यू अपघाताने झाला. सामनेवाले यांनी रक्कम रु.75,000/- नुकसान भरपाई देणे गरजेचे होते असे असतानाही केवळ रक्कम रु.30,000/- देऊन सेवेत त्रूटी ठेवली आहे. सबब, तक्रारदार यांना सामनेवाले क्र.3 यांनी रक्कम रु.45,000/- देण्याचे निर्देश देण्यात यावेत व तक्रारीचा खर्च देण्यात यावा अशी मागणी केली आहे.
सामनेवाले क्र.1 हे मंचासमोर हजर झाले. सामनेवाले क्र.1 यांनी तक्रारदार यांनी तक्रारीत केलेले कथन योग्य व वाजवी आहे असे नमूद केले आहे. सामनेवाले क्र.3 यांची नुकसान भरपाई देण्याची जबाबदार आहे असे निवेदन दिले आहे.
सामनेवाले क्र.3 हे मंचासमोर हजर झाले व त्यांनी तक्रारदार व सामनेवाले क्र.3 यांचेमध्ये तडजोड झाल्या बाबत तडजोडपत्र दाखल केले.
तक्रारदार हया मंचासमोर हजर आहेत. तक्रारदार यांचे वकील श्री.राजपूत हजर आहेत. सामनेवाले यांचे वकील श्री.कूलकर्णी हे मंचासमोर हजर आहेत. तक्रारदार व सामनेवाले यांनी दाखल केलेले तडजोडपत्र तक्रारदार यांना वाचून दाखवले. त्यांना ते मान्य व कबूल असल्याचे सांगितले. सामनेवाले क्र.3 यांनी आज रोजी धनादेश क्र.034543 रक्कम रु.45,000/- तक्रारदार यांना देत आहेत असे नमूद केले. तक्रारदार यांनी व्याज व खर्चाच्या रक्कमेचा हक्क् सोडून दिला आहे ही बाब मान्य केली आहे. सबब, तक्रारदार व सामनेवाले क्र.3 यांचेमध्ये तडजोड होऊन तक्रारदार यांना उर्वरित आम आदमी विमा योजने अंतर्गत लाभ् रक्कम रु.,45,000/- चा चेक दिलेला आहे. सबब, तक्रारदार यांची तक्रार मान्य करण्यास पात्र आहे. तक्रारदार यांनी व्याजाची रक्कम व खर्चाची रक्क्मेचा हक्क सोडून दिलेला आहे. त्यामुळे तो खर्च तक्रारदार यांना देण्यात आलेला नाही.
सबब, मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
- तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्यात येते.
- तक्रारदार व सामनेवाले क्र.3 यांचे तडजोड पत्राचे आधारे तक्रार बंद करण्यात
येत आहे.
3. ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील कलम
20 (3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला परत
करावेत.
श्री.रविंद्र राठोडकर श्रीमती मंजूषा चितलांगे श्री.विनायक लोंढे,
सदस्य सदस्या अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड
जयंत पारवेकर
लघुलेखक