Maharashtra

Beed

CC/14/121

Gangabai Dnaydnoba Kande - Complainant(s)

Versus

Taluka Krushi Adhikari Dharur - Opp.Party(s)

Adv S.R.Rajput

08 Dec 2014

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, BEED.
House No.1-4-1600,Uttamnanda Building,1st Floor,
Ambika Chowk,Pangri Road,Shahu Nagar,
Dist.Beed.431 122.
 
Complaint Case No. CC/14/121
 
1. Gangabai Dnaydnoba Kande
R/o Asola Ta Dharur
Beed
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Taluka Krushi Adhikari Dharur
Office Dharur Ta Dharur
Beed
Maharashtra
2. Manager,Kabal Insurance Broking services Pvt Ltd
101,Shivajinagar,3rd Floor,Near Mangal Theater,Pune
Pune
Maharashtra
3. Manage,Reliance general Insurance Co Ltd
19,Reliance Center,Walchand Hirachand, Nagar, Belard Estate, Mumbai
Mumbai
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MRS. Manjusha Chitalange PRESIDING MEMBER
 HON'BLE MR. R.S.Rathodkar MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
ORDER

निकाल

                       दिनांक- 08.12.2014

                  (द्वारा- श्रीमती मंजुषा चितलांगे,सदस्‍या  )

 

           तक्रारदार यांनी सदरील तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 अन्‍वये सामनेवाले  यांनी तक्रारदार यांना सेवा देण्‍यात कसूर केला म्‍हणून  नुकसान भरपाई मिळणेसाठी दाखल केली आहे.

             तक्रारदारांची तक्रार थोडक्‍यात खालील प्रमाणे, तक्रारदाराचे मयत पती ज्ञानोबा शंकर कांदे यांचे नांवे मौजे आसोला ता. धारुर जि. बीड येथे सर्व्‍हे नं.239 मध्‍ये 1 हे. 13 जमिन होती. ते व्‍यवसायाने शेतकरी होते. दि.13.7.2009 रोजी दुपारी 4 वाजता आठवडी बाजारकामी शिवाजी चौक चे डावे साईडला धारुर येथे उभे असताना माजलगांव कडून केजकडे एक पांढ-या रंगाची टाटा सूमारे क्र.एम.एच.14/बी ए 2630 ने त्‍यांना जोराची धडक दिली. ते अपघात जखमी झाल्‍यामुळे त्‍यांना सरकारी दवाखाना धारुर येथे नेण्‍यात आले. तेथून एस.आर.टी.आर मेडीकल हॉस्‍पीटल अंबाजोर्गा येथे पूढील उपचारासाठी वर्ग करण्‍यात आले. ते मरण  पावले. विष्‍णू तुकाराम यांनी दि.13.7.2009 रोजी गु.रं. नं.58/2009 नुसार पोलिस स्‍टेशन धारुर येथे कलम 279,338,304 (अ) भा. दं.वि. नुसार फिर्याद दिली. नंतर घटनास्‍थळ पंचनामा व शवविच्‍छेदन करण्‍यात आले.  त्‍याबाबत तक्रारीत कागदपत्र दाखल केली आहेत.   तक्रारदार हिने प‍तीचे निधनांनंतर सामनेवाले क्र.1 कडे विमा प्रस्‍ताव दि.9.12.2009 रोजी दाखल केला. सामनेवाले क्र.1 यांनी जिल्‍हा कृषी अधिकारी बीड यांचेकडे दि.14.12.2009 रोजी पाठवला आहे. विचारणा केली असता उडवाउडवीची उत्‍तरे दिली. तक्रारदार यांनी सामनेवाले यांना व कृषी आयूक्‍त पूणे यांना वकिलामार्फत रजिस्‍ट्रर पोस्‍टाने दि.12.11.2013 रोजी नोटीस पाठवली.  सामनेवाले यांना नोटीस प्राप्‍त होऊनही त्‍यांनी काहीही केले नाही.   तक्रारीस कारण घडले म्‍हणून तक्रारदार हिने सदर तक्रार दाखल करुन अशी मागणी केली आहे की, तक्रारदार हिला शेतकरी वैयक्‍तीक अपघात विमा योजने अंतर्गत रक्‍कम रु.1,00,000/- व्‍याजासह मिळावेत  तसेच शारीरिक व मानसिक खर्च व तक्रारीचा खर्च मिळावा.

 

            सामनेवाले क्र.1 हे स्‍वतः हजर झाले व त्‍यांनी लेखी म्‍हणणे नि.9 अन्‍वये दाखल केले आहे.  विमा प्रस्‍ताव हा विमा कंपनीकडे प्रलंबित आहे. सामनेवाले यांनी उडवाउडवीची उत्‍तरे दिली हे म्‍हणणे बरोबर नाही.दि.12.11.2013 रोजीची नोटीस या कार्यालयास प्राप्‍त झाली नाही. दि.15.8.2008 ते 14.08.2009 या कालावधीसाठी शेतक-याचा विमा हा सामनेवाले क्र.3 कडे उतरविलेला आहे. तक्रारदाराचे पती हे वाहन अपघातात दि.13.9.2009 रोजी मयत झाले आहेत त्‍याबाबतचा प्रस्‍ताव त्‍यांचेकउे दि.9.12.2009 रोजी प्राप्‍त झाला आहे. दि.14.12.2009 रोजी तो प्रस्‍ताव जिल्‍हा अधिक्षक कृषी बीड मार्फत सामनेवाले क्र.2 ला पाठविण्‍यात आला आहे. नियमाप्रमाणे नुकसान भरपाई देण्‍याची जबाबदारी ही सामनेवाले क्र.3 ची आहे. त्‍यामुळे त्‍यांचे विरुध्‍दची तक्रार खारीज करण्‍यात यावी.

            सामनेवाले क्र.2 यांनी लेखी म्‍हणणे नि.14 अन्‍वये सादर केले आहे. तक्रारदाराचे पतीचा अपघात दि.13.7.2009 रोजी झाला. सदरीत प्रस्‍ताव जिल्‍हा अधिक्षक कृषी अधिकारी बीड मार्फत सामनेवाले क्र.2 औरंगाबाद कार्यालयास  दि.6.1.2010 रोजी उशिरा प्राप्‍त  झाला. तो प्रस्‍ताव कबाल औरंगाबाद यांनी सामनेवाले क्र.3 कडे दि.30.01.2010 रोजी पाठविला.  सदरील प्रस्‍ताव सामनेवाले क्र.3 यांनी नामंजूर केला असून तक्रारदारास दि.24..11.2010 रोजी पत्राद्वारे कळविले आहे.

 

            सामनेवाले क्र.3 हे वकिलामार्फत हजर झाले व त्‍यांनी त्‍यांचे लेखी म्‍हणणे नि.23 अन्‍वये सादर केले आहे. सामनेवाले यांनी दि.15.8.2008 ते दि.14.8.2009 या कालावधीसाठी पॉलिसी  काढली होती.  हे मान्‍य नाही की, तक्रारदाराचे पती शेतकरी होते. तक्रारदाराची तक्रार वेळेत दाखल न केल्‍यामुळे फेटाळण्‍यात यावी.  तक्रारदार यांनी शेतकरी असलयाबाबत कोणताही ठोस पुरावा दाखल केलेला नाही. तक्रारदाराचा विमा प्रस्‍ताव हा घटना घडल्‍यापासून 90 दिवसाचे आंत दाखल करणे आावश्‍यक आहे.तक्रारदार यांनी सर्व कागदपत्रासह प्रसताव सामनेवाले यांचेकडे योग्‍य त्‍या मार्गाने व वेळेत दाखल केला नाही. सामनेवाले यांनी सेवेत कोणतीही त्रूटी केली नाही.   तक्रारदाराची तक्रार खोटी व बनावट असून ती रु.5000/- खर्चासह फेटाळण्‍यात यावी.

 

            तक्रारदार यांनी नि.6 सोबत क्‍लेम फॉर्म, 8-अ, 7/12 चा उतारा, फेरफार नोंद, गाव  नमूना 6-क, प्रतिज्ञापत्र, मृत्‍यू प्रमाणपत्र, खबर, घटनास्‍थळ पंचनामा, शवविच्‍छेदन अहवाल, प्रवेश निर्गम उतारा, हजर केले आहे. तक्रारदार  यांनी स्‍वतःचे शपथपत्र नि.2 वर दाखल केले आहे. सामनेवाले क्र.3 यांनी सक्षम अधिका-याचे शपथपत्र नि-24 वर  दाखल केले आहे. सामनेवाले क्र.1 यांनी सक्षम अधिका-याचे शपथपत्र नि.10 वर दाखल केले आहे. सामनेवाले क्र.2 यांनी सक्षम अधिका-याचे शपथपत्र नि.14 वर दाखल केले आहे. तक्रारदार यांचे वकील श्री.राजपूत यांचा यूक्‍तीवाद ऐकला. तक्रारदार यांनी दाखल केलेले दस्‍त व शपथपत्राचे अवलोकन केले. सामनेवाले क्र.3 यांचे वकील श्री.ए.पी.कूलकर्णी यांचा यूक्‍तीवाद ऐकला. न्‍यायनिर्णयासाठी खालील मूददे उपस्थित होतात.

 

            मुददे                                                  उत्‍तर

1.     सामनेवाले  यांनी शेतकरी व्‍यक्‍तीगत अपघात विमा

      योजने अंतर्गत तक्रारदार यांना दयावयाच्‍या सेवेत त्रूटी

      ठेवली आहे ही बाब तक्रारदार शाबीत करतात काय       ?                 नाही

2.    तक्रारदार हे शेतकरी व्‍यक्‍तीगत अपघात विमा योजने अंतर्गत

      लाभ मिळण्‍यास पात्र आहेत काय ?                                नाही.

3.    काय आदेश ?                                    अंतिम आदेशाप्रमाणे.

 

                                    कारणमिंमासा

मुददा क्र.1 व 2ः-

                        तक्रारदाराचे वकील श्री. राजपूत यांनी असा यूक्‍तीवाद केला की, तक्रारदार यांचे पती हे दि.13.7.2009 रोजी टाटा सुमो गाडीने जोराची धडक दिल्‍यामुळे गंभीर जखमी होऊन मरण पावले. तक्रारदार  यांच्‍या पतीच्‍या नांवे मौजे आसोला येथे गांवी शेतजमिन होती. तक्रारदार यांचे पती शेतकरी होते. महाराष्‍ट्र शासनाने शेतक-याचा अपघाती मृत्‍यू झाल्‍यास नुकसान भरपाई योजना लागू केली आहे. महाराष्‍ट्र शासनाने त्‍याकरिता सामनेवाले क्र.3 यांच्‍याकडे विमा उतरविलेला आहे. तक्रारदार हे सदर योजने अंतर्गत लाभ घेऊ शकतात.  तक्रारदार यांने शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत विमा प्रस्‍ताव हा दि.09.12.2009 रोजी दाखल केला. विमा प्रस्‍तावा बाबत चौकशी केली असता सामनेवाले यांनी उडवाउडवीची उत्‍तरे दिली. सदर प्रस्‍तावावर योग्‍य कार्यवाही केली नाही. दि.24.11.2010 रोजी सामनेवाले क्र.3 यांनी तक्रारदाराचा विमा प्रस्‍ताव हा 90 दिवसानंतर मिळाल्‍यामुळे नाकारण्‍यात आला आहे असे तक्रारदारास कळविले. सामनेवाले यांना विमा प्रस्‍ताव हा योग्‍य कारणासाठी नाकारला नाही त्‍यामुळे तक्रारदारास मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागला. सामनेवाले क्र.3 यांनी दयावयाच्‍या सेवेत त्रूटी ठेवली आहे. सबब, तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्‍यात यावी.

 

            सामनेवाले क्र.3 यांच्‍या वकिलांनी असा युक्‍तीवाद केला की, तक्रारदाराचा विमा प्रस्‍ताव हा पॉलिसीचा कालावधी संपूष्‍टात आल्‍यानंतर 90 दिवसानंतर उशिराने प्राप्‍त झाला आहे. सदर बाब ही विमा पॉलिसीच्‍या शर्ती व अटीनुसार नाही. पॉलिसीचा कालावधी संपूष्‍टात आल्‍यानंतर व 90 दिवस संपल्‍यानंतर विमा प्रस्‍ताव दाखल केला आहे. पॉलिसीच्‍या शर्ती व अटीचा भंग केला आहे. सामनेवाले क्र.3 यांनी तक्रारदाराचा विमा प्रस्‍ताव हा योग्‍य कारणासाठी नाकारलेला आहे. सबब, तक्रारदारास दयावयाच्‍या सेवेत त्रूटी ठेवली असे म्‍हणता येणार नाही. सबब, तक्रारदाराची तक्रार रदद करण्‍यात यावी.

 

            वर नमूद केलेला यूक्‍तीवाद लक्षात घेतला, तक्रारदार तक्रारी यांनी सोबत दाखल कलेले कागदपत्र व शपथपत्र यांचे अवलोकन केले. तक्रारदार यांचे पती दि.13.07.2009 रोजी मयत झाले. तक्रारदार यांनी शेतकरी जनता अपघात विमा योजनेचा प्रस्‍ताव हा कृषी अधिकारी यांच्‍याकडे दि.09.12.2009 रोजी दाखल केला. तक्रारदार  यांनी प्रस्‍ताव हा पॉलिसी संपूष्‍टात आल्‍यानंतर सादर केल्‍याचे निदर्शनास येते. तक्रारदार हे स्‍वतः निष्‍काळजीपणाने वागले. तक्रारदार  यांनी मुदतीत प्रस्‍ताव का सादर केला नाही याबाबत कोणतेही संयूक्‍तीक वाजवी व समर्थनीय कारण दिले नाही. सर्वसाधारणपणे पॉलिसीच्‍या कालावधी संपल्‍यानंतर 90 दिवसांच्‍या आंत सदरील प्रसताव दाखल करणे गरजेचे आहे. पॉलिसीत नमूद केलेला कालावधी संपल्‍यानंतर ती पॉलिसी संपूष्‍टात येते. तक्रारदार यांनी सदर प्रस्‍ताव हा उशिरा दाखल केला आहे. त्‍याकरिता झालेल्‍या परिणामास तक्रारदार हे स्‍वतः जबाबदार आहे. मंचाचे अधिकार हे कायदयाने सिमीत केलेले आहे. सामनेवाले यांनी सेवा देण्‍यात कसूर केला ही बाब सिध्‍द करणे गरजेचे आहे. परंतु तक्रारदार ही बाब सिध्‍द करु शकले नाहीत. तक्रारदार हे स्‍वतः बेजबाबदारने वागले असतील व प्रस्‍ताव हा वेळेत सादर केला नसेल तर सामनेवाले यांनी सेवेत त्रूटी ठेवली आहे असे म्‍हणता येणार नाही. सबब, या मंचाचे मत असे आहे की, तक्रारदार हे तक्रारीतील मागणी मिळण्‍यास पात्र नाहीत. तक्रार ही रदद होण्‍यास पात्र आहे.

 

            मुददा क्र..1 व 2 चे उत्‍तर नकारार्थी देत आहोत.

 

            सबब, मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.

 

                            आदेश

 

            1)  तक्रारदाराची  तक्रार  नामंजूर  करण्‍यात  येत  आहे.          

2)

            3) ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील कलम

               20 (3) प्रमाणे तक्रारीतील सदस्‍यांचे संच तक्रारदाराला परत

               करावेत.

 

 

 

    श्री.रविंद्र राठोडकर            श्रीमती मंजूषा चितलांगे      श्री.विनायक लोंढे           

         सदस्‍य                    सदस्‍या                  अध्‍यक्ष

                    जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड

 
 
[HON'BLE MRS. Manjusha Chitalange]
PRESIDING MEMBER
 
[HON'BLE MR. R.S.Rathodkar]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.