निकाल
दिनांक- 20.08.2014
(द्वारा- श्री.रविंद्र शेषेराव राठोडकर, सदस्य )
तक्रारदार यांनी सदरील तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 अन्वये सामनेवाले यांनी शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा कंपनीची पॉलिसी अंतर्गत मिळणा-या नुकसान भरपाईची रक्कम देण्यास टाळाटाळ करुन सेवेत कसूर केला आहे म्हणून नुकसान भरपाई मिळणेसाठी दाखल केली आहे.
तक्रारदारांची तक्रार थोडक्यात खालील प्रमाणे आहे, तक्रारदार यांचे पती विक्रम नारायण मुंढे यांचे नांवे मौजे गोपाळपूर येथे सर्व्हे क्र.528,523 मध्ये शेत जमिन आहे. ते व्यवसायाने शेतकरी आहेत. दि.12.4.2010 रोजी मयत हे रोडचे बाजूने जात असताना अंबाजोगाई रोडवर अज्ञात वाहनाने धडक दिली. त्यानंतर अंबाजोगाई येथे उपचार कामी घेऊन गेले असता ते मयत झाले. अज्ञात वाहन चालकाविरुध्द गून्हा केज पोलिस स्टेशन येथे नोंदविण्यात आला. त्यानंतर घटनास्थळ पंचनामा, मरणोत्तर पंचनामा, फिर्याद, इन्व्केस्ट पंचानामा, शव विच्छेदन अहवाल इत्यादी कागदपत्रासह सह विमा दावादि.29.10.2010 रोजी सामनेवाले क्र.1 कडे दाखल केला. सामनेवाले क्र.1 यांनी सामनेवाले क्र.2 मार्फत सामनेवाले क्र.3 कडे वर्ग केला. परंतु अपूर्ण कागदपत्र म्हणून प्रकरण दि.31.12.2013 रोजी बंद केले.
तक्रारदाराने परत सर्व कागदपत्रासह विमा प्रस्ताव दि.22.11.2013 रोजी सामनेवाले क्र.1 कडे दाखल केला. त्यानंतर दि.28.11.2013 रोजी सामनेवाले क्र.2 कडे त्यानंतर सामनेवाले क्र.3 कडे प्रकरण वर्ग केले. मा. मंचाने यापूर्वीच्या तक्रारीच्या निकालानुसार संपूर्ण कागदपत्रासह प्रस्ताव दिल्यानंतरही तक्रारदाराचा विमा प्रस्ताव मंजूर केला नाही. म्हणून सदर तक्रार पून्हा दाखल केली आहे. तक्रारदाराची मागणी आहे की, विम्याची रककम रु.1,00,000/- व्याजासह, तसेच अर्जाचा खर्च, मानसिक व शारीरिक त्रासाचा खर्च मिळावा.
सामनेवाले क्र.1 हे मंचासमोर हजर झाले व त्यांनी दि.14 अन्वये लेखी म्हणणे दाखल केले आहे. तक्रारदाराने दाखल केलेली मुळ कागदपत्र विमा कंपनीने न स्विकारल्यामुळे जिल्हा अधिक्षक बीड यांनी दि.6..12.2010 रोजी परत केली होती. त्याबाबत तक्रारदारास दि.31.12.2010 रोजीच्या पत्राद्वारे कळविले होते. तक्रार क्र.155/2011 मधील आपले आदेशानुसार दि..22.11.2013 रोजी मुळ विमा दावा सामनेवाले क्र.2 कडे पाठविण्यात आला आहे. सदर प्रकरणात नुकसान भरपाई देण्याची जबाबदारी सामनेवाले क्र.3 यांची आहे त्यामुळे सामनेवाले क्र.1 विरुध्दची तक्रार खारीज करण्यात यावी.
सामनेवाले क्र.2 हे स्वतः मंचासमोर हजर झाले व त्यांनी नि.16 अन्वये आपले लेखी म्हणणे दाखल केले आहे. ते महाराष्ट्र राज्य शासनाला विमा योजना राबवण्यासाठी विना मोबदला सहाय करतात. अपघात दि.12.4.2010 रोजी झाला. जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी बीड मार्फत कबाल औरंगाबाद कार्यालयास दि.15.11.2010 रोजी अपूर्ण सिथतीत प्राप्त झाल्यानंतर तो प्रस्ताव त्यांचे मार्फत सामनेवाले क्र.3 कडे दि.21.12.2010 रोजी पाठविला. सामनेवाले क्र.3 यांनी दि.31.12.2010 रोजीचे पत्रान्प्वये दावा नामंजूर केल्याचे तक्रारदार यांना कळविण्यात आले. त्यानतर परत सामनेवाले क्र.1 यांचे पत्रासह कागदपत्रासोबत प्रस्ताव दि.28.11.2013 रोजी सामनेवाले क्र.2 कडे प्राप्त झाल्यानंतर तो प्रस्ताव सामनेवाले क्र.3 कडे दि.11.12.2013 अन्वये पाठविला. सदर प्रस्ताव सामनेवाले क्र.3 कडे प्रलंबित आहे. त्यांचे सेवेत कोणतीही त्रूटी नसून त्यांचे विरुध्दची तक्रार फेटाळण्यात यावी.
सामनेवाले क्र 3 हे मंचासमोर हजर झाले व त्यांनी आपले लेखी म्हणणे नि.7 अन्वये दाखल केले ओ. तक्रारदाराचे संपूर्ण कागदपत्र आल्याशिवाय व त्यांची श्हानिशा झाल्याशिवाय ते जबाबदारी घेत नाहीत.मा. मंचाचे आदेशानुसार पुन्हाही पूर्ण कागदपत्र मुदतीत दिलेले नाहीत. तक्रारदार हे पून्हा पून्हा तोच दावा दाखल करत आहे जे योग्य नाही. तक्रारदाराचा अर्ज खर्चासह खारीज करण्यात यावा.
तक्रारदाराचे विधीज्ञ श्री.एस.आर.राजपूत व सामनेवाला क्र.3 यांचे विधीज्ञ श्री. व्ही.एस.जाधव यांचा युक्तीवाद ऐकला. त्याच बरोबर तक्रारदार व सामनेवाले यांनी दाखल केलेले कागदपत्रे व शपथपत्र यांचे काळजीपूर्वक अवलोकन केले असता न्याय निर्णयासाठी खालील मुददे उपस्थित होतात.
मुददे उत्तर
1. तक्रारदार यांनी सामनेवाला क्र.1 ते 3 यांनी शेतकरी जनता
अपघात विमा योजने अंतर्गत देय असलेला विमा लाभ रक्कम
न देऊन सेवेत त्रूटी ठेवली आहे, ही बाब तक्रारदार शाबीत करतात
काय ? होय.
2. तक्रारदार ही शेतकरी जनता अपघात विमा योजने अंतर्गत
लाभ् मिळण्यास पात्र आहेत काय ? होय.
3. आदेश काय ? अंतिम आदेशाप्रमाणे.
कारणमिंमासा
मुददा क्र.1 व 2 ः-
तक्रारदार व सामनेवाले यांनी दाखल केलेले शपथपत्र व कागदपत्र याचे अवलोकन कले. तक्रारदार यांचे विधीज्ञ श्री.एस.आर.राजपूत यांनी या मंचाचे लक्ष तक्रारदार यांनी दाखल केलेल्या कागदपत्र म्हणजेच नि.4 वर वेधले. तक्रारदार यांनी असा यूक्तीवाद केला की, तक्रारदार यांचे पती श्री.विक्रम नारायण मूंडे हे दि.12.4.2010 रोजी मयत झाले हाते. त्या अनुषंगाने अज्ञात वाहन चालका विरुध्द कलम 179,304 (ए) भा.द.वि. नुसार केज पोलिस स्टेशन येथे गून्हा क्र.34/2010 नोंदविला आहे. त्यांच बरोबर घटनास्थळ पंचनामा, मरणोत्तर पंचनामा, इन्क्वेस्ट पंचनामा, शव विच्छेदन अहवाल इत्यादी बाबीची पूर्तता केली आहे. त्यानंतर तक्रारदाराने शेतकरी जनता अपघात विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी दि.29.10.2010 रोजी सामनेवाले क्र.1 यांचेकडे प्रस्ताव दाखल कला. परंतु सामनेवाले क्र.3 यांनी अपूर्ण कागदपत्र असल्यामुळे दि.31.12.2013 रोजी प्रस्ताव नामंजूर केला. त्यानंतर तक्रारदाराने या मंचापूढे नुकसान भरपाई मिळण्यासाठी तक्रार दाखल केली होती. ज्यांचा नंबर 155/2011 असा असून, ती दि.8.8.2013 रोजी निकाली काढली आहे. त्या निकालात असा आदेश दिला की, तक्रारदाराने सर्व कागदपत्रासह पून्हा प्रस्ताव सामनेवाले क्र.1 कडे दाखल करावा, त्यांने तो प्रस्ताव सामनेवाले क्र.2 मार्फत सामनेवाले क्र.3 कडे पाठवावा आणि सामनेवाले क्र.3 यांनी त्यांना तो प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर 30 दिवसांत निकाली काढावा.
मंचाचे आदेशनुसार तक्रारदार यांनी दि.22.11.2013 रोजी सर्व आावश्यक त्या कागदपत्रासह प्रस्ताव सामनेवाले क्र.1 यांचेकडे दाखल कला. सामनेवाले 2 यांनी तो प्रस्ताव सामनेवाले क्र.3 यांचेकडे मंजूरीसाठी पाठविला परंतु सामनेवाले क्र.3 यांनी तो प्रस्ताव आजपर्यत निकाली काढला नाही.
सामनेवाले क्र.1 यांनी असा यूक्तीवाद केला की, तक्रारदार यांचे तक्रारीतील मजकूर कार्यालयीन संचिकेप्रमाणे बरोबर असून तो मान्य केला आहे. त्यांच बरोबर तक्रार 155/2011 नुसार तक्रारदार यांचा आलेला प्रसताव स्विकारुन तो प्रस्ताव दि.28.11.2013 रोजी सामनेवाले क्र.2 यांचेकडे पाठविला अशी बाब सामनेवाले क्र.1 यांनी आपले लेखी म्हणण्यात आणि शपथपत्रात मान्य केली आहे.
सामनेवाले क्र.2 यांनी आपले लेखी म्हणण्यात असे कथन केले आहे की, तक्रारदार ही आमची ग्राहक नसून ती सामनेवाले क्र.3 यांची ग्राहक आहे. सामनेवाले क्र.2 हे सदरील विमा योजना राबविण्यासाठी विना मोबदला सहाय करतात. त्यासाठी महाराष्ट्र शासन व शेतकरी यांचेकडून कोणताही मोबदला घेत नाहीत. तक्रार क्र.155/2011 नुसार आलेला तक्रारदार यांचा प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर तो प्रस्ताव सामनेवाले क्र.3 यांना दि.11.12.2013 च्या पत्रानुसार पाठविला असून तो दि.18.12.2013 रोजी सामनेवाले क्र.3 यांना प्राप्त झाला आहे. त्या पत्राची प्रत दाखल करण्यात आली आहे. तो प्रस्ताव सामनेवाले क्र.3 यांचेकडे प्रलंबित आहे. म्हणून सामनेवाले क्र.2 यांनी सेवेत कसूर केला नाही ही बाब सिध्द होते. सदरील प्रस्ताव सामनेवाले क्र.3 यांना प्राप्त झालेला असून आजतागायत त्यावर कोणताही निर्णय घेतलेला नाही.
सामनेवाले क्र.3 यांनी असा यूक्तीवाद केला की, तक्रारदार यांनी मा. मंचाचे आदेशानुसार पून्हा पूर्ण कागदपत्र मुदतीत दिलेले नाहीत. त्यांच बरोबर तक्रारदार हे पून्हा पून्हा तोच दावा दाखल करीत आहेत. जे योग्य नाही. म्हणून तक्रार खारीज करावी अशी मागणी केली आहे.
वर नमूद सर्व बाबीचा विचार केला असता, तक्रारदार यांनी तक्रार क्र.155/2011 नुसार सर्व कागदपत्रासह सामनेवाले क्र.1 यांचेमार्फत प्रस्ताव दाखल करुन तो सध्या सामनेवाले क्र.3 यांचेकडे प्रलंबित आहे. यांचाच अर्थ की, सामनेवाले क्र.3 यांनी तक्रारदारास शेतकरी जनता अपघात विमा योजने अंतर्गत मिळणा-या लाभाच्या सेवेत कसूर केला आहे ही बाब सिध्द होते.
सदरील तक्रारीतील सर्व दस्ताचे अवलोकन केले असता, तक्रारदार यांचे पती व्यवसायाने शेतकरी होते व त्यांचा मृत्यू रोड अपघातात झाला आहे ही बाब सिध्द होते. तसेच त्यांचे नांवे शेत जमिन नोंदवलेली आहे. महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्यातील सर्व शेतक-यासाठी शेतकरी जनता अपघात विमा योजने अंतर्गत विमा पॉलिसी काढलेली आहे. ती विमा पॉलिसी सामनेवाले क्र.3 यांचेकडे काढलेली आहे. तक्रारदार यांनी पूर्नप्रस्ताव व सर्व दस्ताऐवज या मंचाचे आदेशानुसार दाखल करुनही प्रस्ताव मंजूर केला नाही. म्हणून सामनेवाले क्र.3 यांनी दयावयाचे सेवेत कसूर केला आहे ही बाब सिध्द होते. सबब, या मंचाचे मत की, शेतकरी जनता अपघात विमा योजने अंतर्गत रक्कम रु.1,00,000/- सामनेवाले क्र.3 यांचेकडून मिळण्यास तक्रारदार पात्र आहेत. तसेच तक्रारदार यांना सदर तक्रार दाखल करावी लागली त्याबददल जो मानसिक व शारीरिक त्रास झाला त्याबददल रु.3,000/- व तक्रारीच्या खर्चाबददल रु.2,000/- मिळण्यास पात्र आहेत.
मुददा क्र.1 व 2 चे उत्तर होकारार्थी देण्यात येते.
सबब, मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1) तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्यात येत आहे.
2)
3)
4) ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील कलम
20 (3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला परत
करावेत.
श्री.रविंद्र राठोडकर, श्रीमती मंजूषा चितलांगे श्री.विनायक लोंढे
सदस्य सदस्या अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड
जयंत पारवेकर
लघुलेखक