Maharashtra

Parbhani

CC/11/14

Ayodhya Madhukar Thapde - Complainant(s)

Versus

Taluka Krishi Officer,Selu - Opp.Party(s)

Adv.A.D.Khapre

11 Aug 2011

ORDER


District Consumer Court,PARBHANIDistrict Consumer Court ,New Administrative Building,Near Telephone Bhavan PARBHANI
Complaint Case No. CC/11/14
1. Ayodhya Madhukar ThapdeR/o Selwadi Tq. SeluParbhaniMaharashtra ...........Appellant(s)

Versus.
1. Taluka Krishi Officer,SeluKrishi Officer Office,Selu tq.seluParbhaniMaharashtra2. Divisional Manager,AurangbadKabal Insurance Broking Services Pvt.Ltd.Bhakryan HDFC,Home Loan Building Plot No.7 Sequter E-1 Town Centre,Cidco-AurangbadAurangbadMaharashtra3. Manager Relance General Insurance Cop.Ltd.570,Reti Fire House,Wadla West,MumbaiEndhuri Gine Electrical Naygum Croass Road,Next Two Royal Industries Estate,Wadla West,MumbaiMumbaiMaharashtra ...........Respondent(s)



BEFORE:
HONABLE MR. JUSTICE C. B. Pandharpatte ,PRESIDENTHONABLE MRS. Sujata Joshi ,MemberHONABLE MRS. Anita Ostwal ,Member
PRESENT :Adv.A.D.Khapre, Advocate for Complainant

Dated : 11 Aug 2011
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

निकालपत्र

 

                        तक्रार दाखल दिनांकः-  30/12/2010

                                    तक्रार नोदणी दिनांकः- 06/01/2011

                        तक्रार निकाल दिनांकः- 11/08/2011

                                                                                    कालावधी 07 महिने. 04 दिवस.

 

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍यायमंच, परभणी

अध्‍यक्ष -         श्री.चंद्रकात बी. पांढरपट्टे, B.Com.LL.B.

सदस्‍या                                                                                                    सदस्‍या

सुजाता जोशी B.Sc.LL.B.                                                          सौ.अनिता ओस्‍तवाल M.Sc.              

    

          आयोध्‍या भ्र.मधुकर थापडे.                               अर्जदार

वय 34 वर्ष.धंदा.घरकाम.                                  अड.अरुण. डी.खापरे.

रा.सेलवाडी ता.सेलू परभणी.

               विरुध्‍द

1     तालुका कृषी अधिकारी.                                 गैरअर्जदार.                     

      कृषी अधिकारी कार्यालय,सेलू.                     

      ता.सेलू जि.परभणी.     

2     विभागीय व्‍यवस्‍थापक.                                 गैरअर्जदार.

      कबाल इन्‍शुरन्‍स ब्रोकींग सर्व्हिसेस प्रा.लि.

      भास्‍करायन,एच.डी.एफ.सी.होम लोन बिल्‍डींग.

      प्‍लॉट नं.7 सेक्‍टर ई 1, टाउन सेंटर.

      सिडको.औरंगाबाद.

3     व्‍यवस्‍थापक,                                       अड.जी.एच.दोडिया.

      रिलायन्‍स जनरल इन्‍शुरन्‍स कं.लि.

      570,रेटी फायर हाउस,इन्‍दुरी जिन इलेक्‍ट्रीक

      नायगम क्रॉस रोड नेक्‍सट टू रॉयल इंडस्‍ट्रीयल

      इस्‍टेट,वडाळा वेस्‍ट,मुंबई

 

 

                                                   

------------------------------------------------------------------------------------        

     कोरम  -    1)    श्री.सी.बी.पांढरपट्टे.      अध्‍यक्ष.

2)        सौ.सुजाता जोशी.                   सदस्‍या.                                              3)        सौ.अनिता ओस्‍तवाल.                 सदस्‍या.

-------------------------------------------------------------------------------------------------------         

          (  निकालपत्र पारित व्‍दारा श्री.सी.बी.पांढरपट्टे. अध्‍यक्ष.)

 

अर्जदारास शेतकरी अपघात विमा योजना अंतर्गत देण्‍यात येणारी नुकसान भरपाई नाकारुन त्रुटीची सेवा दिल्‍याबद्दल गैरअर्जदारां विरुध्‍द अर्जदाराने ही तक्रार दाखल केली आहे.

अर्जदाराची तक्रार थोडक्‍यात अशी की,

अर्जदार मौजे सेलवाडी ता.सेलू. येथील रहिवासी असून तीचा पती मयत मधुकर बंन्‍सीधर थापडे हा खातेदार शेतकरी होता त्‍याच्‍या मालकीची गट क्रमांक 100  शेतजमिन आहे.

दिनांक 26/11/2008 रोजी मधुकर थापडे मोटार सायकल वरुन जात असतांना समोरुन भरधाव येणा-या ऑटोरिक्षाने धडक दिल्‍याने अपघातात गंभीर जखमी होवुन  त्‍याचा मृत्‍यू झाला. उस्‍मानपुरा पोलिस स्‍टेशनला अपघाताची खबर दिल्‍यावर पोलिसांनी गुन्‍हा नोंदवुन घटनास्‍थळाचा व मरणोत्‍तर पंचनामा केला.व सरकारी दवाखान्‍यात प्रेताचे पोष्‍टमार्टेम केले. त्‍यानंतर अर्जदारने गैरअर्जदार क्रमांक 1 यांच्‍याकडे पतीच्‍या अपघाती मृत्‍यूची शेतकरी विम्‍याची नुकसान भरपाई रुपये एक लाख मिळण्‍यासाठी आवश्‍यक त्‍या कागदपत्रासह 04/05/2009 रोजी  क्‍लेम दाखल केला.त्‍यांनी मंजुरीसाठी गैरअर्जदार क्रमांक 2 कडे पाठवले त्‍यानंतर अर्जदारला गैरअर्जदार क्रमांक 1 ते 3 यांनी क्‍लेम मंजुरी बाबत काहीच कळविले नाही.म्‍हणून गैरअर्जदार क्रमांक 1 यांना समक्ष भेटून चौकशी केली असता त्‍यांनीही प्रतिसाद दिला नाही. अशारीतीने गैरअर्जदारानी सेवा त्रूटी करुन नुकसान भरपाई मिळणे पासून वंचीत ठेवले आहे म्‍हणून अर्जदाराने ग्राहक मंचात प्रस्‍तूतचा तक्रार अर्ज दाखल करुन गैरअर्जदार विमा कंपनीकडून विम्‍याची नुकसान भरपाई रु.1,00,000/- द.सा.द.शे. 18 % व्‍याजासह मिळावी याखेरीज मानसिक त्रासापोटी रुपये 25000/- व तक्रार अर्जाचा खर्च रुपये 5000/- मिळावा अशी मागणी केली आहे.

अर्जदाराने तक्रारीसोबत शपथपत्र (नि.2) आणि पुराव्‍यतील कागदपत्रात नि. 4 लगत एकूण 22 कागदपत्रे दाखल केली आहेत.

तक्रार अर्जावर लेखी म्‍हणणे सादर करण्‍यासाठी गैरअर्जदारांना मंचातर्फे नोटीसा पाठविल्‍यावर गैरअर्जदार क्रमांक 1 ने तारीख 17/02/2011 रोजी लेखी म्‍हणणे नि.10 सादर केले. गैरअर्जदार क्रमांक 2 ने पोष्‍टामार्फता पाठविलेला लेखी जबाब दिनांक 17/02/2011 रोजी प्रकरणात नि.9 ला समाविष्‍ट करण्‍यात आला. गैरअर्जदार क्रमांक 3 ने आपला लेखी जबाब प्रकरणात दिनांक 25/03/2011 रोजी सादर केला ( नि.15) वर समाविष्‍ट केला

नि.10 वरील लेखी जबाबात गैरअर्जदार क्रमांक 1 ने असे म्‍हंटले आहे की,अर्जदारच्‍या माघारी कोणीतरी खोडसाळ वक्‍तीने लेखी स्‍वरुपात अर्जदारचे पती मधुकर थापडे याचे अपघातात निधन झाले त्‍याचे विम्‍या बाबत ग्रा.सं.कायदा अंतर्गत खोटी तक्रार केली असल्‍याचे तारीख 03/02/2011 चे पत्र गैरअर्जदार क्रमांक 1 च्‍या कार्यालयास देवुन त्‍यामध्‍ये अर्जदार अथवा तीचे कुटूंबातील कोणत्‍याही व्‍यक्‍तीने केस केलेली नाही त्‍या  अर्जाची छायाप्रत लेखी जबाबासोबत जोडून प्रकरण निकाली काढावी अशी शेवटी विनंती केली आहे.

गैरअर्जदार क्रमांक 2 ने त्‍यांच्‍या लेखी जबाबात (नि.9) असे निवेदन केले आहे की, शासनातर्फे उतरविलेल्‍या शेतकरी अपघात विमा क्‍लेम मधील कागदपत्रांची छाननी करुन व संबधीताकडून आवश्‍यक ती पूर्तता करुन घेण्‍यासाठी व मंजूरीसाठी विमा कंपनीकडे पाठविण्‍यासाठी शासनाने त्‍याना मध्‍यस्‍थ सल्‍लागार म्‍हणून नेमलेले आहे. त्‍यासाठी महाराष्‍ट्र शासनाकडून ते कोणताही मोबदला घेत नाहीत. किंवा त्‍यांचेकडून विम्‍याचा हप्‍ताही स्विकारला जात नाही.  मयत मधुकर थापडे याच्‍या डेथ क्‍लेमची कागदपत्रे त्‍याना 05.03.2009 रोजी मिळाले परंतु त्‍यामध्‍ये काही आवश्‍यक कागदपत्रे नव्‍हती त्‍या अपू-या कागदपत्रात एफ.आय.आर, इन्‍क्‍वेस्‍ट पंचनामा, पी.एम.रिपोर्ट, बँक पासबुक, फेरफार उतारा, घटनास्‍थळाचा पंचनामाच्‍या सर्टीफाईड कॉपीज नसल्‍यामुळे त्‍याची पूर्तता करण्‍यासाठी अर्जदाराला डि.ए.एस.ओ.परभणी यांना दिनांक 14/12/2009 रोजी कळविले होते त्‍यानंतर तारीख 01.02.2010, तारीख 15.04.2010, रोजी स्‍मरणपत्र पाठविली.त्‍यानंतर कागदपत्रे अपुरी असल्‍याचा शेरा मारुन तो क्‍लेम विमा कंपनीकडे तारीख 21.06.2010 रोजी पाठविला त्‍यानंतरही अर्जदाराकडून कागदपत्रांची पुर्तता न झाल्‍यामुळे तारीख 24/11/2010 च्‍या पत्राने विमा कंपनीने क्‍लेम नामंजूर केला. सबब त्‍याना प्रकरणातून वगळण्‍यात यावे अशी शेवटी विनंती केली आहे.   

लेखी जबाबासोबत विमा कंपनीचे दिनांक तारीख 24.11.2010, चे पत्र वगैरे 08  कागदपत्रे दाखल केली आहेत.

गैरअर्जदार क्रमांक 3 ने आपले लेखी जबाबात ( नि.15) अर्जदाराच्‍या तक्रार अर्जातील सर्व विधाने साफ नाकारुन  मयत मधुकर थापडे  याच्‍या शेतकरी विमा क्‍लेम संबंधी पाठवलेल्‍या कागदपत्रात बरीच कागदपत्रे अपूरी असल्‍यामुळे त्‍याची पूर्तता करण्‍यासाठी गैरअर्जदार क्रमांक 2 यानी अर्जदाराला डी.ए.एस.ओ.मार्फत तारीख 14/12/2009, तारीख 01/02/2010, तारीख 15/04/2010, तारीख 21/06/2010 रोजी  स्‍मरणपत्रे पाठवूनही त्‍याचेकडून कागदपत्रांची पूर्तता झालेली नाही असे कबाल ब्रोकरेज इन्‍शुरंस कंपनी यांचेकडून चौकशीही केली तेव्‍हा समजले आहे. त्‍यानंतर देखील अपु-या कागदपत्रांची पुर्तता केली नसल्‍यामुळे तारीख 24/11/2010 च्‍या पत्राव्‍दारे क्‍लेम नामंजूर केल्‍याचे कळवले. अर्जदाराला ग्राहक मंचास तक्रार करणेस कोणतेही कायदेशीर कारण घडलेले नाही, सबब तक्रार अर्ज फेटाळण्‍यात यावा अशी शेवटी विनंती केली आहे.

लेखी निवेदनाचे पुष्‍टयर्थ गैरअर्जदार क्रमांक 3 चे शपथपत्र (नि. 16) दाखल केले आहे.

पक्षकारांनी दाखल केलेली कागदपत्रे व संबंधीत वकिलांच्‍या युक्‍तीवादावरुन निर्णयासाठी  खालील मुद्दे उपस्थित होतात.

मुद्दे.                                            उत्‍तर.

1     गैरअर्जदार क्रमांक 3 ने  अर्जदाराच्‍या मयत पतीच्‍या अपघाती

      निधनाची विमा नुकसान भरपाई रुपये 1,00,000/- चा क्‍लेम

      बेकायदेशिररित्‍या नामंजूर करुन सेवात्रुटी केली आहे काय ?             होय

2     निर्णय?                                          अंतिम आदेशा प्रमाणे.    

                   कारणे

मुद्या क्रमांक‍ 1 व 2 ः-

अर्जदाराचा पती मयत मधुकर बंन्‍सीधर थापडे रा.सेलवाडी हा शेतकरी अपघात विमा पॉलीसीचा लाभार्थी होता हे अर्जदाराने पुराव्‍यात नि.4 लगत  सादर केलेल्‍या महसूल रेकॉर्डच्‍या कागदपत्रावरुन आणि नि.4/9 वरील विमा क्‍लेमफॉर्म मधील तलाठयाचे प्रमाणपत्रा वरुन शाबीत झाले आहे. दिनांक 26.1.2008  रोजी मयत मधुकर थापडे याचा मोटार सायकल अपघातात मृत्‍यू झाला  होता ही वस्‍तूस्थिती देखील पुराव्‍यात दाखल केलेल्‍या नि. 4/14 वरील उस्‍मानपुरा ( औरंगाबाद) पोलिस स्‍टेशन गु.रजि.नं. 84/08 वरील एफ.आय.आर, नि.4/15 वरील मरणोत्‍तर पंचनामा, नि.4/16 वरील पोस्‍टमार्टेम रिपोर्ट या कागदपत्रातून शाबीत झाले आहे.

मयत मधुकर थापडे हा शेतकरी वैयक्तिक अपघात विम्‍याचा लाभार्थी असल्‍यामुळे त्‍याच्‍या अपघाती मृत्‍यूची नुकसान भरपाई रुपये 1,00,000/- मिळणेसाठी. अर्जदाराने वर नमूद केलेल्‍या आवश्‍यक त्‍या कागदपत्रासह गैरअर्जदार क्रमांक 1 तालुका कृषी अधिकारी सेलू  यांचेकडे नुकसान भरपाई क्‍लेम दाखल केलेला होता व ती कागदपत्रे  गैरअर्जदार क्रमांक 2 ला मिळालेली होती हे गैरअर्जदार क्रमांक 2 ने लेखी जबाबात मान्‍य केलेले आहे.अशी वस्‍तुस्थिती असतांनाही गैरअर्जदार क्रमांक 1 ने सादर केलेल्‍या नि.10 वरील लेखी जबाबासोबत अर्जदारने ग्राहक मंचात पतीच्‍या निधना बद्दलची नुकसान भरपाई मिळाली नाही या बाबतची तक्रार केलेली नाही तीच्‍या माघारी कोणीतरी खोडसाळपणे तक्रार केली असल्‍याचे पत्र तीने ग्राहक मंचाला पाठवुन त्‍याची एकप्रत गैरअर्जदार क्रमांक 2 ला माहिती दिली होती ते पत्र (नि.10/1) गैरअर्जदार क्रमांक 1 ने प्रकरणात दाखल केले आहे याउलट अर्जदाराने स्‍वतः प्रस्‍तुत प्रकरणात तारीख 13/7/2011 रोजी शपथपत्र दाखल करुन तथाकथीत तारीख 03/02/2011 चे पत्र तीने ग्राहक मंचात अथवा कृषी अधिका-याला दिलेले नव्‍हते असे शपथेवर निवेदन केलेले असल्‍यामुळे तथाकथीत संगणकीय टायपिंग केलेले पत्र शंकास्‍पद असल्‍याने विचारात घेता येणार नाही. गैरअर्जदारक क्रमांक 1 कडून गैरअर्जदार क्रमांक 2 कडे विमाक्‍लेम व कागदपत्रे गेल्‍यावर  आणखी काही  कागदपत्रांची आवश्‍यकता होती म्‍हणून गैरअर्जदार क्रमांक  2 यानी वेळोवेळी पाठविलेल्‍या पत्रानुसार व स्‍मरणपत्रातून मागणी केलेल्‍या कागदपत्रांची पुर्तता  अर्जदाराने केलेली होती मात्र अर्जदाराकडून तारीख 15/04/2010 पर्यंत कागदपत्रे न मिळाल्‍याने आवश्‍यक तो शेरा मारुन विमा कंपनीकडे प्रस्‍ताव पाठविलेला होता विमा कंपनीकडे देखील त्‍यानंतर अपु-या कागदपत्रांची पुर्तता झाली नसल्‍याने विमा कंपनीने तारीख 24/11/2010 च्‍या पत्राव्‍दारे (नि.9/7) क्‍लेम नामंजूर केल्‍याचे कळवले होते असे लेखी जबाबामध्‍ये म्‍हंटलेले आहे क्‍लेम नामंजुर करण्‍याचा विमा कंपनीने घेतलेला निर्णय निश्चितपणे चुकीचा होता कारण गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी कागदपत्रे पुर्ततेसाठी शेवटचे तारीख 01/02/2010 रोजी स्‍मरणपत्रे (नि.9/5) पाठविल्‍यावर जिल्‍हा कृषी अधिकारी परभणी यांनी  गैरअर्जदार क्रमांक 2 यांना सर्व कागदपत्राची पुर्तता करुन पुन्‍हा तारीख 10/02/2011 रोजी मयत मधुकर थापडे याचा विमा प्रस्‍ताव पाठवला होता त्‍या कव्‍हरींग लेटरची प्रत (नि.18/1) प्रकरणात अर्जदारने दाखल केलेली आहे. विमा क्‍लेम प्रस्‍ताव सर्व पुर्तता करुन विमा सादर केल्‍यानंतर वास्‍तविक तो मंजूर करणे विमा कंपनीचे कर्तव्‍य होते परंतु त्‍याकडे दुर्लक्ष करुन अर्जदारला नुकसान भरपाई देण्‍यापासून वंचित ठेवले असल्‍याचे पुराव्‍यातून ही बाब  सिध्‍द झालेली  असल्‍यामुळे गैरअर्जदार क्रमांक 2  व 3  यानी कागदपत्रांची  अर्जदाराकडून  पूर्तता   झाली नाही असे खोटे निवेदन  केवळ नुकसान भरपाई देण्‍याचे टाळण्‍यासाठीच केले असले पाहीजे यापेक्षा वेगळा निष्‍कर्ष निघूच शकत नाही. प्रस्‍तूत  प्रकरणात ही आपल्‍या लेखी जबाबात खोटा व चुकीचा बचाव घेवून मंचाची दिशाभूल करण्‍याचा प्रयत्‍न केला आहे असे खेदाने म्‍हणावे लागते.  अर्जदाराने पुराव्‍यात दाखल केले प्रमाणे आवश्‍यक ती सर्व कागदपत्रे क्‍लेम मंजुरीसाठी दिलेली असताना गैरअर्जदार क्रमांक  3 यानी अर्जदाराच्‍या विमा क्‍लेम  तारीख 24/11/2010 च्‍या पत्रातून बेकायदेशिररित्‍या नामंजूर करुन अर्जदाराचे आर्थिक नुकसान करुन तीचेवर अन्‍याय केलेला आहे याबाबतीत गैरअर्जदार क्रमांक 3 कडून निश्चितपणे सेवा त्रूटी झालेली आहे. सबब मुद्या क्रमांक 1 चे उत्‍तर होकारार्थी देवून आम्‍ही खालील प्रमाणे आदेश देत आहोंत.                

                             दे                      

1          अर्जदाराची तक्रार अशंतः मंजूर करण्‍यात येते.

2          गैरअर्जदार क्रमांक 3 यानी अर्जदाराच्‍या मयत  पतीच्‍या  डेथ क्‍लेम ची नुकसान भरपाई रुपये 1,00,000/- ( रुपये एक लाख फक्‍त ) आदेश तारखेपासून  30 दिवसाचे आत द.सा.द.शे. 9 %  दराने मंचात प्रकरण दाखल तारखे पासून म्‍हणजे दिनांक 06.01.2011 पासून व्‍याजासह द्यावी.

3     याखेरीज मानसिक त्रास व सेवा त्रूटीबद्यल रुपये 1000/- व अर्जाचा खर्च रुपये 1000/- आदेश मुदतीत द्यावा.

4     पक्षकाराना आदेशाच्‍या प्रती मोफत पुरवाव्‍यात.  

 

 

 

 

सौ. अनिता ओस्‍तवाल              सौ.सुजाता जोशी        श्री. सी.बी. पांढरपटटे

     सदस्‍या                        सदस्‍या                  अध्‍यक्ष

 

 


[HONABLE MRS. Sujata Joshi] Member[HONABLE MR. JUSTICE C. B. Pandharpatte] PRESIDENT[HONABLE MRS. Anita Ostwal] Member