Maharashtra

Beed

CC/12/52

Achut Pandurang Ghodke - Complainant(s)

Versus

Taluka Krishi Adhikari - Opp.Party(s)

Rajput

20 Jun 2013

ORDER

 
Complaint Case No. CC/12/52
 
1. Achut Pandurang Ghodke
Shurur Ghat Tq.Kej
Beed
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Taluka Krishi Adhikari
kej Tq.Kej
Beed
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MRS. Neelima Sant PRESIDENT
 HON'ABLE MRS. Madhuri Vishwarupe MEMBER
 
PRESENT:
 
ORDER

निकाल
दिनांक- 20.06.2013
(द्वारा- श्रीमती माधुरी विश्‍वरुपे, सदस्‍य)
तक्रारदारांची तक्रार थोडक्‍यात खालीलप्रमाणे आहे.
तक्रारदारांचे पती श्री.पांडूरंग किसन घोडके हे शेतकरी असून त्‍यांचे मालकीची शेतजमीन मौजे शिरुर (घाट) ता.केज जि.बीड येथे असून शेती करुन उपजिवीका करत होते. दुर्दैवाने दि.14.02.10 रोजी झालेल्‍या ट्रकच्‍या अपघातात मृत्‍यू पावले. सदर अपघाताची माहिती पोलीस स्‍टेशन वाळूज यांना मिळाल्‍यानंतर पोलीसांनी एफ.आय.आर.ची नोंद केली. तसेच घटनास्‍थळ पंचनामा, मरणोत्‍तर पंचनामा केला. मयताचे प्रेत पोस्‍टमार्टमसाठी पाठवले.

 

तक्रारदारांनी पतीच्‍या मृत्‍यूनंतर शेतकरी व्‍यक्‍तीगत अपघात विमा योजनेअंतर्गत विमा प्रस्‍ताव गैरअर्जदार क्र.1 यांचेकडे आवश्‍यक कागदपत्रांसहीत दि.12.11.10 रोजी पाठवला. गैरअर्जदार क्र.3 यांनी दि.31.12.10 च्‍या पत्रानुसार प्रस्‍ताव नामंजूर केला. तक्रारदारांनी प्रस्‍तावाबाबत पुर्नविचार करण्‍यासाठी दि.02.09.11 रोजी कृषी आयुक्‍त्‍, पुणे यांचेकडे दाखल केला असता दि.16.09.11 रोजीच्‍या पत्रान्‍वये विमा कंपनीने चुकीचे कारण दाखवून दावा नामंजूर केला असल्‍यामुळे न्‍यायमंचात तक्रार दाखल करण्‍याबाबत निर्देश दिले अशी तक्रारदारांची तक्रार आहे.

गैरअर्जदार क्र.1 यांच्‍या लेखी म्‍हणण्‍यानुसार तक्रारदारांचा विमा प्रसताव दि.12.11.10 रोजी प्राप्‍त झाल्‍यानंतर त्‍याच दिवशी म्‍हणजे दि.12.11.10 रोजी जा.क्र.1981 अन्‍वये गैरअर्जदार क्र.2 यांचेकडे पाठवला. अशा प्रकारे तक्रारदारांनी विमा प्रस्‍ताव मुदतीत गैरअर्जदार क्र.2 यांचेकडे पाठवला आहे.

 

(3) त.क्र.52/12

गैरअर्जदार क्र.2 यांचे लेखी म्‍हणण्‍यानुसार तक्रारदारांचा विमा प्रस्‍ताव दि.18.11.10 रोजी प्राप्‍त झाला. सदर प्रस्‍तावामध्‍ये तक्रारदारांनी अपूर्ण कागदपत्रांची पुर्तता न केल्‍यामुळे “अपूर्ण प्रस्‍ताव” शे-यासह गैरअर्जदार क्र.3 विमा कंपनीकडे दि.31.12.10 रोजी पाठवला. त्‍यानंतर दि.19.01.11 व 01.02.11 रोजी वरील कागदपत्रे प्राप्‍त झाल्‍यामुळे गेरअर्जदार क्र.3 यांचेकडे पाठवली तसेच विमा प्रस्‍तावामध्‍ये पूर्ण कागदपत्रे असल्‍याबाबत कळवले.

गैरअर्जदार क्र.3 यांचे लेखी म्‍हणण्‍यानुसार गैरअर्जदार क्र.3 यांनी तक्रारदारांचा प्रस्‍ताव अपूर्ण कागदपत्रांच्‍या कारणास्‍तव दि.31.12.10 रोजी नामंजूर केला.

तक्रारदारांची तक्रार, दाखल कागदपत्र, गैरअर्जदार क्र.1 ते 3 यांचे लेखी म्‍हणणे व दाखल कागदपत्र यांचे सखोल वाचन केले. तसेच तक्रारदाराचे विद्वान वकील श्री.राजपूत आणि गैरअर्जदार क्र.3 यांचे विद्वान वकील श्री.कुलकर्णी यांचा युक्‍तीवाद ऐकला.

तक्रारीतील कागदपत्रे पाहता तक्रारदारांनी शेतकरी व्‍यक्‍तीगत अपघात विमा योजनेअंतर्गत शासनाच्‍या परिपत्रकातील निर्देशानुसार विहीत मुदतीत विमा प्रस्‍ताव गैरअर्जदार क्र.1 यांचेकडे दाखल केला आहे. तसेच गैरअर्जदार क्र.2 कबाल इन्‍शुरन्‍स यांचे लेखी म्‍हणण्‍यानुसार प्रस्‍तावातील अपूर्ण कागदपत्रांची पुर्तता केली आहे. कागदपत्रांची पुर्तता झाल्‍यानंतर दि.19.01.11 व 01.02.11 रोजी गैरअर्जदार क्र.3 विमा कंपनीकडे पाठविल्‍याचे यावरुन स्‍पष्‍ट होते. परंतू त्‍यापूर्वी दि.31.12.10 रोजी गैरअर्जदार क्र.3 विमा कंपनीने तक्रारदारांचा प्रस्‍ताव अपूर्ण कागदपत्राच्‍या कारणास्‍तव नामंजूर केला. अशा परिस्थितीत तक्रारदारांचा प्रस्‍ताव गुणवत्‍तेवर निकाली न होता तांत्रिक मुद्यावर म्‍हणजेच अपूर्ण कागदपत्रांच्‍या कारणास्‍तव नामंजूर झाल्‍याचे दिसून येते.

शासनाने सदरची योजना शेतक-यांकरीता कल्‍याणकारी योजना राबवलेली असून तांत्रिक कारणास्‍तव प्रस्‍ताव नामंजूर करणे उचित नाही. गैरअर्जदार क्र.3 विमा कंपनीची सदरची कृती सेवेतील त्रुटी असल्‍याचे स्‍पष्‍ट होते असे न्‍यायमंचाचे मत आहे.

तक्रारीतील दाखल पुराव्‍यानुसार तक्रारदारांचे पती शेतकरी असून अपघातात मृत्‍यू पावल्‍याचे स्‍पष्‍ट होते. अशा परिस्थितीत तक्रारदार सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्‍यास
(4) त.क्र.52/12

पात्र असल्‍याचे दिसून येते. त्‍यामुळे गैरअर्जदार क्र.3 विमा कंपनीने तक्रारदारांना सदर योजनेअंतर्गत देय असलेली नुकसान भरपाईची रक्‍कम रु.1,00,000/- देणे न्‍यायोचित होईल असे न्‍यायमंचाचे मत आहे.

सबब, न्‍यायमंच खालीलप्रमाणे आदेश देत आहे.
आदेश 1) गैरअर्जदार क्र.3 विमा कंपनीला आदेश देण्‍यात येतो की, तक्रारदारांना
शेतकरी व्‍यक्‍तीगत अपघात विमा योजनेअंतर्गत नुकसान भरपाई रक्‍कम रु.1,00,000/- (अक्षरी रु.एक लाख) आदेश मिळाल्‍यापासून 30 दिवसात देण्‍यात यावी.
2) वरील आदेश क्र.1 मध्‍ये नमुद केलेली रक्‍कम विहीत मुदतीत अदा न केल्‍यास 9% व्‍याजदरासहीत द्यावी.
3) ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील कलम 20 (3) प्रमाणे तक्रारीतील सदस्‍यांचे संच तक्रारदाराला परत करावेत.

 

श्रीमती माधूरी विश्‍वरुपे, श्रीमती नीलि‍मा संत,
सदस्‍य अध्‍यक्ष
जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड
 

 
 
[HON'ABLE MRS. Neelima Sant]
PRESIDENT
 
[HON'ABLE MRS. Madhuri Vishwarupe]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.