Maharashtra

Beed

CC/12/8

Sunita Devida Rathod - Complainant(s)

Versus

Taluka Krishi Adhikari Majalgaon and Others - Opp.Party(s)

Adv V.B.Wadmare

06 Aug 2013

ORDER

 
Complaint Case No. CC/12/8
 
1. Sunita Devida Rathod
Nitrud Ta Majalgaon Dist Beed
Beed
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Taluka Krishi Adhikari Majalgaon and Others
Majalgaon
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MR. Vinayak Raoji Londhe PRESIDENT
 HON'ABLE MRS. Smt.Manjusha Chitlange MEMBER
 
PRESENT:
 
ORDER
                            निकाल
                      दिनांक- 06.08.2013
                  (द्वारा- श्री.विनायक लोंढे, अध्‍यक्ष)
 
            तक्रारदार सुनिता देविदास राठोड यांनी सदरील तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 अनवये दाखल केली आहे.
            तक्रारदार यांची तक्रार थोडक्‍यात खालील प्रमाणे, तक्रारदाराचे पती देविदास भिमा राठोड यांचा मृत्‍यू दि.10.06.2010 रोजी घाटसावळी मार्ग ढेकणपमोहा येथून पाहूण्‍याकडे जात असतांना मैंदा शिवारातील लहान पुलावर एक अँपेरिक्षाने तक्रारदार बसलेल्‍या मोटार सायकलला जोराची धडक दिल्‍यामुळे झाला. घटनेची फिर्याद पिंपळनेर पोलिस स्‍टेशनला देण्‍यात आली. पोलिसांनी घटनेची चौकशी करुन मृत्‍युची नोंद केली. पोलिसांनी मयत व्‍यक्‍तीचा पंचनामा करुन शव शवविच्‍छेदनासाठी वैद्यकीय अधिका-याकडे सुपूर्द केले. साक्षीदारांच्‍या सहया घेऊन मयताचे शव अंत्‍यसंस्‍कारासाठी तक्रारदाराकडे दिले.
            तक्रारीसोबत फिर्याद, घटनास्‍थळांचा पंचनामा,मरणोत्‍तर पंचनामा, शवविच्‍छेदन पावती दाखल केली आहे. तक्रारदार यांचे पूढील कथन की, त्‍यांचे पती हे व्‍यवसायाने शेतकरी होते. महाराष्‍ट्र शासनाने महाराष्‍ट्रातील सर्व शेतक-यासाठी शेतकरी व्‍यक्‍तीगत अपघात विमा योजना राबविली होती.सदर योजने अंतर्गत सर्व शेतक-यांचा विमा काढला आहे. त्‍यांची अंमलबजावणी शासना मार्फत संबंधीत तालुका कृषी अधिकारी यांचे मार्फत युनायटेड इंडिया इन्‍शुरन्‍स कंपनी यांचे संयूक्‍त विद्यमाने अंमलबजावणी केली जात आहे. तक्रारदार यांचे कथन की, त्‍यांचे पती अपघातात मयत झाल्‍यानंतर त्‍यांनी सामनेवाले क्र.1 यांचेकडे विमा योजने अंतर्गत नुकसान भरपाई मिळण्‍यासाठी ज्‍या ज्‍या कागदपत्रांची आवश्‍यकता होती ते जोडून रितसर अर्ज दि.16.08.2011 रोजी दाखल केला. मयत हे शेतकरी असल्‍याबददल गट क्रं.1078 अ चा 7/12, 8-अ, 6 क तलाठी प्रमाणपत्र दाखल केले आहे. तक्रारदार सदर विमा दावसा तालुका कृषी अधिकारी यांच्‍या मार्फत सर्व कागदपत्रे सांक्षाकिंत करुन सामनेवाले क्र.1 ते 3 यांच्‍याकडे पाठविण्‍यात आलेला आहे. सदरील विमा दावा सामनेवाले क्र.1 ते 3 यांनी अद्यापपर्यत मंजूर केलेला नाही. विमा दावा मंजूर न करुन सामनेवाले क्र.1 ते 3 यांनी सेवेत त्रूटी केली आहे. सबब, तक्रारदार यांची विनंती की, विमा अंतर्गत रक्‍कम रु.1,00,000/-व त्‍यावर 18 टक्‍के व्‍याज देण्‍या बाबत सामनेवाले यांना निर्देश देण्‍यात यावेत. तसेच तक्रारदाराला झालेल्‍या मानसिक त्रासापोटी रक्‍कम रु.5,000/- व खर्चापोटी रक्‍कम व रु.2,000/- देण्‍याचे आदेश निर्गमित करण्‍यात यावेत.
            सामनेवाले क्र.1 यांनी हजर होऊन दि.14.02.2012 रोजी त्‍यांचा लेखी जवाब दाखल केला आहे. तक्रारदार यांचा शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत विमा दावा अर्ज दि.16.08.2011 रोजी प्राप्‍त झाले. पत्र क्र.1964 दि.16.08.2011 अन्‍वये अ.क्र.1 ते 8 प्रमाणे कागदपत्रांच्‍या त्रुटी असल्‍याबाबत तक्रारदारास कळविले आहे.तक्रारदार यांनी त्‍या त्रूटी बाबत अद्यापपर्यत काहीच कार्यवाही केली नाही. अपघात दि.10.06.2010 रोजी घडला आहे. विम्‍याचा कालावधी दि.15.08.2009 ते 14.08.2010 असा आहे. वर्ष संपल्‍यानंतर 90 दिवसांचे आंत म्‍हणजेच दि.15.11.2010 च्‍या आंत दावा कार्यालयात सादर करणे आवश्‍यक आहे. प्रस्‍ताव दि.16.08.2011 रोजी प्राप्‍त झाला त्‍यामुळे तो कालबाहय झाला आहे. तक्रारदारांचा अर्ज नामंजूर करण्‍यात यावा अशी विनंती केली आहे.
            सामनेवाले क्र.2 हे हजर होऊन त्‍यांनी दि.14.03.2012 रोजी त्‍यांचे लेखी म्‍हणणे दाखल केले आहे. तक्रारदाराने हे सिध्‍द करावे की, मयत देविदास हा शेतकरी होता.तक्रारदाराने हे सिध्‍द करावे की, त्‍यांचा पतीचा मृत्‍यू हा मोटार सायकल अपघातामध्‍ये झालेला आहे. तक्रारदार यांनी सर्व आवश्‍यक कागदपत्रासह वेळेत दावा दाखल केलेला नाही. कंपनीने तक्रारदारांचा विमा दावा नामंजूर केलेला नाही. विमा कालावधी संपल्‍यानंतर 90 दिवसांचे आंत विमा दावा दाखल करणे आवश्‍यक आहे, परंतु तक्रारदाराने उशिराने विमा दावा दाखल केला आहे. विमा कंपनी ही अटी व शर्तीनुसारच काम करीत असते. शेतक-यांने कोणताही विमा हप्‍ता भरलेला नाही त्‍यामुळे तो विमा कंपनीचा सरळ ग्राहक नाही.त्‍यांमुळे त्‍यांना विमा दावा मागण्‍याचा अधिकार नाही.तक्रारदारांचे पती कडे वाहन चालवित असताना वैध ड्रायव्‍हींग लायसन्‍स नव्‍हते.तक्रारदाराचे पती हे निष्‍काळजीपणाने वाहन चालवित होते त्‍यामुळे त्‍यांचा अपघात झाला व ते मयत झाले.तक्रारदार यांना तक्रारदार दाखल करण्‍यास कोणतेही कारण घडलेले नाही.तक्रारदाराची तक्रार कालमर्यादत दाखल नाही. विमा कंपनीने विमा दावा मंजूर न करुन कोणतीही सेवेत त्रूटी केलेली नाही. म्‍हणून तक्रारदाराची तक्रार खर्चासह नामंजूर करण्‍यात यावी.
             तक्रारदार यांनी तक्रारीसोबत त्‍यांचे शपथपत्र, फिर्याद, शवविच्‍छेदन अहवाल, 7/12, घटनास्‍थळ पंचनामा,तालुका कृषी अधिकारी यांना विमा दावा पाठविल्‍याची पोस्‍टाची प्रत, गावचा नमुना नं.8-अ चा उतारा,फेरफार रजिस्‍ट्रर, गाव नमुना 8-अ,मयताचे ड्रायव्‍हींग लायसन्‍स, मयताचे भारत निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, तक्रारदाराचा लेखी युक्‍तीवाद इत्‍यादी कागदपत्राच्‍या झेरॉक्‍स प्रती दाखल केल्‍या आहेत.सामनेवाले क्र.2 यांनी लेखी म्‍हणण्‍याच्‍या पृष्‍टयर्थ गणेश विठठलराव गुजंर यांचे शपथपत्र दाखल केले आहे.
            तक्रारदार यांची तक्रार, शपथपत्र व दाखल कागदपत्र, सामनेवाला क्र.1 2 व 3 चे यांचे लेखी म्‍हणणे,सामनेवाले क्र.2 चे शपथपत्र यांचे बारकाईने अवलोकन केले असता खालील मुददे उपस्थित होतात.
                  मुददे                                         उत्‍तर
1.     सामनेवाले यांनी तक्रारदार यांना त्रुटीची सेवा दिली आहे काय ?      नाही.  
2.    तक्रारदार हे सामनेवाले यांचेकडून नुकसान भरपाई
      मिळण्‍यास पात्र आहेत काय ?                                नाही.  
3.    काय आदेश ?                                   अंतिम आदेशाप्रमाणे
                              कारणमिंमासा
मुददा क्र.1 ते 3 ः-
            तक्रारदार यांचे वकील श्री. वडमारे यांनी युक्‍तीवादात सांगितले की, तक्रारदार यांनी सामनेवाले क्र.1 तालुका कृषी अधिकारी यांचेकडे शेतकरी व्‍यक्‍तीगत अपघात विमा योजने अंतर्गत विमा दावा रक्‍कम मिळण्‍यासाठी सर्व कागदपत्र सांक्षाकिंत करुन पाठविला आहे. परंतु सामनेवाले क्र.1 ते 3 यांनी अद्यापपावेतो तक्रारदार यांचा दावा मंजूर केलेला नाही. सामनेवाले यांनी सेवेत त्रूटी केली आहे.
            सामनेवाला यांचे कथन की, तक्रारदार यांनी शेतकरी व्‍यक्‍तीगत अपघात विमा योजने अंतर्गत मागणीचा अर्जच दाखल केलेला नाही. शेतकरी व्‍यक्‍तीगत अपघात विमा योजने अंतर्गत विमा मिळणे कामी तक्रारदार यांनी तालुका कृषी अधिकारी यांचेकडे रितसर अर्ज देऊन त्‍यासोबत सर्व विहीत कागदपत्र जोडल्‍यानंतर तालुका कृषी अधिकारी तो प्रस्‍ताव सामनेवाले क्र.3 कबाल इन्‍शुरन्‍स ब्रोकींग सर्व्‍हीस यांचेकडे पाठवितात. अर्जासोबत जोडलेल्‍या कागदपत्रांची शहानिशा करुन प्रस्‍ताव पुर्ण असल्‍यास सदर प्रस्‍ताव व कागदपत्र इन्‍शुरन्‍स कंपनी म्‍हणजेच सामनेवाले क्र.2 कडे पाठवितात.
            सामनेवाले क्र.1 यांचा जवाब व पुरावा पाहता असे निदर्शनास येते की, तक्रारदार सुनिता देविदास राठोड यांनी दि.16.08.2011 रोजी पोस्‍टा मार्फत अर्ज पाठविला होता. सदरील प्रस्‍तावात कागदपत्रात त्रुटी असल्‍याबाबत कळविले आहे. तक्रारदार यांनी कळवूनही आजपर्यत संबंधीत कागदपत्र दाखल केलेले नाहीत. त्‍यामुळे सदरील प्रस्‍ताव पुढे पाठवता आला नाही. सामनेवाले क्र.2 यांचा पुरावा पाहता त्‍यांना तक्रारदार यांचा प्रस्‍तावच मिळाला नाही असे निदर्शनास येते. सामनेवाले क्र.3 यांचेकडेही तो प्रस्‍ताव प्राप्‍त न झाल्‍यामुळे तो पुढील कार्यवाहीसाठी अग्रेषित केला नाही. वर नमुद केलेल्‍या पुराव्‍याचा विचार करता तक्रारदार यांनी आवश्‍यक त्‍या कागदपत्राची पुर्तता न केल्‍यामुळे तालुका कृषी अधिकारी यांनी तो प्रस्‍ताव पुढे पाठविला नाही. तसेच तक्रारदार यांनी कागदपत्राची पुर्तता करणेकामी कळवूनही त्‍यांनी पुर्तता केली नाही. सबब, सामनेवाला यांनी सेवा देण्‍यामध्‍ये त्रुटी केली आहे ही बाब सिध्‍द होत नाही. तक्रारदार यांचेही कायदे अंतर्गत कर्तव्‍य आहे की, प्रस्‍तावासोबत आवश्‍यक ते कागदपत्र जोडणे व मागणी केल असता त्‍यांची पुर्तता करणे परंतु तक्रारदार यांनी कागदपत्राची पुर्तता न केल्‍यामुळे प्रस्‍ताव पुढे पाठवता आला नाही.
            वर नमुद केलेला पुरावा व संपुर्ण कागदपत्र यांचे अवलोकन केले असता, सामनेवाला यांनी तक्रारदार यांना सेवा देण्‍यास त्रुटी केली आहे ही बाब सिध्‍द होत नाही. तसेच शासनाचे शेतकरी व्‍यक्‍तीगत अपघात विमा योजने अंतर्गत जी योजना आहे ती शेतक-याच्‍या हितासाठी आहे व अशा परिस्थितीमध्‍ये तक्रारदार यांनी सामनेवाला यांचेकडे पुन्‍हा प्रस्‍ताव दाखल करण्‍यास परवानगी दिल्‍यास सामनेवाले यांचे कोणतेही नुकसान होणार नाही. तक्रारदार यांनी सामनेवाला क्र.1 तालुका कृषी अधिकारी यांचेकडे आवश्‍यक त्‍या सर्व कागदपत्राची पुर्तता करावी व सामनेवाले क्र.1 यांनी तो प्रस्‍ताव पुढील कार्यवाहीसाठी कबाल इन्‍शुरन्‍स म्‍हणजे सामनेवाले क्र.3 मार्फत सामनेवाले क्र.2 विमा कंपनीकडे पाठवावा व इन्‍शुरन्‍स कंपनीने योग्‍य निर्णय घ्‍यावा, तक्रारदार यांना तो निर्णय मान्‍य नसल्‍यास त्‍यांना मंचामध्‍ये सामनेवाले यांचे विरुध्‍द तक्रार करण्‍याचा हक्‍क राहील असे मंचाचे मत आहे.
            सबब, मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करत आहे.
         आदेश
.1     तक्रारदाराची तक्रार नामंजूर करण्‍यात येते.
 2.   तक्रारदार यांना आदेश देण्‍यात येतो की त्‍यांनी सामनेवाला क्र.1 कडे
      आवश्‍यक त्‍या सर्व कागदपत्राची पुर्तता करावी व सामनेवाले क्र.1 यांनी
      तो प्रस्‍ताव पुढील कार्यवाहीसाठी कबाल इन्‍शुरन्‍स कंपनी मार्फत
      सामनेवाले क्र.2 विमा कंपनीकडे पाठवावा व इन्‍शुरन्‍स कंपनीने प्रस्‍ताव   
      मिळाल्‍यापासून 30 दिवसांचे आंत त्‍यावर निर्णय घ्‍यावा.
3.    खर्चाबददल आदेश नाही.
      4.    ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील कलम 20
                       (3) प्रमाणे तक्रारीतील सदस्‍यांचे संच तक्रारदाराला परत करावेत.
 
 
 
                       श्रीमती मंजुषा चितलांगे             श्री.विनायक लोंढे                                      
                                सदस्‍य                    अध्‍यक्ष     

                                       जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड    

 
 
[HON'ABLE MR. Vinayak Raoji Londhe]
PRESIDENT
 
[HON'ABLE MRS. Smt.Manjusha Chitlange]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.