Maharashtra

Parbhani

CC/12/12

Vimalbai Baberao Mutkule - Complainant(s)

Versus

Taluka Krashi Officer,Jintur and other 03 - Opp.Party(s)

Adv.Arun Dinkarrao Khapre

04 Jul 2012

ORDER

 
Complaint Case No. CC/12/12
 
1. Vimalbai Baberao Mutkule
R/o Vassa Tq. Jintur
Parbhani
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Taluka Krashi Officer,Jintur and other 03
Taluka Krashi Office,Jintur
Parbhani
Maharashtra
2. Divisional Manager,Aurangbad
Kabal Insurance Broking Services Pvt.Ltd.HDFC Home Loane Building Ploat no.7 Seq.E-1 town centre cidco Aurangbad
Parbhani
Maharashtra
3. Branch Manager,Parbhani
United India Insurance Comp.Ltd.Dayawan Complex,Parbhani
Parbhani
Maharashtra
4. United India Insurance Company Limited,Mandale Office,no.02
Ambheka House Shankar Nagar Chowk Nagapur-10
Nagapur
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HONABLE MR. C. B. Pandharpatte PRESIDENT
 HON'ABLE MS. Shrimati Suwarna Deshmukh MEMBER
 
PRESENT:
 
ORDER

 

निकालपत्र

 

                        तक्रार दाखल दिनांकः-  31/12/2011

                        तक्रार नोदणी दिनांकः- 04/01/2012

                        तक्रार निकाल दिनांकः-  04 /07/2012

                                                                                    कालावधी 06 महिने.

 

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी

अध्यक्ष -         श्री.चंद्रकांत बी. पांढरपट्टे, B.Com.L

                    सदस्या-           सौ.सुवर्णा देशमुख.              

--------------------------------------------------------------------------------------------

          विमलबाई भ्र.बाबाराव मुटकुळे                                               अर्जदार

वय 42 वर्ष.धंदा. घरकाम                                       अड.ए.डी.खापरे

रा.वस्‍सा, ता.सेलू जि.परभणी.     

               विरुध्‍द

1     तालुका कृषी अधिकारी,                                            गैरअर्जदार                    

      तालुका कृषी कार्यालय, जिंतुर,                                                   स्‍वतः

      ता.जिंतुर, जि.परभणी.

2     विभागीय व्‍यवस्‍थापक.                                       स्‍वतः

      कबाल इन्‍शुरन्‍स ब्रोकिंग सर्व्हिसेस प्रा.लि.

      भास्‍करायन,एच.डी.एफ.सी.होम लोन बिल्‍डींग

      प्‍लॉट नं. 7 सेक्‍टर ई 1, टाउन सेंटर

      सिडको,औरंगाबाद.

3     शाखा व्‍यवस्‍थापक,                                                   अड.रवि गायकवाड.

      युनायटेड इंडीया इन्‍शुरन्‍स कं.लि.

      दयावान कॉम्‍प्‍लेक्‍स परभणी.

4     युनायटेड इंडीया इन्‍शुरन्‍स कं.लि.                                         --“--

      मंडळ कार्यालय, क्रं.2 अंबिका हाउस.

      शंकर नगर चौक,नागपूर 440010

                                                

 

                                                 

------------------------------------------------------------------------------------        

     कोरम  -    1)    श्री.सी.बी.पांढरपट्टे.      अध्‍यक्ष.

2)        सौ.सुवर्णा देशमुख              सदस्‍या.

-------------------------------------------------------------------------------------------------------

         

          (  निकालपत्र पारित व्‍दारा श्री.सी.बी.पांढरपट्टे. अध्‍यक्ष.)

                 

               शासनातर्फे उतरविलेल्‍या शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत देय  नुकसान भरपाई मयत शेतक-याच्‍या वारसास देण्‍याचे विमा कंपनीने नाकारुन त्रूटीची सेवा दिली म्‍हणून अर्जदाराने ही तक्रार दाखल केली आहे.

            अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी की,  अर्जदार मौजे वस्‍सा, ता.जिंतुर, जि. परभणी येथील रहिवाशी आहे. महाराष्‍ट्र शासनाने राज्‍यातील संपूर्ण खातेदार शेतक-यांचा गैरअर्जदार क्रमांक 4 यांनी पुरस्‍कृत केलेल्‍या शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत विमा उतरविलेला होता. त्‍या पॉलीसीचा अर्जदारचा मयत पती बाबाराव विश्‍वनाथ मुटकुळे हा देखील लाभार्थी होता. तारीख 02/07/2010  रोजी मयत बाबारावचा मुसळधार पाउस झाल्‍यामुळे शेतातुन घरी येत असतांना ओढयामध्‍ये वाहुन गेल्‍यामुळे अपघाती मृत्‍यू झाला. जिंतुर पोलिस स्‍टेशनला अपघाती मृत्‍यूची नोंद झाली. पोलिसांनी घटनास्‍थळाचा पंचनामा करुन पोस्‍टमार्टेमसाठी शव तेथील सरकारी दवाखान्‍यात पाठवले. अर्जदारने त्‍यानंतर गैरअर्जदार क्रमांक 4 कडून नुकसान भरपाई मिळण्‍यासाठी क्‍लेमफॉर्मसह आवश्‍यक ती सर्व कागदपत्रे दिनांक 29/11/2010 रोजी गैरअर्जदार क्रमांक 1 कडे दिली  होती. त्‍यानंतर त्‍यांनी जिल्‍हा क़षी अधिकारी यांच्‍याकडे कागदपत्रे पाठवली, जिल्‍हा कृषी अधिकारी यांनी गैरअर्जदार क्र.3 कडे मंजुरीसाठी कागदपञे पाठविली असल्‍याचे अर्जदारास कळविले होते.  परंतु क्‍लेम मंजुरी अथवा नामंजुरीबाबत एकाही गैरअर्जदाराकडुन अर्जदारास वेळोवेळी चौकशी करण्‍यासाठी गेला असता सांगितले गेले नाही म्‍हणुन त्‍याची कायदेशीर दाद मिळण्‍यासाठी ग्राहक मंचात प्रस्‍तुतचा तक्रार अर्ज दाखल करुन नुकसान भरपाई रु.1,00,000/- द.सा.द.शे. 18 टक्‍के व्‍याजासह मिळावी याखेरिज मानसिक त्रासापोटी रु.25,000/- आणि अर्जाचा खर्च रु.5,000/- मिळावा अशी मागणी केलेली आहे.

तक्रार अर्जाचे पुष्टयर्थ अर्जदाराने आपले शपथपत्र ( नि. 2)  पुराव्यातील कागदपत्रात नि. 4 लगत एकूण  21  कागदपत्रांच्‍या छायाप्रती दाखल केलेल्‍या आहेत.

      तक्रार अर्जावर लेखी म्‍हणणे सादर करण्‍यासाठी गैरअर्जदारांना मंचातर्फे नोटीसा पाठविल्‍यावर गैरअर्जदार क्रमांक 1 ने नोटीस स्‍वीकारूनही नेमल्‍या तारखेस मंचापुढे हजर  राहुन आपले लेखी म्‍हणणे सादर न केल्‍यामुळे त्‍याचेविरूध्‍द तारीख 10.04.12 रोजी एकतर्फा आदेश पारीत करण्‍यात आला. गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी पोष्‍टाव्‍दारे आपले लेखी म्‍हणणे मंचाकडे पाठविले होते ते दिनांक 10.02.2012 रोजी प्रकरणात नि. 9 ला समाविष्‍ठ केले. गैरअर्जदार क्रमांक 3 व 4 यांनी एकञीतपणे आपला लेखी जबाब (नि.14) तारीख 06/03/2012 रोजी सादर केला.           

गैरअर्जदार क्रमांक 2 यानी आपल्‍या लेखी जबाबात (नि.9) असे निवेदन केले आहे की, शासनातर्फे उतरविलेल्‍या शेतकरी अपघात विमा नुकसान भरपाई दावा क्‍लेम संदर्भातील कागदपत्राची विमा कंपनीकडे आवश्‍यक ती पूर्तता व छाननी करण्‍यासाठी शासनाने त्‍याना मध्‍यस्‍थ सल्‍लागार म्‍हणून नेमलेले आहे त्‍यासाठी महाराष्‍ट्र शासनाकडून कोणताही मोबदला घेत नाहीत किंवा त्‍यांचेकडून विम्‍याचा हप्‍ताही स्विकारला जात नाही. मयत बाबाराव विश्‍वनाथ मुटकुळे, रा.वस्‍सा याच्‍या डेथक्‍लेमची कागदपत्रे त्‍यांना तारीख 22/12/2010 रोजी प्राप्‍त झाली होती परंतु पॉलिसी नियमाप्रमाणे सदरचा क्‍लेम 90 दिवसांच्‍या आत सादर करणे आवश्‍यक होते. अर्जदाराचा क्‍लेम तारीख 14/11/2010 पर्यंत दाखल व्‍हावयास पाहिजे होता परंतु तो उशिरा दाखल झालेला असल्‍यामुळे त्‍याची फाईल आवश्‍यक तसा शेरा मारून विमा कंपनीकडे तारीख 28/12/2010 रोजी पाठवली. त्‍यानंतर विमा कंपनीने तारीख 24.03.11 चे पञ पाठवुन अर्जदाराची फाईल वरील कारणास्‍तव बंद केली असल्‍याचे कळविले. सबब गैरअर्जदार क्रमांक 2 यांना या प्रकरणातून वगळण्‍यात यावे अशी शेवटी विनंती केली आहे.

गैरअर्जदार क्रमांक 2 ने लेखी जबाबासोबत विमा कंपनीचे तारीख 24.03.11 चे अर्जदारास पाठवलेल्‍या क्‍लेम नाकारलेल्‍या पत्राची छायाप्रत दाखल केले आहे.

गैरअर्जदार क्रमांक 3 व 4 यांनी आपल्‍या लेखी जबाबात (नि.14) तक्रार अर्जातील त्‍यांचेविरूध्‍द केलेली सर्व विधाने साफ नाकारली आहेत. त्‍यांच्‍याकडुन कोणत्‍याही प्रकारे सेवाञुटी झाली नसल्‍यामुळे व त्‍यांच्‍याविरूध्‍द अर्जदारास प्रस्‍तुतची तक्रार दाखल करण्‍यास कोणतेही कायदेशीर कारण धरलेले नसल्‍यामुळे तक्रार फेटाळण्‍यात यावी असे त्‍यांचे म्‍हणणे आहे. पुराव्‍यात दाखल केलेल्‍या महसुल रेकॉर्डच्‍या कागदपञातुन अर्जदारचा मयत पती शेतकरी होता हे शाबीत होत नाही असे त्‍यांचे म्‍हणणे आहे. अर्जदाराने दाखल केलेला विमा क्‍लेम कषी अधिकारी व कबाल इन्‍शुरंस मार्फत त्‍यांच्‍याकडे आल्‍यानंतर तो पॉलिसी नियमाप्रमाणे पॉलिसीची शेवटची मुदत संपल्‍यानंतर 90 दिवसांच्‍या आंत दाखल करणे आवश्‍यक असतांना उशिरा दाखल केलेला असल्‍यामुळे शेतकरी विम्‍याची नुकसान भरपाई  देण्‍यास विमा कंपनी जबाबदार नसल्‍यामुळे तसेच अर्जदारास तारीख 24.03.11 रोजी पञ पाठवुन क्‍लेम नामंजुर केला असल्‍याचे कळविले होते. वरील सर्व बाबी विचारात घेवुन तक्रार अर्ज खर्चासह फेटाळण्‍यात यावा अशी शेवटी विनंती केली आहे.

लेखी जबाबाचे पुष्‍टयर्थ शपथपत्र नि.15 दाखल केले आहे.

तक्रार अर्जाचे अंतीम सुनावणीचे वेळी अर्जदारातर्फे अड.खापरे आणि गैरअर्जदार क्रमांक 1 तर्फे अड गायकवाड यानी युक्तिवाद केला.

      निर्णयासाठी उपस्थित होणारे मुद्दे.

    मुद्ये                                    उत्‍तर

 

1              गैरअर्जदार 4 यानी अर्जदाराच्‍या मयत पतीच्‍या

शेतकरी अपघात विम्‍याची नुकसान भरपाई देण्‍याचे  

तारीख 24.03.11 च्‍या पञातुन बेकायदेशीररित्‍या

नाकारून सेवात्रुटी केली आहे काय ?                         होय  

  2           अर्जदार नुकसान भरपाई  मिळण्‍यास पात्र आहे  काय ?          होय           

  3         निर्णय ?                               अंतीम आदेशाप्रमाणे

                   

                        कारणे

मुद्या क्रमांक 1 व 2 - 

      अर्जदाराचा मयत पती बाबाराव मुटकुळे हा शेतकरी अपघात विमा पॉलीसीचा लाभार्थी होता हे अर्जदाराने पुराव्‍यात नि.4 लगत सादर केलेल्‍या नि.4/13 व 4/14 वरील गट क्र.544 व 627 चे 7/12 उतारे, नि.4/19 वरील फेरफार उतारा, नि.4/15 वरील   6-क चा उतारा, नि.4/2 वरील तलाठयाचे प्रमाणपञ, 4/12 वरील होल्‍डींग प्रमाणपञ या महसुल कागदपत्रातील नोंदी मधून शाबीत झाले आहे. दिनांक 02.07.2010 रोजी अर्जदारचा मयत पती शेतातुन घरी येत असतांना वस्‍सा शिवारात खंडोबाच्‍या पोळयात पडुन वाहत जावुन त्‍याचा म़त्‍यु झाला होता ही वस्‍तुस्थिती पुराव्‍यात दाखल केलेल्‍या बोरी पोलीस स्‍टेशन अ.म़.र.क्र.75/10 मधील घटनास्‍थळ पंचनामा (नि.4/7), मरणोत्‍तर पंचनामा (नि.4/6), पी.एम.रिपोर्ट (नि.4/8), एफ.आय.आर. (नि.4/9) या पुराव्‍यातून शाबीत झाले आहे. मयत बाबाराव मुटकुळे हा शेतकरी व्‍यक्तिगत अपघात विम्‍याचा लाभार्थी असल्‍यामुळे अर्जदाराने ( मयताची पत्‍नी )  विम्‍याची नुकसान भरपाई रुपये    1 लाख मिळणेसाठी गैरअर्जदार क्रमांक 1 कडे तारीख 29/11/2010 रोजी विमा क्‍लेमसह आवश्‍यक ती सर्व कागदपत्रे सादर केलेली होती. त्‍यानंतर गैरअर्जदार क्रमांक 1 ने ती कागदपञे जिल्‍हा कृषी अधिकारी यांच्‍याकडे पाठविली व त्‍यांनी नंतर ती फाईल मंजुरीसाठी गैरअर्जदार क्र.2 कडे पाठविली होती आणि गैरअर्जदार क्र.2 ला विमा क्‍लेम तारीख 22.12.10 रोजी मिळाला होता हे गैरअर्जदार क्र.2 ने लेखी जबाबात मान्‍य केले आहे. गैरअर्जदार क्रमांक 2 ने लेखी जबाबातून दिलेल्‍या खुलाशाप्रमाणे विमा पॉलिसीची मुदत संपल्‍यानंतर 90 दिवसांच्‍या आत क्‍लेम दाखल करणे पॉलिसी अटीप्रमाणे बंधनकारक आहे. त्‍यानुसार सदरचा क्‍लेम तारीख 14.11.10 पुर्वी दाखल करणे आवश्‍यक असतांना तो मुदतीनंतर दाखले केलेला नव्‍हता. त्‍यामुळे तसा शेरा मारून विमा कंपनीच्‍या नागपुर शाखेकडे तारीख 28.12.10 रोजी पाठविला. त्‍यानंतर विमा कंपनीने देखील गैरअर्जदार क्र.2 ने दिलेले कारण पुढे करून अर्जदाराचा क्‍लेम तारीख 24.03.11 रोजी नामंजुर केलेला होता. त्‍या नामंजुरीपञाची छायाप्रत (नि.10) गैरअर्जदार क्र.2 ने लेखी जबाबासोबत दाखल केलेली आहे. परंतु विमा क्‍लेम पॉलिसीची मुदत संपल्‍यानंतर 90 दिवसात दाखल केला नाही म्‍हणून क्‍लेम नामंजूर केल्‍याचे दिलेले कारण मुळीच ग्राह्य धरता येणार नाही. कारण शेतकरी व्‍यक्तिगत अपघात विमा योजना संदर्भातील महाराष्‍ट्र शासनाच्‍या परिपत्रकामध्‍ये नुकसान भरपाई क्‍लेम ठराविक मुदतीतच दाखल केला पाहीजे ही अट मुळीच  बंधनकारक  नाही  मुळातच राज्‍यातील सर्व खातेदार  शेतक-यासाठी महाराष्‍ट्र शासनातर्फे  घेतलेल्‍या शेतकरी विमा पॉलीसीचा खर्च  लाभार्थी शेतक-यांचा अकस्‍मात अपघाती मृत्‍यू झाल्‍यावर त्‍याच्‍या कुटूबांला आर्थिक हातभार मिळावा व कुटूंबावर उपासमारीची पाळी येवू नये या उदात्‍त हेतूने शेतकरी विम्‍याची कल्‍याणकारी योजना  रा‍बविली गेली आहे. असे असतानाही विमा कंपनीने क्‍लेम मुदतीत दाखल केला नाही हे तांत्रीक कारण दाखवून अर्जदाराचा क्‍लेम  बेकायदेशीररित्‍या नाकारुन निश्‍चीतपणे सेवा त्रूटी केली आहे असाच यातून निष्‍कर्ष निघतो. क्‍लेम उशीरा दाखल केला म्‍हणून विमा कंपनीस पॉलीसी हमीप्रमाणे मयताच्‍या अपघाती मृत्‍यूची नुकसान भरपाई देण्‍याचे विमा कंपनीला मुळीच टाळता येणार नाही. या संदर्भात मा. महाराष्‍ट्र राज्‍य आयोगानेही रिपोर्टेड केस 2008 (2) All MR (Journal) page 13 आय.सी.आय.लोंबार्ड विरुध्‍द सिंधुताई खैरनार या प्रकरणात असे मत व्‍यक्‍त केले आहे की, क्‍लेम दाखल करण्‍यास उशीर झाला ही अट मुळीच बंधनकारक तथा मॅडेटरी नाही हे मत प्रस्‍तूत प्रकरणालाही लागू पडते याखेरीज मा. राष्‍ट्रीय आयोगाने देखील रिट पिटीशन 3329/07 युनायटेड इंडिया इन्‍शुरन्‍स कंपनी विरुध्‍द अरुणा या प्रकरणात 22.10.2007 रोजी दिलेल्‍या निकालपत्रात देखील वरील प्रमाणेच मत व्‍यक्‍त केलेले आहे.ते प्रस्‍तुत प्रकरणाला लागु पडते. अर्जदाराचा क्‍लेम चुकीच्‍या पध्‍दतीने नाकारुन तीला मानसिक त्रास दिला आहे व सेवेतील त्रूटी केलेली असल्‍याचे स्‍पष्‍ट दिसते. गैरअर्जदार क्र. 4 यांनी अर्जदारच्‍या मयत बाबाराव विश्‍वनाथ मुटकुळे याच्‍या अपघाती म़त्‍युची शेतकरी विम्‍याची नुकसान भरपाई देण्‍याचे  बेकायदेशिररित्‍या नाकारुन तिच्‍यावर अन्‍याय केलेला आहे व नुकसान भरपाई मिळणे पासून वंचित ठेवलेले आहे. सबब मुद्दा क्रमांक 1 व 2 चे उत्‍तर होकारार्थी देवून आम्‍ही खालीलप्रमाणे आदेश देत आहोत.

 

 दे 

1          अर्जदाराची तक्रार अशंतः मंजूर करण्‍यात येते.

2          गैरअर्जदार क्र. 4 यांनी अर्जदाराच्‍या मयत पतीच्‍या डेथक्‍लेमची नुकसान भरपाई

      रु 1,00,000/- आदेश तारखेपासून 30 दिवसाच्‍या आत अर्जदारास द्यावी.

3     आदेश मुदतीत नुकसान भरपाई न दिल्‍यास सदरची नुकसान भरपाई द.सा.द.शे. 9 टक्‍के दराने व्‍याजासह वसुल करण्‍याचा अर्जदारास हक्‍क राहील.

4     याखेरीज मानसिक त्रास व सेवेतील त्रूटीबदद्ल  नुकसान भरपाई म्‍हणून रुपये 2000/- व तक्रार अर्जाचा खर्च म्‍हणून रुपये 1000/- आदेश मुदतीत द्यावा.

4     पक्षकाराना आदेशाच्‍या प्रती मोफत पुरवाव्‍यात  

 

 

 

 

सौ. सुवर्णा देशमुख                                  श्री. सी.बी. पांढरपटटे

     सदस्‍या                                               अध्‍यक्ष

 

 

 

 

 

 

 

 
 
[HONABLE MR. C. B. Pandharpatte]
PRESIDENT
 
[HON'ABLE MS. Shrimati Suwarna Deshmukh]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.