Maharashtra

Nanded

CC/10/141

Smi.Zimabai Gopa; Chavan - Complainant(s)

Versus

Taluka Karshi Adhikari - Opp.Party(s)

ADV.R.N.Kulkarni

18 Sep 2010

ORDER


District Consumer Reddressal Forum , NandedDistrict Consumer Forum , Visava Nagar, V.I.P. Road, Nanded
Complaint Case No. CC/10/141
1. Smi.Zimabai Gopa; Chavan R/o.Rawankola Tq.Jalkot Dist.LaturNandedMaharastra ...........Appellant(s)

Versus.
1. Taluka Karshi Adhikari R/o.Rawankola Tq.Jalkot Dist.LaturNandedMaharastra ...........Respondent(s)



BEFORE:
HON'BLE MRS. Member Mrs.S.R. Deshmukh ,PRESIDING MEMBER
PRESENT :

Dated : 18 Sep 2010
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

 

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍यायमंच,नांदेड.
प्रकरण क्रमांक :-  2010/141
                          प्रकरण दाखल तारीख - 03/05/2010
                          प्रकरण निकाल तारीख 16/09/2010
समक्ष  मा.श्री. बी.टी.नरवाडे, पाटील           - अध्‍यक्ष
       मा.श्रीमती सुवर्णा देशमूख, पिंगळीकर    - सदस्‍या.
       मा.श्री.सतीश सामते,                 -   सदस्‍य.
श्रीमती झिमाबाई भ्र.गोपाळ चव्‍हाण
वय 50 वर्षे, धंदा घरकाम                                  अर्जदार
रा.रावणकोळा ता.जळकोट, जि.लातूर
     विरुध्‍द.
1. तालूका कृषी अधिकारी, जळकोट
ता.जळकोट जि.लातूर.
2.   कबाल इन्‍शूरंन्‍स ब्रोकींग सर्व्‍हीसेस प्रा.लि.
भास्‍करायन एचडीएफसी, लाईफ इंशोरंन्‍सच्‍या खाली
प्‍लॉट नं.7, सेक्‍टर ई 1 टाऊन सेंटर, सिडको,औरंगाबाद.                                       
3.   रिलायंस जनरल इन्‍शूरन्‍स कंपनी लि.                 गैरअर्जदार 19, रिलायंन्‍स सेंटर वालचंद हिराचंद मार्ग,
बेलार्ड इस्‍टेट, मुंबई 400 038
4.   रिलायंस जनरल इन्‍शूरन्‍स कंपनी लि.
मार्फत शाखा व्‍यवस्‍थापक,शाखा उज्‍वल इंटरप्रायजेसच्‍यावर
हनुमानगड कमानी जवळ, हिंगोली नाका, नांदेड 
अर्जदारा तर्फे वकील             - अड.आर.एन.कूलकर्णी
गैरअर्जदार क्र. 1 तर्फे               -  स्‍वतः
गैरअर्जदार क्र. 2 तर्फे               -  स्‍वतः
गैरअर्जदार क्र.3 व 4 तर्फे वकील     - अड.अविनाश कदम
 
                               निकालपञ
             (द्वारा - मा.श्री.सतीश सामते, सदस्‍या)
             अर्जदाराने ही तक्रार तिला शेतकरी वैयक्‍तीक अपघात विमा योजने अंतर्गत तिच्‍या पतीचा विमा काढलेला असतानाही ती रक्‍कम त्‍यांच्‍या मृत्‍यूनंतर मिळाली नाही म्‍हणून दाखल केली आहे.
 
              अर्जदाराची तक्रार थोडक्‍यात अशी आहे की, अर्जदार ही मयत गोपाळ यांची पत्‍नी आहे. अर्जदारास मयत माधव पासून दोन मूले  
 
 
आहे. दि.18.4.2009 रोजी धरणी शिवारात लातूर ते नांदेड राज्‍य रस्‍त्‍यावर रस्‍ता अपघातात अर्जदाराचे पती माधवराव यांचा मृत्‍यू झाला. त्‍या बददल अर्जदाराने पोलिस स्‍टेशन चाकूर जि. लातूर यांचेकडे या अपघाता संदर्भात गून्‍हा दाखल केला आहे. ज्‍यांचा नंबर 60/2009 असून भाद.द.वि.279,337,304 (ए) खाली सदर गून्‍हा नोंदविला आहे. अर्जदाराने सदर विम्‍याच्‍या प्राप्‍तीसाठी महाराष्‍ट्र शासनाच्‍या कृषी विभागाकडे अर्ज दाखल केला. तालूका कृषी अधिकारी कंधार यांचे कार्यालयामधून गैरअर्जदार क्र.2 कबाल इन्‍शूरन्‍स कंपनी यांचेकडे पाठविण्‍यात आला. सदरचा अर्ज हा गैरअर्जदार क्र.2 यांनी गैरअर्जदार क्र.3 रिलायन्‍स जनरल इन्‍शूरन्‍स कंपनी यांचेकडे पाठविला परंतु आजपर्यत गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना विमा रक्‍कम दिली नाही म्‍हणून अर्जदारास सदरचा अर्ज करावा लागला. अर्जदाराने आपल्‍या अर्जासोबत शपथपञ दाखल केलेले आहे. तसेच एफ.आय.आर., घटनास्‍थळ पंचनामा, मरणोत्‍तर पंचनामा, पी.एम.रिपोर्ट, तसेच अर्जदार शेतकरी असल्‍याबददलचा त्‍यांचे नांवाचा 7/12, अर्जदाराने कृषी अधिकारी यांचेकडे दाखल केलेला अर्ज, बँक खाते पासबूक, तसेच अर्जदाराच्‍या पतीचे मृत्‍यू नोंदीचा उतारा, तलाठी सज्‍जा कौठा ता.कंधार यांचेकडून मृत्‍यूचे प्रमाणपञ, अर्जदाराने आरपीएडी ने गैरअर्जदार क्र.3 यांना पाठविलेली नोटीस यासर्व कागदपञाची पूर्तता केलेली आहे.
              गैरअर्जदार हे हजर झाले त्‍यांनी आपले म्‍हणणे दाखल केलेले आहे. गैरअर्जदार क्र.1 कृषी अधिकारी यांनी आपले म्‍हणणे दिलेले आहे. अर्जदाराने सर्व कागदपञ व अर्ज दि.29.6.2009 रोजी दाखल केलेले आहे. सदरचे कागदपञ गैरअर्जदार क्र.1 यांनी पञ जा.क्र.265/2009 द्वारे दि.30.06.2009 रोजी उपावीभागीय कृषी अधिकारी लातूर यांचेमार्फत गैरअर्जदार क्र.2 कड दाखल केले.
              गैरअर्जदार क्र.2 हे ही हजर झाले व त्‍यांनी आपले लेखी म्‍हणणे दाखल केलेले आहे. ज्‍यामध्‍ये दि.18.4.2009 रोजीच्‍या अपघाताचे सर्व कागदपञ दि.14.08.2009 रोजी त्‍यांना मिळाले व ते त्‍यांनी रिलायन्‍स जनरल इन्‍शूरन्‍स कंपनी यांचेकडे दि.29.01.2010 रोजी पूर्वीच कार्यवाहीस्‍तव पाठविले अशा प्रकारचे निवेदन केले.
              गैरअर्जदार क्र.3 व 4 हे वकिलामार्फत हजर झाले व त्‍यांनी आपले लेखी म्‍हणणे दाखल केलेले आहे. ज्‍यामध्‍ये त्‍यांनी असे म्‍हटले आहे की, मयत हा शेतकरी असल्‍याबददलचा कोणताही पूरावा अर्जदाराने दाखल केलेला नाही. त्‍यामूळे अर्जदार हे नूकसान भरपाई मिळाली पाञ नाहीत. तसेच तक्रार दाखल करण्‍यास कोणतेही कारण अर्जदाराने दाखवलेले
 
 
नाही व अर्जदार हे प्रत्‍यक्षरित्‍या त्‍यांचे ग्राहक नाहीत. त्‍यामूळे त्‍यांना ञूटीची सेवा दिली असे म्‍हणता येणार नाही. सदरची तक्रार ही ग्राहक मंचात न दाखल करता ती दिवाणी न्‍यायालयात दाखल करणे आवश्‍यक होते व अर्जदार ही नूकसान भरपाई मिळण्‍यास पाञ नाहीअशा प्रकारचे निवेदन त्‍यांनी केले आहे. 
              अर्जदार व गैरअर्जदार यांनी दाखल केलेले निवेदन व कागदपञानुसार खालील मूददे उपस्थित होतात. 
              मूददे                                   उत्‍तर
1.   अर्जदार हे ग्राहक आहेत काय ?                        होय.
2.   गैरअर्जदार हे अर्जदारास नूकसान भरपाई देण्‍यास
     बांधील आहेत काय ?                                   होय.
3.   काय आदेश ?                            अंतिम आदेशाप्रमाणे.
                                                          कारणे
मूददा क्र.1 ः-
              अर्जदाराच्‍या पतीचा शेतकरी वैयक्‍तीक अपघात विमा योजने अंतर्गत विमा काढलेला होता, सदरील विम्‍याचा कालावधी दि.15.08.2008 ते दि.14.08.2009 असा होता. अर्जदार ही मयत गोपाळराव यांची पत्‍नी आहे. म्‍हणून अर्जदार ही प्रत्‍यक्षरित्‍या नसली तरी अप्रत्‍यक्षरित्‍या ग्राहक आहे म्‍हणून मूददा क्र.1 चे उत्‍तर सकारात्‍मक देण्‍यात येत आहे.
मूददा क्र.2 ः-
              अर्जदार यांनी आपल्‍या अर्जासोबत एफ.आय.आर., ची कॉपी,घटनास्‍थळ पंचनामा, मरणोत्‍तर पंचनामा, पी.एम.रिपोर्ट, दाखल केलेले आहे. तसेच मयत गोपाळ हे 7/12 धारक शेतकरी आहे व त्‍यांची मौजे रावणकोळा ता.जळकोट जि. लातूर येथे गट क्र.153 मध्‍ये क्षेञफळ 1 हेक्‍टर 21 आर एवढी शेतजमीन आहे.याबददलचा पूरावा अर्जदाराने दाखल केलेला आहे. त्‍यामूळे गैरअर्जदार क्र.3 व 4 यांचे निवेदनाप्रमाणे मयत गोपाळ हे शेतजमीन धारक नव्‍हते हे म्‍हणणे चूक आहे. महाराष्‍ट्र शासनाच्‍या कृषी वीभागाने राज्‍यातील सर्व 7/12 धारक शेतक-याचा शेतकरी वैयक्‍तीक अपघात विमा योजने अंतर्गत सन 2008 ते 2009 या वर्षाकरिता विमा काढलेला आहे व यासाठीचा कालावधी दि.15.8.2008 ते दि.14.08.2009 असा होता. या योजनेमध्‍ये मयत गोपाळ हे लाभार्थी होते. त्‍यांचा मृत्‍यू दि.18.04.2009 रोजी झालेला असल्‍यामूळे अर्जदार यांनी तक्रार मूदतीत दाखल केलेली आहे हे स्‍पष्‍ट होते. अर्जदाराच्‍या पतीचा मृत्‍यूनंतर तिने गैरअर्जदार क्र.1 यांचेकडे सर्व कागदपञासहीत विमा दावा दाखल केलेला आहे.
 
 
 
गैरअर्जदार क्र.1 यांनी विमा योजनेतील तरतूदीनुसार गैरअर्जदार क्र.2 यांचेकडे अर्जदाराचा विमा दावा पाठवून दिला व गैरअर्जदार क्र.2 यांनी सर्व कागदपञासह गैरअर्जदार क्र.3 यांचेकडे पाठविला. अर्जदाराच्‍या म्‍हणण्‍याप्रमाणे शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत सर्व प्रकारचे हक्‍क समाविष्‍ट असल्‍यामूळे तिचे पती हे रस्‍ता अपघातात मृत झाले व सदरचा अपघात हा या व्‍याख्‍येमध्‍ये मोडतो म्‍हणून अर्जदार ही विमा रक्‍कम रु.1,00,000/- मिळण्‍यास पाञ आहे, असे असूनही गैरअर्जदार क्र.3 यांनी अर्जदारास विमा रक्‍कम न दिल्‍यामूळे अर्जदार यांनी वकिलामार्फत दि.05.04.2010 रोजी गैरअर्जदार क्र.3 यांना विमा रक्‍कम देण्‍या बाबत नोटीस पाठविली. ती गैरअर्जदार क्र.3 यांना दि.08.04.2010 रोजी प्राप्‍त झाली तरी देखील आजपर्यत गैरअर्जदार क्र.3 यांनी विम्‍याची रक्‍कम अर्जदारास न दिल्‍यामूळे अर्जदारास शारीरिक व मानसिक ञास झाला व गैरअर्जदाराने सेवेत ञूटी केली हे सिध्‍द झाले. म्‍हणून अर्जदारास शेतकरी वैयक्‍तीक अपघात विमा योजने अंतर्गत रक्‍कम रु.1,00,000/- दि.18.04.2009 पासून 9 टक्‍के व्‍याज दराने एक महिन्‍याचे आंत दयावी, तसेच अर्जदारास मानसिक ञासाबददल रु.5,000/- व दावा खर्च म्‍हणून रु.2,000/- गैरअर्जदार क्र.3 यांनी दयावेत या नीर्णयापर्यत हे मंच आलेले आहे.
                   वरील सर्व बाबीचा विचार करुन आम्‍ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
                             आदेश
1.                                         अर्जदाराचा तक्रार अर्ज मंजूर करण्‍यात येतो.
2.                                         गैरअर्जदार क्र.3 व 4 यांनी अर्जदारास रु.1,00,000/- दि.18.04.2009 पासून 9 टक्‍के व्‍याजाने एक महिन्‍याचे आंत दयावेत, असे न केल्‍यास दि.18.04.2009 पासून 12 टक्‍के व्‍याजाने रक्‍कम फिटेपर्यत दयावेत.
3.                                         गैरअर्जदार क्र.3 व 4 यांनी अर्जदारास मानसिक ञासाबददल रु.5,000/- व दावा खर्च म्‍हणून रु,2,000/-एक महिन्‍याचे आंत दयावेत.
4.                                         संबंधीताना आदेश कळविण्‍यात यावा.
 
 
 
 
श्री.बी.टी.नरवाडे पाटील                              श्रीमती सुवर्णा देशमूख                       श्री.सतीश सामते   
   अध्‍यक्ष                                                                 सदस्‍या                                           सदस्‍य.

[HON'BLE MRS. Member Mrs.S.R. Deshmukh] PRESIDING MEMBER