Maharashtra

Nanded

CC/10/42

Ujvala Govind Hegde - Complainant(s)

Versus

Tahsildar - Opp.Party(s)

ADV. P.G. Narwade

07 Apr 2010

ORDER


District Consumer Reddressal Forum , NandedDistrict Consumer Forum , Visava Nagar, V.I.P. Road, Nanded
Complaint Case No. CC/10/42
1. Ujvala Govind Hegde Laglud, Tq. Bhokar, Dist. Nanded.NandedMaharastra ...........Appellant(s)

Versus.
1. Tahsildar Tahsil Office Bhokar,Tq. Bhokar, Nanded.NandedMaharastra2. Manager, National Insurance Com. Ltd.65 Marzban Road, Fort Mumbai.MumbaiMaharastra3. Branch Manager, National Insurance Com. Ltd. Naginaghat Road, Nanded.NandedMaharastra ...........Respondent(s)



BEFORE:

PRESENT :

Dated : 07 Apr 2010
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

 

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍यायमंच,नांदेड.
 
प्रकरण क्रमांक :-  2010/42.
                          प्रकरण दाखल तारीख - 05/02/2010
                          प्रकरण निकाल तारीख 07/04/2010
 
समक्ष  मा.श्री. बी.टी.नरवाडे, पाटील           - अध्‍यक्ष
       मा.श्री.सतीश सामते                  - सदस्‍य
       मा.श्रीमती सुवर्णा देशमूख, पिंगळीकर    - सदस्‍या.
 
उज्‍वला भ्र. गोविंद हेगडे
वय 32 वर्षे, धंदा घरकाम                               अर्जदार
रा. लगळूद ता. भोकर जि. नांदेड
     विरुध्‍द.
1.   मा.तहसीलदार,
     तहसील कार्यालय भोकर ता.भोकर जि. नांदेड.
2.   व्‍यवस्‍थापक
     नॅशनल इन्‍शुरन्‍स कंपनी लि.
स्‍टलिंग सिनेमा बिल्‍डींग,दुसरा मजला,
65, मर्झबान रोड, डि.ओ.14 ख फोर्ट, मुंबई -400001.
3.   नॅशनल इन्‍शुरन्‍स कंपनी लि.                        गैरअर्जदार
     मार्फत शाखा व्‍यवस्‍थापक,  
     शाखा नगिना घाट, नांदेड.
4.   कबाल इंन्‍शूरन्‍स सर्व्‍हीसेस प्रा.लि.
शॉप नंबर 2,दीशा अलंकार कॉम्‍पलेक्‍स,
     टाऊन सेंटर, सिडको कॅनॉट, औरंगाबाद.
 
 
अर्जदारा तर्फे वकील             - अड.पी.जी.नरवाडे
गैरअर्जदार क्र. 1 तर्फे वकील        -   स्‍वतः
गैरअर्जदार क्र.2 व 3 तर्फे वकिल   - अड.एम.बी.टेळकीकर
गैरअर्जदार क्र.4 तर्फे वकील        - स्‍वतः
                               निकालपञ
             (द्वारा - मा.श्री.सतीश सामते, सदस्‍य )
 
 
 
              गैरअर्जदार नॅशनल इन्‍शूरन्‍स कंपनी यांचे सेवेतील ञूटी बददल अर्जदार यांनी खालील प्रमाणे तक्रार दाखल केली आहे.
              अर्जदाराची तक्रार थोडक्‍यात अशी की,मयत गोविंद विठठल हेगळे हा शेतकरी असून तो अर्जदार यांचा पती होता, मयत गोविंद हे त्‍यांची शेत जमिन गट नंबर 259 क्षेञफळ 80 आर व गट नंबर 268 क्षेञफळ 32 आर मौजे लगळूद ता.भोकर जि. नांदेड येथे शेती करीत होते. सर्व व्‍यवस्थित चालू असताना अचानक दि.12.09.2006 रोजी अर्जदाराचे पती मयत गोविंद यांना सर्पदंश झाल्‍याने जागीच अपघाती मृत्‍यू झाला. अपघातानंतर घटनेची फिर्याद पोलिस स्‍टेशन भोकर ता. भोकर जि. नांदेड येथे गू.रं.नं.34/2006 कलम 174 सी.आर.पी.सी. प्रमाणे अपघाती मृत्‍यूचा गुन्‍हा नोंदविला. साक्षीदाराचे बयान नोंदविले व घटनास्‍थळ पंचनामा, इन्‍क्‍वेस्‍ट पंचनामा, पी.एम. रिपोर्ट,  केला. अर्जदाराने आवश्‍यक कागदपञासह हदगांव तहसील यांचे मार्फत शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत दावा दाखल केला. महाराष्‍ट्र शासनाने शेतकरी वैयक्‍तीक अपघात विमा योजना सूरु केली. त्‍या अनुषंगाने औरंगाबाद महसूल विभागात येणा-या सर्व शेतक-यांसाठी गैरअर्जदार क्र.2 नॅशनल इन्‍शूरन्‍स कंपनी यांचेकडे शासनाने प्रिमियम भरुन पॉलिसी घेतली. यांचा कालावधी दि.15.07.2006 ते दि.14.07.2007 होता व घटना ही दि.12.09.2006 रोजी घडली, तसेच या कालावधीसाठी गैरअर्जदार क्र.4 मार्फत विमा उतरविला.     म्‍हणून अर्जदार हे लाभार्थी आहेत. अर्जदाराची मागणी आहे की, त्‍यांचे प्रपोजल दि.25.09.2006 रोजी तहसीलदार भोकर यांचेमार्फत गैरअर्जदार क्र.2 यांना पाठविले असता सदरील प्रस्‍ताव   आम्‍ही वर पाठवला आहे, लवकर होईल असे आश्‍वासन देत राहीले व टाळाटाळ करीत राहीले व आजपर्यत अर्जदारास कोणत्‍याही प्रकारची रक्‍कम दिली नाही. अर्जदाराने दि.29.12.2009 रोजी वकिलामार्फत नोटीस पाठविली पण ती नोटीस मिळूनही आजपर्यत कोणतीही रक्‍कम अर्जदारास मिळाली नाही. म्‍हणून अर्जदाराची मागणी आहे की, त्‍यांना विम्‍याची रक्‍कम रु,1,00,000/- व त्‍यावर सन 2006 पासून 12 टक्‍के व्‍याज तसेच मानसिक ञासापोटी रु.50,000/- व दावा खर्च म्‍हणून रु.5,000/- गैरअर्जदार यांचेकडून मिळोवत म्‍हणून ही तक्रार दाखल केलेली आहे.
              गैरअर्जदार क्र.1 यांना मंचाने पाठविलेली नोटीस मिळून ते हजर झाले  व त्‍यांनी आपले लेखी म्‍हणणे दाखल केलेले आहे.हे त्‍यांना मान्‍य आहे गोविंद यांचा मृत्‍यू हा दि.25.09.2006 रोज सर्पदंशाने झाला. अर्जदार यांनी दि.22.09.2006 रोजी विमा दावा दाखल केलेला आहे. त्‍यांचा
 
 
विमा दावा दि.27.09.2006 रोजी मुंबई येथे पाठविण्‍यात आलेला आहे. अर्जदाराने दाखल केल्‍यानंतर सदर कागदपञे मूदतीत विमा कंपनीकडे पाठविण्‍यात आलेली आहेत त्‍यामूळे विलंबाचा प्रश्‍नच निर्माण होत नाही. त्‍यामूळे अर्जदार यांचा प्रस्‍ताव आमच्‍याकडे प्रलंबित नाही. त्‍यामूळे गैरअर्जदार क्र.1 यांचे सेवेत कोणतीही ञूटी नसून त्‍यांचे विरुध्‍द तक्रार खारीज करण्‍यात यावी असे म्‍हटले आहे.
                  गैरअर्जदार क्र.2 व 3 हे वकिलामार्फत हजर झाले व त्‍यांनी आपले लेखी म्‍हणणे एकञितरित्‍या दाखल केलेले आहे. विमा पॉलिसी
ही अटी व शर्ती वर दिल्‍या जाते. अर्जदार यांची तक्रार गैरअर्जदार यांचे कडे आलेली नाही व त्‍यांस कोणतेही उत्‍तर गैरअर्जदार यांनी दिलेले नाही म्‍हणून सदर तक्रार ही खर्चासह नामंजूर करावी असे म्‍हटले आहे.अर्जदार यांनी वारसा बददल कोणतेही रेकॉर्ड   अथवा ठोस पूरावा दाखल केलेले नाही.अर्जदार यांनी ते शेतकरी असल्‍याबददल व त्‍यांचे नांवे जमिन होती हे त्‍यांनी सिध्‍द केले पाहिजे व शासनाने शेतकरी वैयक्‍तीक अपघात विमा योजना गैरअर्जदार क्र.2 याचेकडून त्‍यांनी काढली आहे हे त्‍यांना मान्‍य नाही. मयत हा शेतकरी आहे हे त्‍यांना अमान्‍य आहे. मयत गोविंद  हे साप चाऊन मरण पावले व त्‍याबददल पोलिस स्‍टेशन भोकर येथे गून्‍हा नोंदविला हे त्‍यांना मान्‍य नाही, हे त्‍यांना सिध्‍द करावे लागेल. गैरअर्जदार यांना हे मान्‍य नाही की त्‍यांनी सर्व कागदपञासह दावा दाखल केला. हे त्‍यांना मान्‍य नाही की, अर्जदार हिचा पती शेतकरी आहे व त्‍यांनी शेतकरी अपघात विमा पॉलिसी काढली होती. त्‍यामूळे ते गैरअर्जदार क्र.2 यांचे ग्राहक नाहीत. अर्जदाराने विम्‍याची रक्‍कम 12 टक्‍के व्‍याजासह व तसेच नूकसान भरपाई रु.50,000/- सह, रु.5,000/- खर्चासह मागितली हे देण्‍यासाठी गैरअर्जदार जबाबदार नाहीत. अर्जदार यांनी गैरअर्जदार यांचेकडे सदर दाव्‍याबाबत मागणी केलेली नाही त्‍यामूळे दावा फेटाळण्‍याचा संबंधच नाही. म्‍हणून अर्जदाराची तक्रार ही प्रिमॅच्‍यूअर स्‍वरुपाची आहे. गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना कोणतीही ञूटीची सेवा दिलेली नाही. तसेच अर्जदार ही गैरअर्जदार यांची ग्राहक नाही. तक्रार दाखल करण्‍यासाठी कोणतेही कारण घडलेले नाही त्‍यामूळे अर्जदार कोणतीही नूकसान भरपाई मागू शकत नाही.  गैरअर्जदार यांनी दि.15.7.2006 ते 14.07.2007 या कालावधीसाठी पॉलिसी काढलेली आहे त्‍यामूळ या कालावधीची रिस्‍क ही गैरअर्जदार यांनी घेतलेली आहे.  अर्जदार हे सबळ पूरावा घेऊन मंचापूढे आलेले नाहीत.  घटना ही दि.12.09,2006 रोजी घडलेली आहे व अर्जदार यांनी गैरअर्जदार यांना दि.29.12.2009 रोजी नोटीस पाठवून त्‍या दिवसापासून लिमिटेशन मध्‍ये
 
 
आहे असे सांगितले आहे. तसे लिमिटेशन धरता येणार नाही. असे करुन गैरअर्जदार यांनी सेवेत कोणतीही ञूटी केलेली नाही.  संबंधीत प्रपोजल हे तहसीलदार यांनी कबाल इन्‍शूरन्‍स यांचेकडे पाठविले पाहिजे व त्‍यांनी ते व्‍हेरिफाय करुन कागदपञासह विमा कंपनीकडे पाठविले पाहिजे. यासोबत
दाव्‍याशी संबंधीत कागदपञ जसे तलाठी व तहसीलदार यांचे प्रमाणपञ,
मृत्‍यूचे प्रमाणपञ, बँकेचे डिटेल्‍स, नॉमिनीची नांवे इत्‍यादी कागदपञ असणे आवश्‍यक आहे. त्‍यामूळे अर्जदाराची तक्रार ही खर्चासह फेटाळण्‍यात यावी असे म्‍हटले आहे.
         
                 गैरअर्जदार क्र.4 यांनी आपले लेखी म्‍हणणे पोस्‍टाने पाठविले आहे. त्‍यात ते IRDA Approved Insurance Advisor Company appointed as a consultant by Govt. of Maharashtra  व यासाठी ते शासनाकडून कोणतीही रक्‍कम मानधन म्‍हणून देखील स्विकारत नाहीत. त्‍यामूळे त्‍यांचे विरुध्‍द दावा चालू शकत नाही. अर्जदार यांचा क्‍लेम त्‍यांचेकडे दि.11.12.2006 रोजी तहसिलदार यांचेकडून आला, परंतु त्‍यामध्‍ये claim was incomplete for want of Age Proof Attested, spot Panchanama Attested by Police, the same was conveyed to the claimant via Tahsildar, Bhokar vide out letter dated 20.12.2006 reminder 1 on 22.01.07. 30.,02.2007, 15.04.2007, 20.06.2007 and Reminders on 07.12.2007, 11.06.2008 finally the file is closed by the Insurance company vide their letter dated 18.02.2009 असा जवाब दिलेला आहे. मध्‍यस्‍थ करणे व शेतक-यांच्‍या प्रस्‍तावाची छाननी करणे व योग्‍य त्‍या शिफारशीसह इन्‍शूरन्‍स कंपनीकडे पाठवीणे एवढेच त्‍यांचे काम आहे. त्‍यामूळे त्‍यांचे विरुध्‍दचा दावा खारीज करावा.
                   अर्जदार यांनी पूरावा म्‍हणून आपले शपथपञ, तसेच गैरअर्जदार क्र.2 व 3 यांनी पूरावा म्‍हणून शपथपञ दाखल केलेले आहे. दोन्‍ही पक्षकारानी दाखल केलेले दस्‍ताऐवज बारकाईने तपासून व पक्षकारांचा युक्‍तीवाद ऐकून खालील मूददे उपस्थित होतात.
          मूददे                                       उत्‍तर
 
1.   गैरअर्जदार यांचे सेवेतील ञूटी सिध्‍द होते काय ?         होय.
2.   काय आदेश ?                           अंतिम आदेशाप्रमाणे.
                        कारणे
मूददा क्र. 1 ः-
              अर्जदार   यांचे पती मयत शेतकरी गोविंद हेगडे यांचा दि.12.09.2006 रोजी सर्पदंश झाल्‍याने   मयत गणेशराव यांचा अपघाती मृत्‍यू झाला,   या  बददलचा   पूरावा  म्‍हणून   घटनास्‍थळाचा पंचनामा,
 
 
इन्‍क्‍वेस्‍ट पंचनामा, ग्रामपंचायतचे मृत्‍यू प्रमाणपञ, तलाठयाचे प्रमाणपञ, एफ.आय.आर.,  मरणोत्‍तर पंचनामा,  पी.एम.रिपोर्ट  दाखल आहे.   यात
डॉक्‍टरच्‍या  In my opinion, he is died at Cardioresponatory failure due to snake Bite to leg.
 
त्‍यामूळे मृत्‍यू बददल गैरअर्जदार यांना आक्षेप नाही. घटनेच्‍या मरणोत्‍तर पंचनाम्‍या मध्‍ये मयताचे नांव गोविंद विठठल हेगडे असे असून पोलिस स्‍टेशन भोकर येथे गून्‍हा नोंदविण्‍यात आलेला आहे. पी.एम. रिपोर्ट ही या सोबत जोडलेला आहे. मयत गोविंद यांचे 7/12 या प्रकरणात दाखल असून ते शेतकरी असल्‍याबददल त्‍यांच्‍या  नांवाचा 7/12 व गाव नमूना आठ- अ, गाव नमूना सहा क दाखल आहे. याप्रमाणे गट नंबर 259 मध्‍ये 80 आर व गट नंबर 268 मध्‍ये 0.32 आर ही जमिन लगळूद ता. भोकर येथे आहे. गांव नमुना सहा क वारसा प्रकरणांची नोंदवही दाखल केलेली आहे. यावरुन अर्जदार ही मयत गोविंदराव यांची पत्‍नी आहे. तलाठयाचे मृत्‍यू बददलचे पञ दाखल केलेले आहे. यात मयताचा मृत्‍यू हा दि.12.09.2006 रोजी झाला यांची नोंद आहे. मृत्‍यूनंतर दाव्‍यासाठी क्‍लेम फॉर्म नंबर 1 पूर्ण भरुन घेऊन दि.22.09.2006 रोजी तहसीलदार भोकर यांना दिल्‍याची नोंद आहे. दि.12.09.2006 रोजीला अपघात झाला, तहसीलदार भोकर यांना दि.22.09.2006 रोजी कळविण्‍यात आले म्‍हणजे  विलंब झाला नाही, पण 90 दिवसांचा अवधी क्‍लेम दाखल करण्‍यास होता. त्‍यामूळे तक्रार ही मूदतीत नाही असा आक्षेप घेता येणार नाही. कारण हा नियम जरी असला तरी बंधनकारक नाही. खेडयापाडयातील शेतकरी हा अडाणी असतो. त्‍यांना शासनाच्‍या योजनेची माहीती नसते. घरी अशी घटना घडल्‍यानंतर ते दूखात असतात. त्‍यामूळे जबाबदारीने क्‍लेम दाखल करणे शक्‍य नसते. म्‍हणून अशा प्रकारचा उशिर झाला असल्‍यास शासनाने परिपञका प्रमाणे क्‍लेम वेळेत दाखल करणे आवश्‍यक असले तरी हे बंधनकारक नाही, त्‍यामूळे झालेला विलंब हा माफ करुन केवळ टेक्‍नीकल कारणासाठी शेतक-याचा दावा नाकारु नये असे स्‍पष्‍ट म्‍हटले आहे.   शेतक-याचा मृत्‍यू अपघाती झाला हे स्‍पष्‍ट आहे त्‍यामूळे गैरअर्जदारांनी अर्जदारास विम्‍याची रक्‍कम दिली पाहिजे हे न्‍यायाच्‍या दृष्‍टीने उचित आहे. विम्‍याची रक्‍कम ही मयताच्‍या पत्‍नीस मिळाली पाहिजे. वयाचा दाखला नाही म्‍हणून मयत शेतकरी नाही, त्‍यासाठी दावा नाकारता येणार नाही, काहीही कारणे सांगून व उगीच कागदपञाची अवाजवी मागणी म्‍हणजे सेवेतील ञूटी आहे. गैरअर्जदार यांना त्‍यांचे जबाबदारीतून मुक्‍त होता येणार नाही.
 
 
 
              वरील सर्व बाबीचा विचार करुन आम्‍ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
 
                           आदेश
1.                                         अर्जदाराची तक्रार खालील प्रमाणे मंजूर करण्‍यात येते.
 
2.                                         गैरअर्जदार क्र.2 व 3 यांनी अर्जदार यांना हा निकाल लागल्‍यापासून 30 दिवसांचे आंत विम्‍याची रक्‍कम रु.1,00,000/- व त्‍यावर दि.12.09.2006 पासून 9 टक्‍के व्‍याजासह पूर्ण रक्‍कम वसूल होईलपर्यत व्‍याजासहीत दयावेत.
3.                                         गैरअर्जदार क्र.2 व 3 यांनी अर्जदार यांना मानसिक ञासाबददल   रु.5000/- व दावा खर्च म्‍हणून रु.1,000/- दयावेत.
 
4.                                         गैरअर्जदार क्र.,1 व 4 विरुध्‍द आदेश नाही.
 
5.                                         पक्षकारांना आदेश कळविण्‍यात यावा.
 
 
 
 
श्री.बी.टी.नरवाडे पाटील                                            श्रीमती सुवर्णा देशमूख                                       श्री.सतीश सामते     
   अध्‍यक्ष                                                                               सदस्‍या                                                             सदस्‍य
 
 
 
 
 
जे.यू.पारवेकर.
लघूलेखक.