Maharashtra

Nanded

CC/10/155

Radhbai Suryankant Londhe - Complainant(s)

Versus

Tahsildar Loha - Opp.Party(s)

ADV.A.V.Choudhary

30 Jul 2010

ORDER


District Consumer Reddressal Forum , NandedDistrict Consumer Forum , Visava Nagar, V.I.P. Road, Nanded
Complaint Case No. CC/10/155
1. Radhbai Suryankant Londhe R/o.Sonmanjari Post.Dhnora Dist.NandedNandedMaharastra ...........Appellant(s)

Versus.
1. Tahsildar Loha Tq.Loha Dist.NandedNandedMaharastra ...........Respondent(s)



BEFORE:

PRESENT :

Dated : 30 Jul 2010
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

 

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍यायमंच,नांदेड.
प्रकरण क्रमांक :-  2010/155.
                          प्रकरण दाखल तारीख - 20/05/2010
                          प्रकरण निकाल तारीख 30/07/2010
 
समक्ष  मा.श्री. बी.टी.नरवाडे, पाटील           - अध्‍यक्ष
      मा.श्रीमती सुवर्णा देशमूख, पिंगळीकर    - सदस्‍या.
       मा.श्री.सतीश सामते,                 -   सदस्‍य.
 
श्रीमती राधाबाई भ्र. सुर्यकांत लोंढे
वय सज्ञान वर्षे, धंदा शेती व घरकाम                          अर्जदार
रा.सोनमांजरी पो.धानोरा ता.लोहा जि. नांदेड
     विरुध्‍द.
1. शाखा अधिकारी,
कबाल इंन्‍शूरन्‍स सर्व्‍हीसेस प्रा.लि.
शॉप नं.2, दीशा अलंकार कॉम्‍प्‍लेक्‍स,
टाऊन सेंटर, सिडको, औरंगाबाद.
2.   शाखा अधिकारी
     नॅशनल इन्‍शूरन्‍स कंपनी.लि.
     मूंबई कार्यालय डिव्‍हीजन नं.09,कर्मशियल युनियन
     हाऊस, एक्‍सीलर थिएटरच्‍या बाजूस,9वॅलेजस स्टिट,
     फोर्ट,मूंबई-400 001.                              गैरअर्जदार 
3.   नॅशनल इन्‍शूरन्‍स कंपनी लि.
     मार्फत व्‍यवस्‍थापक, नगिना घाट, नांदेड.
 4.   तहसीलदार,
तहसील कार्यालय,लोहा ता. लोहा जि. नांदेड.
अर्जदारा तर्फे वकील             - अड.ए.व्‍ही.चौधरी
गैरअर्जदार क्र. 1 तर्फे वकील        -   स्‍वतः
गैरअर्जदार क्र.2 व 3 तर्फे वकिल   -   अड.एम.बी.टेळकीकर.
गैरअर्जदार क्र.4 तर्फे वकील       -   कोणीही हजर नाही.
 
                               निकालपञ
             (द्वारा - मा.श्रीमती सूवर्णा देशमूख, सदस्‍या)
 
              गैरअर्जदार नॅशनल इन्‍शूरन्‍स कंपनी यांचे सेवेतील ञूटी बददल अर्जदार यांनी खालील प्रमाणे तक्रार दाखल केली आहे.
 
              अर्जदाराची तक्रार थोडक्‍यात अशी की, अर्जदार ही मयत सुर्यकांत विश्‍वांभर लोंढे यांची पत्‍नी आहे. मयत सूर्यकांत यांचा मृत्‍यू हा दि.12.08.2007 रोजी सुमारे 5.30 वाजता तो शनिशिंगनापूरला त्‍यांचे साथीदार व मूलासोबत जाण्‍यासाठी अटो क्र.एम.एच.-26-सी-9668 मध्‍ये नीघाला असता पालम कडून येणारा टेम्‍पो क्र.एम.एच.-12-डिजी-2004 हा भर वेगात हयगईने व निष्‍काळजीपणे चालवून समोरुन धडक दिली त्‍यामूळे मयताचा जबर मार लागला. या अपघातात अर्जदार यांचा मूलगा पदमाकर व नवरा सूर्यकांत हे दोघेही मरण पावले. अर्जदार हा शेतकरी असून तो शेतीचे काम संपल्‍यानंतर मजूरी करुन उदरनिर्वाह चालवितो. सदर घटने बाबत अपघात मृत्‍यू म्‍हणून पोलिस स्‍टेशन पालम  येथे नोंद झाली आहे. तसेच त्‍यानुसार आ.मृ.क्र. 63/2007 सी.आर.पी.सी 279,304 (अ) 337, 427  अंतर्गत दाखल झाला आहे. वरील घटने संदर्भात पोस्‍ट मार्टम रिपोर्ट तसेच इतर वैद्यकीय प्रमाणपञे अर्जदार यांनी दाखल केलेली आहे. अर्जदार हा वयस्‍कर असून मयत हा घरातील कर्ता व्‍यक्‍ती होता व त्‍यांचेवर संपूर्ण कूटूंबाची जबाबदारी होती. अर्जदार यांना सोनमांजरी  ता.लोहा येथे गट नंबर   20,37, व 173 मध्‍ये एकूण 1 हेक्‍टर 93 आर एवढी शेत जमिन आहे. अर्जदाराने आवश्‍यक कागदपञासह गैरअर्जदार क्र.2 मार्फत गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांचेकडे शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत दावा दाखल केला. गैरअर्जदार क्र.1 यांनी गैरअर्जदार क्र.2 यांना पञ पाठविले त्‍यात अर्जदार यांचा क्‍लेम हा विमा योजनेच्‍या क्षेञात बसत नाही तसेच परिपञकाच्‍या अटी व नियमाप्रमाणे तो वेळ मर्यादेत नाही. महाराष्‍ट्र शासनाने शेतकरी वैयक्‍तीक अपघात विमा योजना सूरु केली. त्‍या अनुषंगाने औरंगाबाद महसूल विभागात येणा-या सर्व शेतक-यांसाठी गैरअर्जदार क्र.2 व 3 नॅशनल इन्‍शूरन्‍स कंपनी यांचेकडे शासनाने प्रिमियम भरुन पॉलिसी घेतली. तसेच गैरअर्जदार क्र.1 मार्फत विमा उतरविला.म्‍हणून अर्जदार हे लाभार्थी आहेत. अर्जदाराची मागणी आहे की, त्‍यांचे प्रपोजल तहसीलदार गैरअर्जदार क्र.4 यांचेमार्फत गैरअर्जदार क्र.3 यांना पाठविले असता, गैरअर्जदार यांनी आजपर्यत अर्जदारास कोणत्‍याही प्रकारची रक्‍कम दिली नाही. म्‍हणून अर्जदाराची मागणी आहे की, त्‍यांना अपघात विमा योजनेअंतर्गत विम्‍याची रक्‍कम रु.1,00,000/- 18 टक्‍के व्‍याज तसेच मानसिक ञासापोटी
 
 
रु.50,000/- व दावा खर्च म्‍हणून रु.5,000/- गैरअर्जदार यांचेकडून मिळावेत म्‍हणून ही तक्रार दाखल केलेली आहे.
               गैरअर्जदार क्र.1 यांनी आपले लेखी म्‍हणणे पोस्‍टाने पाठविले आहे. त्‍यात ते IRDA Approved Insurance Advisor Company
appointed as a consultant by Govt. of Maharashtra  व यासाठी ते शासनाकडून कोणतीही रक्‍कम मानधन म्‍हणून देखील स्विकारत नाहीत.
अपघात हा दि.12.08.2007 रोजी झाला व त्‍यांचा क्‍लेम दावा हा दि.11.12.2007 रोजी झाला तसेच अर्जदाराचा पॉलिसी कालावधी हा दि.15.7.2006 ते 14.07.2007 असा आहे. क्‍लेम दावा हा दि.14.10.2007 रोजी दाखल झाला जो की 90 दिवसात दाखल नाही. क्‍लेम हा उशिराने दाखल झाल्‍यामूळे दाखल करुन न घेता तो परत दि.16.02.2008 रोजेी गैरअर्जदार क्र.4 यांचेकडे पाठविला आहे. त्‍यामूळे त्‍यांचे विरुध्‍द दावा चालू शकत नाही. मध्‍यस्‍थ करणे व शेतक-यांच्‍या प्रस्‍तावाची छाननी करणे व योग्‍य त्‍या शिफारशीसह इन्‍शूरन्‍स कंपनीकडे पाठवीणे एवढेच त्‍यांचे काम आहे. त्‍यामूळे त्‍यांचे विरुध्‍दचा दावा खारीज करावा.             
                  गैरअर्जदार क्र.2 व 3 हे वकिलामार्फत हजर झाले व त्‍यांनी आपले लेखी म्‍हणणे दाखल केलेले आहे. अर्जदाराची तक्रार या मंचात चालू शकत नाही म्‍हणून ती फेटाळण्‍यात यावी असे म्‍हटले आहे. अर्जदार यांना तक्रार दाखल करण्‍यास कोणतेही कारण घडलेले नाही. अपघाताचे वेळी अर्जदाराचे नांवाने शेती होते हे त्‍यांना मान्‍य नाही. अर्जदाराचा अपघात हा दि.12.08.2007 रोजी झाला व पॉलिसीचा कालावधी हा दि.15.7.2006 ते 14.7.2007 असा आहे. त्‍यामूळे पॉलिसीच्‍या नियमानुसार अपघाताच्‍या वेळी त्‍यांची पॉलिसी नव्‍हती.  त्‍यामूळे क्‍लेम देण्‍याचा प्रश्‍नच येत नाही. अर्जदार यांनी स्‍वतःची तक्रार सबळ पूरावा दाखल करुन सिध्‍द करावी.अर्जदारयांना तक्रार दाखल करण्‍यास कोणतेही कारण घडलेले नाही. अर्जदार हा अपघाताच्‍या वेळेस त्‍या योजनेस पाञ नव्‍हता त्‍यामूळे त्‍यांची तक्रार फेटाळण्‍यात यावी.  गैरअर्जदारयांना ञास देण्‍याचे उददेशाने ही तक्रार दाखल केलेली आहे, त्‍यामूळे अर्जदाराची तक्रार ही खर्चासह फेटाळण्‍यात यावी असे म्‍हटले आहे. 
              गैरअर्जदार क्र.4 यांना मंचाने नोटीस पाठवून ते हजर झाले नाही व त्‍यांनी आपले म्‍हणणे मांडले नाही म्‍हणून त्‍यांचे विरुध्‍द एकतर्फा आदेश करुन प्रकरण पूढे चालविण्‍यात आले.
 
 
 
 
                 अर्जदार यांनी पूरावा म्‍हणून आपले शपथपञ, तसेच गैरअर्जदार क्र.1, 2 व 3 यांनी पूरावा म्‍हणून शपथपञ दाखल केलेले आहे. दोन्‍ही पक्षकारानी दाखल केलेले दस्‍ताऐवज बारकाईने तपासून व पक्षकारांचा युक्‍तीवाद ऐकून खालील मूददे उपस्थित होतात.
 
          मूददे                                       उत्‍तर
1.   गैरअर्जदार यांचे सेवेतील ञूटी सिध्‍द होते काय ?         होय.
2.   काय आदेश ?                           अंतिम आदेशाप्रमाणे.
                        कारणे
मूददा क्र. 1 ः-
 
              अर्जदार ही मयत सुर्यकांत विश्‍वांभर लोंढे यांची पत्‍नी आहे. मयत सूर्यकांत यांचा मृत्‍यू हा दि.12.08.2007 रोजी सुमारे 5.30 वाजता तो शनिशिंगनापूरला त्‍यांचे साथीदार व मूलासोबत जाण्‍यासाठी अटो क्र.एम.एच.-26-सी-9668 मध्‍ये नीघाला असता पालम कडून येणारा टेम्‍पो क्र.एम.एच.-12-डिजी-2004 हा भर वेगात हयगईने व निष्‍काळजीपणे चालवून समोरुन धरक दिली त्‍यामूळे मयताचा जबर मार लागला. या अपघातात अर्जदार यांचा मूलगा पदमाकर व नवरा सूर्यकांत हे दोघेही मरण पावले.या बददलचा   पूरावा तहसीलदार, लोहा यांना दि.11.10.2007 रोजीचे पञ, तलाठयाचे व तहसिलदाराचे प्रमाणपञ दाखल केलेले आहे, अर्जदाराचे नांवाने शेती असल्‍याबददल फेरफारचे रजिस्‍टर व 7/12 दाखल केलेले आहे, एफ.आय.आर व इन्‍व्‍केस्‍ट पंचनामा दाखल केलेला आहे यात अपघातात मृत्‍यू झाला असे म्‍हटले आहे.पोस्‍ट मार्टेम रिपोर्ट मध्‍ये  Death due to shock due to harmopoenitoneum due to liver rupture असे म्‍हटलेले आहे. वीशेष कार्यकारी अधिकारी यांनी वारस प्रमाणपञ दि.5.9.2007 रोजीचे दाखल केले आहे त्‍यात मूलगा पदमाकर, प्रशांत व पत्‍नी राधाबाई हे आहेत. ग्रामसेवक यांचे मृत्‍यू दाखला प्रमाणपञ दाखल केलेले आहे.  यात अर्जदार हे शेतकरी असून ते शेतकरी व्‍यक्‍तीगत अपघात विमा योजने अंतर्गत असल्‍यामूळे ते विमा रक्‍कम मिळण्‍यास पाञ आहेत असे म्‍हटले आहे. दि.12.08.2007 रोजीला अपघात झाला, तहसीलदार लोहा यांना लगेच क्‍लेम फॉर्म सहीत दावा दाखल केलेला आहे. क्‍लेम हा 90 दिवसांचा अवधी क्‍लेम दाखल करण्‍यास होता. त्‍यामूळे तक्रार ही मूदतीत नाही असा आक्षेप घेता येणार नाही. कारण हा नियम जरी असला तरी बंधनकारक नाही.  
 
 
खेडयापाडयातील शेतकरी हा अडाणी असतो. त्‍यांना शासनाच्‍या योजनेची माहीती नसते. घरी अशी घटना घडल्‍यानंतर ते दूःखात असतात. त्‍यामूळे जबाबदारीने क्‍लेम दाखल करणे शक्‍य नसते. म्‍हणून अशा प्रकारचा उशिर झाला असल्‍यास शासनाचे परिपञका प्रमाणे क्‍लेम वेळेत दाखल करणे आवश्‍यक असले तरी हे बंधनकारक नाही, त्‍यामूळे झालेला विलंब हा माफ करुन केवळ टेक्‍नीकल कारणासाठी शेतक-याचा दावा नाकारु नये असे स्‍पष्‍ट म्‍हटले आहे.   शेतक-याचा अपघात झाला हे स्‍पष्‍ट आहे त्‍यामूळे गैरअर्जदारांनी अर्जदारास विम्‍याची रक्‍कम दिली पाहिजे हे न्‍यायाच्‍या दृष्‍टीने उचित आहे. काहीही कारणे सांगून व उगीच कागदपञाची अवाजवी मागणी म्‍हणजे सेवेतील ञूटी आहे. गैरअर्जदार यांना त्‍यांचे जबाबदारीतून मुक्‍त होता येणार नाही.
 
              गैरअर्जदार क्र.2 व 3 यांचे म्‍हणण्‍यानुसार अपघात हा पॉलिसी कालावधी मध्‍ये झालेला नाही त्‍यामूळे गैरअर्जदार हे क्‍लेम देण्‍यास बांधीत नाहीत. तशा प्रकारचा जवाब गैरअर्जदार यांनी दाखल केलेला आहे. पण अर्जदार यांनी दि.12.07.2007 रोजी महाराष्‍ट्र शासन कृषी, पशूसंवर्धन दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय वीभाग, शासन नीर्णय क्रमांक पीएआयएस 12078/649/प्र.क्र.166/07/11-ऐ मंञालय विस्‍तार दि.12.07.2007 चे शासनाचे परिपञक दाखल केलेले आहे. या आदेशानुसार शेतकरी वैयक्‍तीक अपघात विमा योजना दि.15.07.2007 ते 14.08.2007 पर्यत पूढे चालू ठेवण्‍या बाबत, सदर योजनेचे कल्‍याणकारी स्‍वरुप पाहता ही योजना पूढे सन 2007-08 मध्‍ये चालू ठेवण्‍याची बाब शासनाच्‍या विचाराधिन होती. सन 2006-07 प्रमाणे सन 2007-08 सालासाठी शेतकरी व्‍यक्‍तीगत अपघात विमा योजनेस दि.15 जूलै ते 14 ऑगस्‍ट 2007 या एक महिन्‍याच्‍या कालावधीसाठी मूदतवाढ देऊन सदर योजना पूढे चालू ठेवण्‍यास या शासन‍ नीर्णयाद्वारे मान्‍यता देण्‍यात येत आहे. सदर वाढीव कालावधीसाठी योजनेसाठीचा विमा हप्‍ता सल्‍लगार कंपनी, विमा कंपप्‍या, योजनेबाबतच्‍या इतर अटी व शर्तीमध्‍ये कोणताही बदल होणार नाही. एक महिन्‍यासाठी देय विमा हप्‍ता संपूर्ण वर्षाच्‍या 1/12 प्रमाणात देय राहील. चालू वितीय वर्षासाठी (07-08) (अ) नॅशनल इन्‍शूरन्‍स कंपनी या विमा कंपनीकडे शेतक-यांना विमा उतरविण्‍यासाठी विमा हप्‍ता व त्‍यावरील सेवा कर यासाठी रु.38,20,420/- इतकी तरतूद याद्वारे मंजूर करुन या आदेशान्‍वये वितरीत करण्‍यात येत आहे. सदरचा जी आर दाखल केलेला आहे त्‍यांची कॉपी
 
 
गैरअर्जदार यांना दिलेली आहे. त्‍यानंतर गैरअर्जदार यांनी त्‍यावर कोणताही आक्षेप घेतलेला नाही. म्‍हणून सदरचा अपघात हा दि.12.08.2007 रोजी घडलेला आहे तो पॉलिसी कालावधीमध्‍येच धरण्‍यात येत आहे. म्‍हणून गैरअर्जदार यांनी अर्जदारास अपघात विमा रक्‍कम दयावी या नीर्णयापर्यत हे मंच आलेले आहे. म्‍हणून गैरअर्जदार यांनी अर्जदारास शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत मिळणारी रक्‍कम रु.1,00,000/- व त्‍यावर दावा दाखल केल्‍यापासून 9 टक्‍के व्‍याज दराने एक महिन्‍याचे आंत दयावेत, तसे न केल्‍यास संपूर्ण रक्‍कम फिटेपर्यत 9 टक्‍के व्‍याज गैरअर्जदार यांनी दयावे. तसेच अर्जदार यांना गैरअर्जदार यांनी दावा रक्‍कम खर्चापोटी रु.3000/- एक महिन्‍यात दयावेत.
 
              वरील सर्व बाबीचा विचार करुन आम्‍ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
 
                           आदेश
1.                                         अर्जदाराची तक्रार खालील प्रमाणे मंजूर करण्‍यात येते.
2.                                         गैरअर्जदार क्र. 2 व 3 यांनी अर्जदार यांना हा निकाल लागल्‍यापासून 30 दिवसांचे आंत विम्‍याची रक्‍कम रु.1,00,000/- दयावेत व त्‍यावर दि.20.05.2010 पासून 9 टक्‍के व्‍याजाने दयावेत, तसे न केल्‍यास संपूर्ण रक्‍कम फिटेपर्यत 12 टक्‍के व्‍याज दयावे लागेल.
3.                                         गैरअर्जदार क्र. 2 व 3 यांनी दावा खर्च म्‍हणून रु.3,000/- दयावेत.
4.                                         गैरअर्जदार क्र.1 व 4 विरुध्‍द आदेश नाही.
5.                                         पक्षकारांना आदेश कळविण्‍यात यावा.
 
 
 
 
श्री.बी.टी.नरवाडे पाटील                              श्रीमती सुवर्णा देशमूख                                 श्री.सतीश सामते   
           अध्‍यक्ष                                                         सदस्‍या                                                      सदस्‍य.
 
 
 
 
 
जयंत पारवेकर
लघूलेखक