(मंचाचा निर्णय: श्री. नरेश बनसोड - सदस्य यांचे आदेशांन्वये)
-// आ दे श //-
(पारित दिनांक : 18/10/2011)
1. तक्रारकर्त्याने ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 12 अंतर्गत विरुध्द पक्षा विरुध्द तक्रार दाखल करुत तक्रारीसोबत विलंब माफीचा अर्ज दाखल केलेला आहे.
2. तक्रारकर्त्याने तक्रारीत स्पष्ट केले आहे की, सन 1984 मध्ये गैरअर्जदारांनी प्लॉटचे नोंदणीकृत विक्रीपत्र करुन देऊन कब्जा सुध्दा दिलेला होता. तसेच मी प्लॉटचा कब्जा मिळाल्यानंतर 15 वर्षे तो बघण्याकरीता गेलो नाही, तसेच वडील फत्तुजी सिताराम धोटे हे दि.20.09.1997 रोजी मरण पावले, व त्यानंतर सुध्दा मी प्लॉट बघण्याकरीता गेलो नाही.
3. आम्ही विलंब माफीचे अर्जाच्या परिच्छेद क्र.2 चे सुक्ष्म अवलोकन केले असता असे निदर्शनास आले की, सिताराम महादेवराव भजभुजे यांचे वडील श्री हत्तुजी सिताराम धोटे कसे आहेत, ही बाब संशयास्पद वाटते.
4. विलंब माफीचा अर्ज किरकोळ प्रकरण म्हणून दाखल करण्यांत आले. विरुध्द पक्षात विलंब माफीच्या अर्जावर आपले म्हणणे दाखल करण्यासाठी नोटीस बजावण्यांत आला असता पोष्टाच्या शे-यानुसार सदर लिफाफा “Unclaimed” म्हणून वापर आला.
2. तक्रारकर्त्याने विलंब माफीच्या अर्जात म्हटले आहे की, तक्रारीत नमुद प्लॉटचे सन 1984 मध्ये विरुध्द पक्षाने नोंदणीकृत विक्रीपत्र करुन दिलेले होते. तक्रारकर्त्याचे म्हणणे आहे की, त्यांनी प्लॉटचा कब्जा दिल्यानंतर मी 15 वर्षे प्लॉट बघण्याकरता गेलो नाही, तसेच वडील फत्तुजी सिताराम धोटे हे दि.20.09.1997 रोजी मरण पावले, त्यानंतर सुध्दा प्लॉट बघण्याकरता कधीही गेलो नाही. मार्च-2011 मध्ये प्लॉट बघण्याकरीता गेलो असता असे लक्षात आले की, विरुध्द पक्ष हरीचंद्र विष्णूपंत काळे, यांचा मुत्यू झालेला आहे व त्यांचा मुलगा हर्षद हरीचंद्र काळे, पार्टनर आहे. त्यास प्लॉटची मोजणी करुन एन.ए.टी.पी. ची कागदपत्रे व नकाशा द्यावा म्हणून मागणी केली असता, त्याने टाळाटाळ केली व म्हणाला की, ‘मी तुम्हाला प्लॉट विकला नाही माझ्या वडीलांनी विकला, मी तुम्हाला प्लॉटची मोजणी करुन देत नाही, तुम्हाला जे करावयाचे आहे ते करा’, असे बजावले. या कारणास्तव तक्रारकर्त्याने विलंब माफीचा अर्ज मंजूर करण्याची विनंती मंचास केलेली आहे.
3. विलंब माफीच्या अर्जावरुन हे स्पष्ट झाले की, गैरअर्जदारांनी प्लॉटचे नोंदणीकृत विक्रीपत्र तसेच ताबा हा सन 20.05.1984 मधे करुन दिलेले आहे. तक्रारकर्त्याने विलंब माफीच्या अर्जात स्वतःचा निष्काळजीपणा कबुल केलेला आहे. ग्राहक संरक्षण कायद्याच्या कलम 24(ए) नुसार सदर तक्रार दोन वर्षांचे आत दाखल केलेली नसुन, तक्रारकर्त्याने विशद केलेले कारण हे Sufficient Cause या सदरात येत नसल्यामुळे सदर झालेला विलंब समाधानकारकरित्या विशद न केल्यामुळे हा अर्ज खारिज करण्यांत येतो.