Maharashtra

Parbhani

CC/10/80

Radhabai Dnyanoba Bidgar - Complainant(s)

Versus

State Bank Of Hydrabad,Gangakhed - Opp.Party(s)

Adv.D.U.Darade

23 Sep 2010

ORDER


District Consumer Court,PARBHANIDistrict Consumer Court ,New Administrative Building,Near Telephone Bhavan PARBHANI
Complaint Case No. CC/10/80
1. Radhabai Dnyanoba BidgarR/o Dongargaon(she)Tq.Gangakhed Dist.ParbhaniParbhaniMaharastra ...........Appellant(s)

Versus.
1. State Bank Of Hydrabad,GangakhedThrough Its Branch Manager,Branch-Dewakate Building Adalat Road,GangakhedParbhaniMaharastra ...........Respondent(s)



BEFORE:
HONABLE MR. C. B. Pandharpatte ,PRESIDENTHONABLE MRS. Sujata Joshi ,MemberHONABLE MRS. Anita Ostwal ,Member
PRESENT :Adv.D.U.Darade, Advocate for Complainant

Dated : 23 Sep 2010
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

 

निकालपत्र

 

       तक्रार दाखल दिनांकः-     18/02/2010

          तक्रार नोदणी दिनांकः-    05/03/2010

      तक्रार निकाल दिनांकः-    23/09/2010

                                                                        कालावधी 06   महिने 18 दिवस

 

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी

 

अध्यक्ष -         श्री.चंद्रकांत बी. पांढरपट्टे, B.Com.LL.B.                 

सदस्या                                                                                         सदस्या

  सुजाता जोशी B.Sc.LL.B.                                                     सौ.अनिता ओस्तवाल M.Sc.              

    

      राधाबाई ज्ञानोबा बिडगर.                                  अर्जदार

      वय 50 वर्षे.धंदा.घरकाम व शेती.                         अड.डी.यु.दराडे.

रा.डोंगरगाव (शे.) ता.गंगाखेड जि.परभणी.

       विरुध्‍द

      स्‍टेट बँक ऑफ हैद्राबाद.                                   गैरअर्जदार.

   व्‍दारा ब्रँच मॅनेजर,                                   अड.बी.एन.जोशी.                                                

    ब्रँच देवकाते बिल्‍डींग अदालत रोड.गंगाखेड.

                    

  -------------------------------------------------------------------------------------       

     कोरम  -    1)    श्री.सी.बी.पांढरपट्टे.      अध्‍यक्ष.

2)        सौ.सुजाता जोशी.                   सदस्या.                                              3)        सौ.अनिता ओस्तवाल.                 सदस्‍या.

 -------------------------------------------------------------------------------------------------------                

                                 

 ( निकालपत्र पारित व्दारा श्री.सी.बी.पांढरपट्टे. अध्‍यक्ष.  )

     

      शासनाने जाहिर केलेल्‍या शेती कर्ज थकबाकी सवलतीचा लाभ अर्जदारास देण्‍याच्‍या बाबतीत गैरअर्जदार बँकेने केलेल्‍या सेवात्रुटीची दाद मिळणेसाठी प्रस्‍तुतची तक्रार आहे.

अर्जदार डोंगरगाव ( शे.) तालुका गंगाखेड येथील रहिवासी शेतकरी आहे. त्‍याने गैरअर्जदार यांच्‍या गंगाखेड शाखेतून सन 2006 मध्‍ये रु. 97500/- चे मध्‍यम मुदत 13 वर्ष मुदतीचे कर्ज घेतले होते त्‍याचा व्‍याजदर 11.5 टक्‍के होता. केंद्र शासनाने सन 2008 मध्‍ये देशातील शेतक-यांसाठी वित्‍तीय संस्‍थाकडून त्‍याने घेतलेल्‍या शेती कर्जाच्‍या थकबाकीमध्‍ये माफी अगर सवलतीची योजना जाहिर केली होती.अर्जदाराचे म्‍हणणे असे की, त्‍याच्‍या मालकीची 1 हेक्‍टर 60 आर एवढीच जमीन आहे शासनाने दोन हेक्‍टर पेक्षा कमी मालकीच्‍या शेतक-यास शंभर टक्‍के कर्ज माफीची योजना जाहिर केली होती.त्‍यामुळे अर्जदार 100 टक्‍के कर्जमाफीस लाभार्थी ठरला होता. अर्जदाराचे पुढे म्‍हणणे असे की, योजना कार्यान्‍वीत झाल्‍यानंतर तीची अंमल बजावणी ताबडतोब करावी असे शासनाचे आदेश होते तसेच कर्ज माफी दिल्‍यावर शेतक-याला 6 टक्‍के दराने नविन कर्ज देण्‍याचेही शासनाचे आदेश होते त्‍यानुसार अर्जदार ता.30/12/2009 रोजी गैरअर्जदारास समक्ष भेटून त्‍याने थकबाकी मध्‍ये शंभर टक्‍के कर्ज माफी देण्‍याची मागणी केली होती.परंतु गैरअर्जदाराने ती देण्‍याचे नाकारले व सेवात्रुटी केली म्‍हणून ग्राहक मंचात प्रस्‍तुतचा तक्रार अर्ज दाखल करुन अर्जदारास गैरअर्जदाराने शंभर टक्‍के कर्ज माफी देवुन बेबाकी प्रमाणपत्र द्यावे याखेरीज मानसिकत्रासापोटी रु.2000/- आणि अर्जाचा खर्च रु. 500/- मिळावा अशी मागणी केली आहे.

तक्रार अर्जाचे पुष्‍टयर्थ अर्जदाराचे शपथपत्र (नि.2 ) आणि पुराव्‍यातील कागदपत्रात नि.5 लगत कर्ज खात्‍यात खात्‍याच्‍या पासबुकाची छायाप्रत, जमिनीचा 7/12 व 8 अ चा उतारा अशी 3 कागदपत्रे दाखल केलेली आहेत.

तक्रार अर्जावर लेखी म्‍हणणे सादर करण्‍यासाठी गैरअर्जदारास मंचातर्फे नोटीस पाठविल्‍यावर त्‍यांनी तारीख 04/06/2010 रोजी प्रकरणात लेखी जबाब ( नि.10) सादर केला तक्रार अर्जातील कर्ज रक्‍कमे संबंधीचा मजकूर वगळता बाकीची सर्व विधाने साफ नाकारली आहेत. पुढे असा खुलासा केला आहे की, कर्ज माफीची अर्जदाराने केलेली मागणी वस्‍तुतः नियमबाह्य आहे.कारण त्‍याने गैरअर्जदाराकडून घेतलेले कर्ज तारण गहाण प्रकारातील होते. त्‍याची परतफेड सहामाही हप्‍त्‍याने करावयाची होती.अर्जदाराच्‍या मालकीची 1 हेक्‍टर 60 आर जमीन असल्‍याचे त्‍यानी मान्‍य केले आहे परंतु कर्ज माफी योजने प्रमाणे 2 हेक्‍टर पेक्षा कमी मालकीच्‍या शेतक-यांना 100 टक्‍के कर्ज माफी मिळते असा अर्जदाराने योजनेचा चुकीचा गैरअर्थ काढलेला आहे.प्रत्‍यक्षात 31/12/2007 पर्यंत  हप्‍त्‍याची थकबाकी राहिली असेल व ती 29/02/2008 पर्यंत भरली नसेलतर तेवढयाच रक्‍कमेची माफी देण्‍याची योजनेत तरतूद आहे.अर्जदाराला ता.08/06/2006 मध्‍ये कर्ज दिल्‍यानंतर 31/12/2007 पर्यंत त्‍याच्‍याकडे ओव्‍हरड्यु रक्‍कम रु.27,968/- अधिक व्‍याज 8072/- असे मिळून 36040/- थकबाकी होती.शिवाय 31/12/2007 ते 29/02/2008 पर्यंतचे व्‍याज रु. 2403/- देखील येणे होते.

योजनेतील मार्गदर्शक सुचने प्रमाणे 29/02/2008 पर्यंतची थकबाकी रु. 36040/- या रक्‍कमेची कर्ज माफी मिळणेस अर्जदार पात्र होता त्‍यानुसार अर्जदारास तो फायदा देण्‍यात आलेला आहे.अर्जदाराने घेतलेले कर्ज पीक कर्ज स्‍वरुपातील नसल्‍यामुळे 100 टक्‍के कर्ज माफीचा लाभ मिळणेस तो पात्र नाही शिवाय त्‍याने घेतलेले कर्ज हे मध्‍यम मुदतीचे असल्‍यामुळे 31/02/2008 नंतरचे हप्‍ते व व्‍याज वसुल करण्‍याचा बँकेला अधिकार आहे.वरील सर्व बाबी विचारात घेवुन तक्रार अर्ज रु. 5000/- च्‍या कॉम्‍पेन्‍सेटरी कॉस्‍टसह फेटाळण्‍यात यावा अशी शेवटी विनंती केली आहे.

लेखी जबाबाच्‍या पुष्‍टयर्थ गैरअर्जदारांचे शपथपत्र नि.11 दाखल केलेले आहे.आणि पुराव्‍यातील कागदपत्रात नि.13 लगत कर्ज माफी योजने संबंधी गैरअर्जदार बँकेने प्रसिध्‍द केलेले पत्रक अर्जदाराला कर्ज माफी दिल्‍याचे तपशिलाचे परिशिष्‍ट दाखल केलेले आहे.

प्रकरण अंतिम सुनावणीसाठी नेमल्‍यानंतर अर्जदाराचे वकिलांनी देखील कर्ज माफी दिल्‍याचे पत्रकाचे अवलोकन केल्‍यानंतर अर्जदारास म्‍हणणे प्रमाणे कर्ज माफी दिली असल्‍याचे त्‍यांनी मंचासमोर प्रमाणिकपणे मान्‍यही केलेले होते व आहे प्रकरण पुढे काढून घेण्‍याविष अर्जदाराशी संपर्क साधून बोलावुन घेण्‍यासाठीच ता.02/07/2010 नंतर वेळोवेळी 4 ते 5 मुदती घेतल्‍या मात्र कोणतीही कार्यवाही केली नाही त्‍यामुळे मेरीटवर प्रकरण अंतिम निकालासाठी घ्‍यावे लागले आहे.

निर्णयासाठी उपस्थित होणारे मुद्दे.

                             मुद्दे.                                                         उत्‍तर.

1     गैरअर्जदार बँकेने अर्जदारास शासनाच्‍या योजने प्रमाणे

दिलेल्‍या कर्ज माफी रक्‍कमेच्‍या संदर्भात सेवात्रुटी

झालेली आहे काय?                                         नाही.                                  

2     अर्जदार कोणता अनुतोष मिळणेस पात्र आहे?          अंतिम आदेशा प्रमाणे.                                 

                                                            

कारणे

मुद्दा क्रमांक 1 व 2

      केंद्र शासनाच्‍या कर्जमाफी योजने अंतर्गत सर्वं पात्र खातेदार शेतक-यांनी दिनांक 30 जुन 2008 रोजी  शेती व्‍यवसायासाठी बॅकेकडून अथवा  अन्‍य वित्‍तीय संस्‍थाकडून घेतलेल्‍या कर्जाच्‍या थकबाकीत कर्ज माफीची घोषणा जाहीर केल्‍यावर महाराष्‍ट्र शासनाने त्‍याच्‍या अंमलबजावणीसाठी शासन परिपत्रक क्रमांक सी.सी.आर 1408/प्र.क्र.419/2-स  सहकार पणन व वस्‍त्रोद्योग विभाग मंत्रालय, मुंबई दिनांक 21.05.2008 चे परिपत्रक काढून कोणत्‍या कर्जदार शेतक-यांना कशा पध्‍दतीने कर्जमाफीचा / कर्जसवलतीचा लाभ दयावा व त्‍याची कार्यवाही कशी करावी या संबधीचे मार्गदर्शन  माहिती परिपत्रकात दिलेली आहे. गैरअर्जदार बँकेनेही या संबंधी प्रसिध्‍द केलेल्‍या परिपत्रकाची छायाप्रत प्रकरण क्रमांक 32/2010 मध्‍ये नि.13/1 ला दाखल केलेली आहे. शासन परिपत्रकातील योजनेचा थोडक्‍यात परामर्श असा आहे की, योजनेचा लाभ दि.31/3/2007 पर्यंत वाटप केलेले आणि दि.31/12/2007 रोजी थकीत झालेले व दिनांक 29/2/2008 पर्यंत परतफेड न केलेले कर्जाची 100 % कर्जमाफी ज्‍या शेतक-यांचे जमिनीचे क्षेत्र 2 हेक्‍टर पेक्षा कमी आहे त्‍याला. आणि  2 हेक्‍टर पेक्षा जास्‍त क्षेत्र असलेल्‍या शेतक-यांना 25 % किंवा 20,000/- पैकी जी जास्‍त रक्‍कम असेल त्‍या रक्‍कमे पर्यंत कर्ज माफी देण्‍यात आलेली आहे  शेतक-यांनी बँक किंवा पतसंस्‍थाकडून घेतलेल्‍या शेतीकर्जाच्‍या व्‍याख्‍येनुसार 1) अल्‍पमुदत उत्‍पादन कर्जः- यामध्‍ये पीक लागवडीसाठी देण्‍यात आलेले तसेंच फळबाग लागवडीसाठी देण्‍यात आलेले रु. 1,00,000/- पेक्षा जास्‍त नसलेल्‍या खेळत्‍या भांडवलासाठी देण्‍यात आलेले कर्ज 2) गुंतवणूक कर्जः-  यामध्‍ये जमिनीची उत्‍पादकता वाढविण्‍यासाठी दिलेले थेट कर्ज यात विहीर खोदाईसाठी पंपसेट बसविण्‍यासाठी ट्रॅक्‍टर / बैलजोडी खरेदी करण्‍यासाठी फळबाग लागवडीसाठी दुग्‍धव्‍यवसाय कुक्‍कूट पालन शेळयामेंढया पालन वराह पालन मत्‍स्‍य व्‍यवसाय मधुमक्‍शीका पालन ग्रीन हाऊस व बायोगॅससाठी देण्‍यात आलेल्‍या कर्जाचा समावेश आलेला आहे.    

      शासनाच्‍या मार्गदर्शन  व माहिती पत्रकात शेतक-यांच्‍या वर्गीकरणाबाबतचा पुढे असा खुलासा दिला आहे की, 1) अत्‍यल्‍प शेतकरी म्‍हणजे 1 हेक्‍टर पर्यंत जमिनीची लागवड करणारा शेतकरी 2) अल्‍प शेतकरी  म्‍हणजे 1 हेक्‍टर ते 2 हेक्‍टर पर्यंत जमिनीची लागवड करणारा शेतकरी आणि 3) इतर शेतकरी म्‍हणजे 2 हेक्‍टर पेक्षा जास्‍त जमिनीची लागवड करणारा

     

 

       प्रस्‍तुत प्रकरणातील अर्जदाराच्‍या मालकीची डोंगरगाव येथे 1 हेक्‍टर 60 आर शेत जमीन आहे ही अडमिटेड फॅक्‍ट आहे.पुराव्‍यात अर्जदाराने नि.5/2 व 5/3 वर 7/12 व 8 अ चा उतारा दाखल करुन शाबीत ही केलेले आहे.अर्जदाराने घेतलेले कर्ज हे मुळातच टर्मलोन तथा मध्‍य मुदतीचे कर्ज घेतलेले आहे ही देखील अडमिटेड फॅक्‍ट आहे.शासकीय योजने प्रमाणे मिळणा-या कर्ज माफी मध्‍ये टर्मलोनच्‍या बाबतीत घेतलेल्‍या कर्जाची थकबाकी ( ओव्‍हर ड्यू अमाऊंट ) 31/12/2007 पर्यंत येणे असेल व 29/02/2008 पर्यंत ती फेडलेली नसेल तेवढया रक्‍कमे पुरतेच कर्ज माफी द्यावी असे परिपत्रक मध्‍ये नमुद आहे.गैरअर्जदारांनी पुराव्‍यात नि.13/2 ला दाखल केलेल्‍या कर्जमाफीच्‍या तपशिलाचे अवलोकन केले असता अर्जदाराकडे 29/02/2008 पर्यंत 36040/- व्‍याजासह थकबाकी होती त्‍याप्रमाणे त्‍या रक्‍कमेची त्‍याला कर्ज माफी दिलेली असल्‍याचे नमुद केलेले आहे.29/02/2008 नंतर मात्र कर्ज रक्‍कमेचे उरलेले हप्‍ते व त्‍यावरील व्‍याजही अर्थातच अर्जदार माफी मिळण्‍यास पात्र नाही.व टर्मलोन असल्‍यामुळे 100 टक्‍के कर्ज माफीचा लाभ या कर्ज प्रकरणात मिळू शकत नाही याबद्दल मंचाचेही दुमत नाही. मंचाने वर नमुद केल्‍याप्रमाणे अर्जदारास गैरअर्जदार बँकेने दिलेले कर्ज माफी नियमा प्रमाणे योग्‍य व बरोबर असल्‍यामुळे त्‍यांच्‍याकडून याबाबतीत कसलीही सेवात्रुटी झालेली नाही.त्‍यामुळे तक्रार अर्जातून अर्जदारास 100 % कर्ज माफीची केलेली मागणी चुकीची असल्‍याने ती मान्‍य करता येणार नाही.तसेच गैरअर्जदाराने बेबाकी प्रमाणपत्र देण्‍याचाही प्रश्‍न उतर नाही.सबब आम्‍ही खालील प्रमाणे आदेश देत आहोंत.

                        आदेश

1         तक्रार अर्ज नामंजूर करण्‍यात येत आहे.

2     पक्षकारांनी आपला खर्च आपण स्‍वतः सोसावा.

3     पक्षकारांना आदेशाच्‍या प्रती मोफत पुरविण्‍यात याव्‍यात.     

 

 

 

 

श्रीमती अनिता ओस्‍तवाल.          सौ.सुजाता जोशी.           श्री.सी.बी.पांढरपट्टे.

     सदस्‍या.                       सदस्‍या.                    अध्‍यक्ष.

 

 


[HONABLE MRS. Sujata Joshi] Member[HONABLE MR. C. B. Pandharpatte] PRESIDENT[HONABLE MRS. Anita Ostwal] Member