निकालपत्र
(द्वारा अध्यक्ष : श्री.विजय चंद्रलाल प्रेमचंदानी)
________________________________________________________
१. तक्रारदाराने ग्राहक संरक्षण कायदा १९८६ कलम १२ प्रमाणे सदर तक्रार दाखल केलेली आहे.
२. तक्रारदार हे कापरेवाडी, ता.कर्जत जि.अहमदनगर येथील रहिवासी असुन, तक्रारदार हे स्वतःची शेती व भाडे तत्वावरील शेतीचा व्यवसाय करतात. त्यासाठी तक्रारदार याने युनियन क्वॉलिटी प्लास्टीक कंपनी यांच्याकडुन शेत तलावाचा प्लास्टीक पेपर खरेदी केला. त्यासाठी त्याने पुणे येथील फेडरल बॅंकेमार्फत आर.टी.जी.एस. ने रूपये २,००,०००/- कंपनीला दिले. सामनेवाले क्र.२ यांनी हलक्या दर्जाच्या शेत तलावाचा प्लॅस्टीक पेपर दिला तो जुळवल्यावरती लिकेज होऊन सदरचा पेपर फाटत आहे. तरी तक्रारदार याचे शेततळे पाण्याचे भरले असता प्लास्टीक फिल्म खराब असल्याने शेतावरील सर्व पाणी लिकेज होऊन गळुन गेले. त्यामुळे तक्रारदाराचे सर्व पिकांचे पाण्याअभावी नुकसान झाले. सदर नुकसान सामनेवालेने शेततलावाच्या प्लास्टीक फिल्म खराब असल्याने झाले. सदर प्लॅस्टीक पेपर सामनेवाले क्र.१ चे मार्फत खरेदी केले असल्याने व तो निष्कृष्ट दर्जाचा असल्याने तक्रारदाराचे नुकसान झाले. सामनेवाले क्र.१ व २ यांनी तक्रारदाराला विकलेले प्लॅस्टीक पेपर खराब असल्याचा अहवाल गर्व्हनमेंट पॉलीटेक्नीक अहमदनगर यांनी पेपराची तपासणी करून दिनांक २५-०३-२०१५ रोजीचा अहवाल तक्रारदार यांना दिलेला आहे. तक्रारदार यांनी सामनेवाले क्र.१ यांना समक्ष त्यांच्या दुकानात जाऊन तक्रारीबाबत लेखी सुचना देऊन त्याची पोहोच घेतली आहे व सदर तक्रारीची पाहोच सामनेवाले यांना दिनांक २६-०८-२०१५ रोजी रजिस्टर पोस्टाने पाठविली आहे. तरीसुध्दा सामनेवालेने त्यावर दखल घेतली नसल्याने तक्रारदाराने सामनेवालेला नुकसान भरपाई देण्यास कंपनीस दिनांक १३-१०-२०१५ रोजी नोटीसद्वारे कळविले आहे. सदर नोटीस सामनेवालेला प्राप्त होऊन कोणतीही दखल घेतली नसल्याने सदर तक्रार मंचासमक्ष दाखल करण्यात आलेली आहे.
तक्रारदाराने तक्रारीत अशी मागणी केली आहे की, सामनेवाले क्र.१ व २ यांनी तक्रारदाराचे शेत तळ्यावर खराब प्लॅस्टीक पेपर लावण्यात आल्यामुळे तक्रारदाराची जमीनीतुन पेरण्यात आलेले पीकाचे झालेले नुकसान भरपाई सामनेवालेकडुन मिळविण्याचा आदेश व्हावा, तसेच तक्रारदाराला चांगल्या प्रतीच्या ५०० मायक्रॉनचा प्लॅस्टीक पेपर सामनेवालेने बदलुन द्यावे व तक्रारीचा खर्च सामनेवालेकडुन मिळण्याचा आदेश व्हावा.
३. तक्रारदाराची तक्रार स्विकृत करून सामनेवालेंना नोटीस काढण्याचा आदेश पारीत करण्यात आला. सामनेवाले क्र.१ यांना नोटीस प्राप्त होऊनसुध्दा प्रकरणात हजर झाले नाही म्हणुन नि.क्र.१ वर सामनेवाले क्र.१ यांच्याविरूध्द प्रकरणात एकतर्फा चालविण्याचा आदेश पारीत करण्यात आला. सामनेवाले क्र.२ यांनी नि.क्र.२१ वर त्यांचे म्हणणे सादर केलेले आहे. सामनेवाले क्र.२ यांनी त्यांच्या कैफीयतीत असे कथन केलेले आहे की, तक्रारदार यांनी तक्रारीत सामनेवाले क्र.२ यांच्याविरूध्द लावलेले आरोप खोटे असुन त्यांना नाकबुल आहे. सामनेवाले क्र.२ ने पुढे असे कथन केलेले आहे की, सामनेवाले क्र.१ हे सामनेवाले क्र.२ या कंपनीचे अधिकृत डिलर आहेत. सामनेवाले क्र.२ कंपनीकडुन प्लॅस्टीक पेपर घेऊन ते शेतकरी यांना विक्री करण्यास तसेच सदरचा कागद शेतकरी यांच्या सुचनेनुसार त्यांच्या शेततळ्यामध्ये बसवुन देण्याचा व्यवसाय करतात. सदरचा कागद बसवतांना शेततळ्यात जर बारीक दगड असल्यास पेपरास छिद्र पडु शकतात. म्हणुन याबाबतची काळजी घेणे ही जबाबदारी ही संबंधीत शेतकरी याची असते व कंपनीच्यावतीने तसेच डिलर यांच्यावतीने शेतकरी यांना तश्याच प्रकारची सुचना देण्यात येतात. इतक्यात नव्हे तर सदर सुचना तक्रारदाराला देण्यात आली होती. सदर कागद घाईगडबडीत टाकल्याने व शेतामध्ये बारीक दगड असल्याने सदरचा कागद दगडामुळे खराब होऊ शकतो त्यात उत्पादक कंपनीची आणि डिलरची कोणतीही जबाबदारी नाही. तक्रारदाराचे प्लॅस्टीक कपडा बारीक काळे छिद्र पडल्याचे तक्रारीत नमुद करण्यात आले आहे. ही बारीक छिद्र बारीक दगडांमध्ये झाले असले तरी त्यात कोणताही उत्पादीत दोष नाही. सामनेवाले क्र.२ यांनी या कंपनीचे उत्पादीत केलेला कागद हा आय.एस.ओ. प्रमाणीत असुन उच्च दर्जाचा आहे. जोडावरील लिकेज होणे म्हणजे कापडात कोणताही दोष नसुन सामनेवाले क्र.१ यांनी व्यवस्थ्ीत काळजीत न घेतल्याने जुळवतांन गळती होऊ शकतेती दुरूस्त करण्याची जबाबदारी ही सामनेवाले क्र.१ यांच्यावर असुन सामनेवाले क्र.२ यांची कोणतीही जबाबदारी नाही. सदर अर्जातील तक्रारदार याच्या नावावर शेतजमीन नसुन सदरील शेत तलावातील शेतजमीन ही मंडलीक जयप्रकाश याच नावावर आहे. सदरील जमीन ही करारनाम्याने तारीख १८-०२-२०१५ रोजी तक्रारदाराने घेतली असुन सदर कागदाचा खरेदी केलेल्या त्यावेळी शेतजमीनीचा तक्रारदार याचा कोणताही संबंध नव्हता. म्हणुन तक्रारदार याचा सामनेवालेशी कोणताही ग्राहक व विक्रेता नातेसंबंध निर्माण होऊ शकत नाही. सामनेवाले क्र.१ व २ यांनी महाराष्ट्रा बाहेर राज्यात शेत तलावासाठी सदर प्लॅस्टीक कागद विकले असुन अशाप्रकारची कोणतीही तक्रार आली नसुन सदर तक्रार खोटी असुन खर्चासह खारीज करण्यात यावी अशी विनंती करण्यात आली आहे.
तक्रारदाराने दाखल तक्रार, दस्तऐवज सामनेवाले क्र.२ ने दाखल केलेली जबाब व उभयपक्षांची तोंडी युकितवाद मंचासमोर खालीलप्रमाणे मुद्दे विचारात घेण्यात येत आहे.
अ.क्र. | मुद्दे | निष्कर्ष |
१. | तक्रारदार क्र.१ व २ हे सामनेवालेंचे ग्राहक आहेत काय ? | होय |
२. | सामनेवाले क्र.१ व २ यांनी तक्रारदार यांना सेवेत त्रुटी दिलेली आहे काय ? | होय |
३. | आदेश काय ? | अंतीम आदेशाप्रमाणे |
मुद्दा क्र.१ -
४. ही बाब तक्रारदाराने निशाणी क्र.४ दस्त क्र.९ व १० वर दाखल देयकावरून सिध्द होते. तक्रारदाराने त्याकरीता सामनेवालेकडे रकमांची भरणा केली ही बाब उभयपक्षांना मान्य आहे. सबब तक्रारकर्ता हे सामनेवाले क्र.१ व २ यांचे ग्राहक आहेत, असे सिध्द होते. सबब मुद्दा क्र.१ चे उत्तर होकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
मुद्दा क्र.२ –
५. तक्रारदाराने नि.क्र.४ वर दाखल दस्त क्रमांक ९ व १० याचे पडताळणी करतांना असे दिसुन आले की, सामनेवाले क्र.२ यांनी तक्रारदाराला शेत तलावाकरीता प्लॅस्टीकचे कागद विकलेले होते, तसेच ते बसविण्याकरीता ३६,०००/- रक्कम स्विकारली होती. सदर प्लॅस्टीक कागद सामनेवाले क्र.१ कडुन तक्रारदाराकडे लावण्यात आलेला होता. सामनेवाले क्र.२ यांनी त्यांच्या कैफीयतीत हे मान्य केलेले आहे की, सदर प्लॅस्टीक कागद जोड ठिकाणी (जॉईंन्टवर) खराब झाला असल्याने शेत तलावात साचलेले पाणी हे पुर्णपणे वाया गेले असतील. सामनेवाले क्र.२ यांनी प्लॅस्टीक कागद बसविण्याकरीता रक्कम स्विकारली म्हणुन त्यांची ही जबाबदारी ठरते की, सदर प्लॅस्टीक कागद बसविणेवेळी योग्य काळजी घेण्यात आली होती किंवा नाही. तसेच सामनेवाले क्र.१ यांची ही जबाबदारी आहे की, सदर प्लॅस्टीक कागद शेत तळ्यात योग्य पध्दतीने बसविणत यावे व त्याच्या जोड ठिकाणी प्लॅस्टीक कागदाचे कोणतेही नुकसान झाले नाही पाहिजे. तक्रारदाराला सामनेवाले क्र.२ यांनी पुरविलेला प्लॅस्टीक कागद ५०० मायकॉनचा होता किंवा नाही तसेच सदर प्लॅस्टीक कागद निम्न दर्जाचा होता ही बाब तक्रारदाराने तज्ञ विशेषज्ञानाच्या अहवालाअभावी सिध्द करू शकले नाही. तसेच तक्रारदाराचे शेत तलावावर पशुपक्षी किंवा जंगली जनावरेमुळे सदर प्लॅस्टीक कागद खराब झाला किंवा दगडांमुळे झाला ही बाबही सामनेवाले यांनी तज्ञ विशेषज्ञानाच अहवलाअभावी सिध्द करू शकले नाही. सामनेवाले क्र.२ यांनी सदर प्लॅस्टीकचा कागद जोड ठिकाणी खराब झाला आहे, ही बाब कैफीयतीत मान्य केलेली असुन सदर प्लॅस्टीक कागद खराब झाला होता, ही बाब सिध्द झाली आहे. सामनेवाले क्र.२ यांनी सदर प्लॅस्टीक कागद बसविण्याकरीता रक्कम स्विकारली होती व सामनेवाले क्र.१ ने ती योग्यप्रमाणे शेत तलावामध्ये बसविलेले नव्हते व त्यानंतर त्याची दुरूस्ती किंवा त्याची पडताळणी करीता सामनेवाले क्र.१ व २ यांना तक्रार प्राप्त होऊनसुध्दा दुर्लक्ष केले, ही बाब सामनेवाले क्र.१ व २ यांची तक्रारदाराप्रती न्युनतम सेवा दर्शविते. सबब मुद्दा क्र.२ चे उत्तर होकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
मुद्दा क्र.३ -
६, त्यातील असलेले तथ्य सदर प्रकरणात लागु पडत नाही. तक्रारदाराने शेत तलावात पाणी गळुन गेले असल्याने त्याचे आर्थिक नुकसान रूपये १९,५८,७००/- पर्यंत झाले याबाबत तक्रारदाराने कोणताही दस्तऐवज पुरावा प्रकरणात सादर केललेा नाही, ही बाब ग्राह्य धरून तसेच मुद्दा क्र.१ व २ चे विवेचनावरुन खालीलप्रामणे अंतीम आदेश पारीत करण्यात येत आहे.
अंतीम आदेश
१. तक्रारदाराची तक्रार अंशतः मंजुर करण्यात येत आहे. २. तक्रारदाराने सामनेवाले क्र.२ ला प्लॅस्टीक कागद बसविणेकरीता दिलेली रक्कम रूपये ३६,०००/- सामनेवाले क्र.२ यांनी तक्रारदाराला परत करावी. ३. तक्रारदाराला झालेल्या शारीरिक, मानसिक त्रासापोटी रूपये २०,०००/-, तसेच तक्रारीचा खर्च रूपये ३,०००/- सामनेवाले क्र.१ व २ यांनी व्यकितगत व संयुक्तरितीने द्यावे. ४. वरील नमुद आदेशाची पुर्तता सामनेवाले क्र.१ व २ यांनी आदेशाची प्रत मिळाल्यापासुन ३० दिवसाच्या आत करावी. ५. तक्रारदारला ‘क’ व ‘ब’ फाईल परत करावी. ६. आदेशाची प्रत विनामुल्य देण्यात यावी. |