::निकालपत्र::
(निकालीपत्र पारीत द्वारा- श्रीमती जयश्री येंडे, मा.सदस्या)
(पारीत दिनांक –27 एप्रिल, 2012 )
1. अर्जदार/तक्रारदाराने ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 अन्वये प्रस्तूत तक्रार गैरअर्जदारा विरुध्द न्यायमंचासमक्ष दाखल केली.
2. अर्जदार/तक्रारदाराची संक्षीत तक्रार अशी आहे की, यातील गैरअर्जदार/विरुध्दपक्षाचा शेतीचे अकृषक वापरामध्ये रुपांतरण करुन भूखंड विक्रीचा व्यवसाय आहे. तक्रारदाराने गैरअर्जदाराशी नागपूर ये्थे संपर्क साधून गैरअर्जदाराचे मौजे सुराबर्डी, तालुका जिल्हा नागपूर येथील प.ह.नं.26, खसरा नं.36 मधील भूखंड क्रमांक-04, क्षेत्रफळ 1720.73 चौरसफूट, एकूण रक्कम रुपये-77,433/- एवढया किंमतीत खरेदी करण्याचा करार दिनांक-01.01.2008 रोजी केला. त.क.ने बयानापोटी रुपये-15,500/- गैरअर्जदारास दिले. करारा प्रमाणे उर्वरीत रक्कम रुपये-61,933/- प्रतीमाह रुपये-1720/- प्रमाणे एकूण 36 हप्त्यात दिनांक-01.01.2008 ते 01.01.2011 या कालावधीत अदा करावयाचे होती.
ग्राहक तक्रार क्रमांक : 508/2011
3. त.क.ने पुढे असे नमुद केले की, त्याने करारा प्रमाणे विहित मुदतीत गैरअर्जदारास रुपये-58,500/- अदा केले होते. त्याच प्रमाणे उर्वरीत रक्कम एकमुस्त स्विकारुन करारातील अटी व शर्ती नुसार सदर भूखंडाचे विक्रीपत्र करुन देण्याची विनंती त.क.ने गैरअर्जदारास केली असता, गैरअर्जदाराने कायदेशीर बाबीची पुर्तता करुन तसेच मोजणी करुन देऊन, भूखंडाचे विक्रीपत्र करुन देण्यास असमर्थतता दर्शविली आणि त.क. यास आजचे बाजारभावाने भूखंडाची रक्कम परत करण्याचे आश्वासन दिले.
4. त.क.ने पुढे असेही नमुद केले की, गैरअर्जदाराने दिनांक-28.04.2010 रोजी बयानापत्र व पावत्यासह संपूर्ण मूळ दस्तऐवज परत घेतले व दिनांक-07.05.2011 व 16.05.2011 रोजी अनुक्रमे रुपये-30,000/- व रुपये-28,500/- एवढया रकमेचे आय.डी.बी.आय.बँक सिताबर्डी शाखा, नागपूरचे दोन धनादेश त.क.यास दिलेत. परंतु सदरचे दोन्ही धनादेश हे गैरअर्जदाराचे बँकेच्या खात्यात पुरेशी रक्कम शिल्लक नाही या कारणास्तव अनादरीत झाले. अशाप्रकारे गैरअर्जदाराने सदर प्रकरणात अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला आणि करारा नुसार भूखंडाचे विक्रीपत्र करुन दिले नाही वा रक्कमही परत केली नाही आणि ही गैरअर्जदाराचे सेवेतील त्रृटी आहे.
4. म्हणून तक्रारकर्त्याने प्रस्तुत तक्रार दाखल करुन तीद्वारे, गैरअर्जदाराने करारा प्रमाणे उर्वरीत रक्कम एकमुस्त स्विकारुन भूखंडाची मोजणी करुन देऊन नोंदणीकृत खरेदी त.क.चे नावे करुन द्यावी किंवा असे करणे शक्य नसल्यास करारातील नमुद भूखंडाचे क्षेत्रफळा प्रमाणे आजचे बाजारभावाने येणारी रक्कम
ग्राहक तक्रार क्रमांक : 508/2011
दिनांक-01.01.2011 पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष्य अदायगी पावेतो द.सा.द.शे.18% दराने व्याजासह परत करण्याचे गैरअर्जदारास आदेशित व्हावे. तक्रारकर्त्यास झालेल्या मानसिक, शारिरीक त्रासा बद्यल रुपये-50,000/- आणि तक्रारीचा खर्च म्हणून रुपये-10,000/- मिळावेत अशी मागणी तक्रारीद्वारे केली.
5. प्रस्तुत प्रकरणात या न्यायमंचाचे मार्फतीने यामधील गैरअर्जदार/विरुध्दपक्ष क्रमांक-1 ते 3 चे नावे नोंदणीकृत डाकेने स्वतंत्ररित्या नोटीस पाठविली असता "Door Closed" "Second Intimation" आणि शेवटी " Not Claimed Return to Sender" Dated-05.10.2011 या पोस्टाचे शे-यासह तीनही पॉकिट परत आले व ते अभिलेखावर दाखल आहेत. म्हणून गैरअर्जदार/विरुध्दपक्ष क्रमांक 1 ते 3 विरुध्द सदरचे प्रकरण एकतर्फी चालविण्याचा आदेश न्यायमंचाने दिनांक 21.03.2012 रोजी प्रकरणात पारीत केला.
6. प्रस्तुत प्रकरणात त.क.ने प्रतिज्ञालेखावर दाखल केला. सोबत निशाणी क्रमांक 3 पान क्रं 11 वरील यादी नुसार एकूण 01 ते 35 दस्तऐवज दाखल केले असून, ज्यामध्ये बयानापत्र, नोंद पुस्तीका, पावत्या, धनादेश, धनादेश परत आल्याचे सुचनापत्र, नकाशा अशा दस्तऐवजाचा समावेश आहे.
7. तक्रारकर्त्याची तक्रार, प्रकरणातील उपलब्ध दस्तऐवज आणि त.क.चा युक्तीवाद यावरुन न्यायमंचाचा निष्कर्ष खालील प्रमाणे-
::निष्कर्ष ::
8. प्रकरणातील त.क.ची तक्रार, उपलब्ध दस्तऐवजाचे अवलोकन केले असता, निर्विवादपणे सिध्द होते की, त.क.ने गैरअर्जदारा सोबत त्यांचे मौजे सुराबर्डी,
ग्राहक तक्रार क्रमांक : 508/2011
तालुका जिल्हा नागपूर येथील प.ह.नं.26, खसरा नं.36 मधील भूखंड क्रमांक-04, क्षेत्रफळ 1720.73 चौरसफूट, एकूण रक्कम रुपये-77,433/- एवढया किंमतीत खरेदी करण्याचा करार दिनांक-01.01.2008 रोजी केला. प्रकरणातील दाखल दस्तऐवजा वरुन हे सुध्दा दिसून येते की, तक्रारकर्त्याने गैरअर्जदारास भूखंडपोटी बयाना रक्कम म्हणून रुपये-15,500/- अदा केले. तसेच दिनांक-27.02.2010 पर्यंत मासिक हप्त्यापोटी वेळोवेळी रुपये-43,000/- एवढी रक्कम अदा केली. अशाप्रकारे त.क.ने गैरअर्जदारास बयानापोटी व हप्त्यापोटी एकूण रक्कम रुपये-58,500/- अदा केली होती.
9. त.क.चे शपथपत्रावरुन हे सुध्दा दिसून येते की, गैरअर्जदाराने कायदेशीर बाबीची पुर्तता न झाल्याचे कारणा वरुन सदर भूखंडाचे विक्रीपत्र करुन देण्यास असमर्थता दर्शविली होती आणि तक्रारकर्त्यास दिनांक-07.05.2011 व 16.05.2011 रोजी अनुक्रमे रुपये-30,000/- व रुपये-28,500/- एवढया रकमेचे आय.डी.बी.आय.बँक सिताबर्डी शाखा, नागपूरचे दोन धनादेश दिलेत. परंतु सदरचे दोन्ही धनादेश हे गैरअर्जदाराचे बँकेच्या खात्यात पुरेशी रक्कम शिल्लक नाही या कारणास्तव अनादरीत झाले. पर्यायाने तक्रारदारास त्याने गैरअर्जदारास भूखंडापोटी अदा केलेली रक्कम परत मिळालेली नाही असे दिसून येते. म्हणजेच त.क.ला सदर धनादेशाची रक्कम परत न मिळाल्यामुळे सदर करार रद्य झाला असे म्हणता येणार नाही. त्यामुळे आजचे स्थितीत सदरचा करार अस्तित्वात आहे असे न्यायमंचाचे स्पष्ट मत आहे.
ग्राहक तक्रार क्रमांक : 508/2011
10. गैरअर्जदाराने, तक्रारकर्त्यास करारा प्रमाणे भूखंडाची उर्वरीत रक्कम घेऊन नोंदणीकृत विक्रीपत्र करुन दिले नाही अथवा तक्रारकर्त्यास त्याची देय रक्कम सुध्दा परत केली नाही आणि ही गैरअर्जदाराचे सेवेतील कमतरता आहे, असे या न्यायमंचाचे स्पष्ट मत आहे.
11. वरील सर्व वस्तूस्थितीचा विचार करुन, न्यायमंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आ दे श
1)तक्रारदाराची तक्रार गैरअर्जदार क्रं 1 ते 3 विरुध्द वैयक्तिक व संयुक्तीकरित्या
अंशतः मंजूर करण्यात येते.
2) गैरअर्जदाराने करारा प्रमाणे, तक्रारकर्त्यास मौजे सुराबर्डी, तालुका जिल्हा नागपूर
येथील प.ह.नं.26, खसरा नं.36 मधील भूखंड क्रमांक-04, क्षेत्रफळ-
1720.73 चौरसफूटाची नोंदणीकृत खरेदी त.क.कडून घेणे असलेली उर्वरीत रक्कम
रुपये-18,933/- (अक्षरी रुपये अठरा हजार नऊशे तेहतीस फक्त ) स्विकारुन
त.क.चे नावे करुन द्यावी. विक्रीपत्रासाठी लागणारा खर्च व इतर अनुषंगीक खर्च
त.क.ने स्वतः सहन करावा.
3) वरील अक्रं 2 प्रमाणे कायदेशीररित्या भूखंडाची खरेदी त.क.चे नावे करुन देणे
गैरअर्जदारास शक्य नसल्यास, गैरअर्जदाराने, तक्रारकर्त्यास, शासकीय शिघ्रगणक
पत्रिके मध्ये दर्शविल्या प्रमाणे आजचे बाजारभावाने करारातील नमुद भूखंडाची
क्षेत्रफळा प्रमाणे येणारी किंमत आणि त्यातून तक्रारकर्त्याकडून करारा प्रमाणे
भूखंडापोटी घेणे असलेली रक्कम रुपये-18,933/-(अक्षरी रुपये अठरा हजार-
नऊशे तेहतीस फक्त) वजा करुन, उर्वरीत रक्कम तक्रारकर्त्यास सदर आदेश
प्राप्त झाल्या पासून तीस दिवसाचे आत परत करावी.
ग्राहक तक्रार क्रमांक : 508/2011
4) गैरअर्जदाराने, तक्रारकर्त्यास मानसिक व शारीरिक त्रासापोटी रुपये 3,000/-
(अक्षरी रुपये तीन हजार फक्त ) आणि तक्रारीचे खर्चापोटी रुपये 2,000/-
(अक्षरी रुपये दोन हजार फक्त) द्यावेत.
5) गैरअर्जदाराने सदर आदेशाचे अनुपालन आदेशाची प्रत प्राप्त झाल्याचे
दिनांकापासून तीस दिवसाचे आत करावे.
6) निकालपत्राच्या प्रमाणित प्रती सर्व संबधित पक्षांना विनामुल्या द्याव्यात.