( आदेश पारित द्वारा :श्रीमती जयश्री येंडे मा.सदस्या)
आ दे श
( पारित दिनांक : 16 सप्टेबर 2011 )
प्रस्तुत प्रकरणातील तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार तक्रारदाराने गैरअर्जदार यांचेशी दिनांक 7/4/2008 रोजी त्यांच्या मौजा- शिरुर येथील प.ह.न.-71,खसरा नं.78, येथील प्लॉट क्रं.17एकुण रक्कम रुपये 9,59,654/- एवढया मोबदल्यात खरेदी करण्याचा करार केला. एकुण मोबदल्यापैकी तक्रारदाराने रुपये 3,84,861/- एवढी रक्कम गैरअर्जदार यांना बयाणा पोटी अदा केली. व उर्वरित रक्कम दिनांक 22/2/2008 ते 22/2/2009 या कालावधीमध्ये तक्रारदाराने रुपये 47,899/- प्रतिमाह प्रमाणे 12 हप्त्याप्रमाणे तक्रारदाराने गैरअर्जदारास अदा करावयाचे असे सदर करारानुसार उभयपक्षामध्ये ठरलेले होते.
तक्रारदाराने सदर ठरलेलया अवधीत एकुण रुपये 7,04,741/- एवढी रक्कम गैरअर्जदार यांना अदा केले. त्यासंबंधात पावत्यादेखिल गैरअर्जदार यांनी तक्रारदारास सादर केल्या. सदर करारातील अटी व शर्तीप्रमाणे उर्वरित रक्कम स्विकारुन गैरअर्जदार यांनी तक्रारदारास सदर भुखंडाचे खरेदीखत नोंदवुन प्रत्यक्ष ताबा देणेसाठी वारंवार मागणी करुनही गैरअर्जदार यांनी तक्रारदारास विक्रीपत्र व ताबा पत्र करुन दिले नाही. शेवटी सदर भुखंडाचे विक्रीपत्र करुन देण्यास गैरअर्जदार असमर्थ असल्याचे तोंडी सांगुन आजच्या बाजारभावाप्रमाणे सदर भुखंडाची रक्कम परत देण्यास तयार असण्यासंबंधी गैरअर्जदार यांनी आश्वासन दिले व तक्रारदाराकडुन दिनांक 22/2/2010 रोजी मुळ कागदपत्रे जसे बयाणपत्र व पावत्या परत घेतल्या. गैरअर्जदार यांनी तक्रारदारास दिनांक 23 एप्रिल 2010, 2/12/2010, 15/12/2010, 20/12/2010, 1/01/2011, 15/01/2011 रोजीचे अनुक्रमे 1,50,000/- 1,50,000/- , 1,50,000/- व 1,04,741/- 1,50,000/- चे रुपी को-ऑपरेटिव्ह बँक लि.शाखा, नागपूर चे धनादेश गैरअर्जदार यांनी तक्रारदारास दिले. परंतु सदर धनादेश गैरअर्जदार यांच्या खात्यात पर्याप्त रक्कम नसण्याच्या कारणावरुन अनादरित झाले. त्यानंतर तक्रारदाराने वारंवार विनंती करुनही गैरअर्जदार यांनी उर्वरित रक्कम स्विकारुन तक्रारदारास सदर भुखंडाचे विक्रीपत्र करुन दिले नाही अथवा तक्रारदारास आश्वासनाप्रमाणे भुखंडासंबंधात घेतलेली रक्कम ही परत केली नाही. ही गैरअर्जदार यांची कृती सेवेतील कमतरता आहे म्हणुन तक्रारदाराने ही तक्रार दाखल करुन गैरअर्जदाराने सदर भुखंडाचे सर्व कायदेशिर बाबींचा पुर्तता करुन व मोजणी करुन तक्रारदाराचे ताब्यात द्यावे गैरअर्जदारास हे शक्य नसल्यास आजच्या बाजार भावाप्रमाणे येणारी भुखंडाची किंमत 18टक्के व्याजासह परत करावी. तसेच तक्रारदारास झालेल्या शारिरिक व मानसिक त्रासापोटी रुपये 1,00,000/- नुकसान भरपाई व तक्रारीच्या खर्चापोटी रुपये 25,000/- मिळावे अशी मागणी केली.
सदर प्रकरणात गैरअर्जदार यांना नोंदणीकृत डाकेद्वारे नोटीस पाठविण्यात आली. नोटीस प्राप्त होऊन गैरअर्जदार हजर झाले परंतु आपला लेखी जवाब दाखल केला नाही म्हणुन प्रकरण त्यांचे विरुध्द बिना जवाब चालविण्याचा आदेश दिनांक 11/7/2011 रोजी पारित करण्यात आला.
तक्रारदाराने आपली तक्रार प्रतिज्ञालेखावर दाखल केली असुन, दस्तऐवज यादीनुसार 11 कागदपत्रे दाखल केलीत. त्यात बयानापत्र, पावत्या व धनादेश इत्यादी कागदपत्रांचा समावेश आहे. गैरअर्जदार गैरहजर. तक्रारदाराने पुरसिस दाखल केले.
#####- का र ण मि मां सा -#####
तक्रारदाराचे शपथेवरील कथन, तसेच कागदपत्र क्रं. 1 वरील बयाणापत्र पाहता निर्वीवादपणे तक्रारदाराने गैरअर्जदार यांच्या मौजा- शिरुर येथील प.ह.न.-71,खसरा नं.78,ता.जि.नागपूर येथील भुखंड क्रं.12, मोबदला रक्कम रु.9,59,654/-एवढया किंमतीत खरेदी करण्याचा गैरअर्जदार यांचेशी करार केला होता व सदर भुखंडाचे बयाणापोटी दिनांक 7/4/2008 रोजी तक्रारदाराने गैरअर्जदार यांना रुपये 3,84,861/- अदा केले होते व कागदपत्र क्रं.16 ते 18 वरील पावत्यावरुन तक्रारदाराने दिनांक 7/4/2008 रोजी रुपये 63,976, दिनांक 4/10/2008 रोजी 1,27,952/- दिनांक 4/12/2008 रोजी 1,27,952/- असे एकुण रुपये 3,17,880/- गैरअर्जदार यांना अदा केलेले म्हणजेच एकुण रुपये 7,04,741/- एवढी रक्कम तक्रारदाराने गैरअर्जदार यांना अदा कलेले होते असे निर्देशनास येते.
तसेच कागदपत्र क्रं 19 वरुन हेही निर्देशनास येते की गैरअर्जदार यांनी तक्रारदारास दिनांक 2/12/2010 रोजी 1,50,000/- दिनांक 15/12/2010 रोजी रुपये 1,50,000/-,दिनांक 20/12/2010 रुपये 1,50,000/-,दिनांक 01/01/2011 रोजी रुपये 1,04,741/-,दिनांक 15/1/2011 रोजी रुपये 1,50,000/- एतक्या रकमेचे रुपी को-ऑपरेटिव्ह बँक लि.चे अकाऊंटपेयी धनादेश तक्रारदारास परत केलेले होते म्हणजेच एकुण रुपये 7,04,741/- एवढया रक्कमेचे धनादेश गैरअर्जदार यांनी तक्रारदारास परत केलेले दिसुन येते.
तक्रारदाराच्या मते सदर धनादेश अनादरित झाले परंतु सदर धनादेश अनादरित झाल्याबद्दलचा पुरावा तक्रारदाराने या मंचात सादर केलेला नाही किंवा उपलब्धकागदपत्रावरुन तसे निर्देशनास येत नाही. त्यामुळे सदरचे धनादेश अनादरित झाले किंवा नाही किंवा सदरची रक्कम तक्रारदारास मिळाली अथवा नाही याबद्दल सखोल साक्षी पुराव्याची आवश्यकता आहे. सदर पुराव्याअभावी या मंचास सदर तक्रारीत योग्य तो निर्णय देणे अशक्य आहे. त्यामुळे सदरची तक्रार तक्रारदाराने योग्य त्या न्यायालयात दाखल करावी. सबब आदेश
-// अं ति म आ दे श //-
1. वरील निरिक्षणासह सदरची तक्रार निकाली काढण्यात येते.