Maharashtra

Nanded

CC/09/265

Baliram Khirba Jadhva - Complainant(s)

Versus

Reliance General Insurance - Opp.Party(s)

ADV.L.G. Shinde

25 Feb 2010

ORDER


District Consumer Reddressal Forum , NandedDistrict Consumer Forum , Visava Nagar, V.I.P. Road, Nanded
Complaint Case No. CC/09/265
1. Baliram Khirba Jadhva Dharjni Kudhla tanda,Tq.Bhokar, Dist Nanded.NandedMaharastra ...........Appellant(s)

Versus.
1. Reliance General Insurance Belard Isstet, Mumbai.NandedMaharastra ...........Respondent(s)



BEFORE:

PRESENT :

Dated : 25 Feb 2010
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

 

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍यायमंच,नांदेड.
 
प्रकरण क्रमांक :-  2009/265.
                          प्रकरण दाखल तारीख - 05/12/2009
                          प्रकरण निकाल तारीख 25/02/2010
 
समक्ष  मा.श्री. बी.टी.नरवाडे, पाटील           - अध्‍यक्ष
        मा.श्री.सतीश सामते                  - सदस्‍य
 
1.   बळीराम पि. खिरबा जाधव वय,61 वर्षे, धंदा शेती
2.   सौ. शांताबाई भ्र.बळीराम जाधव वय 56 वर्षे, धंदा घरकाम
3.   प्रेमसिंग पि. विठठल जाधव, वय 5 वर्षे, धंदा निरंक,
     अज्ञानपालनकर्ता आजोबा अर्जदार क्र.1
     बळीराम खिरबा जाधव सर्व राहणार
     धारजनी कुदळा तांडा ता.भोकर जि. नांदेड.               अर्जदार
 
     विरुध्‍द.
 
1.   रिलायंन्‍स जनरल इन्‍शुरन्‍स कंपनी लि.
मार्फत व्‍यवस्‍थापक/मॅनेजर,
19,रिलायंन्‍स सेंटर वॉलचंद हिराचंद मार्ग,
बेलार्ड इस्‍टेट, मुंबई -400038
2.   रिलांयन्‍स जनरल इन्‍शुरन्‍स कंपनी लि.                गैरअर्जदार
     मार्फत शाखा व्‍यवस्‍थापक, शाखा उज्‍वल इंटरप्रायजेस 
     च्‍यावर हनुमान गड कमानी जवळ, हिंगोली नाका, नांदेड.
3.   विभागीय प्रमुख,
कबाल इंन्‍शूरन्‍स सर्व्‍हीसेस प्रा.लि.
शॉप नंबर 2,दीशा अलंकार कॉम्‍पलेक्‍स,
     टाऊन सेंटर, सिडको, औरंगाबाद.  
4.   मा.तहसीलदार,
     तहसील कार्यालय भोकर ता.भोकर जि. नांदेड.
5.   मिराबाई भ्र. साहेबराव जाधव
वय 24 वर्षे, धंदा घरकाम
रा.रोही पिंपळगांव तांडा ता.मुखेड जि. नांदेड.
 
 
 
 
अर्जदारा तर्फे वकील             - अड.एन.जी. शिंदे.
गैरअर्जदार क्र. 1 व 2 तर्फे वकील  - अड.अविनाश कदम.
गैरअर्जदार क्र. 3 तर्फे वकिल      - स्‍वतः
गैरअर्जदार क्र.4 तर्फे वकील        - स्‍वतः
गैरअर्जदार क्र.5 तर्फे वकील        - कोणीही हजर नाही.
                               निकालपञ
             (द्वारा - मा.श्री.सतीश सामते, सदस्‍य )
              गैरअर्जदार रिलायंन्‍स इन्‍शूरन्‍स कंपनी यांचे सेवेतील ञूटी बददल अर्जदार यांनी खालील प्रमाणे तक्रार दाखल केली आहे.
              अर्जदाराची तक्रार थोडक्‍यात अशी की,मयत विठठल बळीराम जाधव हा शेतकरी असून तो अर्जदार क्र.1 व 2 यांचा मूलगा होता, अर्जदार क्र.3 हा मयताचा मूलगा आहे. मयत विठठल हे त्‍यांची शेत जमिन गट नंबर 144 क्षेञफळ .60 आर व गट नंबर 143 क्षेञफळ 1 हेक्‍टर मौजे धरजनी (कूदळा तांडा) ता.भोकर जि. नांदेड येथे शेती करीत होते. सर्व व्‍यवस्थित चालू असताना अचानक दि.5.6.2008 रोजी मयत हे त्‍यांचे सहका-याच्‍या सोबत जात असताना ट्रॅक्‍टरच्‍या ड्रायव्‍हरने निष्‍काळजीपणाने ट्रॅक्‍टर चालविल्‍यामूळे ते झटक्‍याने खाली पडले व गंभीर जखमी झाले. त्‍यांना  भैसा येथील सरकारी दवाखान्‍यात दाखल करण्‍यात आले असताना उपचारा दरम्‍यान त्‍यांचा मृत्‍यू झाला. अपघातानंतर घटनेची फिर्याद मयताचे वडील बळीराम जाधव यांनी पोलिस स्‍टेशन कूबेर ता. कूबेर जि. अदिलाबाद(आंध्र प्रदेश) येथे दि.5.6.2008 रोजी दिली त्‍यावरुन त्‍यांनी पोलिस स्‍टेशन कूबेर येथे गून्‍हा नंबर 34/2008 नोंदवून घटनास्‍थळ पंचनामा केला. अर्जदार क्र.1 ते 3 हे मयत विठठल जाधव यांचे कायदेशीर वारस आहेत. महाराष्‍ट्र शासनाने शेतकरी वैयक्‍तीक अपघात विमा योजना सूरु केली. त्‍या अनुषंगाने औरंगाबाद महसूल विभागात येणा-या सर्व शेतक-यांसाठी गेरअर्जदार क्र.1 रिलायंन्‍स इन्‍शूरन्‍स कंपनी यांचेकडे शासनाने प्रिमियम भरुन पॉलिसी घेतली. यांचा कालावधी दि.15.8.2007 ते दि.14.8.2008 होता. व या कालावधीसाठी गैरअर्जदार क्र.3 मार्फत विमा उतरविला. कबाल इन्‍शुरन्‍स ही विमा सल्‍ला देणारी कंपनी आहे व ते शासन व विमा कंपनी यामधील दूवा आहेत.     म्‍हणून अर्जदार हे लाभार्थी आहेत. अर्जदाराची मागणी आहे की, त्‍यांचे प्रपोजल दि.29.11.2008 रोजी तहसीलदार भोकर यांचेमार्फत गैरअर्जदार यांना पाठविले असता सदरील प्रस्‍ताव  मूदतीत  नसल्‍यामूळे  शेरा  मारुन  गैरअर्जदार  क्र.3 यांनी दावा
 
 
फेटाळला. म्‍हणून त्‍यांची मागणी आहे की, त्‍यांना विम्‍याची रक्‍कम रु,1,00,000/- व त्‍यावर 15 टक्‍के व्‍याज तसेच मानसिक ञासापोटी रु.40,000/- व दावा खर्च म्‍हणून रु.5,000/- गैरअर्जदार यांचेकडून मिळोवत म्‍हणून ही तक्रार दाखल केलेली आहे.
                  गैरअर्जदार क्र.1 व 2 हे वकिलामार्फत हजर झाले व त्‍यांनी आपले लेखी म्‍हणणे एकञितरित्‍या दाखल केलेले आहे. विमा पॉलिसी ही अटी व शर्ती वर दिल्‍या जाते. अर्जदार यांनी वारसा बददल कोणतेही रेकॉर्ड दाखल केलेले नाही.अर्जदार यांनी ते शेतकरी असल्‍याबददल व त्‍यांची नांवे गट नंबर 143,144 मध्‍ये धारजनी येथे जमिन होती हे त्‍यांनी सिध्‍द केले पाहिजे व शासनाने शेतकरी वैयक्‍तीक अपघात विमा योजना गैरअर्जदार क्र.1 याचेकडून त्‍यांनी काढली आहे हे त्‍यांना मान्‍य नाही. मयत हा शेतकरी आहे हे त्‍यांना अमान्‍य आहे. मयत विठठल जाधव दि.5.6.2008 रोजी अपघातात मरण पावला हे त्‍यांना सिध्‍द करावे लागेल. मयताचे कायदेशीर वारस कोण आहे हे ही त्‍यांना सिध्‍द करावे लागेल. गैरअर्जदार यांनी मयताचे बायकोने दूसरे लग्‍न केले या बददलची माहीती नाही. अर्जदाराने विम्‍याची रक्‍कम 15 टक्‍के व्‍याजासह व रु.5,000/- खर्चासह मागितली हे देण्‍यासाठी गैरअर्जदार जबाबदार नाहीत. अर्जदाराने त्‍यांची तक्रार तलाठयाकडे एक महिन्‍याचे आंत अपघातानंतर नोंदवावयास पाहिजे व यानंतर त्‍यांनी एक आठवडयात गैरअर्जदार क्र.3 मार्फत गैरअर्जदार यांचेकडे पाठविली पाहिजे. परंतु अपघात हा दि.5.6.2008 रोजी झालेला आहे व तहसीलदार यांचेकडे दि.11.12.2008 रोजी तक्रार देण्‍यात आली जी की मूदतबाहय आहे.त्‍यामूळे  गैरअर्जदार यांचेवर जबाबदारी नाही. पॉलिसी ही मूंबई येथून काढली आहे. त्‍यामूळे मंचास कार्यक्षेञ येत नाही. दावा हा मूंबई येथेच दाखल झाला पाहिजे. अर्जदार व विमा कंपनीत काही वाद उदभवल्‍यास तो कमिटीच्‍या पूढे नेला पाहिजे. अर्जदार यांनी Ombudsman  यांचेकडे तक्रार नेली पाहिजे. परंतू अर्जदार यांनी असे न करता ते सरळ मंचात आलेले आहेत. संबंधीत प्रपोजल हे तहसीलदार यांनी कबाल इन्‍शूरन्‍स यांचेकडे पाठविला पाहिजे व त्‍यांनी ते व्‍हेरिफाय करुन कागदपञासह विमा कंपनीकडे पाठविला पाहिजे. यासोबत दाव्‍याशी संबंधीत कागदपञ जसे तलाठी व तहसीलदार यांचे प्रमाणपञ, मृत्‍यूचे प्रमाणपञ, बँकेचे डिटेल्‍स, नॉमिनीची नांवे इत्‍यादी कागदपञ असणे आवश्‍यक आहे. विमा पॉलिसी दाखल करण्‍याची मूदत ही अपघाताचे नंतर 90 दिवसांचे आंत दावा दाखल करणे आवश्‍यक आहे. त्‍यामूळे अर्जदाराची तक्रार ही खर्चासह फेटाळण्‍यात यावी असे म्‍हटले आहे.
 
 
 
         
                  गैरअर्जदार क्र.3 यांनी आपले लेखी म्‍हणणे पोस्‍टाने पाठविले आहे. त्‍यात ते IRDA Approved Insurance Advisor Company appointed as a consultant by Govt. of Maharashtra  व यासाठी ते शासनाकडून कोणतीही रक्‍कम मानधन म्‍हणून देखील स्विकारत नाहीत. त्‍यामूळे त्‍यांचे विरुध्‍द दावा चालू शकत नाही. अर्जदार यांचा क्‍लेम त्‍यांचेकडे दि.07.01.2009 रोजी तहसिलदार यांचेकडून आला परंतु एमओयू प्रमाणे क्‍लेम हा 90 दिवसांनी उशिराने आला व त्‍यांची ती योग्‍य ती कारणे दिलेले नाहीत. त्‍यामूळे पॉलिसीतील शर्ती व अटीनुसार अर्जदार यांना क्‍लेम मिळू शकणार नाही. त्‍यामूळे तो न स्विकारता दि.31.01.2009 रोजी गैरअर्जदार क्र.1 व 2  यांचेकडे वापस पाठविण्‍यात आला. मध्‍यस्‍थ करणे व शेतक-यांच्‍या प्रस्‍तावाची छाननी करणे व योग्‍य त्‍या शिफारशीसह इन्‍शूरन्‍स कंपनीकडे पाठवीणे एवढेच त्‍यांचे काम आहे. त्‍यामूळे त्‍यांचे विरुध्‍दचा दावा खारीज करावा.
              गैरअर्जदार क्र.4 हे हजर झाले पण त्‍यांना संधी देऊन ही त्‍यांने आपले म्‍हणणे दिलेले नाही म्‍हणून तक्रार नोसे करुन पूढे चालविण्‍यात आली.
              गैरअर्जदार क्र.5 यांना नोटीस तामील होऊनही ते हजर झालेले नाही म्‍हणून त्‍यांचे विरुध्‍द एकतर्फा आदेश करुन प्रकरण पूढे चालविण्‍यात आले.
              अर्जदार यांनी पूरावा म्‍हणून आपले शपथपञ, तसेच गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी पूरावा म्‍हणून शपथपञ दाखल केलेले आहे. दोन्‍ही पक्षकारानी दाखल केलेले दस्‍ताऐवज बारकाईने तपासून व पक्षकारांचा युक्‍तीवाद ऐकून खालील मूददे उपस्थित होतात.
          मूददे                                       उत्‍तर
1.   गैरअर्जदार यांचे सेवेतील ञूटी सिध्‍द होते काय ?         होय.
2.   काय आदेश ?                           अंतिम आदेशाप्रमाणे.
                        कारणे
मूददा क्र. 1 ः-
              अर्जदार क्र. 1 व 2 यांनी त्‍यांचा मयत शेतकरी मूलगा विठठल जाधव यांचा दि.5.6.2008 रोजी ट्रॅक्‍टरवर बसून जात असताना सदर ट्रॅक्‍टर ड्रायव्‍हरने ट्रॅक्‍टर निष्‍काळजी व हईगईपणे चालविल्‍यामूळे मयत खाली पडला व गंभीर जखमी होऊन उपचारा दरम्‍यान त्‍यांचा मृत्‍यू झाला म्‍हणजे त्‍यांचा अपघातात मृत्‍यू झाला असे म्‍हटले आहे. या बददलचा पूरावा म्‍हणून  घटनास्‍थळाचा  पंचनामा,   इन्‍क्‍वेसट पंचनामा, दाखल आहे. यात
 
 
 
 
डॉक्‍टरच्‍या मते छातीस मार लागून डॅमेज झाल्‍यामूळे श्‍वाच्‍छोसश्‍वास कोडल्‍यामूळे मृत्‍यू झाल्‍याचे म्‍हटले आहे. त्‍यामूळे मृत्‍यू बददल गैरअर्जदार यांना आक्षेप नाही. घटनेच्‍या प्राथमिक अहवालात मयताचे नांव विठठल जाधव असे असून पोलिस स्‍टेशन कूबेर येथे गून्‍हा नोंदविण्‍यात आलेला आहे. पी.एम. रिपोर्ट ही या सोबत जोडलेला आहे. मयत विठठल यांचे 7/12 या प्रकरणात दाखल असून ते शेतकरी असल्‍याबददल त्‍यांच्‍या नांवाचा 7/12 व होल्‍डींग दाखल आहे.  याप्रमाणे गट नंबर 143 मध्‍ये 1 हेक्‍टर व गट नंबर 144 मध्‍ये 0.60 आर ही जमिन धारजनी ता. भोकर येथे आहे. तसेच हक्‍काचे पञक ज्‍यात फेरफार वरुन मयताचे वडीलाने दोन भावांचे नांवाने मयत विठठल यांचे नांवाने जमिन केलेली आहे. हे वाटणीपञ यात दाखल आहे. वारसा प्रमाणपञ दाखल केलेले आहे. मयताचे आई व वडील व मयताचा मूलगा हे वारस आहेत.  मयताचे  निवडणूक आयोगाचे ओळखपञ दाखल केलेले आहे. मृत्‍यूनंतर दाव्‍यासाठी क्‍लेम फॉर्म नंबर 1 पूर्ण भरुन घेऊन दि.11.12.2008 रोजी तहसीलदार भोकर यांना दिल्‍याची नोंद आहे.  दि.14.07.2009 ला जिल्‍हाधिकारी यांना पञ लिहून दावा मिळाल्‍या संबंधी नोंद केली आहे. तालूका कृषी अधिकारी, भोकर, यानी दि.15.10.2009 रोजी एक पञ देऊन सदर प्रस्‍ताव जिल्‍हा अधिक्षक कृषी अधिकारी नांदेड यांचे मार्फत कबाल इन्‍शूरन्‍स औरंगाबाद यांचेकडे मंजूरीस्‍तव पाठविला होता यासाठी त्‍यांनी गैरअर्जदार क्र.3 चे पञ जोडलेले आहे. त्‍यात त्‍यांना प्रस्‍ताव दि.7.12.2008 रोजी प्राप्‍त झाला त्‍यामूळे उशिराने प्राप्‍त झालेल्‍या प्रस्‍तावाचा विचार करता येणार नाही असा उल्‍लेख केलेला आहे. दि.5.6.2008 रोजीला अपघात झाला, तहसीलदार भोकर यांना दि.11.12.2008रोजी कळविण्‍यात आले म्‍हणजे सहा महिने विलंब झाला, पण 90 दिवसांचा अवधी क्‍लेम दाखल करण्‍यास होता. त्‍यामूळे तक्रार ही मूदतीत नाही असा आक्षेप घेतलेला आहे. खेडयापाडयातील शेतकरी हा अडाणी असतो. त्‍यांना शासनाच्‍या योजनेची माहीती नसते. घरी अशी घटना घडल्‍यानंतर ते दूखात असतात. त्‍यामूळे जबाबदारीने क्‍लेम दाखल करणे शक्‍य नसते. म्‍हणून अशा प्रकारचा उशिर झाला असल्‍यास शासनाने परिपञका प्रमाणे क्‍लेम वेळेत दाखल करणे आवश्‍यक असले तरी हे बंधनकारक नाही त्‍यामूळे  झालेला  विलंब  हा  माफ  करुन  केवळ  टेक्‍नीकल कारणासाठी शेतक-याचा दावा नाकारु नये असे स्‍पष्‍ट म्‍हटले आहे.   शेतक-याचा मृत्‍यू अपघाती झाला हे स्‍पष्‍ट आहे त्‍यामूळे गैरअर्जदारांनी अर्जदारास विम्‍याची रक्‍कम दिली पाहिजे हे न्‍यायाच्‍या दृष्‍टीने उचित आहे. विम्‍याची रक्‍कम ही मयताच्‍या पत्‍नीस मिळाली पाहिजे, पण मयताचे वडिलांनी तिने दूसरे लग्‍न केले असे म्‍हटले
 
 
आहे. तिला गैरअर्जदार क्र.5 म्‍हणून नोटीस पाठविली पण ती हजर झाली नाही, त्‍यामूळे अर्जदारांचे म्‍हणणे ग्राहय धरण्‍यात येते, शिवाय वारसा प्रमाणपञातही पत्‍नीचे नांव नाही म्‍हणून तिचा अधिकार गेला, मयताचा मूलगा मायनर आहेतेव्‍हा त्‍यांचे पालन पोषणाची जबाबदारी अर्जदार क्र.1 यांचीच आहे. मयताचे मूलाचा हिस्‍सा त्‍यांचे कल्‍याणासाठी त्‍यांनी खर्च करावा.
             
              वरील सर्व बाबीचा विचार करुन आम्‍ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
                           आदेश
1.                                         अर्जदाराची तक्रार खालील प्रमाणे मंजूर करण्‍यात येते.
2.                                         गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी अर्जदार यांना हा निकाल लागल्‍यापासून 30 दिवसांचे आंत विम्‍याची रक्‍कम रु.1,00,000/- व त्‍यावर दि.5.6.2008 पासून 9 टक्‍के व्‍याजासह पूर्ण रक्‍कम वसूल होईलपर्यत व्‍याजासहीत दयावेत. तिन्‍ही अर्जदाराचे वतीने अर्जदार क्र.1 यांना चेक देण्‍यात यावा.
3.                                         गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी अर्जदार यांना मानसिक ञासाबददल   रु.5000/- व दावा खर्च म्‍हणून रु.1,000/- दयावेत.
4.                                         गैरअर्जदार क्र.,3 4 व 5 विरुध्‍द आदेश नाही.
5.                                         पक्षकारांना आदेश कळविण्‍यात यावा.
 
 
 
 
श्री.बी.टी.नरवाडे पाटील                                                                                    श्री.सतीश सामते     
   अध्‍यक्ष                                                                                                                  सदस्‍य
 
 
 
 
 
जे.यू.पारवेकर.
लघूलेखक.