Maharashtra

Parbhani

CC/11/179

Muktabai Rama Jadhav - Complainant(s)

Versus

Relance General Insurance Company Limited,Mumbai-38 - Opp.Party(s)

Adv.Maroti T.Parve

30 Oct 2012

ORDER

 
Complaint Case No. CC/11/179
 
1. Muktabai Rama Jadhav
R/o Degvan(telyacha) Tq.Purna
Parbhani
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Relance General Insurance Company Limited,Mumbai-38
11 Relance Centre,walchand Hirachand marge,Belard-Mumbai-38
Mumbai
Maharashtra
2. Manager,kabal Insurance Services Pvt.Ltd.Aurangbad
Divisional office Bhaskaryan HDFC.Home Building Ploat No.7 Town Centre,Cidco Aurangbad
Aurangbad
Maharashtra
3. Thasildar,Purna
Thasil Office,Purna
Parbhani
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MRS. Mrs.Rekha Kapdiya PRESIDENT
 HON'ABLE MRS. Mrs.Madhuri Vishwarupe MEMBER
 
PRESENT:Adv.Maroti T.Parve, Advocate for the Complainant 1
 
ORDER

निकालपत्र

                        तक्रार दाखल दिनांकः-  23/08/2011

                                    तक्रार नोदणी दिनांकः- 12/09/2011

                        तक्रार निकाल दिनांकः- 30/10/2012                                 कालावधी 01 वर्ष,01महिन18 दिवस.

  

  जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍यायमंच, परभणी

  प्रभारी अध्‍यक्ष          सौ.रेखा कापडिया.

                                                  सदस्‍या --             सौ.माधुरी विश्‍वरुपे.                

---------------------------------------------------------------------------------------

          मुक्‍ताबाई भ्र.रामा जाधव.                               अर्जदार

वय 65 वर्षे.धंदा. घरकाम.                           अड.एम.टी.पारवे.

रा.देगांव तेल्‍याचे ता.पूर्णा जि.परभणी.     

               विरुध्‍द

1      रिलायन्‍स जनरल इन्‍शुरन्‍स कं.लि.                   अड.जी.एच.दोडीया.

       11 रिलायन्‍स सेंटर वालचंद हिराचंद मार्ग,

       बेलार्ड मुंबई 800038.

2      व्‍यवस्‍थापक.

       कबाल इन्‍शुरन्‍स सर्व्हिसेस प्रा.लि.

       विभागीय कार्यालय भास्‍कराय,

       एस.डी.एफ.सी.होम बिल्‍डींग.

       प्‍लॉट नं.7,सेक्‍टर इ.1 टाऊन सेंटर सिडको औरंगाबाद.

3      मा.तहसिलदार साहेब,

       तहसिल कार्यालय, पूर्णा ता.पूर्णा.

------------------------------------------------------------------------------------        

     कोरम  -    1)    सौ.रेखा कापडिया.       अध्‍यक्षा.

2)        सौ. माधुरी विश्‍वरुपे.                        सदस्‍या.

-------------------------------------------------------------------------------------------------------      

        (  निकालपत्र पारित व्‍दारा सौ.रेखा कापडिया.प्र.अध्‍यक्षा.)  

       अर्जदाराचे पती शेतकरी असून त्‍यांचे वाहन अपघातात निधन झाल्‍यामुळे अर्जदाराने महाराष्‍ट्र शासनाच्‍या शेतकरी व्‍यक्तिगत अपघात विमा योजने अंतर्गत विमा रकमेची मागणी गैरअर्जदार यांच्‍याकडे केली.गैरअर्जदार यांनी विमा रक्‍कम न दिल्‍यामुळे अर्जदाराने मंचात तक्रार दाखल  केली आहे.

    अर्जदाराने दाखल केलेल्‍या तक्रारी नुसार त्‍यांचे पती रामा पुंजाजी जाधव यांच्‍या नावे सुरवाडी,ता.पूर्णा येथे शेतजमीन आहे. दिनांक 16/02/2009 रोजी त्‍यांचे वाहन अपघातात निधन झाले. त्‍याची नोंद संबंधित पोलीस स्‍टेशन मध्‍ये घेण्‍यात आली आहे. दिनांक 24/04/2009 रोजी गैरअर्जदार क्रमांक 3 यांच्‍याकडे विमा रक्‍कम मिळण्‍यासाठी प्रस्‍ताव दाखल केला. गैरअर्जदार क्रमांक 3 यांनी सदरील प्रस्‍ताव दिनांक 15/05/2009 रोजी गैरअर्जदार क्रमांक 2 यांच्‍याडे पाठविला, त्‍यानंतरही रक्‍कम न मिळाल्‍यामुळे त्‍यांनी दिनांक 07/05/2011 रोजी वकीला मार्फत गैरअर्जदार क्रमांक 1 ते 3 यांना कायदेशिर नोटीस पाठविली. गैरअर्जदार यांनी त्‍याची दखल घेतली नाही, म्‍हणून अर्जदाराने मंचात तक्रार दाखल केली आहे. गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी विमा रक्‍कम देण्‍याची व नुकसान भरपाईची मागणी अर्जदाराने केली आहे.

       अर्जदाराने तक्रारी सोबत विमा प्रस्‍ताव, 7x12 चा उतारा, घटनास्‍थळ पंचनामा, वैद्यकिय अहवाल, फेरफार इत्‍यादी कागदपत्रे दाखल केली आहेत.

      गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी मंचात दाखल  केलेल्‍या जबाबानुसार अर्जदार किंवा त्‍यांच्‍या पत्‍नीच्‍या नावे कोणतीही विमा पॉलिसी नसल्‍यामुळे ते ग्राहक या संज्ञेत येत नाही. अर्जदाराने दाखल केलेली तक्रार मंचाच्‍या कार्यक्षेत्राबाहेरची आहे. अर्जदाराने पाठविलेल्‍या प्रस्‍तावा सोबत योग्‍य ती कागदपत्रे जोडलेली नाहीत. दिनांक 23/06/2010 रोजी पत्राव्‍दारे अर्जदारास अपूर्ण कागदपत्रांची पूर्तता करण्‍यास सांगितले, परंतु अर्जदाराने कागदपत्रे न पाठविल्‍यामुळे दिनांक 24/11/2010 रोजी त्‍यांचा विमा प्रस्‍ताव रद्द करण्‍यात आला.अर्जदाराने मंचात दाखल केलेली तक्रार मुदतबाह्य असल्‍याचे सांगून तक्रार खारीज करण्‍याची विनंती मंचास केली आहे.

     गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी मंचात दाखल केलेल्‍या जबाबानुसार महाराष्‍ट्र शासनाने त्‍यांची सल्‍लागार म्‍हणून नियुक्‍ती केली आहे. या योजने अंतर्गत आलेल्‍या प्रस्‍तावांची छाननी करुन संबंधीत विमा कंपनीकडे पाठविण्‍याचे काम त्‍यांच्‍याकडे आहे. सदरील प्रस्‍ताव त्‍यांना दिनांक 25/05/2009 रोजी मिळाला अर्जदाराने प्रस्‍तावा सोबत मृत्‍यू प्रमाणपत्र, पंचनामा, एफ.आय.आर., फेरफार इत्‍यादी कागदपत्रे दाखल न केल्‍यामुळे ती पाठविण्‍यासाठी दिनांक 03/02/2010 व 24/02/2010 रोजी त्‍यांना पत्राव्‍दारे कळविले. दिनांक 21/06/2010 रोजी त्‍यांनी सदरील प्रस्‍ताव गैरअर्जदार क्रमांक 1 यांच्‍याकडे अपूर्ण शे-यासह पाठविला गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी 24/11/2010 रोजी अपूर्ण कागदपत्रामुंळे विमा रक्‍कम देता येत नसल्‍याचे पत्राव्‍दारे कळविले.

          गैरअर्जदार क्रमांक 3 यांना नोटीस प्राप्‍त होऊनही ते मंचात उपस्थित राहिले नाहीत, म्‍हणून त्‍यांच्‍या विरुध्‍द एकतर्फा सुनावणीचा आदेश पारीत करण्‍यात आला.

   अर्जदार व गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 यांनी दाखल केलेल्‍या कागदपत्रांवरुन व सुनावणी वरुन असे दिसून येते की, अर्जदाराचे पती रामा पुंजाजी जाधव हे शेतकरी असून त्‍यांच्‍या नावे सुरवाडी, ता.पूर्णा येथे शेतजमिन आहे. दिनांक 16/02/2009 रोजी त्‍यांचे वाहन अपघातात निधन झाले त्‍याची नोंद संबंधीत पोलीस स्‍टेशन मध्‍ये घेण्‍यात आलेली दिसून येते. अर्जदाराने पोस्‍ट मार्टम अहवाल, मृत्‍यू प्रमाणपत्र मंचात दाखल केलेले आहेत.

   अर्जदाराने महाराष्‍ट्र शासनाच्‍या शेतकरी व्‍यक्‍तीगत अपघात योजने अंतर्गत विमा रक्‍कम मिळण्‍यासाठी दिनांक 24/04/2009 रोजी गैरअर्जदार क्रमांक 3 यांच्‍याकडे विमा प्रस्‍ताव दाखल केला आहे. सदरील प्रस्‍तावा सोबत त्‍यांनी फेरफारची नक्‍कल, सातबाराचा उतारा, मृत्‍यू प्रमाणपत्र इत्‍यादी कागदपत्रे जोडली असल्‍याचे दिसून येते. अर्जदाराने विमा रक्‍कम न मिळाल्‍यामुळे गैरअर्जदार क्रमांक 1 ते 3 यांना 07/05/2011 रोजी वकीला मार्फत कायदेशीर नोटीस पाठविल्‍याचे दिसून येते, परंतु गैरअर्जदार क्रमांक 1 ते 3 यांनी या नोटीसला जबाब दिलेला दिसून येत नाही.

          गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी विमा प्रस्‍तावासोबत मृत्‍यू प्रमाणपत्र , पंचनामा, एफ.आय.आर.,फेरफार इत्‍यादी कागदपत्रे दाखल न केल्‍यामुळे विमा प्रस्‍ताव नाकारल्‍याचे जबाबात म्‍हंटले आहे.

          अर्जदाराने मंचात आवश्‍यक ती सर्व कागदपत्रे दाखल केलेली आहेत. सदरील विमा योजनेचा कालावधी 15/08/2008 ते 14/08/2009 असा असून अर्जदाराच्‍या पतीचे 16/02/2009 रोजी निधन झाले आहे व अर्जदाराने 24/04/2009 रोजी विमा प्रस्‍ताव पाठविलेला आहे. महाराष्‍ट्र शासनाच्‍या या योजनेतील कलम 12(3) मध्‍ये विमा प्रस्‍ताव विमा कालावधीत कधीही प्राप्‍त झाल्‍यास तो विचारात घेणे विमा कंपनीला बंधनकारक राहील असे म्‍हंटले आहे. अज्ञानामुळे किंवा काही कारणामुळे जर कागदपत्रे दाखल करण्‍यास उशीर झाला तर संबंधित व्‍यक्ति विमा रक्‍कमे पासून वंचित राहू नये हा या मागचा शासनाचा उद्देश आहे.

    अर्जदाराने मंचामध्‍ये सर्व कागदपत्रे दाखल केली आहेत.त्‍यामुळे त्‍यांना गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी विमा रक्‍कम द्यावी.

 

 

         दे                         

1          गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी अर्जदारास विमा रक्‍कम 1,00,000/- रुपये

      30 दिवसात द्यावे.

2     खर्चाबद्दल आदेश नाही.

3     पक्षकारांना आदेशाच्‍या प्रती मोफत पुरवाव्‍यात.

 

 

 

        सौ.माधुरी विश्‍वरुपे.                             सौ.रेखा कापडिया.

             सदस्‍या.                                          प्रभारी अध्‍यक्षा.

 

 

 

 

 
 
[HON'ABLE MRS. Mrs.Rekha Kapdiya]
PRESIDENT
 
[HON'ABLE MRS. Mrs.Madhuri Vishwarupe]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.