तक्रारदार : स्वतःवकीलासोबत(श्री.शिरसाठ) हजर. सामनेवाले : प्रतिनिधी वकीलासोबत(पुष्कर पाटनकर)हजर. *-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-**-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*- निकालपत्रः- श्री.ज.ल.देशपांडे, अध्यक्ष ठिकाणः बांद्रा *-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-**-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*- न्यायनिर्णय 1. सा.वाले हे आरोग्य विषयक संशोधन व व्यवस्थापन क्षेत्र पदविका देणारे एक केंद्र आहे. तक्रारदारांनी सा.वाले यांचेकडे एका पदविकेचे संदर्भात नांव नोंदविले. व त्याबद्दल रु.15,000/- सा.वाले यांचेकडे जमा केले. पदविका शिक्षणाचा कालावधी एका वर्षाचा होता. व त्या संबंधीचे वर्ग आठवडयातून प्रत्येक शनीवारी दुपारी 2.00 ते सुध्याकाळी 8.00 या दरम्यान चालणार होते. तक्रारदारांना ती वेळ सोईची असल्याने व जाहीरातीमध्ये तसे नमुद केलेले असल्याने तक्रारदारांनी आपले नांव नोंदविले. 2. तक्रारदारांचे तक्रारीतील कथना प्रमाणे 6 डिसेंबर,2008 रोजी सा.वाले यांनी अचानक असे घोषीत केले की, पदविकेचे वर्ग सकाळी 10.00 ते दुपारी 4.00 असे घेतले जातील. त्याप्रकारे झालेला वेळेतील बदल तक्रारदारांना मान्य नव्हता कारण तो तक्रारदारांना गैरसोयीचा होता. तक्रारदारांनी त्या बद्दल आपला निषेध नोंदविला. तक्रारदारांनी दिनांक 13 डिसेंबर, 2008 रोजी सा.वाले यांचे प्राचार्य यांना भेटून आपला निषेध व्यक्त केला. परंतु सा.वाले यांनी पूर्वीची वेळ कायम ठेवण्याचे नाकारले. अंतीमतः तक्रारदारांनी आपली नोंदणी रद्द करण्याचे ठरविले. व त्या प्रमाणे सा.वाले यांना कळविले. 3. तक्रारदारांनी सा.वाले यांचेकडे जमा केलेली नोंदणी फी रक्कम रु.15,000/- परत मागीतली. परंतु सा.वाले यांनी ती अदा करण्यास नकार दिला. अंतीमतः तक्रारदारांनी प्रस्तुतची तक्रार दाखल केली व त्यामध्ये अर्जाचे शुल्क रु.500/- नोंदणी फी रु.15,000/- परत मिळणेकामी तसेच नुकसान भरपाई रु.50,000/- अशी दाद मागीतली. 4. सा.वाले यांनी आपली कैफीयत दाखल केली. व त्यामध्ये असे कथन केले की, तक्रारदारांनी सा.वाले यांचेकडे एकूण शुल्क रु.30,000/- फक्त रु.15,000/- जमा केले. बदललेल्या वेळेच्या संदर्भात सा.वाले यांचे असे कथन आहे की, 6 डिसेंबर, 2008 रोजी उदधाटनाचे सत्रामध्ये बहुतेक प्रशिक्षणार्थीनी वेळेमध्ये बदल व्हावा अशी मागणी केली. व त्यांचे मागणीवरुन दुपारी 2.00 ते संध्याकाळी 8.00 च्या ऐवजी सकाळी 10.00 ते दुपारी 4.00 अशी वेळ ठरविण्यात आली. तक्रारदारांनी या बद्दल सुरवातीला नाराजी व्यक्ती केली. परंतु बहुसंख्य प्रशिक्षणार्थीनी वेळेमधील बदल या मागणीचे बाजुने असल्याने तक्रारदारांनी आपला विरोध सोडून दिला व 13 डिसेंबर, तसेच 20 डिसेंबर, 2008 रोजी वर्गामध्ये उपस्थिती लावली. सा.वाले यांनी असे कथन केले की, संस्थेच्या नियमाप्रमाणे व शर्ती अटी प्रमाणे प्रशिक्षणार्थी आपले शुल्क परत मागू शकत नाही. या प्रमाणे शुल्क परत करण्याचे संदर्भात तक्रारदारांना सेवा सुविधा पुरविण्यात कसुर झाली या आरोपास सा.वाले यांनी नकार दिला. 5. तक्रारदारांनी आपले प्रतिउत्तराचे शपथपत्र दाखल केले. तर सा.वाले यांनी त्यांचे मुख्य व्यवस्थापक श्रीमती निता नेघांधी यांचे शपथपत्र दाखल केले. दोन्ही बाजुंनी आवश्यक ती कागदपत्रे व लेखी युक्तीवाद दाखल केला. 6. प्रस्तुत मंचाने तक्रार, शपथपत्रे, कागदपत्रे, यांचे वाचन केले. त्यानुसार तक्रारीच्या निकाली कामी पाढील मुद्दे कायम करण्यात येतात. क्र. | मुद्दे | उत्तर | 1 | सा.वाले यांनी पदविकेच्या वर्गाची वेळ बदलल्यानंतर व तक्रारदारांनी आपली नोंदणी रद्द केल्यानंतर तकारदारांना त्यांनी जमा केलेले शुल्क रु.15,000/- परत करण्यास नकार देवून सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली ही बाब तक्रारदार सिध्द करतात काय ? | होय. | 2 | तक्रारदार सा.वाले यांचेकडून तक्रारीतील मागणी प्रमाणे नुकसान भरपाई मिळविण्यास पात्र आहेत काय ? | नाही. . | 3 | अंतीम आदेश | तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते. |
कारण मिमांसा 7. तक्रारदारांनी सा.वाले यांचेकडे शुल्का बद्दल रु.15,000/- जमा केले या बद्दल वाद नाही. त्याचप्रमाणे प्रशिक्षण वर्गाची मुळची वेळ दुपारी 2.00 ते 8.00 अशी होती या बद्दलही वाद नाही. तक्रारदारांनी आपले तक्रारीसोबत सा.वाले संस्थेने पदविकेच्या प्रशिक्षणा बद्दलची जी जाहीरात दिली होती. त्याची प्रत हजर केलेली आहे. त्यामध्ये देखील प्रशिक्षण वर्गाची वेळ दुपारी 2.00 ते 8.00 अशी नमुद केलेली आहे. 8. सा.वाले यांनी आपल्या कैफीयतीमध्ये असे कथन केले आहे की, प्रशिक्षण वर्गाचे दिनांक 6 डिसेंबर, 2008 रोजी उदघाटन झाल्यानंतर बहुसंख्य प्रशिक्षणार्थीनी वेळेमध्ये बदल होण्याची मागणी केली. व प्रमाणे प्रशिक्षणाची वेळ शनिवारी दुपारी 2.00 ते 8.00 चे ऐवजी सकाळी 10.00 ते 4.00 अशी ठेवण्यात आली. सा.वाले यांनी आपल्या कैफीयतीचे परिच्छेद क्र.24 मध्ये असे नमुद केले आहे की, प्रशिक्षणाचे वेळेमध्ये करण्यात आलेल्या बदलाबद्दल तक्रारदारांनी तिथेच आपली नाराजी व्यक्त केली. तथापी सा.वाले असे म्हणतात की, तक्रारदारांनी नाईलाजाने ती वेळ मान्य केली व 13 डिसेंबर, 2008 तसेच 20 डिसेंबर, 2008 रोजी प्रशिक्षण वर्गावर हजेरी लावली. 9. या संदर्भात तक्रारदारांचे असे म्हणणे आहे की, 6 डिसेंबर, 2008 नंतर 13 डिसेंबर व 20 डिसेंबर, 2008 रोजी ते सा.वाले संस्थेमध्ये गेले होते. परंतू संस्थेच्या प्राचार्याना भेटून आपली नाराजी व्यक्त करुन नोंदणी शुल्क परत मिळणेकामी त्यांनी सा.वाले संस्थेकडे संस्थेच्या वर्गावर वरील हजर राहण्याचे ठरविले. तक्रारदारांचे तक्रारीतील कथन तसेच पत्र व्यवहारातील मजकुर तक्रारदारांचे वरील कथनास पुष्टी देतो. यावरुन तक्रारदारांनी सा.वाले यांचा प्रशिक्षण वर्गाची वेळ बदलण्याचा निर्णय मान्य केला होता असा निष्कर्ष काढणे शक्य होणार नाही. 10. सा.वाले यांनी आपले कैफीयतमधील कथनाचे पृष्टयर्थ अटी व शर्तीची प्रत दाखल केलेली आहे. त्यातील परिच्छेद क्र.4 मध्ये असे नमुद केलेले आहे की, उमेदवाराने जमा केलेले शुल्क कुठल्याही पारिस्थितीमध्ये परत केले जाणार नाही. या अटी व शर्तीचे आधारे सा.वाले यांचे असे कथन आहे की, तक्रारदारांचे दाखल होण्याचे अर्जासोबत शर्ती व अटीचा मसुदा जोडलेला असल्याने शर्ती व अटी मधील कलम 4 तक्रारदारांना मान्य होते असा अर्थ काढावा लागेल व त्यावरुन तकारदार नोंदणीशुल्क परत मिळण्यास पात्र नाहीत असा निष्कर्ष नोंदवावा लागेल असेही कथन सा.वाले यांनी केले. 11. वर नमुद केल्याप्रमाणे तक्रारदारांनी दिलेल्या जाहीरातीमध्ये प्रशिक्षण वर्गाची वेळ शनिवार दुपारी 2.00 ते 8.00 अशी नमुद केलेली होती व त्यावर विसंबून तक्रारदारांनी प्रशिक्षणकामी प्रवेश घेतला व शुल्क जमा केले. जाहीरातीमध्ये नमुद केलेल्या वेळेचे संबंधात सा.वाले यांनी केलेला बदल हा तक्रारदारांचे विनंती वरुन केलेला नव्हता तर सा.वाले यांनी स्वतः व एकतर्फी तो निर्णय घेतला होता. तो निर्णय बहुसंख्य प्रशिक्षणार्थीचे मागणी वरुन घेतला गेला होता असे सा.वाले यांचे कथन असले तरी तो निर्णय तक्रारदारांना कधीही मान्य नव्हता व त्यास तक्रारदारांनी कधीही संमती दर्शविली नाही. या प्रमाणे प्रशिक्षणाचे वेळेमध्ये केलेला बदल हा सा.वाले यांनी कराराचे अटी व शर्तीमध्ये केलेला एकतर्फी बदल असल्यामुळे नोंदणी शुल्काचे संदर्भात शर्ती व अटी मध्ये असलेली तरतुद तक्रारदारांना लागू होणार नाही. या संदर्भात तक्रारदारांनी मा.राष्ट्रीय आयोगाचे तसेच तामीळनाडू व दिल्ली आयोगाचे वेग वेगळया न्यायनिर्णयाचा संदर्भ दिला आहे. त्यातील अभिप्राय तक्रारदारांचे कथनास पुष्टी देतात. 12. वरील सर्व घटनाक्रम लक्षात घेता सा.वाले यांनी तक्रारदारांना नोंदणी शुल्क रु.15,000/- परत करण्यास नकार दिला व सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली असा निष्कर्ष काढावा लागतो. तक्रारदारांनी प्रवेश अर्जाची किंमत रु.500/- परत मागीतली आहे. परंतु ती शुल्क नसल्याने परत मिळणार नाही. त्याच प्रमाणे तक्रारदारांनी रु.50,000/- नुकसान भरपाई मागीतलेली आहे. तथापी शुल्काची रक्कम रु.15,000/- सा.वाले यांनी 9 टक्के व्याजाने परत करावी असा आदेश होत असल्याने सा.वाले यांनी तक्रारदारांना वेगळी नुकसान भरपाई अदा करावी असा आदेश देणे न्याय व योग्य राहील असे प्रस्तुत मंचास वाटत नाही. 13. वरील निष्कर्षा व चर्चेनुरुप पुढील प्रमाणे आदेश करण्यात येतो. आदेश 1. तक्रार क्रमांक 69/2009 अंशतः मान्य करण्यात येते. 2. सामनेवाले यांनी तक्रारदारांना शुल्क परत करण्यास नकार देवून तक्रारदारांना सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली असे जाहीर करण्यात येते. 3. सामनेवाले यांनी तक्रारदारांना शुल्काची रक्कम रु.15,000/- त्यावर दिनांक 13 डिसेंबर, 2008 पासून 9 टक्के दराने व्याजासह अदा करावी असा आदेश देण्यात येतो. 4. सामनेवाले यांनी तक्रारदारांना रु.1000/- तक्रारीच्या खर्चाबद्दल अदा करावेत. 5 आदेशाच्या प्रमाणित प्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठविण्यात याव्यात.
| [HONABLE MRS. Mrs.DEEPA BIDNURKAR] Member[HONABLE MR. Mr. J. L. Deshpande] PRESIDENT | |