Maharashtra

Nashik

CC/131/2011

Aanjanabai Ramkrushan Jejurkar - Complainant(s)

Versus

Oriental insurance - Opp.Party(s)

24 Nov 2011

ORDER

 
Complaint Case No. CC/131/2011
 
1. Aanjanabai Ramkrushan Jejurkar
Naygao,sinnar,nashik
...........Complainant(s)
Versus
1. Oriental insurance
Gangapur road,nashik
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MR. R.S.Pailwan PRESIDENT
 HON'ABLE MRS. V.V.Dani MEMBER
 
PRESENT:
 
ORDER

(मा.सदस्‍या अँड.सौ.व्‍ही.व्‍ही.दाणी यांनी निकालपत्र पारीत केले)

                      नि  का      त्र

  अर्जदार यांचे पती कै.रामकृष्‍ण सखाराम जेजूरकर यांचे दि.22/02/2010 रोजी पाण्‍यात पडून निधन झाले. अर्जदार यांना शेतकरी अपघात विमा योजनेप्रमाणे सामनेवाले यांनी लाभ दिल्याने सदरचा अर्ज दाखल करावा लागलेला आहे. सबब अर्जदार यांना सामनेवाले यांचेकडून विमा क्लेमपोटी रक्कम रु.1,00,000/- 12 मे 2010 पासून 15% व्याजदराने मिळावे, तसेच मानसिक,शारिरीक आर्थिक त्रासापोटी रु.50,000/- व तक्रार अर्जाचा खर्च रु.5,000/- मिळावेत या मागणीसाठी सदर अर्ज दाखल केलेला आहे.

        सामनेवाला क्र.1 यांचा जबाब पान क्र.27 लगत व प्रतिज्ञापत्र पान क्र.31 लगत दाखल केलेले आहे. सामनेवाला क्र.2 यांनी त्‍यांचा जबाब पोष्‍टाद्वारे पाठवला असून तो पान क्र.20 लगत दाखल केलेला आहे.

 

                                                  तक्रार क्र.131/2011

अर्जदार यांचा अर्ज प्रतिज्ञापत्र, त्यांनी दाखल केलेली सर्व कागदपत्रे तसेच सामनेवाला क्र.1 यांचे लेखी म्हणणे, प्रतिज्ञापत्र  त्यांनी दाखल केलेली सर्व कागदपत्रे सामनेवाला क्र.2 यांचे लेखी म्‍हणणे  यांचा विचार होऊन पुढीलप्रमाणे मुद्दे विचारात घेतलेले आहेतः

मुद्देः

1.    अर्जदार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहेत काय? -- होय

2.    सामनेवाले यांनी अर्जदार यांना सेवा देण्यात कमतरता केली आहे काय? -- होय.

     सामनेवाले क्र.1 यांनी अर्जदार यांना सेवा देण्यात कमतरता केलेली आहे.

3.    अर्जदार हे सामनेवाले क्र.1 यांचेकडून विमा क्लेमची रक्कम व्याजासह मिळण्यास

     पात्र आहेत काय? -- होय

4.    अर्जदार हे सामनेवाले क्र.1 कडून मानसिक त्रासापोटी अर्जाचे खर्चाची रक्कम

      मिळणेस पात्र आहेत काय? -- होय

5.    अंतीम आदेश?  -- अर्जदार यांचा तक्रार अर्ज  सामनेवाले क्र.2 विरुध्द नामंजूर

     करणेत येत आहे सामनेवाले क्र.1 विरुध् अंशतः मंजूर करण्यात येत आहे.            

विवेचनः

याकामी अर्जदार सामनेवाले यांचा युक्तीवाद ऐकला.         

      महाराष्ट्र शासनाने शेतक-यांकरीता दि.06/09/2008 चे परिपत्रकाप्रमाणे शेतकरी व्यक्तीगत अपघात संरक्षण विमा योजना सुरु केलेली आहे. त्याचा कालावधी दि.15/8/2009 ते दि.14/8/2010 असा होता.  सामनेवाले क्र.1 यांनी शेतकरी अपघात विमा योजना प्रस्ताव स्विकारलेला आहे.    

सामनेवाले क्र.2 यांनी त्यांचे लेखी म्हणणे पोष्टामार्फत दाखल केले आहे. सदर जबाब पाहता त्यामध्ये सामनेवालेची भूमिका अत्यंत जुजबी आहे, यामध्ये शेतक-यांचा विमादावा अर्ज तहसिलदारांमार्फत आल्यावर दावा अर्ज योग्यपणे भरलेला आहे काय? सोबत जोडलेली कागदपत्रे मागणीप्रमाणे आहेत काय? नसल्यास तहसिलदार यांना कळवून त्यांची पूर्तता करवून घेणे, त्यानंतर विमा कंपनीकडे पाठविणे, विमा कंपनीकडे दावा मंजूर होऊन आलेला धनादेश संबंधीत वारसांना देणे ही कामे आहेत. यासाठी सामनेवाले हे राज् शासन वा शेतकरी यांचेकडून कोणताही मोबदला घेत नाही असे नमूद  आहे. याचा

 

 

                                                  तक्रार क्र.131/2011

विचार होता अर्जदार यांचा तक्रार अर्ज सामनेवाले क्र.2 विरुध् नामंजूर करणेत यावा असे या मंचाचे मत आहे.

सामनेवाले क्र.1 यांनी त्यांचे लेखी जबाबात सदर शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजना नाकारलेली नाही. सदर पॉलिसी ही  शेतक-यांकरीता विमा योजनेंतर्गत घेतलेली होती ही बाब मान् केलेली आहे. अर्जदार हया कै.रामकृष्‍ण सखाराम जेजूरकर यांच्‍या पत्‍नी आहेत ही बाब सामनेवालेंनी नाकारलेली नाही. सामनेवाले यांचे लेखी म्हणणे त्यामधील कथनावरुन अर्जदार हे मयतचे वारस म्हणून सामनेवाले यांचे ग्राहक आहेत असे या मंचाचे मत आहे.

सामनेवाले क्र.1 यांनी त्‍यांचे लेखी म्‍हणण्‍यामध्‍ये घेतलेल्‍या बचावामध्‍ये, अर्जदार हे सामनेवालेंचे ग्राहक नाहीत. मयत कै.रामकृष्‍ण सखाराम जेजूरकर यांचा मृत्‍यु अपघाती नसून मयताने दारु पिलेली असल्‍याने तो पाण्‍यात पडून मयत झाला आहे. अर्जदार यांनी शेतकरी असल्‍याचा कोणताही पुरावा दाखल केलेला नाही. त्रिपक्षीय करारानुसार अटी व शर्तींचा भंग झालेला असल्‍यामुळे सामनेवाला यांची नुकसान भरपाई देण्‍याची तरतूद नाही. त्‍यामुळे अर्ज करण्‍यास कारण नाही. सबब अर्जदाराचा अर्ज रद्द करावा, असे नमूद केलेले आहे.

अर्जदार यांनी अपघाताचेबाबत पोलिसांकडील कागदपत्रे पान क्र.6,7,8,9 लगत दाखल केलेली आहेत. या कागदपत्रांमध्‍ये अकस्‍मात मृत्‍यु रजिष्‍टरमधील नोंदीमध्‍ये मयत कै.रामकृष्‍ण सखाराम जेजूरकर यांचा बंधा-याच्‍या पाण्‍याच्‍या तलावावरील पायी रस्‍त्‍याने जात असतांना त्‍यांचा तोल जावून पाण्‍यात पडून मृत्‍यु झाला असल्‍याचे नमूद आहे. मयताचा पोष्‍ट मार्टेम रिपोर्ट पान क्र.9 लगत  दाखल केलेला आहे. त्‍यामध्‍ये मयताच्‍या मृत्‍युचे कारण death due to Asphyxia dlt drowning असे नमूद केलेले आहे. यावरुन मयताचा मृत्‍यु पाण्‍यात बुडून झालेला आहे हे  स्‍पष्‍ट होत आहे. 

परंतु याबाबत सामनेवाले यांनी, असा बचाव घेतला आहे की मयत कै.रामकृष्‍ण सखाराम जेजूरकर यांचा अपघाती मृत्‍यु झालेला नसून त्‍यांनी दारुचे सेवन केल्‍याने त्‍यांचा तोल जावून त्‍यांच्‍या मृत्‍युस ते स्‍वतः जबाबदार आहेत. त्‍यामुळे शेतकरी अपघात विमा योजनेच्‍या तरतुदी प्रस्‍तुत तक्रारीस लागु होत नाहीत. परंतु सामनेवाला यांनी बचावाच्‍या पृष्‍ठयर्थ कोणतेही कागदपत्र दाखल केलेले नाही. पोलीस कागदपत्रांचा विचार होता मयताने दारुचे सेवन केलेले आहे व त्‍यामुळे त्‍याचा पाण्‍यात पडून मृत्‍यु झाला आहे असे कुठेही

 

                                                  तक्रार क्र.131/2011

नमूद केलेले नसून त्‍याप्रमाणे पुरावा आलेला नाही. तसेच पोस्‍टमार्टेम रिपोर्टमध्‍ये मयताने दारुचे सेवन केलेले होते व दारुचा अंश पोटात आढळलेला आहे असे नमूद केलेले नाही. याचा विचार होता मयताचा मृत्‍यु हा पाण्‍यात पडून बुडून झालेला दिसत आहे. सदर मृत्‍युची घटना ही अपघाती कारणानेच झालेली आहे. सदर मृत्‍युचे कारण हे पॉलीसीप्रमाणे इतर अपघात या कलमामध्‍ये येत असल्‍याने सदर घटना ही पॉलीसी अंतर्गत येते असे मंचाचे मत आहे. सबब सामनेवालेंचे बचावात काही तथ्‍य नाही.  याबाबत शासन परिपत्रकानुसार महाराष्‍ट्र शासनाने शेतक-यांचा शेती व्‍यवसाय करतांना होणारे रस्‍त्‍यावरील अपघात, विज पडणे, पूर,सर्पदंश इ. नैसर्गिक आपत्‍तीमुळे होणारे अपघात किंवा अन्‍य कोणतेही अपघात यामुळे शेतक-यांना मृत्‍यू किंवा अपंगत्‍व ओढवल्‍यास अपघातग्रस्‍त कुटुंबास आर्थिक लाभ देण्‍याकरीता सदरची विमा योजना केलेली आहे. या योजनेप्रमाणे सदर अर्जदार हे विमा क्‍लेम मिळणेस पात्र आहेत

सदर अपघाताबाबत अर्जदार यांनी तालुका कृषी अधिकारी, सिन्‍नर यांचेकडे कागदपत्रांची पूर्तता करुन प्रस्‍ताव दाखल केला आहे. यावरुन अर्जदार यांनी विमा क्‍लेमची पूर्तता केलेली दिसत आहे. शेतकरी व्‍यक्‍तीगत अपघात विमा योजना महाराष्‍ट्र शासनाचे परिपत्रकानुसार शासन निर्णयासोबत नमूद केलेली कागदपत्र शेतक-याने स्‍वतंत्रपणे सादर करण्‍याची आवश्‍यकता नाही.

अर्जदाराने पान क्र.14,15,16 लगत खाते उतारा, 7/12 उतारा व 6 ड पत्रकाची प्रत  दाखल केलेली आहे. यावरील नोंद पाहता कै.रामकृष्‍ण सखाराम जेजूरकर हे अपघाताचेवेळी व विमा कराराचेवेळी शेतकरी होते असे स्‍पष्‍ट होत आहे.

शासन परिपत्रकाचा व कागदपत्रांचा व वरील सर्व कारणांचा विचार होता  सामनेवाले यांना अर्जदार यांचा क्‍लेम अद्यापपावेतो न देवून सामनेवाले क्र.1 यांनी अर्जदार यांना सेवा देण्‍यात कमतरता केलेली आहे असे या मंचाचे मत आहे.

सामनेवाला क्र.1 यांचे लेखी म्‍हणणे तसेच अर्जदार यांनी दाखल केलेली सर्व कागदपत्रे विचारात घेतली असता शेतकरी अपघात विमा योजनेनुसार शेतक-याचा मृत्‍यू झाल्‍यास रु.1,00,000/-ची विमा जोखीम घेण्‍यात आली,  दावा रकमेवर व्‍याज मिळणेस अर्जदार हे पात्र आहेत. याचा विचार होता अर्जदार हे सामनेवाले क्र.1 कडून विमा क्‍लेमपोटी रक्‍कम रु.1,00,000/- व या रकमेवर सदर तक्रार अर्ज दाखल तारखेपासून

 

 

                                                  तक्रार क्र.131/2011

म्‍हणजेच दि.07/06/2011 पासून संपूर्ण रक्‍कम फिटेपर्यंत द.सा.द.शे.12% दराने व्‍याज अशी एकूण रक्‍कम मिळण्‍यास पात्र आहेत असे या मंचाचे मत आहे.

अर्जदार यांनी सामनेवालेकडून मानसिक त्रासापोटी व खर्चाचे रकमेची मागणी केलेली आहे.  वास्‍तविक वर उल्‍लेख केलेल्‍या महाराष्‍ट्र शासनाच्‍या परिपत्रकानुसार सामनेवाले यांनी कोणत्‍याही तांत्रिक बाबींचा आधार न घेता अर्जदाराचा विमा क्‍लेम योग्‍य त्‍या वेळेत मंजूर करणे गरजेचे होते.  विमा क्‍लेमची रु.1,00,000/- इतकी मोठी रक्‍कम अर्जदार यांना योग्‍य वेळेत मिळालेली नाही.  विमा क्‍लेमची रक्‍कम मिळावी म्‍हणून अर्जदार यांना सामनेवालेकडून या मंचात दाद  मागावी लागलेली आहे. वरील कारणांमुळे निश्चितपणे अर्जदारास मानसिक त्रास सहन करावा लागला आहे व तक्रार अर्ज दाखल करण्‍यास खर्चही करावा लागलेला आहे. याचा विचार होता अर्जदार हे सामनेवाले क्र.1 कडून मानसिक त्रासापोटी रक्‍कम रु.5,000/- व अर्जाचे खर्चापोटी रु.1,000/- मिळण्‍यास पात्र आहेत असे या मंचाचे मत आहे.

याकामी मंचाचेवतीने पुढीलप्रमाणे वरिष्‍ठ कोर्टाचे निकालपत्रांचा आधार घेणेत आलेला आहेः

     1. मा. उच्‍च न्‍यायालय, मुंबई, शकुंतला धोंडीराम मुंडे वि. स्‍टेट ऑफ    

        महाराष्‍ट्र व इतर (2010(2)Mh.L.J.)

 2. 2008(2) सीपीआर महाराष्‍ट्र आयोग पान 203 आय.सी.आय.सी.आय 

    लोंबार्ड  वि. सिंधुताई खैरनार

3. 2(2008) ए.सी.सी. मुंबई  उच्‍च न्‍यायालय पान 888 निर्मलाबाई विरुध्‍द 

   महाराष्‍ट्र सरकार.

वरील निकालपत्रांत शेतकरी अपघात विमा योजनेबाबत विचार करुन निर्णय देण्‍यात आलेला आहे.  यामुळे या निकालपत्राचा आधार घेतलेला आहे.

अर्जदाराचा अर्ज, प्रतिज्ञापत्र, त्‍यांनी दाखल केलेली सर्व कागदपत्रे, वकीलांचा युक्‍तीवाद तसेच सामनेवाले क्र.1 यांचे लेखी म्‍हणणे, दाखल केलेली कागदपत्रे, वर उल्‍लेख

केलेली व आधार घेतलेली वरिष्‍ठ कोर्टाची निकालपत्रे व वरील सर्व विवेचन यांचा विचार होऊन पुढीलप्रमाणे आदेश करण्‍यात येत आहेः

                                          आ दे श

1)     अर्जदार यांचा तक्रार अर्ज सामनेवाले क्र. 2 विरुध्‍द नामंजूर करण्‍यात येत आहे.

                                                     तक्रार क्र.131/2011

2)     अर्जदार यांचा तक्रार अर्ज सामनेवाले क्र.1 यांचेविरुध्‍द अंशतः मंजूर करण्‍यात येत आहे.   

3)     आजपासून 30 दिवसांचे आंत सामनेवाले क्र. 1 यांनी अर्जदारास खालीलप्रमाणे रक्‍कम दयावीः

अ.          विमा क्‍लेमपोटी रक्‍कम रु.1,00,000/-व या रकमेवर दि.07/06/2011     पासून द.सा.द.शे. 12% दराने संपूर्ण रक्‍कम फिटेपर्यंत व्‍याज दयावे.

ब.  मानसिक त्रासापोटी रु.5,000/- दयावेत.

क.  अर्जाचे खर्चापोटी रु.1,000/- दयावेत.

 

 
 
[HON'ABLE MR. R.S.Pailwan]
PRESIDENT
 
[HON'ABLE MRS. V.V.Dani]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.