Maharashtra

Chandrapur

CC/20/110

Smt.Jijabai Kushab Jeurkar - Complainant(s)

Versus

Oriental Insurance Company Ltd through Branch Manager - Opp.Party(s)

Adv.U.P.Kshirsagar

01 Sep 2022

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTE REDRESSAL COMMISSION
CHANDRAPUR
 
Complaint Case No. CC/20/110
( Date of Filing : 02 Nov 2020 )
 
1. Smt.Jijabai Kushab Jeurkar
R/o.Aarvi,Tah- Gondpipri ,Dist-Chandrapur
Chandrapur
MAHARASHTRA
2. Shri.Balkishan Kushab Jeurkar
R/o.Aarvi,Tah-Gondpipri,Dist-Chandrapur
CHANDRAPUR
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. Oriental Insurance Company Ltd through Branch Manager
Dhanraj planza,2nd floor,M.G.Road,Chandrapur
CHANDRAPUR
MAHARASHTRA
2. Jaika Insurance Brokrage Pvt.Ltd
nd floor ,Jaika Building,Commercial Road,Civil Lines,Nagpur
Nagpur
MAHARASHTRA
3. Taluka Krushi Adhikari,Gondpipri
Tah-Gondpipri,DIst-Chandrapur
CHANDRAPUR
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. Atul D.Alsi PRESIDENT
 HON'BLE MRS. Kirti Vaidya Gadgil MEMBER
 HON'BLE MRS. Kalpana Jangade Kute MEMBER
 
PRESENT:
 
Dated : 01 Sep 2022
Final Order / Judgement

::: नि का ल  प ञ   :::

           (मंचाचे निर्णयान्वये, सौ. किर्ती वैद्य (गाडगीळ), मा. सदस्‍या)                  

      (पारित दिनांक ०१/०९/२०२२)

 

                       

                       

  1. तक्रारकर्तीने सदर तक्रार ग्राहक संरक्षण कायदा, २०१९ चे कलम ३५(१) अन्‍वये दाखल केली आहे.
  2. तक्रारकर्ती ही आर्वी, तालुका गोंडपिपरी, जिल्‍हा चंद्रपूर येथील रहिवासी असून तक्रारकर्ती क्रमांक १ चे  प‍ती व तक्रारकर्ता क्रमांक २ चे वडील श्री कुशाब गोविंदराव जेउरकर यांच्‍या मालकीची मौजा आर्वी, तालुका गों‍डपिपरी, जिल्‍हा  चंद्रपूर येथे भुमापन क्रमांक १६६/१ ही शेतजमीन आहे. तक्रारकर्ती क्रमांक १ चे पती हे शेतीचा व्‍यवसाय करीत होते व शेतातील उत्‍पन्‍नावर कुटुंबाचे पालन पोषण करीत होते. विरुध्‍द पक्ष क्रमांक १ ही विमा कंपनी असून विरुध्‍द पक्ष क्रमांक २ ही विमा सल्‍लागार कंपनी आहे. शासनाच्‍या वतीने विरुध्‍द पक्ष क्रमांक ३ हे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत दावे स्‍वीकारतात. शासनाच्‍या  वतीने विरुध्‍द पक्ष क्रमांक ३ तर्फे सदर विमा योजनेअंतर्गत तक्रारकर्ती क्रमांक १ चे पतीचा दोन लाखाचा विमा शासनाच्‍या वतीने उतरविला होता. सदर विमा जरी शासनाच्‍या वतीने उतरविण्‍यात आला असला तरी तक्रारकर्ती क्रमांक १  व २ हे मयत श्री गाविंदराव जेउरकर यांचे वारस असल्‍याने सदर विमाचा लाभधारक आहे. सदर दाव्‍याचा प्रस्‍ताव विरुध्‍द पक्ष क्रमांक ३ तर्फे सर्व कागदपञांची शहानिशा करुन सर्व प्रस्‍ताव बरोबर आहे हे पाहून विरुध्‍द पक्ष क्रमांक १ व २ ला पाठविला जातो व विरुध्‍द पक्ष क्रमांक १ सदर दाव्‍याचे भुगतान करते. तक्रारककर्ती क्रमांक १ हिचे पती व तक्रारकर्ता क्रमांक २ चे वडील यांचा मृत्‍यु दिनांक २/१०/२०१७ रोजी शेतात काम करत असतांना ईलेक्‍ट्रीक शॉक लागून जखमी होऊन झाला. तक्रारकर्ती क्रमांक १ च्‍या पतीच्‍या आकस्‍मीक निधनाने तक्रारकर्तीला मानसिक धक्‍का बसला परंतु शासनाच्‍या वतीने तक्रारकर्ती क्रमांक १ चे पतीचा शेतकरी व्‍यक्तिगत अपघात विमा काढला असल्‍याने तक्रारकर्ती क्रमांक १ च्‍या पतीचा अपघातात मृत्‍यु झाल्‍यामुळे तिचे स्‍वतःचे मनस्थिती ठीक नसल्‍याने तक्रारकर्ता क्रमांक २ जो तिचा मुलगा त्‍याच्‍या मार्फत विरुध्‍द पक्ष क्रमांक ३ कडे दिनांक २३/८/२०१८ रोजी रीतसर अर्ज केला तसेच वेळोवेळी विरुध्‍द पक्षांनी जे दस्‍तावेज मागितले त्‍याची पुर्तता केली. तक्रारकर्ते यांनी रीतसर अर्ज करुन तसेच आवश्‍यक दस्‍त दिल्‍यानंतर विरुध्‍द पक्षांनी सदर दाव्‍याबाबत काहीही न कळविल्‍याने यांचे विरुध्‍द सदर तक्रार दाखल करण्‍यास काही पर्याय उरला नव्‍हता. वास्‍तविकतः विरुध्‍द पक्षांनी त्‍यानुसार सदर दाव्‍याबाबत साठ दिवसांत मंजूर अथवा नामंजूर आहे हे कळविणे आवश्‍यक असते तसेच विरुध्‍द पक्षांनी दावा फेटाळून तक्रारकर्तीला सेवेत न्‍युनता दिली असल्‍यामुळे सदर अर्ज विद्यमान आयोगासमोर नुकसान भरपाईची रक्‍कम रुपये २,००,०००/- मिळण्‍याकरिता तसेच झालेल्‍या  मानसिक व शारीरिक ञासापोटी रुपये ५०,०००/- व तक्रारीचा खर्च रुपये २०,०००/- मिळावे अशी मागणी केलेली आहे.
  3. विरुध्‍द पक्ष क्रमांक १ यांनी लेखी उत्‍तर दाखल करुन तक्रारकर्त्‍यांचे तक्रारीतील म्‍हणणे खोडून काढीत पुढे विशेष कथनात नमूद केले की, तक्रारकर्ता यांनी ह्या प्रकरणात दाखल केलेले सर्व कागदपञ बोगस व खोटे  आहेत तसेच तक्रारकर्त्‍याची  स्‍वाक्षरी सुध्‍दा  संशयास्‍पद आहे. विमा पॉलिसीप्रमाणे नुकसान भरपाईचा  दावा करण्‍याचा कायदेशीर अधिकार फक्‍त मयतच्‍या पत्‍नीला आहे. तक्रारकर्ता क्रमांक २ यांना नाही. विमा कंपनी अशा फसवणूक आणि बेकायदेशीर प्रकरणासाठी कोणतीही भरपाई देण्‍यास जबाबदार नाही. मयत श्री कुशाब हे मरण पावले परंतु त्‍याच्‍या मृत्‍युचे कोणतेही कारण सक्षम प्राधिकरणाच्‍या कागदपञासह प्रकरणात सादर केले नाही.शॉक लागून मृत्‍यु झाल्‍यास विद्युत विभागाचे कर्मचारी घटनास्‍थळाची पाहणी,  पंचनामा करतात तसेच प्रत्‍यक्षदर्शीचे बयाण नोंदवून घेतले जातात. विद्यूत निरीक्षकाने मृत्‍युच्‍या ठिकाणी भेट देऊन वस्‍तुस्थितीची चौकशी करणे आवश्‍यक होते तसेच प्रस्‍तुत शेतात विद्यूत लाईनचा उल्‍लेख नाही तसेच मयत विद्यूत प्रवाहाच्‍या संपर्कात कसा आला व त्‍याचा मृत्‍यु कशा झाला याबाबत प्रकरणात काहीही स्‍पष्‍टता नाही तसेच तक्रारीचे कारण दिनांक २/१०/२०१७ रोजी घडले जेव्‍हा मयत श्री  कुशाब मरण पावले परंतु तक्रारकर्ता यांनी दिनांक १८/०३/२०२० रोजी तक्रार दाखल केली. सबब सदर तक्रार मुदतबाह्य आहे तसेच विमा पॉलिसीच्‍या करारात सुधारणा करण्‍याचा अधिकारी कोणत्‍याही न्‍यायालयाला नाही तसेच दाव्‍याचा प्रस्‍ताव हा नियमाप्रमाणे कृषी  अधिकारी यांच्‍याकडे ९० दिवसाचे आत दाखल केला याबाबत प्रकरणात कोणताही दस्‍तावेज दाखल नाही. सबब तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष क्रमांक १ विरुध्‍द खोटे आरोप केले असल्‍यामुळे सदर तक्रार विरुध्‍द पक्ष क्रमांक १ विरुध्‍द खारीज  करण्‍यात यावी.
  4. विरुध्‍द पक्ष क्रमांक २ यांनी प्रकरणात उपस्थित राहून त्‍यांचे उत्‍तर दाखल करीत नमूद केले की, तक्रारकर्तीच्‍या पतीचे दिनांक २/१०/२०१७ रोजी विजेच्‍या धक्‍क्‍याने निधन झाले. तक्रारकर्त्‍याने या योजनेअंतर्गत विरुध्‍द पक्ष क्रमांक ३ तालुका कृषी अधिकारी यांचेकडे दिनांक २२/०२/२०१८ रोजी अर्ज सादर केला. हा अर्ज विरुध्‍द पक्ष क्रमांक ३ कडून जिल्‍हा कृषी अधिकारी यांच्‍या मार्फत विरुध्‍द पक्ष क्रमांक २ यांना दिनांक १/०३/२०१८ रोजी प्राप्‍त झाला व हा अर्ज आणि त्‍यासोबत जोडलेले कागदपञ विरुध्‍द पक्ष क्रमांक २ यांनी विरुध्‍द पक्ष क्रमांक १ कडे दिनांक १७/०३/२०१८ रोजी विचाराकरिता पाठविले. या अर्जाची शहानिशा केल्‍यावर विरुध्‍द पक्ष क्रमांक १ यांनी मयत व्‍यक्‍तीचा मृत्‍यु अपघातामुळे झाला हे स्‍पष्‍ट होत नाही हे कारण देऊन दिनांक ८/२/२०१९ च्‍या पञाव्‍दारे नामंजूर केला परंतु हा विमा दावा कंपनीने मंजूर करायला हवा होता. या प्रकरणात विरुध्‍द पक्ष क्रमांक २ यांनी त्‍यांची जबाबदारी चोखपणे पार पाडली असून तक्रारकर्त्‍याला सेवा प्रदान करण्‍यात कोणतीही कसूर केली नाही. दावा मंजूर अथवा नामंजूर करणे हे विरुध्‍द पक्ष क्रमांक १ च्‍या अखत्‍यारीत असते. विरुध्‍द पक्ष क्रमांक २ हे फक्‍त विमा कंपनी, तक्रारदार आणि शासन यांच्‍यातील मध्‍यस्‍थी म्‍हणून काम पाहतात.
  5. प्रकरणात विरुध्‍द पक्ष क्रमांक ३ यांना आयोगातर्फे नोटीस प्राप्‍त होऊनही त्‍यांनी प्रकरणात उपस्थित होऊन त्‍यांचे उत्‍तर दाखल केले नाही.
  6. तक्रारकर्तीची तक्रार, दस्‍तावेज, शपथपञ,  विरुध्‍द पक्ष क्रमांक १ चे लेखी उत्‍तर, विरुध्‍द पक्ष क्रमांक २ चे लेखी उत्‍तर, तसेच उभयपक्षांचा तोंडी युक्तिवाद यावरुन तक्रार निकाली काढण्‍याकरिता खालील कारणमीमांसा व त्‍यावरील निष्‍कर्ष कायम करण्‍यात आले.

 

 

कारणमीमांसा

  1. तक्रारकर्तीर्ते यांनी तक्रारीमध्‍ये निशानी क्रमांक ४ वर दाखल केलेल्‍या अनुक्रमे ७/१२ उतारा, गांव नमुना या दस्‍तऐवजांवर तक्रारकर्तीचे  मयत पती श्री कुशाब यांचे नाव आहे यावरुन मयत हा शेतकरी असून तक्रारकर्ते क्रमांक १ व २ हे विमाधारक शेतक-याचे पत्‍नी व मुलगा असून ते लाभधारक असल्‍यामुळे विरुध्‍द पक्ष क्रमांक १ चे ग्राहक आहेत. शिवाय प्रस्‍तुत वाद हा अपघाती मृत्‍युमुळे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत विमा कंपनीचे जबाबदारी संबंधीत असल्‍यामुळे या आयोगास प्रस्‍तुत वाद चालविण्‍याचा अधिकार आहे. तक्रारकर्ता हिने निशानी क्रमांक ४ वर दाखल केलेला ७/१२ उतारा व इतर शेतीचे कागदपञांचे अवलोकन केले असता निदर्शनास येते की तक्रारकर्तीच्‍या पतीचे मौजा आर्वी, तहसील गोंडपिपरी, जिल्‍हा चंद्रपूर येथे भुमापन क्रमांक १६६/१ ही शेतजमीन आहे व त्‍या शेतीवर ते त्‍याच्‍या कुटुंबाचे पालनपोषन करायचे. मयत श्री कुशाब यांचा शासनाच्‍या वतीने शेतकरी अपघात  विमा २०१६-२०१७ या कालावधीकरिता रुपये २,००,०००/- चा विमा काढण्‍यात आला होता ही बाब स्‍पष्‍ट दिसून येत आहे तसेच तक्रारकर्ता ही मयत विमाधारक यांची पत्‍नी तसेच तक्रारकर्ता क्रमांक २ हा मुलगा असून सदर विम्‍याचे लाभधारक आहे. तक्रारकर्ते यांनी तक्रारीत दाखल केलेले दस्‍तावेज व विरुध्‍द पक्ष क्रमांक १ व २ यांनी दाखल केलेले उत्‍तराचे अवलोकन केले असता निदर्शनास येते की तक्रारकर्त्‍याचे पतीचा दिनांक २/१०/२०१७ रोजी शेतात काम करीत असतांना इलेक्‍ट्रीक शॉक लागून अपघाती मृत्‍यु झाला असून सदर अपघाताबाबत नोंदविण्‍यात आलेला एफ.आय.आर. तसेच घटनास्‍थळ पंचनामा, पी.एम. रिपोर्ट इत्‍यादी दस्‍तावेज प्रकरणात दाखल आहेत तसेच दस्‍त क्रमांक ७ वर सरपंच ग्रामपंचायत वेजगांव तालुका गों‍डपिपरी यांचे प्रमाणपञ तसेच दस्‍त क्रमांक ८ वर पोलीस पाटील यांचे प्रमाणपञावरुन मयत श्री कुशाब गोविंदा जेउरकर यांचा मृत्‍यु शेतामध्‍ये काम करीत असतांना इलेक्‍ट्रीक शॉक लागून झाला हे सिध्‍द होत आहे. विरुध्‍द पक्ष क्रमांक ३ यांचे उत्‍तराचे अवलोकन केले असता तक्रारकर्ते या योजने अंतर्गत विरुध्‍द पक्ष क्रमांक ४ कडे दिनांक २२/०२/२०१८ रोजी अर्ज सादर केला व विरुध्‍द पक्ष क्रमांक ४ कडून विरुध्‍द पक्ष क्रमांक ३ यांना दिनांक १/०३/२०१८ रोजी प्राप्‍त झाला व विरुध्‍द पक्ष क्रमांक ३ कडून दिनांक १७/०३/२०१८ रोजी विरुध्‍द पक्ष क्रमांक १ व २ यांना दावा प्राप्‍त झाला यावरुन अर्थातच विरुध्‍द पक्ष क्रमांक १ यांना नोडल एजन्‍सी व्‍दारे तक्रारकर्तीचा दावा प्राप्‍त झाला होता. माञ सदर विमा दावा तक्रारकर्त्‍यांनी विमा धारकाचा मृत्‍युनंतर ९० दिवसापेक्षा जास्‍त कालावधीनंतर दाखल केला असे विरुध्‍द पक्षांचे म्‍हणणे आहे परंतु या कारणास्‍तव शेतकरी विमा दाव्‍याबाबत मार्गदर्शक तत्‍वे घालून दिली असून त्‍यात विमा दावा ९० दिवसाच्‍या आत दाखल न होता विलंबा ने दाखल झाला तरी देखील तो स्‍वीकारावा असे निर्देश दिले आहेत. तसेच विरुध्‍द पक्ष क्रमांक १ यांनी विद्यूत कर्मचारी  यांनी घटनास्‍थळावर येऊन कोणताही पंचनामा केल्‍याबाबतचे कोणतेही दस्‍त प्रकरणात नाही याबद्दल आक्षेप त्‍याच्‍या उत्‍तरात नमूद केला आहे असून त्‍याबद्दलचे तक्रारकर्त्‍यांनी कोणतेही कागदपञे प्रकरणात दाखल केले नाही असे नमूद केले आहे परंतु आयोगाच्‍या मते या कारणावरुन तक्रारकर्तीचा दावा फेटाळणे निरर्थक आहे कारण तक्रारकर्तीचा पतीचा मृत्‍यु हा इलेक्‍ट्रीक शॉक लागून झाला ही बाब सिध्‍द करणारे दस्‍तावेज प्रकरणात दाखल आहेत. सबब सदर तक्रारीतील तक्रारकर्ता क्रमांक १ व २ हे विमा दाव्‍याची रक्‍कम रुपये २,००,०००/-मिळण्‍यास पाञ असल्‍याचा निष्‍कर्षाप्रत हे आयोग पोहचले आहे. विरुध्‍द पक्ष क्रमांक २ व ३ यांचे काम मध्‍यस्‍थाचे असल्‍यामुळे तसेच ते निःशुल्‍क सेवा पुरवितात. त्‍यामुळे त्‍यांच्‍यावर दावा रक्‍कम देण्‍याची जबाबदारी नाही असे आयोगाचे मत आहे. सबब खालिलप्रमाणे आयोग आदेश पारित करीत आहे.

 

अंतिम आदेश

 

  1. तक्रारकर्त्‍यांची तक्रार क्रमांक ११०/२०२० अंशतः मंजूर करण्‍यात येते.
  2. विरुध्‍द पक्ष क्रमांक १ यांनी तक्रारकर्ते यांना शेतकरी व्‍यक्‍तीगत अपघात विमा पॉलिसीची रक्‍कम रुपये २,००,०००/- द्यावे.
  3. विरुध्‍द पक्ष क्रमांक १ यांनी तक्रारकर्त्‍यास झालेल्‍या शारीरिक व मानसिक ञासापोटी रुपये १०,०००/- व  तक्रारीचा खर्च रुपये ५,०००/- अदा करावे. 
  4. विरुध्‍द पक्ष क्रमांक २ व ३ विरुध्‍द कोणताही आदेश नाही.
  5. उभयपक्षांना आदेशाच्‍या प्रती विनामुल्‍य देण्‍यात यावे.
 
 
[HON'BLE MR. Atul D.Alsi]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. Kirti Vaidya Gadgil]
MEMBER
 
 
[HON'BLE MRS. Kalpana Jangade Kute]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.