Maharashtra

Chandrapur

CC/18/18

Smt Meena Raju Gotephode At Tilaknagr - Complainant(s)

Versus

Oriental Insurance Company Limited through Divisional Manager Nagpur - Opp.Party(s)

Adv. Hatkar

24 Apr 2019

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTE REDRESSAL FORUM
CHANDRAPUR
 
Complaint Case No. CC/18/18
( Date of Filing : 16 Jan 2018 )
 
1. Smt Meena Raju Gotephode At Tilaknagr
At Post Tilkanager Tah Bramhapuri
chandrapur
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. Oriental Insurance Company Limited through Divisional Manager Nagpur
Divisiaonl Office No 2 8 Hindustan Collony Ajani Chowk Wardha Road Nagpur
NAGPUR
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. Atul D.Alsi PRESIDENT
 HON'BLE MRS. Kirti Vaidya Gadgil MEMBER
 HON'BLE MRS. Kalpana Jangade Kute MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
Dated : 24 Apr 2019
Final Order / Judgement

::: नि का ल प ञ:::

(मंचाचे निर्णयान्‍वये,  मा. सौ. किर्ती वैदय (गाडगीळ) मा.सदस्‍या) (पारीत दिनांक :- 24/04/2019)

1.    अर्जदार ही वरील पत्त्यावर राहाते. तिचे पती देवराव गोटेफोडे हे  शेतीचा व्यवसाय करीत होते व त्यांच्या नावे मौजा देलनवाडी तहसील ब्रह्मपुरी येथे भूमापन क्र. 8/1 ही शेतजमीन होती. अर्जदार तिचा पती हा शेतकरी होता व शेतीच्या उत्पन्नावर सगळ्या कुटुंबाचे पालन पोषण करीत होता. अर्जदाराच्या पतीचा दिनांक १०.०५.२००८ रोजी विहिरीच्या पाण्याचा उपसा करीत असताना विषारी वायूमुळे गुदमरून व बुडून म्हणजे अपघाताने झाला. अर्जदाराच्या पतीचा रुपये 1 लाख चा शेतकरी अपघात विमा हा महाराष्ट्र सरकारतर्फे काढण्यात आला होता. शासनाच्या सदर विमा योजनेप्रमाणे अर्जदार हि पत्नी असल्याने सदर विम्याची लाभार्थी आहे. त्‍यामुळे अर्जदाराने पतीचा शेतकरी अपघात विमा लाभ मिळण्‍यासाठी गैरअर्जदार क्र. 2 मार्फत गैरअर्जदार क्र.1 कडे रीतसर अर्ज सादर केला. सदर विमा च्या नियमानुसार दावे स्वीकारण्यासाठी गैरअर्जदार क्र. २ ला नियुक्त केलेले आहे. गैरअर्जदार क्र. 2 हे दावे स्वीकारून पुढे इन्शुरन्स ॲडव्हायझर यांच्याकडे पाठवतात इन्शुरन्स ॲडव्हायझर सदर दावा गैरअर्जदार क्र. 1 यांच्याकडे पाठवतात अर्जदार हिने कागदपत्रे आपल्या दाव्या सोबत गैरअर्जदार क्र. 2 यांच्याकडे दाखल केली तसेच गैरअर्जदार क्र. 2 च्या मागणी नुसार अर्जदाराने कागदपत्राची पूर्तता केली. परंतु असे असूनही तिला आजपर्यंत तिच्या दाव्या संदर्भात कोणतीही माहिती मिळाली नाही. गैरअर्जदार क्र. 2 कडे वारंवार विचारणा करून सुद्धा अर्जदारास विमादाव्‍याबाबत काही कळले नसल्यामुळे अर्जदार यांनी दिनांक ९.०१.२०१८ रोजी गैरअर्जदारांना वकीला तर्फे नोटीस पाठवली. सदर नोटीस प्राप्त होऊन सुद्धा अर्जदाराला विमा दावा रक्कम मिळाली नाही. सबब अर्जदाराने सदर तक्रार मंचासमक्ष दाखल केली आहे. अर्जदाराची मागणी अशी आहे की गैरअर्जदाराने अर्जदाराला विमा दाव्याची रक्कम रुपये 1 लाख, दावा दाखल झाल्यापासून द.सा.द.शे. 18 टक्के व्याजासह देण्याचे आदेश व्हावे तसेच झालेल्या मानसिक शारीरिक व आर्थिक त्रासापोटी रू.20,000/- व तक्रारी तक्रारीचा खर्च रू.10,000/- देण्याचा आदेश देण्यात यावा.

2.  गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांना नोटीस काढण्यात आले.
गैरअर्जदार क्र. 1 यांनी तक्रारीत उपस्थित होऊन त्यांचा अर्जदाराच्या पतीचा अपघात हा दिनांक १०.०५.२००८ रोजी होऊन अर्जदाराचे पती राजू हे मृत्यू पावले व अशा परिस्थितीत 2008 मध्ये घडलेल्या कारणाकरता दिनांक ९.०१.२०१७ रोजी वकिलामार्फत नोटीस पाठवली हे काही ग्राहकवाद करणाकरता काण होऊ शकणार नाही. सदर तक्रार प्राथमिकदृष्ट्या मुदतबाह्य आहे.अर्जदाराचे पतीचे नाव दिनांक १०.०५.२००८ रोजी कोणतीही शेती महाराष्ट्र राज्यात नव्हती. मात्र त्यांच्या मृत्यू झाल्यानंतर २३.०६.२००९ रोजी मयत उर्फ सुरेश राजूचे नाव ७/१२ वर चढवले अशाप्रकारे मृत्यूच्या दिवशी त्यांच्या नावाने कोणती शेतजमीन नव्हती. याबाबत शहानिशा झाल्यावर गैरअर्जदार विमा कंपनीने दिनांक १०.१२.२००९ चे पत्र पाठवून विमा दावा अस्वीकृत केल्याचे अर्जदारास कळवले आहे. अशा परिस्थितीत अर्जदाराने आता १६.०१.२०१८ रोजी तब्बल नऊ वर्षानंतर दाखल केलेला हा दावा पूर्णपणे मुदतबाह्य झालेला आहे. सदर तक्रार प्राथमिकदृष्ट्या खारीज होण्यास पात्र आहे. अर्जदाराने गैर अर्जदाराने पाठवलेले विमा खारीज झाल्याबाबतचे बाबतचे पत्र दिनांक १०.१२.२००९ जाणीवपूर्वक लपवून ठेवलेले आहे. अर्जदाराचा वाद हा पूर्णपणे मुदतबाह्य असून सन 2009 मध्ये अर्जदाराचा विमा खारीज झाल्यानंतर अर्जदाराचा गैरअर्जदार विरुद्ध ग्राहक न्यायालयात दाद मागण्याचा अधिकार नाही. अशा परिस्थितीत विमा पॉलिसी अटी व करारातील तरतुदीनुसार या गैरअर्जदार विमा कंपनीचे नुकसान भरपाई देण्याची जबाबदारी नाही. सबब अर्जदारांचा दावा विमा दावा खारीज होण्यास पात्र आहे.

3.     गैरअर्जदार क्र. २ ह्यांना मंचातर्फे नोटीस प्राप्त होऊनसुद्धा प्रकरणात हजार न राहिल्यामुळे त्यांचे विरुद्ध प्रकरण एकतर्फा चालविण्याचे आदेश दि.३.१.२०१९ रोजी करण्यात आले .

4      तक्रारकर्तीची तक्रार दस्तावेज, पुरावा शपथपत्र, लेखी युक्‍तीवाद व गैरअर्जदार क्र. 1 यांचे लेखी म्‍हणणे, पुरावा शपथपत्र लेखी युक्‍तीवाद तसेच तक्रारकर्ती व वि. प क्र. 2 यांचे तोंडी युक्तिवादावरून तक्रार निकाली कामी खालील मुद्दे कायम करण्‍यात येत आहे.

मुद्दे                                                             निष्‍कर्ष

1. तक्रारकर्तीची तक्रार मुदतीत आहे काय ?                    नाही

 २..  आदेश काय ?                                    आदेशप्रमाणे

कारण मिमांसा

मुद्दा क्र. बाबत

5.     उपरोक्त तक्रारीतील दोन्ही पक्षाचे कथन व दस्तेवज वरून असे दिसून येत कि अर्जदाराचे पतीचा मृतू दि. १०.०५.२००८ रोजी विहिरीच्या पाण्याचा उपसा करताना विषारी वायुमुळे गुदुमुरून  व बुडून झाला. अर्जदार हिच्या पतीचा गैरअर्जदार क्र. १ कडून विमा दावा काढलेला असून अर्जदार हिने लाभार्थी म्हणून विमा दावा मिळण्याकरिता अर्ज २००८ मधेय केला व गैरअर्जदाराच्या उत्तरात नमूद असल्याप्रमाणे दि. १०.०२.२००९ रोजी शहानिशा करून अर्जदार चा पती हा शेतकरी नव्हता या आधारावर खारीज केला. परंतु अर्जदाराचे म्हणणे आहे कि गैर अर्जदारांनी पाठविलेल  दावा नाकारण्याचे पत्र अर्जदाराला मिळाले नाही. सबब अर्जदाराचे तक्रार दाखल करण्याचे कारण सतत घडत आहे. परंतु मंचाच्य मते इखाद्या व्यक्तीने विमा दावा दाखल केल्य्नंतर तो दावा प्राप्त करण्यासाठी ९ ते १० वर्ष वाट पाहणार नाही किवा दावा मिळण्याकरिता तिचे प्रयत्न सतत चालू राहतील. परंतु प्रस्‍तूत प्रकरणात असा कोणताही पत्रव्‍यवहार किंवा पाठपूरावा केल्‍याचे तक्रारकर्तीने कोणताही दस्‍तावेज वा पुरावा दाखल करून सिध्‍द केलेले नाही.  त्‍यामुळे प्रस्‍तूत प्रकरणात दावा दाखल केल्यानंतर फक्त दावा नाकारण्याचे  पत्र गैरअर्जदाराकडून प्राप्त झाले नाही म्हणून तक्रार दाखल करण्याचे कारण सतत घडत आहे हि बाब ग्राह्य धरण्या सारखी नाही . सबब सदर तक्रार मुदतीत नाही हि बाब सिद्ध होत असल्यामुळे मुद्दा क्र. १ चे उत्तर नकारार्थी देण्यात येत आहे.

मुद्दा क्रं. 2 बाबत ः- 

 

6.         मुद्दा क्रं. 1 च्‍या विवेचनावरुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.

अंतीम आदेश

            (1) तक्रारकर्त्‍याची तक्रार क्र.१८/२०१८ खारीज करण्‍यात येते.

            (2) उभय पक्षांनी आपआपला तक्रार खर्च सहन करावा. 

            (3) उभय पक्षांना आदेशाची प्रत तात्‍काळ पाठविण्‍यात यावी .

 

 

(श्रीमती.कल्‍पना जांगडे(कुटे))  (श्रीमती. किर्ती वैदय (गाडगीळ))  (श्री. श्री.अतुल डी. आळशी)                    

       सदस्‍या                                  सदस्‍या                           अध्‍यक्ष 

                  जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, चंद्रपूर.

 
 
[HON'BLE MR. Atul D.Alsi]
PRESIDENT
 
[HON'BLE MRS. Kirti Vaidya Gadgil]
MEMBER
 
[HON'BLE MRS. Kalpana Jangade Kute]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.