Maharashtra

Bhandara

CC/19/63

MANGALABHAI NAMDEV NIWARE - Complainant(s)

Versus

ORIENTAL INSURANCE CO.LTD - Opp.Party(s)

MR. DEVENDRA HATKAR

07 Jul 2020

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM,BHANDARA
Near Akhil Sabhagruha, Ganeshpur Road,Bhandara
 
Complaint Case No. CC/19/63
( Date of Filing : 16 May 2019 )
 
1. MANGALABHAI NAMDEV NIWARE
POST SELOTI TAH LAKHANI
BHANDARA
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. ORIENTAL INSURANCE CO.LTD
TROUGH DIVISIONAL MANAGER DIVISIONAL MANAGER OFFICE NO. 2,8,HINDUSTAN COLONY NEAR AJANI CHOWK WARDHA ROAD
NAGPUR
MAHARASHTRA
2. TAHSHILDAR BHANDARA
TAHSHILDAR OFFICE TAH LAKHANI
BHANDARA
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. NITIN M. GHARDE PRESIDING MEMBER
 HON'BLE MRS. VRUSHALI JAGIRDAR MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
Dated : 07 Jul 2020
Final Order / Judgement

(पारीत व्‍दारा श्री नितीन माणिकराव घरडे, मा.पिठासीन अध्‍यक्ष)

                    (पारीत दिनांक–07 जुलै, 2020)

 

   

01.  तक्रारकर्तीने प्रस्‍तूत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्‍या कलम 12 खाली विरुध्‍दपक्ष क्रं-1 ओरिएंटल इन्‍शुरन्‍स कंपनी लिमिटेड आणि इतर विरुध्‍द शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत तिचे पतीचे अपघाती मृत्‍यू संबधात विमा दाव्‍याची रक्‍कम मिळण्‍यासाठी ग्राहक मंचा समोर दाखल केलेली आहे.

 

02.  तक्रारीचा थोडक्‍यात आशय खालील प्रमाणे-      

      तक्रारकर्ती ही उपरोक्‍त नमुद पत्‍त्‍यावर राहत असून, तिचा पती मृतक श्री नामदेव श्रीराम नेवारे हा व्‍यवसायाने शेतकरी होता व त्‍याचे मालकीची शेती ही मौजा- सेलोटी, तहसिल लाखनी, जिल्‍हा भंडारा, येथे भुमापन क्रं 192 या वर्णनाची होती.    तिने पुढे असे नमुद केले की, तिचे पती नामे श्री नामदेव श्रीराम नेवारे याचा दिनांक-16.03.2008 रोजी पाण्‍यात बुडून अपघाती मृत्‍यु झाला. यातील विरुध्‍दपक्ष क्रं- 1 ही विमा कंपनी आहे तर विरुध्‍दपक्ष क्रं-2) तहसिलदार असून ते महाराष्‍ट्र शासनाचे वतीने शेतक-याचा विमा काढतात व विमा दावा स्विकारुन व आवश्‍यक दस्‍तऐवजाची पुर्तता करुन घेऊन पुढे तो विमा दावा विमा कंपनीकडे दाखल करतात. शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत तिचे पतीचा रुपये-1,00,000/- एवढया रकमेचा विमा विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीकडे काढण्‍यात आला असल्‍याने ती पत्‍नी या नात्‍याने कायदेशीर वारसदार म्‍हणून “लाभार्थी” आहे. पतीच्‍या मृत्‍यू नंतर तिने शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत आवश्‍यक दस्‍तऐवजांसह विरुध्‍दपक्ष क्रं-2 तहसिलदार, तहसिल कार्यालय, लाखनी, जिल्‍हा भंडारा यांचे कार्यालयात विमा दावा प्रस्‍ताव दाखल केला होता. विरुध्‍दपक्षाने ज्‍या दस्‍ताऐवजाची मागणी केली त्‍या दस्‍ताऐवजांची पुर्तता तिने केली होती.

       तिने पुढे असे नमुद केले की, विरुध्‍दपक्ष क्रं. 1 विमा कंपनीला तिचा विमा दावा प्रस्‍ताव आवश्‍यक दस्‍तऐवजांसह प्राप्‍त होवूनही त्‍यांनी विमा दाव्‍या संबधी काहीही तिला विमा दाव्‍या संबधात कळविले नाही आणि ही विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनी तर्फे तिला दिलेली दोषपूर्ण सेवा असून, त्‍यामुळे तिला शारिरीक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. तिने वकीलामार्फत विरुध्‍दपक्षांना कायदेशीर नोटीस दिनांक 15/03/2019 रोजीची पाठविली होती. परंतु सदर नोटीसला विरुध्‍दपक्षाने उत्‍तर दिलेले नाही, म्‍हणून शेवटी तिने प्रस्‍तुत तक्रार विरुध्‍दपक्षां विरुध्‍द ग्राहक मंचासमक्ष दाखल करुन त्‍याव्‍दारे विरुध्‍दपक्षा कडून विमा दाव्‍याची रक्‍कम रुपये-1,00,000/- विमा दावा प्रस्‍ताव सादर केल्‍याच्‍या दिनांकापासून द.सा.द.शे. 18 टक्‍के व्‍याजासह मिळावी तसेच तिला झालेल्‍या मानसिक, शारीरीक व आर्थिक त्रासाबद्दल नुकसान भरपाई रुपये 20,000/- आणि तक्रार खर्च रुपये-10,000/- अशा रकमांची मागणी विरुध्‍दपक्षा विरुध्‍द केली.

03.   विरुध्‍दपक्ष क्रं 1 ओरिएंटल इन्‍शुरन्‍स कंपनी लिमिटेड कंपनीने आपले लेखी उत्‍तर अभिलेखावर पान क्रं 93 ते 97 वर दाखल केले. त्‍यांनी लेखी उत्‍तरामध्‍ये  दोन प्राथमिक  आक्षेप घेतलेत की, त्‍यातील प्रथम आक्षेप असा आहे की, शेतकरी अपघात विमा योजने मध्‍ये महाराष्‍ट्र शासन, विमा कंपनी आणि कबाल इन्‍शुरन्‍स यामध्‍ये दिनांक-28 जुलै, 2008 रोजी जो त्रीपक्षीय करार झालेला आहे, त्‍यानुसार या विमा योजने मध्‍ये कबाल इन्‍शुरन्‍स ही नोडल एजन्‍सी म्‍हणून विमा दाव्‍या संबधी कार्य करते परंतु तक्रारकर्तीने कबाल इन्‍शुरन्‍स कंपनीला सदर प्रकरणात प्रतिपक्ष केलेले नाही. दुसरा प्राथमिक आक्षेप असा आहे की, करारनाम्‍या नुसार विमा योजने संबधी वाद निर्माण झाल्‍यास मुंबई येथील ग्राहक मंचास अधिकारक्षेत्र येते करीता प्रस्‍तुत तक्रार खारीज करण्‍यात यावी.

     विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने पुढे असे नमुद केले की, केवळ सात-बारा उता-यावर नाव असल्‍याने शेतीचा व्‍यवसाय होता असे सिध्‍द होत नाही. तक्रारकर्तीने सर्वप्रथम विमा दावा विरुध्‍दपक्ष क्रं 2 तहसिलदार यांचे कडे केंव्‍हा दाखल केला होता या बाबत तक्रारीत नमुद केलेले नाही. पोलीस दस्‍तऐवजा नुसार तक्रारकर्तीचा पती नामे श्री नामदेव श्रीराम नेवारे याचा अपघाती मृत्‍यू नसून तो कावीळ आजाराने ग्रस्‍त होता आणि पाणी आणताना चक्‍कर येऊन तो पाण्‍यात पडल्‍याने मृत्‍यू झाला होता म्‍हणून तिचा विमा दावा विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने दिनांक-20.11.2009 रोजीचे पत्रान्‍वये नामंजूर केला व त्‍याची लेखी सुचना तक्रारकर्तीसह सर्व संब‍धितांना देण्‍यात आली होती. तक्रारकर्तीची तक्रार मुदतबाहय असल्‍याने ती खारीज होण्‍यास पात्र आहे. तक्रारकर्तीने दिनांक-15 मार्च, 2019 रोजीच्‍या पाठविलेल्‍या नोटीस मध्‍ये कोणतीही विस्‍तृत माहिती दिलेली नसून सदरची नोटीस खोटी असून मा.ग्राहक मंचाची दिशाभूल करणारी आहे. विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने तक्रारकर्तीला कोणतीही दोषपूर्ण सेवा दिलेली नाही, त्‍यामुळे ती कोणतीही नुकसान भरपाई मिळण्‍यास पात्र नाही. तक्रारकर्तीची तक्रार खोटी व नियमबाहय असल्‍याने ती खर्चासह खारीज करण्‍याची विनंती विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनी तर्फे करण्‍यात आली.

04.  विरुध्‍दपक्ष क्रं. 2 तहसिलदार, लाखनी, तहसिल-लाखनी जिल्‍हा भंडारा यांनी आपला लेखी उत्‍तर पान क्रं. 57 वर दाखल केले असुन त्‍यात नमुद केले की, तक्रारकर्तीचा पती श्री. नामदेव श्रीराम नेवारे हा दिनांक 16/03/2008 रोजी शेतातील पाण्‍याच्‍या डबक्‍यात तोल जाऊन पडल्‍याने पाण्‍यात बुडून त्‍याचा मृत्‍यू झाला होता. तक्रारकर्तीने विमा दावा प्रस्‍ताव तहसिल कार्यालय लाखनी येथे दाखल केला होता. सदर विमा दाव्‍याची  तपासणी करुन विमा दावा प्रस्‍ताव आवश्‍यक सर्व कागदपत्रासह कबाल अन्‍शुरन्‍स सर्व्हिसेस प्रा. लि. नागपूर-440010 यांचेकडे त्‍यांचे कार्यालयाचे दिनांक-22.04.2008 रोजीचे पत्रान्‍वये सादर करण्‍यात आला होता. त्‍यानंतर विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीचे दिनांक-21.12.2008 रोजीचे पत्रान्‍वये मृतक श्री नामदेव श्रीराम नेवारे याचे केमीकल अॅनालॉसीसची प्रमाणित प्रत आणि पोलीस फायनल समरी रिपोर्टची मागणी करण्‍यात आली होती, त्‍यानुसार विरुध्‍दपक्ष क्रं 2 तहसिलदार यांनी दिनांक-05.02.2009 रोजी अहवाल सादर केला होता. त्‍यांनी त्‍यांचे कार्य नियमानुसार केलेले आहे. विमा दाव्‍याचे प्रकरण हे विरुध्‍दपक्ष क्रं 1 ओरिएन्‍टल इन्‍शुरन्‍स कंपनी यांचेकडे प्रलंबित असल्‍याचे नमुद केले.

05.  तक्रारकर्तीने तक्रारीचे पृष्‍टयर्थ दस्‍तऐवज यादी पृष्‍ट क्रं- 10 नुसार एकूण-12 दस्‍तऐवजाच्‍या प्रती दाखल केल्‍या असून ज्‍यामध्‍ये शेतकरी जनता अपघात योजना शासन निर्णय, तक्रारकर्तीचे अधिवक्‍ता श्री हटकर यांचे नावे माहिती अधिकारा खाली तहसिलदार लाखनी यांनी दिनांक-07.03.2019 रोजीचे पाठविलेल्‍या पत्राची प्रत, विमा दावा प्रस्‍ताव, 7/12 उतारा व गावनमुना 6-ड व 6-क, मृत्‍यूचे प्रमाणपत्र, वारसान प्रमाणपत्र, शाळा सोडल्‍याचा दाखला, पोलीस दस्‍तऐवज, शव विच्‍छेदन अहवाल, वि.प.क्रं 2 तहसिलदार, लाखनी यांनी विमा कंपनीला दिनांक-05.02.2009 रोजी पाठविलेल्‍या पत्राची प्रत, विरुध्‍दपक्षांना रजिस्‍टर पोस्‍टाने पाठविलेली कायदेशीर नोटीस व रजि. पोस्‍टाच्‍या पावत्‍या व पोच अशा दस्‍तऐवजाच्‍या प्रतीचा समावेश आहे. पृष्‍ट क्रं- 98 ते 100 वर तक्रारकर्तीने शपथेवरील पुरावा दाखल केला असून, पृष्‍ट क्रं-101 ते 103 अनुसार तिने लेखी युक्‍तीवाद दाखल केला. तसेच मा. वरिष्‍ठ न्‍यायालयाचे न्‍यायनिवाडे दाखल केलेत.

06.   विरुध्‍दपक्ष क्रं- 1 विमा कंपनी तर्फे लेखी उत्‍तर अभिलेखावरील पान क्रं-93 ते 97 वर दाखल केले. विरुध्‍दपक्ष क्रं. 1 विमा कंपनीने पृष्‍ट क्रं- 104 वर लेखी पुरसिस दाखल करुन त्‍यांनी लेखी उत्‍तर शपथेवर दाखल केलेले आहे आणि त्‍यामुळे त्‍यांचे लेखी उत्‍तरालाच शपथेवरील पुरावा समजण्‍यात यावा अशी नमुद केले. तसेच पृष्‍ट क्रं- 105 व 106 वर लेखी युक्‍तीवाद दाखल केला. तसेच पृष्‍ट क्रं-107 वरील दस्‍तऐवज यादी नुसार अकस्‍मात मृत्‍यू खबरी, विमा दावा खारीज केल्‍या बाबतचे पत्राची प्रत आणि शेतकरी अपघात विमा योजने बाबत झालेल्‍या त्रीपक्षीय कराराची प्रत दाखल केली.

07.  विरुध्‍दपक्ष क्रं 2 तहसिलदार, लाखनी यांनी पान क्रं 57 वर लेखी उत्‍तर दाखल केले. तसेच पान क्रं-58 वरील दस्‍तऐवज यादी अनुसार विमा दावा प्रस्‍ताव, मृत्‍यू प्रमाणपत्र, शाळा सोडल्‍याचा दाखला, बॅंक पासबुक, निवाडणूक ओळखपत्र, वारसान प्रमाणपत्र, 7/12 उतारा, फेरफार नोंदवही, कबाल इन्‍शुरन्‍स कंपनीचे पत्र, शवविच्‍छेदन अहवाल,  विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीचे दस्‍तऐवज मागणी पत्र, तहसिलदार कार्यालयाने विमा कंपनीचे कार्यालया अनुसार दस्‍तऐवज पाठविल्‍या बाबत पत्राची प्रत अशा दस्‍तऐवजाच्‍या प्रती दाखल केल्‍यात.

08.  तक्रारकर्तीची तक्रार, दाखल केलेले दस्‍तऐवज, शपथेवरील पुरावा, लेखी युक्तिवाद तसेच विरुध्‍दपक्ष क्रं-1) विमा कंपनी तर्फे लेखी उत्‍तर, लेखी युक्‍तीवाद तसेच विरुध्‍दपक्ष क्रं. 2 तहसिलदार यांचे लेखी उत्‍तर व दाखल केलेल्‍या दस्‍तऐवजाचे  ग्राहक मंचा तर्फे अवलोकन करण्‍यात आले. तक्रारकर्ती तर्फे वकील श्री देवेंद्र हटकर आणि विरुध्‍दपक्ष  क्रं. 1 विमा कंपनी तर्फे वकील श्री. एम. ए. चौधरी यांचा मौखीक युक्‍तीवाद ऐकण्‍यात आला, त्‍यावरुन ग्राहक मंचाचा निष्‍कर्ष पुढील प्रमाणे-  

                                                                                              :: निष्‍कर्ष ::

 

09.   तक्रारकर्तीचा पती नामे श्री नामदेव श्रीराम नेवारे  याचे नावाने 7/12 उता-यावरुन मौजा सेलोटी, तहसिल लाखनी जिल्‍हा भंडारा येथे भूमापन क्रं 192 वर्णनाची शेती होती ही बाब सिध्‍द होते. गाव नमुना-6 क वरुन तक्रारकर्तीचा पती नामे श्री नामदेव श्रीराम नेवारे याचा दिनांक-16.03.2008 रोजी मृत्‍यू झाल्‍याने त्‍याचे वारसदार पत्‍नी नामे श्रीमती मंगला नेवारे आणि अज्ञान मुले अमित नामदेव नेवारे आणि शाहील नामदेव नेवारे यांचे नावाची शासकीय अभिलेखात नोंद केल्‍याची बाब सिध्‍द होते. ग्राम पंचायत सेलोटी यांनी दिलेल्‍या मृत्‍यू प्रमाणपत्रावरुन मृतक श्री नामदेव श्रीराम नेवारे याचा दिनांक-16.03.2008 रोजी मृत्‍यू झाल्‍याचे सिध्‍द होते.   तक्रारकर्तीचे पतीचा शेतकरी अपघात विमा योजने मध्‍ये समावेश होता ही बाब विरुध्‍दपक्ष क्रं 2 तहसिलदार, लाखनी यांनी त्‍यांचे उत्‍तरा मध्‍ये मान्‍य केलेली आहे.

10.   तक्रारकर्तीचे पती मृतक श्री नामदेव श्रीराम नेवारे याचा विरुध्‍दपक्ष   क्रं-2 तहसिलदार, लाखनी यांचे मार्फतीने शेतकरी जनता अपघात विमा योजने अंतर्गत विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीकडे विमा काढलेला होता या बाबी प्रकरणातील उपलब्‍ध दस्‍तऐवजांवरुन सिध्‍द होतात.

11.  कबाल इन्‍शुरन्‍स कंपनीला प्रतिपक्ष न केल्‍याचे कारणा वरुन तक्रार खारीज करण्‍या बाबत वि.प.क्रं 1 विमा कंपनीचे आक्षेपा बाबत-

      विरुध्‍द पक्ष क्रं. 1 विमा कंपनीने आपल्‍या लेखी उत्‍तरात दोन प्राथमिक आक्षेप घेतलेत की,  शेतकरी अपघात विमा योजने मध्‍ये महाराष्‍ट्र शासन, विमा कंपनी आणि कबाल इन्‍शुरन्‍स यांचे मध्‍ये जो त्रीपक्षीय करार झालेला आहे, त्‍यानुसार या विमा योजने मध्‍ये कबाल इन्‍शुरन्‍स जी नोडल एजन्‍सी म्‍हणून विमा दाव्‍या संबधी कार्य करते तिला तक्रारकर्तीने सदर प्रकरणात प्रतिपक्ष केलेले नाही.

     या संदर्भात ग्राहक मंचाव्‍दारे स्‍पष्‍ट करण्‍यात येते की, शेतकरी अपघात विमा योजने मध्‍ये महाराष्‍ट्र शासनाचे वतीने तहसिलदार हे मृतक शेतक-याचे विमा दावे आवश्‍यक दस्‍तऐवजासह दाखल करुन घेतात आणि पुढे सदर विमा दावा प्रस्‍ताव आवश्‍यक दस्‍तऐवजांसह कबाल इन्‍शुरन्‍स कंपनीकडे पाठवितात. कबाल इन्‍शुरन्‍स कंपनी ही विमा दाव्‍याची व दस्‍तऐवजाची तपासणी करुन व त्‍यातील त्रृटींची पुर्तता संबधितां कडून तहसिलदार यांचे मार्फतीने करुन घेऊन पुढे तो विमा दावा प्रस्‍ताव आवश्‍यक दस्‍तऐवजांसह विमा कंपनीकडे विमा दाव्‍यावर निर्णय घेण्‍यासाठी पाठविते, एवढीच मर्यादित भूमीका कबाल इन्‍शुरन्‍स कंपनी करते. विमा दाव्‍या संबधी तो मंजूर करावा अथवा नामंजूर करावा याचा निर्णय संबधित विमा कंपनी घेते, त्‍यामुळे कबाल इन्‍शुरन्‍स कंपनीला तक्रारीमध्‍ये प्रतिपक्ष केले किंवा केले नाही यामुळे तक्रारीतील गुणवत्‍तेवर (On Merit)काहीही फरक पडत नाही असे ग्राहक मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे आणि त्‍यामुळे विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीचा प्राथमिक आक्षेप की, कबाल इन्‍शुरन्‍स कंपनीला प्रतिपक्ष केले नसल्‍याने तक्रार खारीज करण्‍यात यावी यामध्‍ये काहीही तथ्‍य दिसून येत नसल्‍याने सदरचा आक्षेप नामंजूर करण्‍यात येतो.

12.  जिल्‍हा ग्राहक न्‍यायमंच, भंडारा यांना प्रस्‍तुत तक्रार चालविण्‍याचे अधिकारक्षेत्र येत नसल्‍याचे कारणा वरुन तक्रार खारीज करण्‍या बाबतचे वि.प.क्रं 1 विमा कंपनीचे आक्षेपा बाबत-

 विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीचा प्राथमिक आक्षेप असा आहे की, करारनाम्‍या नुसार विमा योजने संबधी वाद निर्माण झाल्‍यास मुंबई येथील ग्राहक मंचास अधिकारक्षेत्र येते करीता प्रस्‍तुत तक्रार खारीज करण्‍यात यावी. यातील तक्रारकर्तीचा मृतक पती नामे श्री नामदेव श्रीराम नेवारे याची शेती मौजा सेलोटी, तहसिल लाखनी, जिल्‍हा भंडारा येथे होती आणि त्‍याचा विरुध्‍दपक्ष क्रं 2 तहसिलदार लाखनी यांचे मार्फतीने शेतकरी अपघात विमा योजने मध्‍ये विमा काढलेला होता. महाराष्‍ट्र शासन कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍ध व्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग, मंत्रालय, मुंबई यांचे दिनांक-24 ऑगस्‍ट, 2007 रोजीचे शेतकरी व्‍यक्‍तीगत अपघात विमा योजने प्रमाणे विम्‍याचा कालावधी हा दिनांक-15 ऑगस्‍ट, 2007 ते 14 ऑगस्‍ट, 2008 असा होता. पोलीस दस्‍तऐवज अकस्‍मात मृत्‍यू सुचने प्रमाणे मृतक श्री नामदेव श्रीराम नेवारे याचा मौजा सेलोटी, तालुका लाखनी जिल्‍हा भंडारा येथील शेतामध्‍ये दिनांक-16 मार्च, 2008 रोजी पाण्‍यात पडून मृत्‍यू झाल्‍याचे नमुद आहे. यावरुन मृतकाचा अपघाती मृत्‍यू हा विमा योजनेच्‍या कालावधी मध्‍ये भंडारा जिल्‍हयाचे अधिकारक्षेत्रात झालेला आहे. मृतकाची शेती आणि मृत्‍यूचे ठिकाण हे भंडारा जिल्‍हयामधील असल्‍याने तक्रारीचे कारण हे भंडारा जिल्‍हयात घडलेले आहे आणि त्‍यामुळे ग्राहक संरक्षण कायदयातील तरतुदी नुसार तक्रारीचे कारण भंडारा जिल्‍हयात घडलेले असल्‍याने जिल्‍हा ग्राहक मंच, भंडारा यांना तक्रार चालविण्‍याचे अधिकारक्षेत्र येते. विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीचे तक्रार चालविण्‍याचे अधिकारक्षेत्रा बाबत घेतलेल्‍या आक्षेपात ग्राहक मंचास कोणतेही तथ्‍य आढळून येत नाही.

13.  विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने तक्रारकर्तीने प्रस्‍तुत तक्रार ग्राहक मंचा समोर उशिराने दाखल केल्‍यामुळे तक्रार मुदतबाहय असल्‍याचे आक्षेपा बाबत-

      विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीचे लेखी उत्‍तरा नुसार तक्रारकर्तीचा पती नामे श्री नामदेव श्रीराम नेवारे याचा अपघाती मृत्‍यू नसून तो कावीळ आजाराने ग्रस्‍त होता आणि पाणी आणताना चक्‍कर येऊन तो पाण्‍यात पडल्‍याने मृत्‍यू झाला होता म्‍हणून तिचा विमा दावा विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने दिनांक-20.11.2009 रोजीचे पत्रान्‍वये नामंजूर केला व त्‍याची लेखी सुचना तक्रारकर्तीसह सर्व संब‍धितांना देण्‍यात आली होती. विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने सदर दावा नामंजूरीचे दिनांक-20.11.2009 रोजीचे पत्राची प्रत अभिलेखावर दाखल केली. त्‍यामुळे तक्रारकर्तीची तक्रार मुदतबाहय असल्‍याचे कारणा वरुन खारीज करण्‍यात यावी असा आक्षेप घेतला.

     या संदर्भात ग्राहक मंचा तर्फे नमुद करण्‍यात येते की, विरुध्‍दपक्ष  क्रं 1 विमा कंपनीने  जरी त्‍यांचे लेखी उत्‍तरामध्‍ये त्‍यांनी तक्रारकर्तीला तिचा विमा दावा नामंजूर केल्‍याबाबतचे पत्र पाठविल्‍याचे नमुद केलेले असले तरी सदर विमा दावा नामंजूरीचे पत्र तक्रारकर्तीस मिळाल्‍यासंबंधीची रजिस्‍टर पोस्‍टाची पोच पावती पुराव्‍या दाखल अभिलेखावर दाखल केल्‍याचे दिसून येत नाही, त्‍यामुळे विमा दावा नामंजूरीचे पत्र तक्रारकर्तीस मिळाले अथवा नाही ही बाब स्‍पष्‍ट होत नाही. त्‍यामुळे तक्रारकर्तीचे प्रस्‍तुत तक्रारी मध्‍ये मुदतीची बाधा येत नाही असे ग्राहक मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे

14.  तक्रारकर्तीचे वकीलांनी शेतकरी अपघात विमा योजनेच्‍या प्रकरणात ग्राहक मंचात तक्रार दाखल करण्‍यास जो उशिर झालेला आहे त्‍या संदर्भात खालील मा.वरिष्‍ठ न्‍यायालयाचे निवाडयावर भिस्‍त ठेवली-

Hon’ble State Consumer Dispute Redressal Commission, Mumbai, Circuit Bench at Nagpur, First Appeal No.FA/13/205, Decided on-24/04/2017-“NationalInsurance Company Ltd.-Versus-Smt.Sushilabai Dnyneshwarrao Bobde and others”

सदर अपिलीय प्रकरणातील आदेशा मध्‍ये मा.राज्‍य ग्राहक आयोग यांनी स्‍पष्‍टपणे नमुद केले की, दावा नामंजूरीचे पत्राची प्रत मूळ तक्रारकर्ती (अपिलीय प्रकरणातील उत्‍तरवादी) हिला मिळाल्‍या बाबत रजिस्‍टर पोस्‍टाची पोच पुराव्‍या दाखल केलेली नसल्‍याने तक्रारीमध्‍ये मुदतीची बाधा येत नसून तक्रार दाखल करण्‍यास सतत कारण घडत असल्‍याने नमुद करुन  विमा कंपनीचे अपिल खारीज केले.

                                                                                 *****

 

15.    शेतकरी अपघात विमा योजनेच्‍या प्रकरणात ग्राहक मंचात तक्रार दाखल करण्‍यास जो उशिर झालेला आहे त्‍या संदर्भात ग्राहक मंचा तर्फे खालील मा.वरिष्‍ठ न्‍यायालयाचे निवाडयावर भिस्‍त ठेवण्‍यात येत आहे-

Hon’ble N.C.D.R.C. New-Delhi-Revision Petition No.-1179 of 2015 Decided on-01st December, 2015-“Divisional Manager, Oriential Insurance Company-Versus-Damni & 2 others.

उपरोक्‍त नमुद आदरणीय राष्‍ट्रीय ग्राहक आयोगाचे निवाडयात स्‍पष्‍टपणे नमुद केलेले आहे की, विमा दावा नाकारल्‍याचे दिनांका पासून मुदत सुरु होते. आमचे समोरील प्रकरणात विमा दावा नाकारल्‍याचे पत्र तक्रारकर्त्‍याला दिल्‍या बाबतचा कोणताही पुरावा
विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने दाखल केलेला नसल्‍याने सदर न्‍यायनिवाडा आमचे समोरील प्रकरणात अंशतः लागू होतो असे आमचे मत आहे.

                                                                                   *****

 

16.  तक्रारकर्तीचे वकीलांनी विमा दावा विमा कंपनीकडे विहित मुदतीत सादर न केल्‍याचे आक्षेपा बाबत खालील मा.वरिष्‍ठ न्‍यायालयाचे निवाडयावर आपली भिस्‍त ठेवली-

 

            Hon’ble State Consumer Dispute Redressal Commission, Mumbai, Circuit Bench at Aurangabad, First Appeal        No.FA/495/2013, Decided on-22/02/2013-“Bhagabai Machindra Folane-Versus-ICICI Lombard General Insurance Company Ltd. and other”

 

      मा.राज्‍य ग्राहक आयोग मुंबई खंडपिठ औरंगाबाद यांनी दिलेल्‍या अपिलीय निवाडयाचे आम्‍ही वाचन केले असता मृतकाचे अपघाता संबधाने केलेला सर्वप्र‍थम सादर केलेला विमा दावा हा तहसिलदार यांचेकडे विहित मुदतीत दाखल केल्‍याचे नमुद केलेले आहे. आमचे समोरील हातातील प्रकरणात मृतकाचा मृत्‍यू हा दिनांक-16 मार्च, 2008 रोजी झालेला असून तहसिलदार, लाखनी यांनी तक्रारकर्तीचा विमा दावा त्‍यांचे कार्यालयीन दिनांक-22.04.2008 रोजीचे पत्रान्‍वये कबाल इन्‍शुरन्‍स प्रायव्‍हेट लिमिटेड नागपूर यांना पाठविल्‍याची बाब सदर पत्रावरुन सिध्‍द होत असल्‍याने विमा दावा हा विहित मुदतीत दाखल केल्‍याचे दिसून येते, त्‍यामुळे सदर मा.राज्‍य ग्राहक आयोगाचा निवाडा हातातील प्रकरणात लागू पडतो असे ग्राहक मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे.

                                                                        *****

17.    या शिवाय तक्रारकर्तीचे वकीलांनी खालील नमुद आणखी एका मा.वरिष्‍ठ न्‍यायालयाचे निवाडयावर आपली भिस्‍त ठेवली-

 

      Hon’ble State Consumer Dispute Redressal Commission, Mumbai, Circuit Bench at Nagpur, First Appeal No.FA/16/149, Decided on-20/03/2019-“Tata Aig General Insurance Company Ltd. -Versus-Smt. Asha Gurwant Koche and other”

     

मा.राज्‍य ग्राहक आयोग मुंबई खंडपिठ नागपूर यांनी दिलेल्‍या अपिलीय निवाडयाचे आम्‍ही वाचन केले असता त्‍यामध्‍ये मृतक शेतक-याचे नाव हे शेतकरी अपघात विमा योजना सुरु  झाल्‍याचा दिनांक-01/11/2013 रोजी शासकीय अभिलेखा मध्‍ये नोंदविल्‍या गेले नव्‍हते आणि विमा दावा 90 दिवस उशिराने दाखल केल्‍याचे कारणा वरुन विमा कंपनीने विमा दावा नामंजूर केला होता. जिल्‍हा ग्राहक तक्रार मंच, भंडारा यांनी मूळ तक्रारकर्ती श्रीमती आशा गुणवंत कोचे हीची तक्रार अंशतः मंजूर केली होती, ग्राहक मंचाचे निकाला विरुध्‍द विमा कंपनीने मा.राज्‍य ग्राहक आयोग खंडपिठ नागपूर यांचे समोर सदर अपिल दाखल केले होते. मा.राज्‍य आयोग खंडपिठ नागपूर यांनी विमा कंपनीचे केलेले अपिल फेटाळले. हातातील प्रकरणात मात्र  विरुध्‍दपक्ष विमा कंपनीचा अशा स्‍वरुपाचा विवाद नाही तसेच अशी वस्‍तुस्थिती हातातील प्रकरणात नाही.

18.  विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीचे उत्‍तरा प्रमाणे तक्रारकर्तीचा पती    श्री नामदेव श्रीराम नेवारे हा कावीळ या आजाराने दिर्घ कालावधीपासून ग्रस्‍त असून त्‍याने शेततळयात उडी घेऊन आत्‍महत्‍या केल्‍याने व सदर बाब विम्‍याचे अटी व शर्ती मध्‍ये मोडत नसल्‍याने दावा नामंजूर केल्‍याचे आक्षेपा बाबत-

    विरुध्‍दपक्ष क्रं 1) विमा कंपनीने त्‍यांनी तक्रारकर्तीचा विमा दावा नामंजूर केल्‍या बाबत दिनांक-20.11.2009 रोजीचे पत्राची प्रत अभिलेखावर दाखल केलेली असून सदर विमा दावा नामंजूरीचे पत्र तक्रारकर्तीचे नावे लिहिलेले असून त्‍याची प्रत मे.कबाल इन्‍शुरन्‍स कंपनी नागपूरला दिल्‍याचे त्‍यावरुन दिसून येते. सदर विमा दावा नामंजूरीचे पत्रात मृतक हा दिर्घ कालावधीपासून आजारी असल्‍याची भावना असल्‍याने त्‍याने तळयात उडी मारल्‍याने त्‍याचा मृत्‍यू झाला असून दिर्घ आजाराची बाब विम्‍या मध्‍ये येत नसल्‍याने विमा दावा नामंजूर करण्‍यात येत असल्‍याचे नमुद केल्‍याचे दिसून येते.

    या संदर्भात ग्राहक मंचाव्‍दारे स्‍पष्‍ट करण्‍यात येते की, तक्रारकर्तीच्‍या पतीने शेतातील तळयात उडी मारुन आत्‍महत्‍या केली असल्‍या बाबतचा प्रत्‍यक्षदर्शी (Eye Witness) कोणताही पुरावा ग्राहक मंचासमक्ष आलेला नसल्‍याने विरुध्‍द पक्ष क्रं. 1 विमा कंपनीने घेतलेला आक्षेप नाकारण्‍यात येतो. तसेच पोलीस स्‍टेशन, लाखनी, जिल्‍हा भंडारा यांनी अकस्‍मात मृत्‍यू खबरी मध्‍ये  मृतकास कावीळचा आजार होता व तो अशक्‍त होता. तो पाण्‍याच्‍या खडडयावर हातपाय धुण्‍या करीता गेला असता त्‍याला चक्‍कर येऊन तो पाण्‍यात पडल्‍याने बुडून त्‍याचा मृत्‍यू झाल्‍याचे नमुद आहे. पोलीस दस्‍तऐवजा मध्‍ये मृतक श्री नामदेव श्रीराम नेवारे याने आत्‍महत्‍या केल्‍या बाबत कुठेही उल्‍लेख केलेला नाही. यावरुन मृतकाने आत्‍महत्‍या केल्‍या बाबत कोणताही सक्षम पुरावा विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनी जवळ नसताना चुकीचे कारण दर्शवून तक्रारकर्तीचा अस्‍सल विमा दावा (Genuine Insurance Claim) नामंजूर करुन विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने तक्रारकर्तीला दोषपूर्ण सेवा दिल्‍याची बाब सिध्‍द होते. विरुध्‍दपक्षाचे दोषपूर्ण सेवेमुळे तक्रारकर्तीला निश्‍चीतच शारिरीक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे असे ग्राहक मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे.

 

19.  हातातील तक्रारी मध्‍ये आत्‍महत्‍ये संदर्भात खालील मा.वरिष्‍ठ न्‍यायालयाच्‍या निवाडयांवर ग्राहक मंचाव्‍दारे भिस्‍त ठेवण्‍यात येत आहे-

01)   Hon’ble State Consumer Dispute Redressal Commission, Mumbai, Circuit Bench at Aurangabad, First Appeal No.FA/427/2011, Decided on-21/11/2011-“United India Insurance Company Ltd.-Versus-Smt.Sumanbai Rangrao Mugal and others”

 सदर अपिलीय प्रकरणातील आदेशामध्‍ये मा.राज्‍य ग्राहक आयोग, खंडपिठ औरंगाबाद यांनी स्‍पष्‍टपणे नमुद केलेले आहे की, सदर मृत्‍यू प्रकरणात पोलीसांनी फौजदारी प्रक्रिया संहिते अंतर्गत कलम 174 अनुसार गुन्‍हा नोंदविलेला असून पोलीस चौकशी प्रलंबित आहे. विमा कंपनीने मृतकाने आत्‍महत्‍या केल्‍या बाबत कोणताही पुरावा दाखल केलेला नाही, जेणे करुन ही बाब सिध्‍द होईल की, मृतकाने आत्‍महत्‍या केलेली आहे असे मत नोंदवून ग्राहक मंचाचा निर्णय कायम ठेवला. आमचे समोरील हातातील प्रकरणात सुध्‍दा तक्रारकर्तीचे मृतक पतीने आत्‍महत्‍या केल्‍या बाबत सक्षम असा पुरावा दाखल केलेला नाही. पोलीसांनी नोंदविलेला जाब जबाब हा सक्षम पुरावा होऊ शकत नाही असे अनेक निर्णय मा.वरिष्‍ठ न्‍यायालयांनी वेळोवेळी दिलेले आहेत. त्‍यामुळे सदरचा न्‍यायनिवाडा हातातील प्रकरणास अंशतः लागू पडतो असे ग्राहक मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे.

                                                                                                      *****

  1. Hon’ble State Consumer Dispute Redressal Commission, kerala- First Appeal No.FA/311/2013, Decided on-30/04/2014-“Moothodi Ayathar, S/o Madhavan -Versus-The Commissioner, The Kerala Fishermen’s  Welfare Fund Board and Reliance General Insurance Co.Ltd.”

 

सदर अपिलीय प्रकरणातील आदेशा वरुन अपिल मंजूर केले होते आणि ग्राहक मंचाचा तक्रार खारीज करण्‍याचा आदेश रद्दबातल ठरविला. मृतकाने आत्‍महत्‍या केल्‍या बाबतचा सक्षम पुरावा रिलायन्‍स इन्‍शुरन्‍स कंपनीने दाखल केला नसल्‍याचे नमुद केले.

                                                                                              *****

  1. 2011 (4) CPR-23 (NC) “New India Assurance Co.Ltd.-Versus-M.S.Vyakatesh Babu”.

 

     सदर मा.राष्‍ट्रीय ग्राहक आयोगाचे निवाडयामध्‍ये “FIR as also the statements recorded by police cannot be used by Insurance Company in support of its case”  पोलीसांनी नोंदविलेल्‍या एफआयआरचा उपयोग विमा कंपनीला होणार नाही असे मत नोंदविलेले आहे.

                                                                                             *****

  1. 2007 (3) CPR 142 -“New India Assurance Co.Ltd.-Versus-Hausabai Pannalal Dhoka”

            सदर प्रकरणात मा.राज्‍य ग्राहक आयोग, मुंबई यांनी असे नमुद केले की,  पोलीसानीं गुन्‍हयाचे प्रकरणात नोंदविलेला जबाब हा पुरावा म्‍हणून ग्राहय धरता येणार नाही जो पर्यंत ग्राहक मंचा तर्फे जबाब देणा-याची साक्ष घेतल्‍या जात नाही असे मत नोंदविले.

                                                                                               *****     

  1. Hon’ble State Commmission, Punjab, Chandigarh-FA No-1406/2006, decided on-10/06/2011-“ National Insurance Company Ltd.-Versus- Gurmail Kaur”

                                                                                                      *****

  1. Hon’ble State Commmission, Mumbai-Compalint Case No.-CC/326/2001, decided on-20/10/2011-“Smt. Mangal Ramesh Sontakke-Versus-National Insurance Company Ltd.”.

                                                                                                     *****

 

  1. Hon’ble State Commmission, Circuit Bench Nagpur-FA No-205/2013, decided on-24/04/2017-“National Insurance Company-Versus-Smt. Sushila Dnyneshwarrao Bobade & others”

       उपरोक्‍त नमुद मा.वरिष्‍ठ न्‍यायालयांचे न्‍यायनिवाडयांचे आम्‍ही काळजीपूर्वक अवलोकन केले, त्‍यामध्‍ये केवळ पोलीसांचे दसतऐवजांचे आधारावरुन आत्‍महत्‍या केली असा निष्‍कर्ष काढता येत नाही त्‍यासाठी सक्षम असा पुरावा (Substantial  Evidence ) समोर येणे आवश्‍यक असल्‍याचे मत नोंदविलेले आहे. उपरोक्‍त नमुद मा.वरिष्‍ठ न्‍यायालयांचे न्‍यायनिवाडे हातातील प्रकरणात अंशतः लागू पडतात असे ग्राहक मंचाचे मत आहे.

20.  शेतकरी अपघात विमा योजने संदर्भात महाराष्‍ट्र शासन, कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍ध व्‍यवसाय विकास व मत्‍स्‍य व्‍यवसाय विभाग, मंत्रालय मुंबई यांचे दिनांक-24 ऑगस्‍ट 2007 रोजीचे परिपत्रकानुसार विमा दावा विमा कंपनीकडे सादर झाल्‍यापासून त्‍यावर 30 दिवसांच्‍या आत कार्यवाही करणे विमा कंपनीवर बंधनकारक राहिल असे स्‍पष्‍टपणे नमुद केलेले आहे. ग्राम पंचायत सेलोटी, पंचायत समिती लाखनी, जिल्‍हा भंडारा यांचेव्‍दारा निर्गमित मृत्‍यू प्रमाणपत्रा वरुन तक्रारकर्तीचा पती श्री नामदेव श्रीराम नेवारे याचा मृत्‍यू दिनांक-16 मार्च, 2008 रोजी झाल्‍याचे दिसून येते. हातातील प्रकरणात विरुध्‍दपक्ष क्रं 2 तहसिलदार तहसिल कार्यालय, लाखनी, तालुका लाखनी, जिल्‍हा भंडारा यांनी दिनांक 22/04/2008 रोजीचे पत्रान्‍वये मे. कबाल इंशुरन्‍स सर्व्‍हीसेस यांना तक्रारकर्तीचा विमा दावा प्रस्‍ताव पाठविलेला आहे, सदर तहसिलदार यांचे पत्राची प्रत अभिलेखावर दाखल आहे. यावरुन असे दिसून येते की, तक्रारकर्तीने तिचे पतीचे मृत्‍यू नंतर केवळ एका महिन्‍यातच विमा दावा प्रस्‍ताव आवश्‍यक दस्‍तऐवजासह तहसिलदार यांचे कार्यालयात सादर केला होता व तहसिलदारांनी सुध्‍दा दिनांक-22.04.2008 रोजी विमा दावा प्रस्‍ताव आवश्‍यक दस्‍तऐवजांसह कबाल इन्‍शुरन्‍स सर्व्‍हीसेस प्रायव्‍हेट लिमिटेड नागपूर यांचेकडे पाठविलेला आहे.

21.  तक्रारकर्तीचा पती नामे श्री नामदेव श्रीराम नेवारे याचे नावाने असलेल्‍या 7/12 चे उता-यावरुन मौजा सेलोटी, तहसिल लाखनी जिल्‍हा भंडारा येथे भूमापन क्रं 192 वर्णनाची शेती होती ही बाब सिध्‍द होते. गाव नमुना-6 क वरुन तक्रारकर्तीचा पती नामे श्री नामदेव श्रीराम नेवारे याचा दिनांक-16.03.2008 रोजी मृत्‍यू झाल्‍याने त्‍याचे वारसदार पत्‍नी नामे श्रीमती मंगला नेवारे आणि अज्ञान मुले अमित नामदेव नेवारे आणि शाहील नामदेव नेवारे यांचे नावाची शासकीय अभिलेखात नोंद केल्‍याची बाब सिध्‍द होते.

22.  तक्रारकर्तीचा विमा दावा  विरुध्‍दपक्ष क्रं 1 ओरिएन्‍टल इन्‍शुरन्‍स कंपनीने त्‍यांचे दिनांक 20/11/2009 रोजीचे पत्र तिचे नावाने पाठवून नामंजूर करण्‍यात केला होता व सदर पत्राची प्रत मे. कबाल इन्‍शुरन्‍स सर्व्हिसेस प्रा. लि. यांना दिल्‍याचे सदर पत्रावरुन दिसून येते. परंतु सदर विमा दावा नामंजूरीचे पत्राची प्रत तक्रारकर्तीला रजिस्‍टर पोस्‍टाने पाठविल्‍या बाबत रजि. पोस्‍टाची पावती व रजि. पोच विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने पुराव्‍या दाखल सादर केलेली नाही. तक्रारकर्तीने प्रस्‍तुत तक्रार ग्राहक मंचा समक्ष दिनांक-16 मे, 2019 रोजी दाखल केली परंतु वर नमुद केल्‍या प्रमाणे विमा दावा नामंजूरीचे पत्राची प्रत तिला मिळाल्‍या बद्दलचा कोणताही पुरावा अभिलेखावर दाखल केलेला नाही, त्‍यामुळे जो पर्यंत तिला विमा दाव्‍याचे मंजूरी/नामंजूरी बाबत कळविण्‍यात येत नाही तो पर्यंत तक्रारीचे कारण हे सतत घडत (Cause of Action is continuing) असे असे ग्राहक मंचाचे मत आहे. दुसरी बाब अशी आहे की, विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने दिनांक-20.11.2009 रोजीचे विमा दावा नामंजूरीचे पत्रात मृतक श्री नामदेव श्रीराम नेवारे याने शेतातील तळयात उडी मारुन आत्‍महत्‍या केल्‍या बाबत जो निष्‍कर्ष काढला, त्‍या संबधाने कोणताही सक्षम पुरावा (Substantial Evidence), प्रत्‍यक्षदर्शी साक्षीदाराचा जबाब (Statement of Eye Witness) दाखल केलेला नाही. तसेच पोलीस दस्‍तऐवजा मध्‍ये सुध्‍दा मृतक श्री नामदेव श्रीराम नेवारे याने आत्‍महत्‍या केल्‍या बाबत कोणताही उल्‍लेख नाही असे असताना विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने मृतकाने आत्‍महत्‍या केल्‍यामुळे विमा दाव्‍याची रक्‍कम देय होत नाही असा जो निष्‍कर्ष काढला तो निष्‍कर्ष योग्‍य अशा सक्षम पुराव्‍याचे अभावी नामंजूर करण्‍यात येतो. तक्रारकर्तीला तिचे पतीचे मृत्‍यू पःश्‍चात देय विमा दाव्‍याची रक्‍कम नामंजूर करुन विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने दोषपूर्ण सेवा दिल्‍याची बाब सिध्‍द होते आणि त्‍यामुळे तिला निश्‍चीतच शारिरीक व मानसिक त्रास झालेला आहे.

23.   उपरोक्‍त नमुद वस्‍तुस्थितीचा विचार करता तक्रारकर्तीला तिचे पतीचे अपघाती मृत्‍यू संबधात विमा दाव्‍याची रक्‍कम रुपये-1,00,000/- विरुध्‍दपक्ष क्रं 1) विमा कंपनी कडून विमा दावा प्रस्‍ताव नाकारल्‍याचा दिनांक-20.11.2009 पासून ते रकमेच्‍या प्रत्‍यक्ष्‍य अदायगी पावेतो द.सा.द.शे.-9% दराने व्‍याजासह मंजूर करणे योग्‍य व न्‍यायोचित होईल. या शिवाय विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीचे दोषपूर्ण सेवेमुळे तिला झालेल्‍या मानसिक व शारिरीक त्रासाबद्दल नुकसान भरपाई रुपये-10,000/-(अक्षरी रुपये दहा हजार फक्‍त) आणि तक्रारीचा खर्च रुपये-5,000/-(अक्षरी रुपये पाच हजार फक्‍त)  विरुध्‍दपक्ष क्रं- 1 विमा कंपनीकडून तक्रारकर्तीला मंजूर करणे योग्‍य व न्‍यायोचित आहे, असे ग्राहक मंचाचे मत आहे. विरुध्‍दपक्ष क्रं-(2) तहसिलदार, लाखनी, तालुका-लाखनी जिल्‍हा भंडारा यांनी कोणतीही दोषपूर्ण सेवा तक्रारकर्तीला दिल्‍याचे दिसून येत नाही वा तसे तिचे म्‍हणणे सुध्‍दा नाही त्‍यामुळे त्‍यांचे विरुध्‍दची तक्रार खारीज होण्‍यास पात्र आहे असे ग्राहक मंचाचे मत आहे, त्‍यावरुन ग्राहक मंचाव्‍दारे हातातील तक्रारीत खालील प्रमाणे आदेश पारीत करण्‍यात येत आहे.

                                                                                   :: अंतिम आदेश ::

 

(01)  तक्रारकर्तीची तक्रार, विरुध्‍दपक्ष क्रं 1 ओरिएन्‍टल इन्‍शुरन्‍स कंपनी लिमिटेड तर्फे विभागीय व्‍यवस्‍थापक, विभागीय कार्यालय, नागपूर यांचे विरुध्‍द  खालील प्रमाणे अंशतः मंजूर करण्‍यात येते.

(02) विरुध्‍दपक्ष 1 विमा कंपनीला आदेशित करण्‍यात येते की, त्‍यांनी तक्रारकर्तीला तिचे पतीचे अपघाती मृत्‍यू संबधाने शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत देय विमा रक्‍कम रुपये-1,00,000/- (अक्षरी रुपये एक लक्ष फक्‍त) अदा करावी आणि सदर रकमेवर दिनांक-20.11.2009 पासून ते रकमेच्‍या प्रत्‍यक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे.-9% दराने व्‍याज तक्रारकर्तीला अदा करावे.

(03) विरुध्‍दपक्ष क्रं. 1 विमा कंपनीचे दोषपूर्ण सेवेमुळे तक्रारकर्तीला झालेल्‍या  मानसिक व शारिरीक त्रासाबद्दल नुकसान भरपाई रुपये-10,000/-(अक्षरी रुपये दहा हजार फक्‍त) आणि तक्रारीचा खर्च रुपये-5000/-(अक्षरी रुपये पाच हजार फक्‍त) विरुध्‍दपक्ष क्रं- 1 विमा कंपनीने तक्रारकर्तीला अदा करावेत.

(04)  विरुध्‍दपक्ष -(2) तहसिदार, लाखनी, तहसिल कार्यालय, लाखनी जिल्‍हा भंडारा यांचे विरुध्‍दची तक्रार खारीज करण्‍यात येते.

(05) सदर आदेशाचे अनुपालन विरुध्‍दपक्ष क्रं-1 विमा कंपनीने प्रस्‍तुत निकालपत्राची प्रथम प्रमाणित प्रत प्राप्‍त झाल्‍याचे दिनांकापासून 30 दिवसांचे आत करावे. विहित मुदतीत सदर अंतिम आदेशाचे अनुपालन विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने न केल्‍यास अंतिम आदेशातील मुद्दा क्रं-(02) मध्‍ये नमुद केलेली देय विमा राशी मुदतीनंतर पासून ते रकमेच्‍या प्रत्‍यक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे.-12% दराने दंडनीय व्‍याजासह तक्रारकर्तीला देण्‍यास विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनी जबाबदार राहिल.

(06) निकालपत्राच्‍या प्रमाणित प्रती सर्व पक्षकारानां निःशुल्‍क उपलब्‍ध    करुन देण्‍यात याव्‍यात.

(07)  तक्रारकर्तीला “ब” व “क” फाईल्‍स परत करण्‍यात याव्‍यात.

 

 

 
 
[HON'BLE MR. NITIN M. GHARDE]
PRESIDING MEMBER
 
 
[HON'BLE MRS. VRUSHALI JAGIRDAR]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.