Complaint Case No. CC/175/2018 | ( Date of Filing : 20 Feb 2018 ) |
| | 1. SHRI. SANJAYSINGH VINODKUMAR SINGH | R/O. H.P.R. OFFICE, TELEPHONE EXCHANGE CHOWK, C.A. ROAD, NAGPUR | NAGPUR | MAHARASHTRA |
| ...........Complainant(s) | |
Versus | 1. NATIONAL INSURANCE CO. LTD. | GIJRE BHAVAN, HOUSE NO. 402, PLOT NO. 13, SOUTH AMBAZARI ROAD, LAXMINAGAR, NAGPUR-440022 | NAGPUR | MAHARASHTRA |
| ............Opp.Party(s) |
|
|
Final Order / Judgement | आदेश मा. सदस्य, श्री. सुभाष रा. आजने यांच्या आदेशान्वये – - तक्रारकर्त्याने प्रस्तुत तक्रार ग्राहक संरक्षण कायद्याच्या कलम 12 अंतर्गत दाखल केली असून त्यात असे नमूद केले की, त्याने विरुध्द पक्षाकडून त्याचे वाहन ट्रक क्रमांक एम.एच.28 एच. 1339 चा विमा दिनांक 30.05.2013 ते 29.05.2014 या कालावधीकरिता पॉलिसी क्रं. 282200/31/13/6300001157 अन्वये रुपये 3,87,644/- एवढया किंमतीचा विमा उतरविला होता. तक्रारकर्त्याच्या वाहनाचा दि. 23.08.2013 रोजी दिल्ली ते आगरा जात असतांना राजा धाबा, जि. सागर, मध्यप्रदेश येथे रात्री 11.30 वाजता अपघात झाला व याबाबतची तक्रार देवास पोलिस स्टेशन जि. सागर, मध्यप्रदेश येथे अपराध क्रं. 301/13 द्वारे नोंदविली. तसेच तक्रारकर्त्याने सदर घटनेची सूचना त्वरित विरुध्द पक्षाला टोल फ्री क्रमांकावर दिली. विरुध्द पक्षाने अपघाताचे कारण शोधण्याकरिता सर्व्हेअरची नियुक्ती केली व सर्वेअरने अपघातग्रस्त वाहनाची पाहणी करुन सर्व बाजूने फोटो घेतले व तक्रारकर्त्याला क्षतिग्रस्त वाहन पुढील कार्यवाहीकरिता सर्विस स्टेशनला नेण्यास सांगितले. सर्वेअरने अपघाताबाबत कुठलाही संशय नसल्याचा अहवाल विरुध्द पक्ष 1 कडे दिला. त्यानंतर तक्रारकर्त्याने क्षतिग्रस्त वाहनाचे टोचन करुन मे. गिरनार, हिंगणा, एम.आय.डी.सी.नागपूर येथे वाहन नेले. त्यानंतर तक्रारकर्त्याने सदर वाहनाच्या दुरुस्तीचे इस्टीमेट तसेच वाहनाचे आवश्यक दस्तऐवज विरुध्द पक्षाला देऊन अंतिम निर्णयासाठी परत सर्वेअर नेमण्यास सांगितले. विरुध्द पक्षाने परत सर्वेअरची नियुक्ती केली. त्याप्रमाणे सर्वेअरने अधिकृत सर्विस स्टेशन मे. गिरनार हिंगणा, एम.आय.डी.सी.नागपूर येथे भेट देऊन वाहनाचे फोटोग्राफ घेऊन व अधिकृत गॅरेजच्या इंजिनिअर सोबत चर्चा करुन अपघातग्रस्त वाहन रिपेअर करण्यास सांगितले. तक्रारकर्त्याने सदरच्या वाहनाच्या दुरुस्ती करिता स्वतः रुपये 2,50,000/- खर्च करुन वाहन दुरुस्त केले.
- तक्रारकर्त्याने पुढे असे नमूद केले की, दि. 23.08.2013 रोजी विरुध्द पक्षाकडे विमा दावा प्रस्ताव सादर केला होता. त्यांनतर सदर दाव्याबाबत वारंवार विरुध्द पक्षाकडे विचारणा केली, परंतु प्रत्येक वेळेस लवकर निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन दिले. परंतु तक्रारकर्त्याचा विमा दावा मंजूर अथवा नामंजूर केला नाही. त्यामुळे तक्रारकर्त्याने दि. 04.09.2017 ला विरुध्द पक्षाला कायदेशीर नोटीस पाठविली. सदरची नोटीस प्राप्त होऊन ही विरुध्द पक्षाने त्याची दखल घेतली नाही. म्हणून तक्रारकर्त्याने प्रस्तुत तक्रार मंचासमक्ष दाखल करुन मागणी केली की, तक्रारकर्त्याला त्याच्या वाहनाचे विमा संरक्षण मुल्य रुपये 2,50,000/- विमा दावा दाखल केल्याच्या तारखेपासून म्हणजे दि. 23.08.2013 पासून व्याजासह देण्याचा आदेश द्यावा. तसेच शारीरिक, मानसिक त्रासाकरिता नुकसानभरपाई व तक्रारीचा खर्च देण्याचा आदेश द्यावा अशी विनंती केली आहे.
- विरुध्द पक्षाने आपला लेखी जबाबात नमूद केले की, तक्रारकर्त्याचा ट्रक क्रं. एम.एच. 28 एच.1339 चा विमा दिनांक 30.05.2013 ते 29.05.2014 या कालावधीकरिता पॉलिसी क्रं. 282200/31/13/6300001157 अन्वये रुपये 3,87,644/- एवढया किंमतीचा विमा उतरविला होता व सदरच्या ट्रकचा राजा धाबा जि. सागर, मध्यप्रदेश येथे अपघात झाला होता याबाबतची माहिती मिळताच विरुध्द पक्षाने सर्वेअरची नियुक्ती केली व सर्वेअरला अहवाल सादर करण्याबाबत कळविले होते. तक्रारकर्त्याने विमा मागणी निकाली काढण्याकरिता दि. 04.09.2017 ला नोटीस पाठविली होती. परंतु विमाधारकाचा विमा दावा हा दि. 05.03.2014 रोजीच्या पत्रान्वये वाहन चालकाजवळ अपघाताच्या दिवशी विहित वाहन परवाना नव्हता या कारणास्तव विमा दावा नाकारण्यात आला. तसेच तक्रारकर्त्याने सदरची तक्रार ग्राहक संरक्षण कायद्याच्या कलम 24 (A)नुसार तक्रारीचे कारण घडल्यापासून 2 वर्षाच्या आत दाखल करावयास पाहिजे होती. तक्रारकर्त्याची विमा मागणी ही दि. 05.03.2014 च पत्रान्वये नाकारण्यात आली आणि सदर तक्रार दि. 05.04.2016 ला दाखल करण्यात आली. सदरची तक्रार ही विमा दावा नाकारल्यापासून 3 वर्षानंतर दाखल करण्यात आली. त्यामुळे तक्रारकर्त्याची तक्रार मुदतबाहय असल्याने खारीज करण्यात यावी अशी विनंती केली आहे.
- विरुध्द पक्षाने पुढे आपल्या विशेष कथनात असे नमूद केले की, वाहन अपघाताची माहिती प्राप्त झाल्यानंतर सरबजीत सिंग तुली याची सर्वेअर म्हणून नियुक्ती केली. त्याप्रमाणे सर्वेअरने तपासणी केली व दि. 05.10.2013 रोजी अहवाल सादर केला व त्यात वाहनाचे रुपये 1,25,000/- चे नुकसान झाल्याचे नमूद केले. परंतु वाहनाच्या अपघाताच्या दिवशी तक्रारकर्त्याचे वाहन बाल मुकुंद हा चालवित होता आणि त्याच्या जवळ अधिकृत परवाना नव्हता. तक्रारकर्त्याने विमा दावा प्रस्ताव सादर करतांना श्री. बाल मुकुंद बघेल हा विमाकृत वाहन चालवित असल्याचे नमूद केले आणि वाहन सर्वेअरने वाहन चालक बाल मुकुंद याच्या वाहन परवान्याची तपासणी केली असता, वाहन चालकाचा वाहन परवाना नं. बरोबर न जुळल्याने विरुध्द पक्षाने दि. 24.01.2014 रोजीच्या पत्रान्वये एम.पी.गोस्वामी यांची चौकशी अधिकारी म्हणून नेमणूक करुन विभागीय परिवहन अधिकारी आगरा यांच्याकडून परवान्याबाबतची माहितीची चौकशी केली असता, असे लक्षात आले की, तक्रारकर्त्याने विमा प्रस्तावामध्ये नमूद केलेला वाहन परवाना क्रं. हा त्यांचे वाहन चालक बाल मुकुंदचा नसून तो प्रत्यक्षात एम.एल. राणा यांना देण्यात आला आहे. त्यानुसार विरुध्द पक्षाने दि. 13.03.2013 रोजी तक्रारकर्त्याला सदरची बाब कळविली व वाहन चालक, श्री. बाल मुकुंद याच्याजवळ अपघाताच्या दिवशी अधिकृत वाहन परवाना नव्हता याबाबत स्पष्टीकरण मागितले व यावर तक्रारकर्त्याने आपले स्पष्टीकरण दिले नाही तर तक्रारकर्त्याची विमा मागणी फाईल बंद करण्यात येईल असे कळविले होते. विरुध्द पक्षाने पाठविलेल्या पत्राला तक्रारकर्त्याने उत्तर दिले नाही. तक्रारकर्त्याने विमा पॉलिसीतील शर्तीचे उल्लंघन केल्यामुळे विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याचा विमा दावा नाकारला असल्याचे नमूद केले.
- उभय पक्षांनी दाखल केलेले दस्तऐवज, लेखी युक्तिवाद व त्यांच्या वकिलांनी केलेला तोंडी युक्तिवाद ऐकून घेतल्यावर मंचाने खालील मुद्दे विचारार्थ घेऊन त्यावरील निष्कर्ष खालीलप्रमाणे नोंदविले.
अ.क्र. मुद्दे उत्तर 1 प्रस्तुत तक्रार विहित मुदतीत दाखल केली काय ?होय - विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याला दोषपूर्ण सेवा दिली काय ?होय
- काय आदेश ? अंतिम आदेशानुसार
- मुद्दा क्रमांक 1 व 2 बाबत – तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाकडून त्याचे वाहन ट्रक क्रमांक एम.एच.28 एच. 1339 चा विमा दिनांक 30.05.2013 ते 29.05.2014 या कालावधीकरिता पॉलिसी क्रं. 282200/31/13/6300001157 अन्वये रुपये 3,87,644/- एवढया किंमतीचा विमा उतरविला होता याबाबत उभय पक्षात वाद नाही. तक्रारकर्त्याच्या वाहनाचा दि. 23.08.2013 रोजी रात्री 11.30 वाजता दिल्ली ते आगरा जात असतांना राजा धाबा, जि. सागर, मध्यप्रदेश येथे विमा कालावधीत वाहनाचा अपघात झाला व अपघाताच्या वेळी वाहन चालक बालमुकुंद बघेल याच्याजवळ विहित वाहन परवाना नव्हता, या कारणाने विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याचा विमा दावा दि. 05.03.2014 च्या पत्रान्वये नाकारला होता. तसेच तक्रारकर्त्याने विमा दावा मागणी प्रस्तावा सोबत पाठविलेला वाहन परवाना हा बाल मुकुंद याचा नसून तो एम.एल.राणा चा असल्याबाबतचे तक्रारकर्त्याला दि. 05.03.2014 च्या पत्रान्वये कळविले होते व याबाबतचे विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याला स्पष्टीकरण मागितले असतांना तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाला दिनांक 05.03.2014 च्या पत्राच्या अनुषंगाने आपले स्पष्टीकरण रजिस्टर्ड पोस्टाने दि. 04.07.2014 ला विरुध्द पक्षाकडे पाठविले असून ते दि. 07.07.2014 ला विरुध्द पक्षाला प्राप्त झाले असल्याबाबतची पोच पावती नि.क्रं. 2(4) वर दाखल केली आहे. त्यानंतर ही विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याचा विमा दावा मंजूर अथवा नामंजूर केल्याबाबतचे कोणतेही पत्र तक्रारकर्त्याला न पाठविल्यामुळे तक्रारीस कारण सतत घडत असल्याच्या कारणाने तक्रारकर्त्याने प्रस्तुत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 2019 च्या कलम 69 (1) अंतर्गत मंचासमक्ष विहित मुदतीत दाखल केली असे मंचाचे स्पष्ट मत आहे.
- तसेच वाहन चालक बाल मुकुंद यांच्याकडे अपघाताच्या दिवशी वैध वाहन परवाना असल्याचे तक्रारकर्त्याने प्रतिज्ञालेखावर दाखल केलेल्या तक्रारी सोबत जोडलेल्या नि.क्रं.2(3) वरील दस्तावेजावरुन स्पष्ट होते. त्यामुळे विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याचा विमा दावा नाकारुन सेवेत त्रुटी केली असल्याचे मंचाचे स्पष्ट आहे.
- विरुध्द पक्षाच्या सर्वेअरने तक्रारकर्त्याच्या क्षतिग्रस्त वाहनाची तपासणी करुन तक्रारकर्त्याच्या वाहनाचे रुपये 1,25,000/- चे नुकसान झाले असल्याचा अहवाल सादर केला आहे व त्याबाबत तक्रारकर्त्याने त्याचे प्रतिउत्तरात, लेखी युक्तिवादा द्वारे आक्षेप नोंदविला नाही. त्यामुळे विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याचे क्षतिग्रस्त वाहनाचे दुरुस्तीपोटी रुपये 1,25,000/- अदा करावे असे मंचाचे स्पष्ट मत आहे.
सबब खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित. अंतिम आदेश - तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर.
- विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याला त्याच्या क्षतिग्रस्त वाहनाच्या नुकसानी पोटी विमा रक्कम रुपये 1,25,000/- द्यावे व सदरच्या रक्कमेवर विमा दावा नाकारल्याच्या तारखेपासून म्हणजेच दि.05.03.2014 पासून ते रक्कमेच्या प्रत्यक्ष अदायगीपर्यंत द.सा.द.शे. 7 टक्के दराने व्याजसह रक्कम तक्रारकर्त्याला अदा करावी.
- विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याला झालेल्या शारीरिक, मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई म्हणून रुपये 20,000/- व तक्रारीचा खर्च म्हणून रुपये 10,000/- द्यावे.
- वरील आदेशाची पूर्तता आदेशाची प्रत प्राप्त झाल्याच्या तारखेपासून 30 दिवसाच्या आंत विरुध्द पक्षाने करावी.
- उभय पक्षांना आदेशाची प्रथम प्रत निःशुल्क द्यावी.
- तक्रारकर्त्याला तक्रारीची ब व क प्रत परत करावी.
| |