जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 2009/155. प्रकरण दाखल तारीख - 09/07/2009 प्रकरण निकाल तारीख – 30/09/2009 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे, पाटील - अध्यक्ष मा.श्री.सतीश सामते - सदस्य मा.श्रीमती सुजाता पाटणकर - सदस्या बालाजी नारायणराव येरावार वय, 46 वर्षे, धंदा शेती रा.मोंढा उमरी ता. उमरी जि.नांदेड अर्जदार विरुध्द. 1. शाखाधिकारी, दि. नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. शाखा उमरी ता. उमरी जि. नांदेड गैरअर्जदार. 2. दि. नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. नांदेड मूख्य शाखा, शिवाजी पूतळयाजवळ,नांदेड 3. आर.बी.आय.मुंबई. अर्जदारा तर्फे वकील - अड. एस.के.दागडिया. गैरअर्जदार क्र. 1 व 2 तर्फे वकील - अड.एस.डी.भोसले. गैरअर्जदार क्र. 3 तर्फे - स्वतः निकालपञ (द्वारा - मा.श्रीमती सुजाता पाटणकर, सदस्या ) गैरअर्जदार नांदेड जिल्हा सहकारी बँक यांचे सेवेतील ञूटी बददल अर्जदार यांनी खालील प्रमाणे तक्रार दाखल केली आहे. अर्जदार यांनी गैरअर्जदार क्र.1 बँकेकडे बचत खाते क्र.45/31 खाते उघडले. अर्जदार हा शेतकरी असून शेतीमधून आलेलया उत्पन्नाची रक्कम बचत खात्यात ठेवीत होता. अर्जदाराच्या मूलीचे लग्न दि.25.11.2008 रोजी झाले व लग्नासाठी पैशाची आवश्यकता असल्यामूळे त्यांनी गैरअर्जदार क्र.1 बॅकेकडे रक्कमेची मागणी केली. परंतु अर्जदाराला बँक वेळेवर पैसे देऊ शकली नाही त्यामूळे त्यांना नातेवाईकाकडून उसने पैसे घेऊन मूलीचे लग्न करावे लागले. तसेच अर्जदाराची पत्नी गर्भाशयाच्या आराजाने आजारी आहे. त्यामूळे त्यांला रक्कमेची आवश्यकता आहे. तिच्या ऑपरेशनसाठी डॉक्टरानी रु.1,00,000/- खर्च येईल असे सांगितले आहे. तसेच मूलगी आश्वीनी हि दि.18.05.2009 रोजी प्रसूतीसाठी आलेली असल्यामूळे तिचा खर्च रु.34,250/- येईल. वेळोवेळी मागणी करुन गैरअर्जदार बॅकेने अर्जदाराची रक्कम दिली नाही. दि.1.7.2009 रोजी व दि.8.6.2009 रोजी रक्कमेची मागणी केली पण गैरअर्जदाराने रक्कम दिली नाही.त्यामूळे अर्जदाराची मागणी आहे की त्यांना नूकसान भरपाई रु.3,43,000/-व त्यावर दि.17.03.2009 पासून रक्कम वसूल होईलपर्यत 18 टक्के व्याज मिळावे, नोंदणीचा खर्च रु.500/- मानसिक ञासापोटी रु.25,000/- व दावा खर्च रु.3000/- मिळावेत अशी मागणी केली आहे. गैरअर्जदार क्र. 1 व 2 हे वकिलामार्फत हजर झाले त्यांनी आपले लेखी म्हणणे मांडले आहे. त्यांना हे मान्य केले आहे की, अर्जदाराचे रु.2,92,862/-/- जमा आहेत. पैसे परत देत नाहीत व व्याजही देत नाहीत हे म्हणणे खोटे आहे. गैरअर्जदार बँकेवर आर.बी.आय. ने दि.20.10.2005 रोजी 35 अ कलम लाऊन आर्थिक निर्बध घातले आहेत. त्यामूळे बँक रु.1000/- पेक्षा जास्त रक्कम देऊ शकत नाही. अर्जदाराला दि.17.03.2009 रोजी रु.50,000/- हार्डशिप गाऊडवर रक्कम दिलेली आहे. परत त्यांनी दि.9.7.2009 रोजी हार्डशिप गाऊडवर केलेला अर्ज आर.बी. आय.कडे पाठविलेला आहे त्यांची मंजूरी आली की बँक रक्कम देण्यास तयार आहे. असे करुन गैरअर्जदार बॅकेने कोणतीही ञूटीची सेवा दिलेली नाही. अर्जदाराला जर रक्कमेची आवश्यकता असेल तर आर.बी.आय. ने ठरवून दिलेल्या विहीत नमून्यातील अर्ज व त्यांसोबत डॉक्टराचे प्रमाणपञ व उपचारासाठीची सर्व कागदपञे दाखल करुन प्रस्ताव दिल्यास तो प्रस्ताव मंजूरीसाठी आर.बी.आय. कडे पाठविण्यास बँक तयार आहे. मंजूर होऊन आलेली रक्कम बँक अर्जदारास देण्यास तयार आहे. रक्कम न देऊन बँकेने कोणतीही ञूटी केलेली नाही. म्हणून सदरची तक्रार फेटाळावी अशी मागणी केली आहे. अर्जदार यांनी पूरावा म्हणून आपले शपथपञ, तसेच गैरअर्जदार यांनी पूरावा म्हणून शपथपञ दाखल केलेले आहे. दोन्ही पक्षकारानी दाखल केलेले दस्ताऐवज बारकाईने तपासून व वकिलामार्फत केलेला यूक्तीवाद ऐकून खालील मूददे उपस्थित होतात. मूददे उत्तर 1. गैरअर्जदार यांचे सेवेतील ञूटी सिध्द होते काय ? नाही. 2. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे. कारणे मूददा क्र. 1 - अर्जदाराचे बचत खात्या मध्ये रक्कम जमा आहेत ही बाब गैरअर्जदार यांना मान्य आहे. पण अर्जदार यांना रक्कमेची आवश्यकता पडली असेल ही बाब सूध्दा नाकारता येणार नाही. परंतु गैरअर्जदार बँकेवर आर.बी.आय. ने कलम (35 ए) हे कलम लावून बँकेच्या आर्थिक व्यवहारावर निर्बध लादले असल्यामूळे गैरअर्जदार आर.बी.आय. च्या परवानगीशिवाय रक्कम देऊ शकत नाही. त्यामूळे गैरअर्जदार यांच्या सेवेतील ञूटी होत नाही. गैरअर्जदार बँकेने म्हटल्याप्रमाणे अर्जदाराला जर रक्कमेची आवश्यकता असेल तर आर.बी.आय. ने ठरवून दिलेल्या विहीत नमून्यातील अर्ज, उपचाराचे कागदपञ व इतर कागदपञ दाखल करुन रक्कमे बाबतचा प्रस्ताव त्यांचेकडे सादर केल्यास तो प्रस्ताव बँक ताबडतोब आर.बी.आय.कडे पाठविण्यास तयार आहे व आर.बी.आय. ने मंजूर केलेली रक्कम अर्जदार यांना देण्यास तयार आहे. अशा प्रकारे रक्कम न देऊन बॅकेने कोणतीही सेवेत ञूटी केलेली नाही. वरील सर्व बाबीचा विचार करुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश 1. अर्जदाराचा तक्रार अर्ज खालील प्रमाणे मंजुर करण्यात येतो. 2. अर्जदार यांनी योग्य कागदपञासह रक्कमेबाबतचा प्रस्ताव आर.बी.आय. ने ठरवून दिलेल्या विहीत नमून्यात गैरअर्जदार बँकेकडे सादर करावा व बँकेने तो प्रस्ताव त्यांचे मार्फत आर.बी.आय. कडे सादर करावा व आर.बी.आय. ने मंजूर केलेली रक्कम ताबडतोब अर्जदार यांना दयावी. 3. मानसिक ञासाबददल आदेश नाही. 4. दावा खर्च पक्षकारांनी आपआपला सोसावा. 5. पक्षकाराना आदेश कळविण्यात यावा. श्री.बी.टी.नरवाडे पाटील श्रीमती सुजाता पाटणकर श्री.सतीश सामते अध्यक्ष सदस्या सदस्य गो.प.निलमवार लघूलेखक. |