Maharashtra

Parbhani

CC/11/110

Gokarnabai Maroti More - Complainant(s)

Versus

Manager,Relance General Insurance Company Limited,Mumbai - Opp.Party(s)

Adv.Maroti T.Parve

03 Oct 2011

ORDER


District Consumer Court,PARBHANIDistrict Consumer Court ,New Administrative Building,Near Telephone Bhavan PARBHANI
Complaint Case No. CC/11/110
1. Gokarnabai Maroti MoreR/o Pimpala Bhattya Tq.PurnaParbhaniMaharashtra ...........Appellant(s)

Versus.
1. Manager,Relance General Insurance Company Limited,MumbaiRelance General Insurance Company Limited,11 Relance Centre,Walchand Hirachand Marge Belard Estate,Mumbai-38MumbaiMaharashtra2. Manager,Kabal Insurance Services Pvt.Ltd.Divisional Office,AurangbadPlot No.07 Sequter E-1 Town Centre Cidco AurangbadAurangbadMaharashtra3. Thasildar Thasil Office,PurnaThasil Office,Purna Tq.PurnaParbhaniMaharashtra ...........Respondent(s)



BEFORE:
HONABLE MR. JUSTICE C. B. Pandharpatte ,PRESIDENTHONABLE MRS. Sujata Joshi ,MemberHONABLE MRS. Anita Ostwal ,Member
PRESENT :Adv.Maroti T.Parve, Advocate for Complainant

Dated : 03 Oct 2011
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

निकालपत्र

                        तक्रार दाखल दिनांकः-  29/04/2011

                                    तक्रार नोदणी दिनांकः- 04/05/2011

                        तक्रार निकाल दिनांकः- 03/10/2011

                                                                                    कालावधी 04 महिने 29 दिवस.

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍यायमंच, परभणी

अध्‍यक्ष -         श्री.चंद्रकात बी. पांढरपट्टे, B.Com.LL.B.

सदस्‍या                                                                                                    सदस्‍या

सुजाता जोशी B.Sc.LL.B.                                                          सौ.अनिता ओस्‍तवाल M.Sc.              

    

          गोकर्णाबाई भ्र.मारोती मोरे.                                 अर्जदार

वय 40 वर्ष.धंदा. शेती व घरकाम.                            अड.मा.तु.पारवे.

रा.पिंपळा भत्‍या ता.पूर्णा.जि.परभणी.     

               विरुध्‍द

1     व्‍यवस्‍थापक.                                           गैरअर्जदार.    

      रिलायंस जनरल इन्‍शुरन्‍स कं.लि.                       अड.जी.एच.दोडिया.                      

      11 रिलायंस सेंटर,वालचंद हिराचंद मार्ग,             

      बेलार्ड इस्‍टेट.मुंबई.400 038.

2     व्‍यवस्‍थापक.

      कबाल इन्‍शुरन्‍स सर्व्हिसेस प्रा.लि.                         

      विभागीय कार्यालय,भास्‍करायण एच.डी.एफ.सी.होमबिल्‍डींग.

      प्‍लाट नं.7 सेक्‍टर इ-1 टाऊन सेंटर,सिडको औरंगाबाद.

3     मा.तहसिलदार साहेब,                                                                             तहसिल कार्यालय,पूर्णा.ता.पूर्णा.जि.परभणी.                                                    

------------------------------------------------------------------------------------        

     कोरम  -    1)    श्री.सी.बी.पांढरपट्टे.      अध्‍यक्ष.

2)        सौ.सुजाता जोशी.                   सदस्‍या.                                              3)        सौ.अनिता ओस्‍तवाल.                 सदस्‍या.

-------------------------------------------------------------------------------------------------------          

        (  निकालपत्र पारित व्‍दारा श्री.सी.बी.पांढरपट्टे. अध्‍यक्ष.)

      शासनातर्फे उतरविलेल्‍या  शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत देय  नुकसान भरपाई मयत शेतक-याच्‍या वारसास  देण्‍याचे विमा कंपनीने नाकारुन त्रूटीची सेवा दिली म्‍हणून अर्जदाराने ही  तक्रार दाखल केली आहे.

            अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी की, अर्जदार मौजे पिंपळा भत्‍या ता.पूर्णा जि. परभणी येथील रहिवाशी आहे.महाराष्‍ट्र शासनाने राज्‍यातील संपूर्ण खातेदार शेतक-यांचा गैरअर्जदार क्रमांक 1 यानी पुरस्‍कृत  केलेल्‍या शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत विमा उतरविलेला होता त्‍या पॉलीसीचा अर्जदारचा मयत  पती मारोती भिमराव मोरे हा देखील लाभार्थी होता तारीख 17/07/2008  रोजी मयत मारोती भिमराव मोरे  याचा पाण्‍यात  बुडून अपघाती मृत्‍यू झाला. अर्जदारने त्‍यानंतर मयत पतीच्‍या शेतकरी विम्‍याची नुकसान भरपाई तीला मिळणेसाठी गैरअर्जदार क्रमांक 3 कडे मुदतीत तारीख 2/8/08 रोजी  नुकसान भरपाई मिळण्‍यासाठी क्‍लेमफॉर्मसह आवश्‍यक ती सर्व कागदपत्रे पाठवली होती.त्‍यानंतर गैरअर्जदार क्रमांक 3 ने 30/09/08 चे पत्र पाठवुन काही अपु-या कागदपत्रांची मागणी केली.त्‍याचीही पुर्तता अर्जदारने केली.परंतु नुकसान भरपाई मंजूर झाल्‍याचे कळवले नाही म्‍हणून अर्जदाराने शेवटी वकिला मार्फत गैरअर्जदार क्रमांक 1 ला नोटीस पाठवुन नुकसान भरपाईची मागणी केली होती नोटीस स्‍वीकारुनही गैरअर्जदारांनी दाद दिली नाही.अशा रितीने सेवात्रुटी करुन नुकसान भरपाई देण्‍यापासून वंचित ठेवले आहे म्‍हणून ग्राहक मंचात प्रस्‍तुतचा तक्रार अर्ज दाखल करुन नुकसान भरपाई रु.1,00,000/-   व्‍याजासह मिळावी याखेरिज मानसिकत्रासापोटी रु.10,000/- आणि अर्जाचा खर्च रु.25,000/- मिळावा अशी मागणी केलेली आहे.

तक्रार अर्जाचे पुष्टयर्थ अर्जदाराने आपले शपथपत्र ( नि. 2)  पुराव्यातील कागदपत्रात नि. 5 लगत एकूण  20  कागदपत्रांच्‍या छायाप्रती दाखल केलेली आहेत.

      तक्रार अर्जावर लेखी म्‍हणणे सादर करण्‍यासाठी गैरअर्जदारांना मंचातर्फे नोटीसा पाठविल्‍यावर गैरअर्जदार क्रमांक 1 विमा कंपनीने तारीख 9/8/11 रोजी आपला लेखी जबाब (नि.16) सादर केला. गैरअर्जदार क्रमांक 2 यानी पोष्‍टाव्‍दारे आपले लेखी म्‍हणणे मंचाकडे पाठविले होते ते दिनांक 28.06.2011 रोजी प्रकरणात नि. 11 ला समाविष्‍ठ केले. गैरअर्जदार क्रमांक 3 यांना मंचाची नोटीस स्‍वीकारुनही नेमले तारखेस मंचापुढे हजर झाले नाही.व लेखी म्‍हणणे सादर करण्‍यासाठी संधी देवुनही दिले नाही त्‍यामुळे त्‍यांचे विरुध्‍द तारीख 09/08/2011 रोजी एकतर्फा आदेश पारित करण्‍यात आला.          

      गैरअर्जदार क्रमांक 1 यानी आपल्‍या लेखी जबाबात नि.16  तक्रार अर्जातून त्‍यांच्‍या विरुध्‍द केलेल्‍या विधानांचा इन्‍कार करुन प्रस्‍तुतची तक्रार विमा कंपनी विरुध्‍द मुळीच चालणेस पात्र नाही त्‍यांचेकडून कोणत्‍याही प्रकारे सेवात्रुटी झालेली नाही असे म्‍हंटलेले आहे.कारण कबाल इन्‍शुरन्‍स ब्रोकरेज सर्व्‍हीसेस ( गैरअर्जदार क्रमांक 2 ) यांचेकडून आजपर्यंत मयत मारोती मोरे याच्‍या डेथक्‍लेमची कागदपत्रे कंपनीला मिळालेली नाहीत त्‍यामुळे अर्जदारला नुकसान भरपाई देण्‍याचा प्रश्‍नच उदभवत नाही.अर्जदारने शेतकरी विम्‍या संबंधी तक्रार अर्जातील बाकीचा मजकूर ही वैयक्तिक माहिती अभावी साफ नाकारला आहे. अतिरिक्‍त लेखी जबाबात पुढे असा खुलासा केला आहे की, शेतकरी विम्‍या संबंधी महाराष्‍ट्र सरकार व विमा कंपनी यांचे दरम्‍यान झालेल्‍या  लेखी करारनाम्‍यानुसार 90 दिवसाच्‍या ग्रेस पिरीयड मध्‍ये क्‍लेम मंजूर करणे बंधनकारक आहे परंतु अर्जदाराच्‍या मयत पतीच्‍या विमा क्‍लेमची कागदपत्रे कंपनीकडे आलेली नसल्‍यामुळे त्‍यांच्‍याकडून याबाबतीत  कसलीही सेवात्रुटी झालेली नाही.सबब तक्रार अर्ज खर्चासह फेटाळण्‍यात यावा. अशी शेवटी विनंती केली आहे.

लेखी जबाबाचे पुष्‍टयर्थ गैरअर्जदार नं 1 चे शपथपत्र (नि.17) दाखल केले आहे.

गैरअर्जदार क्रमांक 2 यानी आपल्‍या लेखी जबाबात (नि.11) असे निवेदन केले आहे की, शासनातर्फे उतरविलेल्‍या शेतकरी अपघात विमा नुकसान भरपाई दावा क्‍लेम संदर्भातील कागदपत्राची विमा कंपनीकडे आवश्‍यक ती पूर्तता व छाननी करण्‍यासाठी शासनाने त्‍याना मध्‍यस्‍थ सल्‍लागार म्‍हणून नेमलेले आहे त्‍यासाठी महाराष्‍ट्र शासनाकडून कोणताही मोबदला घेत नाहीत किंवा त्‍यांचेकडून विम्‍याचा हप्‍ताही स्विकारला जात नाही. मयत मारोती मोरे याच्‍या विमा क्‍लेमची कागदपत्रे तारीख 4/9/08 रोजी प्राप्‍त झाली होती.त्‍यानंतर काही अपु-या कागदपत्रांची पुर्तता करुन घेतलयावर विमा कंपनीकडे मंजुरीसाठी अर्जदाराचा प्रस्‍ताव तारीख 26/6/09 रोजी पाठवलेला आहे.व मंजुरीसाठी स्‍मरणपत्रे पाठवुनही अद्यापी काही समजलेले नाही. तो  प्रलंबीत आहे. सबब गैरअर्जदार क्रमांक 2 यांना या प्रकरणातून वगळण्‍यात यावे.
अशी शेवटी विनंती केली आहे.

तक्रार अर्जाचे अंतीम सुनावणीचे वेळी अर्जदारातर्फे अड.एम.टी.पारवे आणि   गैरअर्जदार क्रमांक 1 तर्फे अड दोडिया  यानी युक्तिवाद केला.

     

 

 

 

 

 

 

निर्णयासाठी उपस्थित होणारे मुद्दे.

    मुद्ये                                    उत्‍तर

1              गैरअर्जदार 1 याने अर्जदाराच्‍या मयत पतीच्‍या

मृत्‍यू पश्‍चात शेतकरी अपघात विम्‍याची नुकसान भरपाई

मंजूर करण्‍याच्‍या बाबतीत सेवात्रुटी केली आहे काय ?           होय  

  2           अर्जदार नुकसान भरपाई  मिळण्‍यास पात्र आहे  काय ?          होय    

                             कारणे

मुद्या क्रमांक 1 व 2 - 

      अर्जदाराचा मयत पती मारोती भिमराव मोरे हा  शेतकरी  अपघात विमा पॉलीसीचा लाभार्थी होता हे अर्जदाराने पुराव्‍यात सादर केलेल्‍या नि.5/4  वरील शेत जमिनीचे 7/12 उतारे व नमुना नं.8 चा उतारा, नि.5/4 वरील होल्‍डींग प्रमाणपत्र,  या कागदपत्रातील नोंदी मधून शाबीत झाले आहे.  दिनांक 17.07.2008 रोजी अर्जदाराच्‍या मयत पतीचा मालेगाव रोडवरील तुकाराम पावडे याच्‍या तीन मजली बिल्‍डींगच्‍या तळमजल्‍यात साठलेल्‍या पाण्‍यात बुडून मृत्‍यू झाला होता.ही वस्‍तूस्थिती पुराव्‍यात दाखल केलेल्‍या नि.5/9 वरील एफ.आय.आर., नि.5/10 वरील मरणोत्‍तर पंचानामा, नि.5/11 वरील भाग्‍यनगर नांदेड पालिस स्‍टेशन अ.मृत्‍यू रजि.क्रमांक 22/2008 मधील घटनास्‍थळ पंचनामा नि.5/12 वरील पी.एम.रिपोर्ट, या पुराव्‍यातून शाबीत झालेले आहे.परंतु पी.एम.रिपोर्ट मध्‍ये व्‍हीसेरा केमिकल अनॅलेसि‍ससाठी राखून ठेवला आहे.असे रिपोर्टचे शेवटी म्‍हंटलेले आहे.

      मयत मारोती भिमराव मोरे हा शेतकरी व्‍यक्तिगत अपघात विम्‍याचा लाभार्थी असल्‍यामुळे अर्जदाराने (मयताची पत्‍नी) विम्‍याची नुकसान भरपाई रुपये 1 लाख मिळणेसाठी गैरअर्जदार क्रमांक 3 कडे तारीख 2/8/2008 रोजी  विमा क्‍लेमसह आवश्‍क ती सर्व कागदपत्रे सादर केलेली होती त्‍याच्‍या छायाप्रती अर्जदाराने पुराव्‍यात नि. 5 लगत दाखल केलेल्‍या आहेत. विमा क्‍लेम मंजूर होण्‍यासाठी आवश्‍यक ती सर्व कागदपत्रे गैरअर्जदार क्रमांक 3 कडे सुपूर्द केलेली होती याबद्दल कोणतीही शंका उरत नाही. युक्तिवादाचे वेळी विमा कंपनीतर्फे अड.दोडीया यांनी मयताचा व्‍हीसेरा रिपोर्ट (नि.19/2) दाखल केलेला आहे.त्‍याचे अवलोकन केले असता अपघाताची घटना घडली त्‍या अगोदर मयत मारोती मोरे हा दारुच्‍या नशेत होता त्‍या कारणानेच नशेत असतांना त्‍याचा पाण्‍यात बुडून मृत्‍यू झाला होता.व्हीसेरा रिपोर्टमध्‍ये त्‍याच्‍या पोटात, किडनी आणि प्‍लीहामध्‍ये अनुक्रमें 103 मि.ग्रॅम.व 101 मि.ग्रॅम इथेअल्‍कोहोल असल्‍याचे आढळले होते असे नमुद केले आहे.अर्जदाराच्‍या पतीचा दारुच्‍या नशेत असतांना बिल्‍डींगच्‍या तळघरातील पाण्‍यात पडल्‍याने मृत्‍यू झाला होता हे जरी खरे असले तरी तो अपघाती मृत्‍यू होता आत्‍महत्‍या नव्‍हती असे मंचाचे मत आहे.विमा कंपनी पॉलिसी कंडीशन प्रमाणे शेतक-याचा दारुच्‍या नशेत असतांना मृत्‍यू झाला तर विमा नुकसान भरपाई देण्‍यास कंपनी जबाबदार नाही असा पॉलिसी नियम अटी बाबतचा कोणताही सबळ पुरावा उदाः पॉलिसी संबंधी शासनाशी केलेला करार मंचापुढे दाखल केलेला नाही.किंवा कंपनीची पॉलिसी नियम अटीची प्रतही दाखल केलेली नाही. अर्जदाराने पुराव्‍यात नि.5/20 वर दाखल केलेल्‍या तारीख 29/05/2009 रोजी शासनाने प्रसिध्‍द केलेल्‍या शेतकरी विम्‍याच्‍या परिपत्रकात देखील तसा कुठे उल्‍लेख दिसून येत नाही.एवढेच नव्‍हेतर गैरअर्जदार विमा कंपनीने लेखी जबाबात दारुच्‍या नशेत शेतक-याचा मृत्‍यू झाला होता त्‍यामुळे नियम अटींचे उल्‍लंघन  झाले म्‍हणून क्‍लेम नामंजूर केला आहे. अथवा विमा कंपनी नुकसान भरपाई देण्‍यात जबाबदार नाही असाही स्‍पष्‍ट बचाव घेतलेला नाही.उलट गैरअर्जदार क्रमांक 2 ने त्‍यांच्‍या लेखी जबाबात असे म्‍हंटले आहे की, अर्जदार कडून मिळालेल्‍या आवश्‍यकत्‍या सर्व कागदपत्रांची छाननी करुन अर्जदाराचा क्‍लेम मंजुरीसाठी विमा कंपनीकडे दिनांक 26/06/2009 रोजी पाठवलेला आहे.परंतु स्‍मरणपत्रे देवुनही त्‍यांनी मंजुरी बाबत कळवलेले नाही.असा खुलासा केलेला आहे.यावरुन गैरअर्जदार क्रमांक 1 ने आजपर्यंत मंजुरीविना क्‍लेम रखडत ठेवुन याबाबतीत निश्‍चीतपणे सेवा त्रूटी केली आहे असाच यातून निष्‍कर्ष निघतो. सबब मुद्दा क्रमांक 1 व 2 चे उत्‍तर होकारार्थी देवून आम्‍ही खालीलप्रमाणे आदेश देत आहोत.

         आदेश                         

1          अर्जदाराची तक्रार अशंतः मंजूर करण्‍यात येते.

2          गैरअर्जदार नं 1 यांनी अर्जदाराच्‍या मयत पतीच्‍या डेथक्‍लेमची नुकसान भरपाई

      रु 1,00,000/- आदेश तारखेपासून 30 दिवसाच्‍या आत अर्जदारास द्यावी.

3     याखेरीज मानसिक त्रास व सेवेतील त्रूटीबद्यल  नुकसान भरपाई म्‍हणून  रुपये 2000/- व तक्रार अर्जाचा खर्च म्‍हणून रुपये 1000/- आदेश मुदतीत द्यावा.

4     पक्षकाराना आदेशाच्‍या प्रती मोफत पुरावाव्‍यात

 

सौ. अनिता ओस्‍तवाल              सौ.सुजाता जोशी        श्री. सी.बी. पांढरपटटे

     सदस्‍या                        सदस्‍या                  अध्‍यक्ष

 


[HONABLE MRS. Sujata Joshi] Member[HONABLE MR. JUSTICE C. B. Pandharpatte] PRESIDENT[HONABLE MRS. Anita Ostwal] Member