निकालपत्र :- (दि.08/07/2011) (सौ.वर्षा एन.शिंदे,सदस्या) (01) प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला हे त्यांचे वकीलांमार्फत हजर झाले. त्यांनी त्यांचे लेखी म्हणणे दाखल केले आहे. युक्तीवादाच्या वेळेस उभय पक्षकार व त्यांचे वकील अनुपस्थिती असलेने प्रस्तुतची तक्रार गुणदोषावर निर्णित करणेत येते. सदरची तक्रार सामनेवाला क्र.1 विमा कंपनीने तक्रारदाराचा योग्य व न्याय क्लेम कोणताही निर्णय न देऊन सेवेत त्रुटी ठेवल्यामुळे दाखल करणेत आली आहे. (02) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी:- तक्रारदार या राशिवडे ता.राधानगरी येथील रहिवाशी असून तेथे त्यांची स्थावर व जंगम मालमत्ता आहे. सामेनवाला ही विमा कंपनी असून सदर कंपनीकडे तक्रारदाराचे पती मयत किरण गोपाळ पाटील यांचा श्री भारत विविध कार्यकारी संस्था मर्या. राशिवडे बुद्रुक मार्फत विमा उतरविलेला होता. सदर विमा पॉलीसीचा हप्ता नमुद संस्थेने अदा केलेला होता व आहे. तक्रारदाराचे पती दि.10/03/0009 रोजी सायंकाळी 6 वाजणेचे सुमारास आपल्या शेतातील निशिगंधा फुलांचे व किटकनाशक औषध फवारणी करत असताना अपघाताने त्यांचे तोंडातून विषारी औषध पोटामध्ये गेलेने बेशुध्द अवस्थेत पडले असता त्यांना ताबडतोब उपचारासाठी सी.पी.आर.हॉस्पिटल,कोल्हापूर येथे दाखल करणेत आले. औषधोपचारादरम्यान दि.11/03/2009 रोजी ते मयत झाले. सदरचा मृत्यू अपघाती असलेने अपघाताची नोंद राधानगरी पोलीस स्टेशन येथे होऊन पूर्ण तपास केला असता किटकनाशक औषध फवारणी करीत असताना अपघाताने त्यांचे तोंडामध्ये औषध गेलेने त्यांचा मृत्यू झालेचे निष्पन्न झाले. तक्रारदाराने वर नमुद संस्थेमार्फत सामनेवाला विमा कंपनीकडे योग्य त्या कागदपत्रांसह दि.15/06/2009 रोजी विमा दावा दाखल केला असता व्हिसेरा रिपोर्ट व मृत्यू कारणाचा अंतिम अहवाल नसलेचे कारणावरुन बेकायदेशीरपणे क्लेम नाकारला आहे. सबब तक्रारदाराचा क्लेम मंजूर होणेस पात्र असतानाही नामंजूर करुन सामनेवाला यांनी बेकायदेशीर कृती करुन सेवात्रुटी केली आहे. तक्रारदार ही गरीब अशिक्षीत विधवा असून राधानगरी तालूक्यातील दूर्गम भागात असणा-या राशिवडे गावात राहते. पतीचे मृतयूमुळे तक्रारदाराचे मनावर आघात झालेला आहे. प्रस्तुत विमा रक्कम न मिळालेसे तिचे व तिचे कुटूंबावर उपासमारीची वेळ येणार आहे. सबब प्रस्तुतची तक्रार मंजूर करुन सामनेवाला विमा कंपनीकडून तक्रारदारास विमा रक्कम रु.1,00,000/-दि.15/6/2009 पासून द.सा.द.शे.18 टक्केने मिळणेचा आदेश व्हावा अशी विंनती केलेली आहे. (03) तक्रारदाराने तक्रारीच्या पुष्टीप्रित्यर्थ क्लेम फॉर्म, अॅफिडेव्हीट, मृत्यू प्रमाणपत्र, लक्ष्मीपुरी पोलीस स्टेशनचे पत्र, मृतावस्थेचा दाखला, इन्क्वेस्ट पंचनामा, पोलीस अहवाल, कॉज ऑफ डेथ सर्टीफिकेट, पोस्ट मार्टेम रिपोर्ट, सामनेवाला यांचे पत्र, कॉज ऑफ डेथ अंतिम अहवाल इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत. (04) सामनेवाला क्र.1 यांनी दाखल केलेल्या लेखी म्हणणेनुसार मान्य केले कथनाखेरीज परिच्छेद निहाय तक्रारदाराची तक्रार नाकारली आहे. तक्रार अर्ज कलम 1 व 2 मधील मजकूराबाबत सामनेवाला यांना काही म्हणावयाचे नाही. कलम 3 व 4 मधील मजकूराबाबत सामनेवाला यांना त्याची काहीही माहिती नाही. सदरची बाब पुराव्यानिशी सिध्द करणेची जबाबदारी तक्रारदार यांची आहे. तक्रारदाराने क्लेम दाखल करताना आवश्यक ती कागदपत्रे दाखल केलेली नाहीत. सामनेवाला यांनी वेळोवेळी मागणी करुन व्हिसेरा रिपोर्ट व मृत्यू कारणाचा अंतिम अहवाल दाखल केलेला नाही. सदर कागदपत्रे क्लेम मंजूर करणेसाठी आवश्यक असतात. सबब सामनेवाला यांनी तक्रारदाराचा क्लेम नाकारलेला आहे. यामध्ये त्यांची कोणतीही सेवात्रुटी नाही; सबब तक्रारदाराची तक्रार नामंजूर करण्यात यावी व तक्रार अर्जाचा कोर्ट खर्च तक्रारदाराकडून सामनेवाला यांना देवविण्यात यावा अशी विनंती सामनेवाला यांनी सदर मंचास केलेली आहे. (05) सामनेवाला यांनी आपल्या लेखी म्हणणेच्या पुष्टयर्थ कोणतेही कागदपत्र दाखल केलेली नाहीत. (06) तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे, सामनेवाला यांचे लेखी म्हणणे इत्यादीचे बारकाईने अवलोकन केले असता महत्वाचे मुद्दे निष्कर्षासाठी येतात. 1. सामनेवाला विमा कंपनीने सेवेत त्रुटी ठेवली आहे काय? -- होय. 2. काय आदेश? -- शेवटी दिलेप्रमाणे मुद्दा क्र.1 :- तक्रारदाराचे पतीचा मयत किरण गोपाळ पाटील यांचा श्री भारत विविध कार्यकारी संस्था मर्या. राशिवडे बुद्रुक मार्फत व्यक्तीगत अपघात विमा योजनेअंतर्गत सामनेवाला यांचेकडे विमा उतरविलेला होता. दि.14/10/2009 चे पत्राने तक्रारदाराचा विमा दावा सामनेवाला विमा कंपनीने नाकारलेला आहे. सदर पत्रानुसार पॉलिसी क्र.47/08/3541 असून दावा क्र.47/2010/000057 असा आहे. प्रस्तुतचा दावा हा व्हिसेरा रिपोर्ट व मृत्यूच्या कारणाचा अंतिम अहवाल नसलेने नाकारलेला आहे ही वस्तुस्थिती निर्विवाद आहे. तक्रारदाराचे पती किरण गोपाळ पाटील दि.10/03/2009 रोजी सायंकाळी 6 चे सुमारास शेतामध्ये विषारी औषधाची फवारणी करीत असताना तोंडावाटे विषबाधा होऊन बेशुध्द अवस्थेत सी.पी.आर. हॉस्पिटल,कोलहापूर येथे दाखल केले असता उपचारादरम्यान दि.11/3/2009 रोजी 15/15 वाजता मयत झाला आहे. त्याबाबत आकस्मिक मयत दाखल करुन घेणेबाबत राधानगरी पोलीस स्टेशनचे दि.11/3/2009 चे पत्र आहे. तदनंतर मरणोत्तर पंचनामा झालेला आहे. मरणोत्तर पंचनाम्यामध्येही कलम 12 मध्ये वरील वस्तुस्थिती नमुद केलेली आहे. तसेच शवविच्छेदनासाठी पाठविेलेला फॉर्म सेकंड-बी मध्येही निशिगंधाचे फुलावर औषध फवारणी करत असताना विषारी औषध पोटामध्ये जाउुन विषबाधा होउुन उपचारादरम्यान मृत्यू झालेचे नमुद केले आहे. मृत्यूच्या कारणाच्या प्रमाणपत्रामध्ये तसेच शवविच्छेदन अहवालामध्ये व्हिसेरा व मृत्यूचे कारण राखून ठेवलेचे नमुद केले आहे. मात्र प्रस्तुत प्रकरणी मृत्यूच्या कारणांचा अंतिम अहवाल दाखल आहे. प्रस्तुत दि.31/12/2009 रोजी सी.पी.आर.हॉस्पिटल, कोल्हापूर येथील वैद्यकीय अधिका-यांनी राधानगरी पोलीस स्टेशनला मृत्यूच्या अंतिम कारणाबाबत कळवलेले आहे. त्यानुसार तक्रारदाराचे पतीचा मृत्यू हा Diffase Cerebral Oedema c Bil-Pneumonitis असे नमुद केलेले आहे. तक्रारदाराचे पतीच्या मृत्यूबाबतची वस्तुस्थिती व मृत्यूच्या अंतिम कारणाचा विचार करता तक्रारदाराचे पतीचा मृत्यू हा नैसर्गिक नाही ही वस्तुस्थिती निर्विवाद आहे तसेच कोणत्याही प्रकारे झालेली विषबाधा ही सेरेब्रल ओडीमाचे महत्वाचे कारण असलेचे विविध वैद्यकीय परिक्षणावरुन निदर्शनास येते. तक्रारदारचे पती हे त्याचे शेतामध्ये निशिगंधाचे फुलावर किटकनाशक औषधाची फवारणी करत असता सदर विषारी औषधाचा अंश तोंडाव्दारे त्याचे शरिरात गेला असलेची शक्यता नाकारता येत नाही. अशा प्रकारच्या घटना शेतक-यांच्या बाबतीत ब-याच वेळा घडलेचे दिसून येते. विषारी किटकनाशकाची फवारणी करताना बराच काळ फवारणी दरम्यान सदर विषारी औषधाच्या सानिध्यात राहिलेने तोंडावाटे वनाकाव्दारे होणा-या श्वासोच्छासाव्दारे विषारी औषधाचा अंश शरिरात प्रवेश करुन बेशुध्द अवस्था येते व त्यामुळे मृत्यू येऊ शकतो. तसेच मृत्यू झालेचे उदाहरणही आहे; सदर परिस्थिती तक्रारदाराचे पतीबाबत घडलेची वस्तुस्थिती दाखल कागदपत्रांवरुन निदर्शनास येते. तक्रारदाराचे पतीने जाणीवपूर्वक विषारी औषध प्राशन केले अथवा आत्महत्या केली असे निदर्शनास आले नाही तशा प्रकारची वस्तुस्थिती नाही. सदर बाबींचा विचार करता प्रस्तुत दावा मंजूरीसाठी लागणा-या अनेक कागदपत्रांपैकी व्हिसेरा रिपोर्ट व मृत्यूच्या अंतिम कारणांचा अहवाल हे कागद आहेत. मृत्यूचा अंतिम कारणांचा अहवाल प्रस्तुत प्रकरणी दाखल आहे. व्हिसेरा रिपोर्ट हा अपघाती मृत्यू निर्णित करणेचा एकमेव पुरावा नाही अथवा तशी निर्णायक अट नाही. सामनेवाला विमा कंपनीकडे वैद्यकीय तज्ञांचे पॅनेल असते. सामनेवाला विमा कंपनी वैद्यकीय तज्ञांचे मत घेऊन प्रस्तुत क्लेम निर्णित करु शकले असते. तसे न करता व्हिसेरा रिपोर्ट नाही या कारणास्तव व मृत्यूचे अंतिम कारणाचा अहवाल नसलेचे कारणास्तव पॉलीसीचा मूळ हेतू विचारात न घेता तांत्रिक कारणास्तव तक्रारदाराचा न्याययोग्य क्लेम नाकारुन सेवेत त्रुटी ठेवलेचे निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. वरील विस्तृत विवेचनाचा विचार करता तक्रारदाराचे पतीचा मृत्यू अपघाती आहे. सबब पॉलीसीप्रमाणे तक्रारदार रक्कम रु.1,00,000/- व्याजासह मिळणेस पात्र आहेत. प्रस्तुत व्याज हे दि.18/8/2008 पासून संपूर्ण रक्कम अदा होईपर्यंत देय राहील. तक्रारदार हया गरीब, असाहय्य, अशिक्षीत विधवा असलेने सामनेवालांचे सेवात्रुटीमुळे तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम मिळणेस पात्र आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे व खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे. आदेश 1) तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्यात येते. 2) सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदारास पॉलीसीप्रमाणे असलेली क्लेम रक्कम रु.1,00,000/-(रु.एक लाख फक्त) अदा करावी. सदर रक्कमेवर दि.14/10/2009 पासून ते संपूर्ण रक्कम मिळेपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्के प्रमाणे व्याज अदा करावे. 3) तक्रारदारास तक्रारीच्या खर्चापोटी रु.1,000/-(रु. एक हजार फक्त) अदा करावेत.
| [HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT | |