Maharashtra

Nanded

CC/10/79

Deubai Sambhaji Shidne - Complainant(s)

Versus

Manager, Reliance General Insurance com. Ltd. - Opp.Party(s)

Adv B.V. Bhure

30 Jun 2010

ORDER


District Consumer Reddressal Forum , NandedDistrict Consumer Forum , Visava Nagar, V.I.P. Road, Nanded
Complaint Case No. CC/10/79
1. Deubai Sambhaji Shidne Kapsi, Tq. Loha, Nanded.NandedMaharastra ...........Appellant(s)

Versus.
1. Manager, Reliance General Insurance com. Ltd. Belard estate, Mumbai.MumbaiMaharastra2. Branch Manager, Reliance General Insurance com. Ltd. Hingoli naka, Nanded.NandedMaharastra ...........Respondent(s)



BEFORE:

PRESENT :

Dated : 30 Jun 2010
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

 

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍यायमंच,नांदेड.
प्रकरण क्रमांक :-  2010/79.
                          प्रकरण दाखल तारीख - 06/03/2010
                          प्रकरण निकाल तारीख 28/06/2010
 
समक्ष  मा.श्री. बी.टी.नरवाडे, पाटील           - अध्‍यक्ष
      मा.श्रीमती सुवर्णा देशमूख, पिंगळीकर    - सदस्‍या.
       मा.श्री.सतीश सामते,                 - सदस्‍य.
 
देऊबाई भ्र. संभाजी शिदणे
वय 36 वर्षे, धंदा घरकाम                                 अर्जदार
रा. कापसी बु., ता.लोहा जि. नांदेड
     विरुध्‍द.  
1.   व्‍यवस्‍थापक
     रिलायन्‍स इन्‍शुरन्‍स कंपनी लि.
19, रिलायंस सेंटर, वालचंद हिराचंद मार्ग,
बेलार्ड इस्‍टेट मूंबई 400 038.                        गैरअर्जदार
2.   रिलायन्‍स इन्‍शुरन्‍स कंपनी लि.                      
     मार्फत शाखा व्‍यवस्‍थापक,  
     उज्‍वल इंटरप्रायजेसच्‍या वर
     हनूमान गढ कमानी जवळ, हिंगोली नाका, नांदेड.
 
अर्जदारा तर्फे वकील             - अड.बी.व्‍ही.भूरे
गैरअर्जदार क्र. 1 व 2 तर्फे वकील     -  अड.अविनाश कदम.
                               निकालपञ
             (द्वारा - मा.श्रीमती सूवर्णा देशमूख, सदस्‍या )
 
              गैरअर्जदार रिलायन्‍स इन्‍शूरन्‍स कंपनी यांचे सेवेतील ञूटी बददल अर्जदार यांनी खालील प्रमाणे तक्रार दाखल केली आहे.
              अर्जदाराची तक्रार थोडक्‍यात अशी की,मयत संभाजी खंडू शिदणे हा शेतकरी असून तो अर्जदार यांचा पती होता, मयत संभाजी हे त्‍यांची शेत जमिन गट नंबर 360 मध्‍ये 50 आर असून ती मौजे कापसी बु., ता.लोहा जि. नांदेड येथे शेती करीत होते.   सर्व व्‍यवस्थित चालू असताना अचानक दि.30.01.2008 रोजी स्‍वतची जनावरे मेंढया घेऊन किनाळा ता. नायगांव येथे गेले असता मेंढया चारत असताना ते नाल्‍यामध्‍ये
 
 
अनावधानाने पाय घसरुन पडले त्‍यामूळे बूडून त्‍यांचा अपघाती मृत्‍यू झाला. अर्जदाराच्‍या पतीचा मृत्‍यू झाल्‍यानंतर संबंधीत पोलिस पाटील कापसी बु., तसेच संरपंच ग्रामपंचायत कार्यालय किन्‍हाळा व गांव तंटामूक्‍त अध्‍यक्ष ग्रामपंचायत किन्‍हाळा यांनी तसा अहवाल दिलेला आहे. मयताचे वारसास शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत आर्थिक सहाय मिळणेसाठी अर्जदाराने दि.03.03.2009 रोजी तहसील कार्यालय लोहा यांचे कार्यालयात अर्ज दाखल केला. अर्जदाराने स्‍वतः दि.01.08.2009 रोजी सर्व आवश्‍यक कागदपञासह गैरअर्जदार क्र.1 कडे रजिस्‍टर्ड पोस्‍टाने सर्व कागदपञे पाठविली व ती कागदपञे गैरअर्जदार यांना मिळाली. प्रकरणात अर्जदाराने क्‍लेम फॉर्म, तलाठी व तहसीलदार यांच्‍याकडे विमा रक्‍कम मिळणे बाबत दिलेला अर्ज, 7/12 चा उतारा, नमुना नं.8-अ चा उतारा, 6-क चा उतारा  दाखल केलेला आहे. पॉलिसीचा कालावधी दि.15.07.2007 ते दि.14.7.2008 असा आहे व अपघाताची तारीख दि.30.01.2008 ची आहे व मृत्‍यू हा दि.30.01.2008 रोजी झाला. त्‍यामूळे दावा मूदतीत आहे व अर्जदार हा नूकसान भरपाई मिळण्‍यास पाञ आहे.  महाराष्‍ट्र शासनाने शेतकरी वैयक्‍तीक अपघात विमा योजना सूरु केली. त्‍या अनुषंगाने औरंगाबाद महसूल विभागात येणा-या सर्व शेतक-यांसाठी गैरअर्जदार क्र.2 रिलायन्‍स इन्‍शूरन्‍स कंपनी यांचेकडे शासनाने प्रिमियम भरुन पॉलिसी घेतली. म्‍हणून अर्जदार हे लाभार्थी आहेत. अर्जदाराची मागणी आहे की, त्‍यांचे प्रपोजल तहसीलदार लोहा यांचेमार्फत गैरअर्जदार क्र.1 यांना पाठविले असता, गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी आजपर्यत अर्जदारास कोणत्‍याही प्रकारची रक्‍कम दिली नाही. म्‍हणून अर्जदाराची मागणी आहे की, त्‍यांना विम्‍याची रक्‍कम रु,1,00,000/- सन 2009  पासून 12 टक्‍के व्‍याजासह गैरअर्जदार यांचेकडून मिळावेत तसेच मानसिक व शारीरिक ञासापोटी रु.50,000/- व दावा खर्च म्‍हणून रु.5000/- मिळावेत.                                
                  गैरअर्जदार क्र.1 व 2 हे वकिलामार्फत हजर झाले व त्‍यांनी आपले लेखी म्‍हणणे एकञितरित्‍या दाखल केलेले आहे. विमा पॉलिसी
ही अटी व शर्ती वर दिल्‍या जाते. अर्जदार  हे दि.30.01.2008 रोजी अपघाताने  मरण पावले याबददल कोणतेही रेकॉर्ड   अथवा ठोस पूरावा दाखल केलेले नाही.अर्जदार यांनी ते शेतकरी असल्‍याबददल व त्‍यांचे नांवे मौजे कापसी बु. ता.लोहा  जि. नांदेड येथे जमिन होती हे त्‍यांनी सिध्‍द केले पाहिजे. शासनाने शेतकरी वैयक्‍तीक अपघात विमा योजना गैरअर्जदार क्र.2 याचेकडून त्‍यांनी काढली आहे हे त्‍यांना मान्‍य नाही. मयत हा शेतकरी आहे हे त्‍यांना अमान्‍य आहे. मयत संभाजी यांचा अपघात झाला व ते मरण पावले हे त्‍यांना मान्‍य नाही. अर्जदार यांनी एफ.आय.आर,. खबरी रिपोर्ट व
 
 
फायनल इन्‍व्‍हेस्‍टीगेशन दाखल केलेले नाही. अर्जदार यांनी अपघाता बददल पोलिस स्‍टेशन येथे तक्रार केलेली नाही. तसेच अर्जदार यांनी घटना घडल्‍यानंतर सात दिवसांचे आंत तक्रार दाखल केलेली नाही. गैरअर्जदार हे अर्जदार यांना विम्‍याची रक्‍कम रु.100,000/- तसेच रु.50,000/- मानसिक ञासापोटी देण्‍यास जबाबदार नाहीत. गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना कोणतीही ञूटीची सेवा दिलेली नाही. त्‍यामूळे अर्जदाराची तक्रार खर्चासहीत खारीज करावी असे म्‍हटले आहे.                
                 अर्जदार यांनी पूरावा म्‍हणून आपले शपथपञ, तसेच गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी पूरावा म्‍हणून शपथपञ दाखल केलेले आहे. दोन्‍ही पक्षकारानी दाखल केलेले दस्‍ताऐवज बारकाईने तपासून व पक्षकारांचा युक्‍तीवाद ऐकून खालील मूददे उपस्थित होतात.
          मूददे                                       उत्‍तर
 
1.   गैरअर्जदार यांचे सेवेतील ञूटी सिध्‍द होते काय ?         होय.
2.   काय आदेश ?                           अंतिम आदेशाप्रमाणे.
                        कारणे
मूददा क्र. 1 ः-
              अर्जदार   यांचे पती मयत संभाजी खंडू शिदणे यांचा दि.30.01.2008 रोजी स्‍वतची जनावरे मेंढया घेऊन किनाळा ता. नायगांव येथे गेले असता मेंढया चारवत असताना ते नाल्‍यामध्‍ये अनावधानाने पाय घसरुन पडले त्‍यामूळे बूडून त्‍यांचा मृत्‍यू झाला. या बददलचा   पूरावा म्‍हणून तलाठयाचे प्रमाणपञ,तहसीलदार यांना दिलेले पञ,पोलिस पाटलाचा अहवाल, मृत्‍यू दाखला प्रमाणपञ, अर्जदार व मयताचे निवडणूक आयोगाचे ओळखपञ, मरणोत्‍तर पंचनामा, गाव नमूना सात तसेच बारा,गाव नमूना आठ, गाव नमूना सहा क, मराठवाडा ग्रामीण बँकेचे पासबूक, इत्‍यादी कागदपञ दाखल केलेले आहेत. दि.3.3.2009 रोजी तहसीलदार लोहा यांना मयताचे अपघाती मृत्‍यू बददल रु.1,00,000/- मिळण्‍यासाठी कबाल इन्‍शूरन्‍स कंपनीचा क्‍लेम फॉर्म नंबर 1, भाग नंबर 2 भरुन दिलेला आहे.  पोलिस पाटलाचे अहवालामध्‍ये तसेच तंटामूक्‍ती समीती मौ. कापसी बु. यांचे प्रमाणपञ, ग्रामपंचायतचे मृत्‍यू दाखलला प्रमाणपञ या सर्वामध्‍ये अर्जदाराचा मृत्‍यू हा अपघाताने झाला असे म्‍हटलेले आहे, म्‍हणजे मृत्‍यू हा अपघातानेच झालेला आहे. त्‍यामूळे मृत्‍यू बददल गैरअर्जदार यांना आक्षेप नाही. मयत संभाजी यांचे 7/12 या प्रकरणात दाखल असून ते शेतकरी असल्‍याबददल त्‍यांच्‍या नांवाचा 7/12 व गाव नमूना आठ- अ,  दाखल आहे. याप्रमाणे गट  नंबर 360 मध्‍ये 50 आर ही जमिन कापसी बु. ता.लोहा येथे आहे.
 
 
अर्जदार देऊबाई व मयत संभाजी यांचे निवडूणक ओळखपञ दाखल असून यावरुन अर्जदार ही मयत संभाजी यांची पत्‍नी आहे. ग्रामपंचायत कापसी बु. यांनी वरील सर्व वारसाची नांवे वारसा प्रमाणपञामध्‍ये दिलेली आहे. म्‍हणजे वारसा बददल वाद नाही. तसेच मृत्‍यूनंतर दाव्‍यासाठी क्‍लेम फॉर्म नंबर 1 पूर्ण भरुन घेऊन तहसीलदार लोहा यांना दिल्‍याची नोंद आहे. दि.30.01.2008 रोजीला अपघात झाला, तहसीलदार लोहा यांना लगेच कळविण्‍यात आले, पण 90 दिवसांचा अवधी क्‍लेम दाखल करण्‍यास होता, त्‍यामूळे तक्रार ही मूदतीत नाही असा आक्षेप घेता येणार नाही. कारण हा नियम जरी असला तरी बंधनकारक नाही. खेडयापाडयातील शेतकरी हा अडाणी असतो. त्‍यांना शासनाच्‍या योजनेची माहीती नसते. घरी अशी घटना घडल्‍यानंतर ते दूःखात असतात. त्‍यामूळे जबाबदारीने क्‍लेम दाखल करणे शक्‍य नसते. म्‍हणून अशा प्रकारचा उशिर झाला असल्‍यास शासनाचे परिपञका प्रमाणे क्‍लेम वेळेत दाखल करणे आवश्‍यक असले तरी हे बंधनकारक नाही, त्‍यामूळे झालेला विलंब हा माफ करुन केवळ टेक्‍नीकल कारणासाठी शेतक-याचा दावा नाकारु नये असे स्‍पष्‍ट म्‍हटले आहे.   शेतक-याचा मृत्‍यू अपघाती झाला हे स्‍पष्‍ट आहे त्‍यामूळे गैरअर्जदारांनी अर्जदारास    विम्‍याची रक्‍कम दिली पाहिजे हे न्‍यायाच्‍या दृष्‍टीने उचित आहे. विम्‍याची रक्‍कम ही मयताच्‍या पत्‍नीस मिळाली पाहिजे. काहीही कारणे सांगून व उगीच कागदपञाची अवाजवी मागणी म्‍हणजे सेवेतील ञूटी आहे. गैरअर्जदार यांना त्‍यांचे जबाबदारीतून मुक्‍त होता येणार नाही.
              वरील सर्व बाबीचा विचार करुन आम्‍ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
                           आदेश
1.                                         अर्जदाराची तक्रार खालील प्रमाणे मंजूर करण्‍यात येते.
2.                                         गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी अर्जदार यांना हा निकाल लागल्‍यापासून 30 दिवसांचे आंत विम्‍याची रक्‍कम रु.1,00,000/-,मूदतीत रक्‍कम न दिल्‍यास वरील रक्‍कमेवर 12 टक्‍के व्‍याजाने पूर्ण रक्‍कम वसूल होईलपर्यत व्‍याजासहीत दयावेत.
3.                                         गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी अर्जदार यांना मानसिक ञासाबददल   रु.2000/- व दावा खर्च म्‍हणून रु.1,000/- दयावेत.
4.                                         पक्षकारांना आदेश कळविण्‍यात यावा.
 
 
श्री.बी.टी.नरवाडे पाटील                                               श्रीमती सुवर्णा देशमूख                             श्री.सतीश सामते      
            अध्‍यक्ष                                                                         सदस्‍या                                                   सदस्‍य.