नि का ल प त्र:- (व्दारा- मा. श्री. शरद डी. मडके, अध्यक्ष) (दि.28-01-2016)
1) वि. प. कॅरीको रोड कॅरिअर यांनी तक्रारदारांना द्यावयाचे सेवेत त्रुटी ठेवलेने, तक्रारदारांनी ग्राहक सरंक्षण कायदा कलम 1986, कलम-12 अन्वये प्रस्तुतची तक्रार मंचात दाखल केली आहे.
2) तक्रारदार यांचा ‘अरविंद इंडस्ट्रीज’ नावाने कापड खरेदी विक्रीचा व्यवसाय असून, स्वत:चे कुटूंबियाचे उदरनिर्वाहाकरिता सदरचा व्यवसाय करीत आहेत. वि.प. नं. 2 कॅरीको रोड कॅरीअर नावाने ट्रान्सपोर्टचा व्यवसाय करणा-या संस्थेचे व्यवस्थापक असून, वि.प. नं. 2 हे वि.प. नं. 1 हे इचलकरंजी येथील ऑफिस आहे.
3) तक्रारदार यांनी दि. 1-10-2013 रोजी बील नं. 259, एल.आर. नं. 3485-10 सुती कापड एकूण 2181.60 वि.प. च्या ट्रान्सपोर्टमधून पाठविले होते. सदर माल योग्य स्थितीत पाठविणेची हमी व खात्री वि.प. यांनी दिली होती.
4) तक्रारदारांनी कथन केले की, वाहतुकीचे दरम्यान पाण्याचे भिजुन कपडयाचे प्रचंड नुकसान झाले, व ते कापड मोहन टेक्स्टाईल्स यांनी स्विकारले नाही. वि.प. यांच्या निष्काळजीपणामुळे सदर नुकसान झाले. तक्रारदार यांनी दि. 3-01-2014 रोजी वि.प. कडून रक्कमेची मागणी केल्यावर 15 दिवसांची मुदत द्या, नुकसानभरपाई देतो असे वि.प. नी सांगितले. तक्रारदार यांनी दि. 6-03-2014 रोजी नोटीस पाठविली व सदर मालाची रक्कम व व्याजाची मागणी केली, पण वि.प. यांनी दाद दिली नाही.
5) वि.प. नं. 1 व 2 यांनी दि. 3-12-2014 रोजी लेखी म्हणणे सादर करुन तक्रार अर्जातील मजकूर स्पष्टपणे नाकारला आहे. वि.प. यांनी जसा माल घेतला तसा कलकत्ता येथे पोहचवला आहे. सदर कामातील नमूद कापड कोणत्याही तज्ञ व्यक्तीकडून तपासून घेतले नाही. व कोणताही पुरावा दाखल केला नाही. सदर माल व्यापारी तत्वावर पाठविला असल्याने तक्रारदार ग्राहक होत नाहीत.
6) वि.प. यांनी पॅरा. 13 मध्ये नमूद केले की, सदर दिवशी ट्रकमधून कलकत्ता येथे 280 गाठी माल पाठविला त्यामध्ये तकक्रारदाराचा माल मधल्या कप्प्यात ठेवला होता. सदर गाठीच्या खाली व वर अन्य कापड माल व्यवस्थित पोहचलेला आहे. तक्रारदाराचा माल मधल्या थप्पीत असलेने नुकसान होण्याचा प्रश्न येत नाही.
7) वि.प. यांनी पॅरा. 14 मध्ये म्हटले की, वि.प. यांनी यांचेकडे गोडावून भाडे इत्यादी मागितले असता तक्रारदार यांनी जबाबदारी टाळली. तक्रारदाराचे कापड मालाचे डिब्रेंज दररोज रक्कम रु. 360/- होते. त्या हिशोबाने माल घेऊन जाणेबाबत तक्रारदारांना सांगितले असता खोटी तक्रार दाखल केली.
8) तक्रारदार यांनी तक्रारीत पुढील कागदपत्रे दाखल केली आहेत. वि. प. यांना दि. 6-03-2014 रोजी पाठविलेली नोटीस, नोटीस वि.प. यांना मिळालेची पोहच पावती, तक्रारदार यांनी वि.प. ना दिलेले दि. 3-01-2014 रोजीचे पत्र, पी. टेक्स्टाईल यांनी तक्रारदारांना दिलेले पत्र, वि.प. नी तक्रारदाराना दिलेले पत्र, वि.प. यांचेकडील कन्साईनमेंट नोट दि. 8-06-2014 इत्यादी कागदपत्रे दाखल केलेली आहेत.
9) तक्रारदार यांनी दि. 13-07-2015 रोजी शपथपत्र पुरावा म्हणून दाखल केले. वि.प. यांनी पुराव्याचे शपथपत्र दि. 5-08-2015 रोजी दाखल केले. दोन्ही बाजूंनी लेखी युक्तीवाद दाखल केला.
10) मंचाचे मते खालील मुद्दे उपस्थित होतात.
मुद्दे उत्तरे
1. वि.प. यांनी सेवेत त्रुटी केली आहे काय ? होय
2. तक्रारदार नुकसानभरपाई मिळणेस पात्र आहेत का ? होय
3. काय आदेश ? तक्रार अर्ज अंशत: मंजूर.
का र ण मि मां सा –
11) तक्रारदार यांनी तक्रारीत पुढील कागदपत्रे दाखल केली आहेत. वि. प. यांना दि. 6-03-2014 रोजी पाठविलेली नोटीस, नोटीस वि.प. यांना मिळालेची पोहच पावती, तक्रारदार यांनी वि.प. ना दिलेले दि. 3-01-2014 रोजीचे पत्र, पी. टेक्स्टाईल यांनी तक्रारदारांना दिलेले पत्र, वि.प. नी तक्रारदाराना दिलेले पत्र, वि.प. यांचेकडील कन्साईनमेंट नोट दि. 8-06-2014. वि.प. यांनी तक्रारदार यांचा माल ट्रान्सपोर्टसाठी स्विकारला असे मान्य केले आहे. सदर माल हा कलकत्ता येथे स्विकारला नाही हे दोन्ही बाजूंना मान्य आहे. वि.प. यांनी लेखी म्हणणेत पॅरा. 5 मध्ये म्हटले आहे की, तक्रारदार यांनी ज्या स्थितीत माल दिला त्याच स्थितीत कलकत्ता येथे पोहच केला व तो माल मोहन टेक्स्टाईल यांनी स्विकारला नाही याची जबाबदारी वि.प. वर नाही.
12) वि.प. यांनी आपल्या लेखी म्हणणे पॅरा 16 मध्ये म्हटले आहे की, तक्रारदार हे गोडावून भाडे, डिब्रेंज व नुकसान भरपाई अशी एकूण रु. 2,00,000/- वि.प. यांना देणे लागतात, ते टाळण्यासाठी तक्रार दाखल केली आहे.
13) दि कॅरिअर अॅक्ट, 1865 मधील तरतुदी या प्रकरणी लागू होतात. या कायद्याप्रमाणे मालाची सुरक्षितपणे वाहतुक करणे व योग्य ठिकाणी सांगितलेल्या मुदतीत, वेळेत माल पोहोचता करणे बंधनकारक आकहे. वाहकांनी माल पाठवणा-याच्या सर्व सुचनांचे पालन करणे आवश्यक आहे. वि.प. यांनी आपल्या लेखी युक्तीवाद पॅरा. 18 मध्ये म्हटले आहे की, कलकत्ता येथील पार्टीने माल घेऊन गेलेनंतर तो दोन दिवसानंतर गोडावूनसमोर रस्त्यावर आणून ठेवून ते निघून गेले ही वस्तुस्थिती तक्रारदार यांनी अर्जात नमूद केली आहे. मंचाचे मते वि.प. यांनी तक्रारदार यांचा माल मोहन टेक्स्टाईलकडे सुरक्षित देणे आवश्यक होते व जर त्यांनी स्विकारला नसेल तर त्यासंबंधी त्वरीत माहिती तक्रारदार यांना कळविणे आवश्यक होते.
14) वि.प. यांनी सदर माल मोहन टेक्स्टाईल यांनी स्विकारला नाही, त्यावेळी तक्रारदार यांना कल्पना दिली असे दिसून येत नसून, सदर मालाच्या सुरक्षेसाठी गोडाऊन भाडे, डिब्रेंज व नुकसानभरपाईपोटी रक्कम रु. 2,00,000/- मागणे बेकायदेशीर असून तक्रारदार यांना देण्यात येणा-या सेवेत त्रुटी आहे व अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केल्याचे स्पष्ट दिसून येते. सदर अनुचित व्यापारी प्रथेचा वापर केल्याने व सेवेतील त्रुटीने, तक्रारदार यांना मानसिक त्रास झाल्याचे दिसून येते. तक्रारदार यांचा व्यवसाय हा कुटूंबाच्या उदरनिर्वाहासाठी करीत असल्याने, तक्रारदार हे वि.प. नं. 1 व 2 चे ग्राहक आहेत.
15) वि.प. यांनी सदर माल दि. 1-10-2013 रोजी कलकत्ता येथे देणेसाठी ताब्यात घेतला त्या दिवसांपासून वि.प. हे मालाच्या किंमतीवर व्याज देण्यास बांधील आहेत. वि.प. यांनी गोडाऊन भाडे, डिब्रेंज चार्जेसबद्दल कोणताही पुरावा दाखल केला नसून, दररोज रक्कम रु. 360/- डिब्रेंजसाठी मागणे संयुक्तिक नाही. मंचाचे मते, वि.प. नं. 1 व 2 हे तक्रारदार यांना रक्कम रु. 1,13,880/- देणेस संयुक्तिक व व्यक्तीगत जबाबदार आहेत. सदर रक्कमेवर दि. 1-10-2013 रोजीपासून द.सा.द.शे. 12 % व्याज देणे वि.प. नं. 1 व 2 यांचेवर बंधनकारक आहे. तसेच वि.प. नं. 1 व 2 यांनी व्यक्तीगत व संयुक्तिकरित्या तक्रारदारांना मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 10,000/- व तक्रार अर्जाचे खर्चापोटी रक्कम रु. 3,000/- द्यावेत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. न्यायाचे दृष्टीने मंच खालीलप्रमाणे आदेश देत आहे. सबब, आदेश.
आ दे श
1) तक्रारदाराची तक्रार अंशत: मंजूर करणेत येते.
2) वि.प. नं. 1 व 2 यांनी व्यक्तीगत व संयुक्तिकरित्या तक्रारदारास रक्कम रु. 1,13,880/- (अक्षरी रुपये एक लाख तेरा हजार आठशे ऐंशी फक्त) दि. 1-10-2013 रोजीपासून द.सा.द.शे. 9 % व्याजासह द्यावेत.
3) वि.प. नं. 1 व 2 यांनी व्यक्तीगत व संयुक्तिकरित्या तक्रारदारास मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 10,000/- (अक्षरी रुपये दहा हजार फक्त) द्यावेत. तसेच तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रु. 3,000/- (अक्षरी रुपये तीन हजार फक्त) द्यावेत.
4) वरील आदेशाची प्रमाणित प्रत मिळालेपासून वि.प. यांनी 30 दिवसांचे आत आदेशाची पूर्तता करावी.
5) सदर आदेशाच्या प्रमाणीत प्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठविण्यात याव्यात.